(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • शेतकरी राजा

    शेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे

  • इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास

    विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का?   इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का?  रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का?  असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.  याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात,  त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं,  याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल.

  • जगणे संघर्ष झाले

    वाढत्या भ्रष्ट्राचारामुळे जीवन संघर्षमय झाले सर्वसामान्यांचे.

  • चापडा

    हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा घेणारा सदर ठाण्याची वनजीवन संपदा.


    डोंगराळ माळरानांनी सजलेल्या विस्तृत ठाण्याच्या जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या तशी फार. देशभर आढळणाऱ्या अनेक सापांच्या प्रजातींपैकी काही प्रजाती या आपल्या शहराला लागून असलेल्या जंगलात आजही मोठ्या संख्येने आपलं अस्तित्व टिकवून आहेत. खरंतर भारतात आढळणाऱ्या सापांची संख्या तशी फार असली तरीही यातील काही जाती विषारी आहेत. विषारी सापांचा आढळ हा विविध ठिकाणी पाहायला मिळतो. घनदाट जंगलात, डोंगररांगांजवळ, गवताळ भागात, पाणवठ्याजवळ, दगड कपारीत तर काही विषारी साप हे मनुष्यवस्तीजवळ ही सापडतात. एकूण विषारी सापांपैकी मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने सापडणारे असे चार विषारी साप असून हे साप अन्नाच्या शोधात मनुष्यवस्तीजवळ येतात. या चार सापांनंतर मनुष्यवस्तीजवळ आढळणारा अशा सापांच्या यादीत चापडा या विषारी सापाची गणना करता येईल.

    जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक जाती उपजाती पाहायला मिळतात. या सापांना राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणानुसार यांचा अधिवास त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र, या चापडा सापाचा अधिवास हा केवळ भारतातच आणि त्यातही पूर्व आणि पश्चिम घाटाच्या पट्ट्यातच हा चापडा साप आढळतो. आपल्या भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ असून याच्या रंगात तसेच आकारात ठिकाणानुसार काहीसा फरक आढळून येईल.

    या सापाची नोंद आपल्या इथे माथेरान, कोयना, भंडारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, अंबोली, कर्नाटक या सारख्या भागात डोंगरावरील जंगलात हा बांबू पिट व्हायपर अथवा चापडा सहज सापडतो.आपल्या मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यात येऊर, नागला बंदर, ओवळा इथलं जंगल, कल्याण-डोंबिवली नजीक गांधारी, निळजे या परिसरात तसेच नवी मुंबई, पनवेल, उरण इथे हा साप सापडतो.

    चापडा हा साप व्हायपर या सापांच्या प्रकारात मोडतो. व्हायपर या जातीचे असे तसे रागीट आणि फारच चिडखोर असे असतात. आपल्या इथे मनुष्यवस्तीजवळ सापडणाऱ्या चार सापांपैकी दोन्ही व्हायपर या प्रकारातलेच आहे. नाग, मण्यार या सापांशिवाय फुरसं म्हणजेच साउस्केल व्हायपर आणि गुणच म्हणजेच रसल व्हायपर हे चार विषारी साप मनुष्यवस्तीजवळ अधिक येतात ते उंदीर, पाली यांच्या शोधात. या सापांचा दंश हा अनेकदा न कळत यांच्याजवळ गेल्याने वा अपघाताने सर्वाधिक झाल्याचं लक्षात येतो.

    छायाचित्राची तांत्रिक माहिती
    ठाण्यातल्या येऊरच्या जंगलातील पाठवणा पाडा या भागात सापडा सापाचं हे छायाचित्र मी टिपले आहे. चापडा साप अतिशय विषारी असल्याने याची फोटोग्राफी करताना फार काळजी घ्यावी लागली होती.

    या छायाचित्रासाठी कॅननचा ५० डी कॅमेरा आणि टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स वापरली आहे. कॅमेर्‍यात अपार्चर एफ ५.६, शटरस्पीड १/६० आणि आयएसओ ४०० ठेवून हे छायाचित्र घेतले गेले आहे.

    ("पुढारी" मध्ये पूर्वप्रकाशित)

  • एक विसरलेला इतिहास

    2011 मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी लक्ष्मीचंद जैन यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्म विभूषण दिले, हे तेच लक्ष्मीचंद जैन होते ज्यांनी स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधात राजदूत असताना देशाने अणूचाचणी घेतली म्हणून भूमिका घेतली होती.

  • सरस्वती सेकंडरी स्कूल – नवकांती पालवली विद्याभवनी !

    नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे.

  • रेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया

    रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास,  रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस,  वेटिंग रुम्स,  स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती….  खरंतर या जंत्रीला शेवटच नाही,  या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच  `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.

  • सामाजिक शिष्टाचार – प्रस्तावना

    आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्‍याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्‍यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांना चांगल्या बोलण्या-वागण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

  • सामाजिक शिष्टाचार – संघभावना

    कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.

  • पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’

    राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय.