वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला.
April 21, 2024
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????
प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत, त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशेवर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे, दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा ३० सेमी / १ फूटी दगडी कठडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतके देखभाल न करावी लागणं हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.
August 7, 2016
हे विश्व आपण पाहतो ते खरच real आहे का ? जसे स्वप्नात आपल्याला जागे झाल्याशिवाय स्वप्न की अस्तित्व कळत नाही अगदी तसेच या अस्तित्वाला समजायला तुम्हाला जागाव लागेल (You have to awake). असे म्हणू शकतो कारण आपल्या संसारी जीवनात आपण तितके व्यस्तच आहोत. त्यापासून थोडे लक्ष वेधण्यासाठी सद्या काही चर्चेत असलेल्या science बद्दल काही रहस्यमय facts आणि theory आपण पाहणार आहोत .
March 23, 2019
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, निकाल झाला असला तरी हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!
- ऍड. हरिदास उंबरकर,
बुलडाणा
मो. 9763469184
December 4, 2017
खाद्य तेले
आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी भीती मनात कुठेतरी बसलेली मंडळी आहेत. ह्या विषयावर प्रकाश टाकणार आहेच, परंतु त्यापूर्वी एका ओळीत सांगायचे तर “अति सर्वत्र वर्जयेत” हे वाक्य कायम ध्यानात ठेवावे. स्निग्धपदार्थ दोन प्रकारे आहारातून सेवन केली जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तूप तेल यांसारखे पदार्थ आणि अप्रत्यक्ष म्हणजे आहारातील इतर पदार्थांमधून जाणारा स्निग्धांश, जसे शेंगदाणे, चिक्की, लाडू इ.
ही भीती कोठून आली?
स्निग्ध पदार्थ हृदयाला घातक आहेत ही भीती पश्चिमी देशांकडून आपल्याकडे आली. ज्यांच्या आहारात फक्त आणि फक्त मांसाहारच असतो त्यांना ही भीती असणे साहजिक आहे. मांसाहारातून (रेड मीट) अप्रत्यक्षपणे अवाजवी प्रमाणात घातक स्निग्धांश शरीरात जातो आणि त्यामुळे अशांना “तेल – तूप खाऊ नका” हे आवर्जून सांगणे जरुरीचे आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात फोडणीच्या स्वरूपात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात स्निग्धांश सेवन केला जातो. त्यामुळे शाकाहारींनाही ही भीती बाळगायला हवी. प्रथिनांमध्ये आणि पिष्टमय पदार्थांमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये ४ तर स्निग्ध पदार्थांमध्ये ९ उष्मांक (कॅलरीज) असतात. म्हणून जास्त स्निग्ध पदार्थ सेवन करणाऱ्यांना व्यायामाच्या माध्यमातून त्या बर्न करणे अधिक जरुरीचे असते. तेल तूप पचायला तुलनेने अधिक जड असतात आणि शरीरातील मेदाशी ह्याचे साधर्म्य असते म्हणून ह्याने चरबी वाढते. प्रौढ पुरुषांना दर दिवशी सुमरे २५ ते ४० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते तर स्त्रियांना २० ते ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते.
आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा आणि मज्जा असे ४ प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ह्यापैकी गुणधर्मांच्या दृष्टीने घृत हे सर्वोत्तम, तेल हे त्यापेक्षा कमी, वसा त्याहून कमी आणि मज्जा सर्वात कनिष्ठ असल्याचे वर्णन आहे. ह्या ४ स्निग्ध पदार्थांपैकी तेल संपूर्णपणे वनस्पतीजन्य असून बाकीचे प्राणिज स्नेह आहेत. घृत (तूप) हे प्राण्यांच्या दुधातील स्निग्धांश वेगळा काढून तयार केले जाते आणि वसा आणि मज्जा प्रत्यक्ष प्राण्यांच्या शरीरातून काढली जाते. ह्यात ट्रान्स फॅट्स, धार्मिक विचारांच्या दृष्टीने ह्याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही वसा आणि मज्जा खूप जड आहेत. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्यपदार्थाची चव सुधारते. भाजलेला पापड आणि तळलेला पापड, साधे वरण आणि फोडणीचे वरण किंवा साधी भाजलेली पोळी आणि तूप लावलेली पोळी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
आधुनिक विज्ञान शाखेत स्निग्ध पदार्थांवर बरेच संशोधन झाले आहे. स्निग्ध पदार्थांचे विश्लेषण करून त्यातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज आपल्याला उपलब्ध आहे. विविध खाद्य तेलांविषयी विचार करतांना पुफा, मुफा, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. त्याविषयी नेमकी व थोडक्यात माहीती आपल्याला असणे जरुरीचे आहे.
वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांना अधिक टिकाऊ व अधिक स्वादिष्ट करण्यासाठी हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया केली जाते. ही हायड्रोजनेशनची क्रिया अपूर्ण झाल्यास त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. ह्या ट्रान्स फॅट्स रक्तातील एल. डी. एल. (स्वास्थ्यास घातक चरबी) वाढवितातव एच. डी. एल. (स्वास्थ्यवर्धक चरबी) कमी करतात. परिणामी हृदयाला रक्ताभिसरण करणाऱ्या धमन्या कडक होतात, कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून तेल खरेदी करतांना शक्यतो हायड्रोजनेटेड तेलाचा वापर करू नये. सरकारी नियमांनुसार तेलाच्या डब्यावर/ पाकिटावर हे छापणे बंधनकारक आहे.
स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात. २२ ते २५० डिग्री तापमानात गोठणारे सॅच्युरेटेड व ह्याच तापमानात द्रवावस्थेत राहणारे अनसॅच्युरेटेड असे ढोबळ मानाने समजावेत. सॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेल द्रव्य स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक व अनसॅच्युरेटेड त्यामानाने चांगली असतात. संपूर्णपणे अनसॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेले असत नाहीत. त्यात किंचित प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धता असतेच. पण हे प्रमाण नगण्य असावे एवढेच ध्यानात असावे.
अनसॅच्युरेटेड स्निग्धता ही पण दोन प्रकारांची असते. ह्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलिअनसॅच्युरेटेड (PUFA) असे दोन प्रकार आहेत. ओमेगा जातीचे वसाम्ले मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) मध्ये असतात व ही स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक असतात. हृदय, मेंदू, सांधे, ज्ञानेंद्रियांची शक्ती उत्तम राखणे अशी गुणवत्ता त्यांमध्ये असते.
भारतीय आहारात मुख्यतः खालील तेलांचा वापर मुख्यत्वाने होतो. त्यातील घटकांमधील रसायनांचा तक्ता –
| मराठी नाव | इंग्रजी नाव | सॅच्युरेटेड
स्निग्धांश |
MUFA | PUFA | ओमेगा ३ | ओमेगा ६ |
| तीळ तेल | Sesame oil | १४ % | ४३ % | ४३ % | ०.३ % | ४१ % |
| भुईमूग तेल | Peanut oil | १८ % | ४९ % | ३२ % | ० % | ३१ % |
| पाम तेल | Palm oil | ५२ % | ३८ % | १० % | ०.२ % | ९.१ % |
| सोयाबीन तेल | Soybean oil | १५ % | २४ % | ६१ % | ६.७ % | ५० % |
| सुर्यफुल तेल | Sunflower oil | ११ % | २० % | ६९ % | ० % | ५६ % |
| सरकी तेल | Cotton seed oil | २४ % | २६ % | ५० % | ०.२ % | ५० % |
| खोबरेल तेल | Coconut oil | ९२ % | ०६ % | ०२ % | ० % | १.८ % |
| करडई तेल | Safflower oil | १० % | १३ % | ७७ % | ० % | ७४ % |
| ऑलिव्ह तेल | Olive oil | १४ % | ७३ % | ११ % | ० % | ० % |
| राईचे तेल | Mustard oil | १३ % | ६० % | २१ % | ५.९ % | १५ % |
| तांदूळ कोंड्याचे तेल | Rice Bran oil | २० % | ७४ % | ३३ % | १.६ % | ३३ % |
| मक्याचे तेल | Corn oil | १३ % | २५ % | ६२ % | १.१ % | ५३ % |
| जवसाचे तेल | Flax Seed oil | ११ % | २१ % | ६८ % | ५३ % | १३ % |
तीळ तेल -
रिफाइंड आणि नॉन रिफाइण्ड असे तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. सेंद्रिय, रिफाइण्ड न केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मोहक सुगंध देते. तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. तीळ तेल चिंता करणार्यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेलाने कर्करोगापासून रक्षण होऊ शकते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.
शेंगदाणा तेल :
यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्स्चं उत्तम मिश्रण आहे. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्स असतात जे फ्री रॅडिकल्स (पेशीविघातक दोष) तयार होण्यापासून रोखतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल. हे कोलेस्टेरॉलची परत यकृताकडे पाठविते आणि अडथळ्यांपासून बचाव करते. वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. हे कोलेस्टेरॉलचे वहन पेशींकडे आणि वाहिन्यांकडे करून वाहिन्यात अडथळे निर्माण होतात.
पाम तेल
जगात होणाऱ्या खाद्य तेलाच्या निर्मितीपैकी ४४ टक्के हिस्सा पाम तेलाचा आहे. ह्यात पाल्मेटिक अम्ल नावाचा घटक असतो. ह्यात ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण मोठे आहे व हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
सोयाबीन तेल
सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे ५०% खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे. रक्तातील घातक स्निग्धांश व स्वस्थ्यकर स्निग्धांशांचा याने समतोल राखला जातो. प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने शुद्ध शाकाहारी लोकांनी ह्याचा वापर जरूर करावा. सोयाबीनमधील अॅन्टिऑक्सिडंट घटक विशिष्ट कॅन्सर पेशींना आळा घालून त्यांची वाढ रोखतात असे संदर्भ मिळतात.
सनफ्लॉवर तेल -
या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास हितकर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. यातील PUFA आणि MUFA जातीची स्निग्धाम्ले तीव्र उष्णता, प्रखर प्रकाश, हवेतील बाष्प अशा कारणांमुळे तेलाचे गुणधर्म नाश पावतात. म्हणून ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि साठविण्याच्या पद्धती नियंत्रित असणे जरुरीचे आहे.
सरकी तेल –
कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. यात फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. पितळी भांड्यांवर ह्याची रासायनिक क्रिया होते म्हणून स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. हृदय स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले आहेच शिवाय ई जीवनसत्वाचे प्रमाणही ह्यात चांगले आहे. गॉसिपॉल’ नामक विशिष्ट घटकामुळे स्त्री व पुरुष प्रजननक्षमता खालावते असे काही वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे.
खोबरेल तेल -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू तेलांनाही असतात. सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे लाभही अनेक आहेत. मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तेलांना पूर्णपणे वर्ज्य करून चालत नाही. अल्झेमर्स डिसीजमध्ये (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) खोबरेल तेलाचा उपयोग अतिशय प्रशंसनीय आहे असे संशोधन नुकतेच झाले आहे.
करडई तेल (सॅफ्लॉवर) -
ह्या तेलात पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.
ऑलिव्ह तेल
हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तळणीसाठी केल्यास गुणधर्म नाश पावतात म्हणून कच्च्या स्वरूपात याचा वापर करणे अधिक योग्य आहे.
राईचे तेल –
हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. ह्यात MUFA चे प्रमाण उत्तम असल्याने ओमेगा ३ जातीचे मेदाम्ल प्रचुर प्रमाणात आहेत. हे प्रमाण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगले आहे. मात्र याचा वास उग्र असतो. अन्य तेलांचा वापर करणाऱ्यांना रुचत नाही.
राईस ब्रान तेल -
या तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट नसतात. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडन्ट्सही असतात. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला सूक्ष्म असा वास असतो आणि धुराचा बिंदू जास्त असतो. त्यामुळे ते तळणासाठी व अन्न शिजवण्यासाठी व भाजण्यासाठीही वापरता येते.
मक्याचे तेल –
मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो. ऑलिव्ह तेलाच्या तुलनेत हे तेल अधिक उष्णता सहन करते म्हणून तळणीसाठी हे अधिक योग्य आहे. मशीनद्वारे काढलेले मक्याचे तेल अधिक स्वास्थ्यकर आहे. आजकाल बाजारात हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन या रसायनांचा वापर करून काढलेले तेल अधिक प्रमाणात मिळते. त्यातील रसायनांचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.
जवसाचे तेल -
जवसाच्या बिया (flaxseed किंवा linseed) अत्यंत आरोग्यदायी आहेत. यालाच अळशी असेही नाव आहे. आजकाल जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा-3 हे मेदाम्ल. आहारशास्त्रानुसार आपल्या आहारात ओमेगा-3 व ओमेगा-6 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यतः ओमेगा-6 हे मेदाम्ल रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजपणे मिळत असते; परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत. म्हणून हे मेदाम्ल शरीराला सहजासहजी मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी, जवस या पदार्थांपासून आपल्याला ओमेगा-3 मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, संधीविकार, कर्करोग व स्थूलता यांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लामुळे स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी, नैराश्य कमी होते. जवस हे रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रोज साधारणपणे ३० ग्रॅम जवस खाण्याने रजःनिवृतीपूर्वी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा, शरीरातून गरम वाफा निघणे, हे त्रास कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात जवसाचा आहारात वापर करता येईल. जवसाच्या बिया बडीशेपेसारखे तव्यावर परतून खाव्यात. किंचित मीठ घालून मुखवास रूपाने खूप रुचकर लागतात. जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सॅलडवर घ्यावे. तापवल्याने याला विशिष्ट उग्र वास येतो.
सारांश:
खाद्य तेलांबद्दल एवढी माहीती वाचल्यावर “मी कोणते तेल वापरू” हा प्रश्न आपल्याला नक्कीच भेडसावणार आहे. म्हणून सारांशाने थोडक्यात महत्वाचे मुद्दे आता पाहूया –
१) लेबलवर “हायड्रोजनेटेड” शब्द दिसला तर असे तेल वापरू नये.
२) तळणीसाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये. (निरांजनात वापरण्यास हरकत नाही)
३) “ट्रान्स फॅट्स” असलेले तेल वापरू नये.
४) मांसाहाराचे बंधन नसेल तर मधूनच फिश ऑईलचा आहारात वापर करावा.
५) सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असलेले तेल टाळावे (याला खोबरेल तेल अपवाद आहे)
६) नॉन-रिफाइंड तेलांना नैसर्गिक गंध असतो व ती तेले अधिक पौष्टिक असतात. परंतु तुलनेने लवकर खवट होतात. तळणीसाठी अशा तेलांचा वापर शक्यतो करू नये.
७) रिफाइंड तेलांचा वापर तळणीसाठी अधिक योग्य असतो. रिफायनिंग प्रक्रियेत तेलामधील कित्येक स्वास्थ्यकर जीवनसत्व नाश पावतात. रिफाइंड तेल अधिक टिकाऊ असते, मात्र त्याला नैसर्गिक स्वाद फारच कमी असतो.
८) ज्याज्या ठिकाणी गायीचे तूप वापरता येईल त्यात्या ठिकाणी तेलाऐवजी अशा तुपाचा वापर करावा.
९) उपलब्ध असलेल्या सर्व तेलांचा वापर अदलून बदलून करावा. एकच एक तेल कधीही खाण्यास वापरू नये.
१०) आहारात कोणतेही तेल घ्या पण ‘४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे’ हा नियम कधीही विसरू नका.
११) स्निग्ध पदार्थ म्हटल्यावर सर्वांच्या मनात “कोलेस्टेरॉलची” दहशत बसलेते. म्हणून ह्याबद्दल थोडी माहीती हवीच -
कोलेस्टेरॉलबद्दल ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी त्याचे फायदेही समजून घेतले पाहिजेत. कोलेस्टेरॉल हा यकृतात निर्माण होणारा एक घटक आहे. हा घटक सर्वस्वी वाईट असता तर निसर्गाने ह्याची निर्मिती केलीच नसती. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अति सर्वत्र वर्जयेत हा नियम येथेही लागू होतो. त्याचे संतुलन शरीराच्या गरजेपुरते असावे, अति वाढू नये ह्याची काळजी घ्यावी. शरीरात निर्माण होणाऱ्या कोलेस्टेरॉलशिवाय आपण आहारातून घेतलेले कोलेस्टेरॉल देहाचे स्वास्थ्य खालावत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
March 3, 2017
मुरेल बेकचा जन्म ८ जून १९१८ रोजी लंडन येथे ज्यू कुटुंबात झाला.त्यांचे कुटुंब १९२३ ला विसबेडन जर्मनी येथे स्थायिक झाले व तिथून ते १९२६ मध्ये फ्रांस येथे गेले.तिचे शिक्षण फ्रांस मध्येच झाले. १९३५ मध्ये तिने लिली विश्वविद्यालयात दाखला घेतला. १९३६ ते १९३८ मध्ये तिने एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. त्याच बरोबर १९३७ मध्ये गेट थिएटर मध्ये सहायक स्टेज मॅनेजर म्हणूनही काम केले.दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिने रेड क्रॉसमध्ये दाखला घेतला. १९४१ ला ती टोऱ्कयू येथे गेली व असिस्टंट क्लार्क व वॉर्डन चे काम पाहू लागली. १९४२ मध्ये ती वुमन एअर फोर्स मध्ये गेली आणि ड्यूटी क्लार्क चे काम पाहू लागली. नंतर तिचे प्रमोशन सेक्शन ऑफिसर म्हणून झाले.
तिचे फ्रेंच उत्तम होते म्हणून तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव गुप्तहेर संघटनेत १९४३ मध्ये दाखल करून घेण्यात आले.सप्टेंबर १९४३ मध्ये तिचे सूरी येथे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे तिचे para-military फोर्सचे शिक्षण सुरू झाले. व पुढे वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण घेतले. एसओई मध्ये तिला गुप्तहेरीचे काम देण्यात आले.गुप्तहेराचे सर्व आवश्यक गुण तिच्यात होते. ८ एप्रिल १९४४ रोजी तिला पॅरॅशूटने फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. तिचे कोडनाव व्हायोलेट ठेवण्यात आले. तिने सालब्रासिस येथे सुरक्षित घर मिळवले. तिने ट्रान्समिशन यंत्र गेरेजच्या शेड मागे लपवले जेथे जर्मन जीप व ट्रक दुरुस्ती साठी येत असत.तिथे तिला संशयित जर्मन सैनिक दिसले . तिने यंत्र दुसरीकडे हलवले.ती पर्शियन सेक्रेटरी बनली. तिथून ती एका लोहाराच्या घरी राहू लागली. खूप वेळ काम केल्यामुळे तिला ताण आला व ती बेशुद्ध झाली. तिला तातडीची वैद्यकीय गरज होती तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे meningitis चे निदान झाले व तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,पण प्रत्येक हॉस्पिटलवर जर्मनांचा पहारा होता. तिला नन्स द्वारा चलवणाऱ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही २५ मे १९४५ रोजी वयाच्या 27 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
December 27, 2022
आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते.
February 6, 2022
सर्व जग आणि आपल्या देशाला भेडसावणारा यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. बऱ्याच विकसीत आणि विकसनशील देशांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि करीत आहेत. पण भ्रष्टाचारख्या शुल्लक गोष्टीचे निर्मुलन अजून तरी कुठल्याच देशाला करता आलेले नाही करण्याची मानसिकता आणि प्रबळ इच्छाशक्तीही नाही.
August 24, 2015
देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय? यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय?
April 26, 2012
जय देवा जय देवा जय मोहिनी देवा
शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।।
समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली
सर्व देवांना ती तु अर्पण केली ।
अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला
वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।।
रुप बदलून राहू देवासह आला
नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला
नजरेतुन तुझ्या तो नाही सुटला
सुदर्शन चक्रे त्याचा निप्पात केला ।।
शरण येऊनी तुजला भक्ती जे करती
सुखी ठेऊनी त्यांना मुक्ती तु देशी ।
भक्त रक्षिणीया तू धावुनीया आला
नेवासे नगरी तू ऊभा ठाकला ।।
सुरेश काळे
सातारा.
July 26, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti