वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे.
September 10, 2019
मित्रांनो १८ ऑगस्ट ही तारखेप्रमाणे *श्रीमंत बाजीराव पेशवे सरकारांची* जयंती आहे. हे निमीत्त साधुन त्यांच्या बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न आहे. सदर स्वरूपात त्यांच्या पराक्रमाबाबत थोडक्यात माहीती देण्याचा विचार आहे.
शिवराय व शंभुराजे नंतर इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या या पराक्रमी योध्याला लोकांनी फक्त मस्तानी पुरताच ओळखला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर हे बाजीरावांनीच केले. दिल्ली पर्यंत मजल मारणारा स्वराज्याचा पहीला पंतप्रधान म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शेवट पर्यंत छत्रपतींचा सेवक म्हणुनच जगलेला हा योद्धा काळाच्या पडद्याआड गेला.
२० वर्षाच्या वादळी कारकिर्दीत एकही युद्ध न हरलेला हिंदवी स्वराज्याचा एकमेव पेशवा म्हणुन आजही ओळख आहे.
सदस्यांनी आपली पसंती कळवावी.
August 16, 2016
झाडांच्या बियांचं दिव्यत्व या लेखात स्पष्ट केलं आहे.
December 23, 2016
भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता 'इ' रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे.
रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पी.आर.एस.) म्हणतात. याकरता लागणारं सॉफ्टवेअर 'क्रिस' (सी.आर.आय.एस.) पद्धतीचं असून, याकरता भारतभर पाच डाटा सेंटर्स (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद) आहेत. त्यांचे सगळे सर्व्हर्स एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतभरातून कुठूनही कुठल्याही विभागातील गाडीच्या तिकिटाचं आरक्षण मिळतं. याकरता रेल्वेचे १० विभाग केलेले आहेत. ही भारतीय रेल्वेची सर्वांत अद्ययावत संगणकीकरणप्रणाली असून, त्यासाठी भारतीय रेल्वेला २००९ सालातील 'वेबरत्न प्लॅटिनम आयकॉन अॅवॉर्ड' मिळालेलं आहे; तसंच १९९९ सालात 'कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया' यांचं 'बेस्ट आयटी यूजेस'बद्दल बक्षीस मिळालेलं आहे.
क्रिस प्रणाली अंतर्गत जवळजवळ ३५ विभागांकरता सॉफ्टवेअर्स वापरलेली आहेत. त्यामुळे तिकीटआरक्षण, तिकिटावर दिसणाऱ्या सर्व बाबी, गाड्यांचं टाईम टेबल, गाडी कुठे आहे, इंजिनं, मालगाडीचे डबे, यार्ड्स, प्रत्येक डब्यावरील प्रवाशांच्या नावांचे चार्ट्स, तिकिटांचं कॅन्सलेशन, वेट लिस्ट व रोज प्रत्येक टर्मिनलला जमणारे पैसे, अशा अनेक गोष्टींची माहिती संगणकावर मिळू शकते SATSANG Software रेल्वे टाईम टेबल व गाडीची येण्याची जाण्याची वेळ या करता वापरलं जातं. 'इंटिग्रेटेड मल्टिप्लाय ट्रेन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (आय.एम.टी.पी.आर.एस.) द्वारे आता मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून प्रवाशांना ते प्रतीक्षा यादीत आहेत किंवा त्यांचं तिकीट नक्की झालं आहे हे कळू शकणार आहे, याकरता आता इंटरनेट उघडण्याची गरज पडणार नाही. क्रिस, सी.एम.सी., आय.एम.टी.पी. आर. एस. (concert are based on 3- Tier server client architecture with Mesh Type Topology) या अद्ययावततेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणली गेलेली आहे. सर्वसाधारण प्रवाशाला कळू शकेल अशा सुधारणा रोजच्या रोज केल्या जात आहेत. या यंत्रणेत अकस्मात बिघाड होऊ नये म्हणून 'स्ट्रक्चरल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी' अर्थात 'रचनात्मक आपत्कालीन व्यवस्थापन धोरण' अमलात आणलेलं असून, फिजिकल डिझास्टर अर्थात शारीरिक आपत्तीपासूनही संरक्षण देण्याची यंत्रणा आहे. १०० टक्के सुरक्षित यंत्रणेकरता ज्या काही त्रुटी आहेत त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या क्रांतीमुळे रांगेत उभं राहून तिकिटं काढण्याचा जुना कंटाळवाणा प्रघात आता इतिहासजमा झाला आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
November 13, 2022
बर्याच व्यक्ती उराशी काही धैय्य बाळगून असतात व त पुर्ण होण्यासाठी संकल्प करीत असतात. असे बरेच संकल्प आपल्या देशात केंद्र राज्य जिल्हा तालूका व ग्रामपंचायत स्थरावर प्रत्यक्षात येण्यासाठी सोडले जातात.
January 12, 2011
सौम्य प्रमाणात मुंग्या येणे अथवा शरीराचा एखादा भाग बधिर होणे हा प्रकार वरचेवर घडत असेल, तर त्यामागचे कारण वेळीच शोधायला हवे. कदाचित मज्जारज्जूच्या शिरांना अपाय झाल्याने असे होऊ शकते. मज्जातंतू मज्जारज्जूतून बाहेर पडतात. थोड्याच अंतरावर त्यातील काही तंतू एकमेकांजवळ येतात व त्या गठ्ठ्याच्या शिरा बनतात. या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या भागात कार्य करतात, म्हणून त्यांना पेरिफरल (परिघाच्या बाजूच्या) मज्जारज्जूच्या शिरा (नव्ह्र्ज) म्हटले जाते. या शिरांना अनेक कारणांनी अपाय होणे संभवते. अशा विकारांना पेरिफरल न्यूरोपथी म्हणतात. पेरिफरल नव्ह्र्जमुळे आपला मेंदू आपल्या शरीरातील एकूण एक लहानसहान भागाला जोडला जातो. कोणत्या जागेच्या शिरा आणि किती प्रमाणात अपाय झाला आहे, यावर लक्षणे ठरतात. बहुतेक सर्व प्रकारांत सुरवात सौम्य प्रमाणात मुंग्या येणे व भाग बधिर होणे अशी होते. हळूहळू काही महिन्यांनी अथवा वर्षांनी शरीराचे भाग बधिर होतात. मधुमेह या आजारात पावलात आलेल्या बधिरपणामुळे तेथे जखमा झालेल्या रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाहीत. तेथे जंतुजन्य दाह झालेलादेखील समजत नाही. पावलात असे घडते, ही गोष्ट अनेक मधुमेही रुग्णांत घडते. शरीराच्या इतर भागातही असे घडू शकते. नजर अस्पष्ट होणे, रक्तदाब उतरणे, मूत्रविरेचनात अडथळे जाणवणे, पोट फुगणे, आतड्यांची हालचाल कमी किंवा जास्त होऊन मलावरोध किंवा पोटात कळा येणे आणि पुरुषांत लैंगिक दुर्बलता येणे, अशा विविध प्रकारचे त्रास रुग्णांना होऊ शकतात. हे पेरिफरल न्यूरोपथीचे आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. दीर्घ काळ मद्यसेवन, मधुमेह, शरीरात कोठेही (सुप्तदेखील) कॅन्सरची गाठ निर्माण होणे, मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे, जीवनसत्त्वे ब 1, ब 6 किंवा ब 12 याचा आहारात अभाव होणे, शिसे जास्त प्रमाणात शरीरात जाणे, मुंग्या येण्यासारखे त्रास ताब्यात आणणे त्यामानाने कठीण असते. हेटेरोसायस्लिक प्रकारची औषधे वेदना ताब्यात आणण्यासाठी उपयोगी असतात. या औषधांचा फायदा औषधे घेण्यास सुरू केल्यापासून काही आठवड्यांनंतरच दिसू लागतो. दीर्घ काळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. सर्व प्रकारच्या मद्य-पेयांत इथाईल अल्कॉहॉल नावाचे रासायनिक द्रव्य असते. आपल्या शरीरात यकृतातील पेशीने या इथाईल अल्कॉहॉलच्या रेणूचे विघटन होते व प्रथम ऍसिटाल्डिहाईड नावाचा रेणू तयार होतो.
ऍसिटाल्डिहाईडचे रूपांतर ऍसिटिक ऍसिड या रेणूत होते. ऍसिटिक ऍसिडचे रूपांतर कार्बन-डाय-ऑक्सातईड आणि पाणी या रेणूत होऊन ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. या सर्व प्रक्रियांना दहा तास लागतात. ऍसिटाल्डिहाईड आणि ऍसिटिक ऍसिड हे रेणू शरीराच्या एकूण एक पेशींना घातकारक असतात.
शरीरात दहा तासांच्या अवधीत हे रेणू संपूर्ण शरीरभर फिरतात. यकृत, मेंदू, हृदयाचे स्नायू, स्वादुपिंड, जठर, लहान व मोठे आतडे, मूत्राशय इत्यादी सर्व अवयवांवर दारूचा दुष्परिमाण होतो. याचबरोबर पेरिफरल नव्ह्र्जच्या पेशीदेखील मृत होतात. परिणामी हात, पाय बधिर होतात. तेथे मुंग्या येणे, वेदना होणे असे त्रास अहोरात्र होतात. हातपाय कमजोर होतात. चालना येईनासे होते. एकदा या मज्जातंतूंच्या शिरा अशा प्रकारे विकारग्रस्त झाल्या की त्या पूर्ववत बऱ्या होतील, असा उपाय अद्ययावत सापडलेला नाही. मूळतःच दारूला स्पर्शही न करणे व घेणाऱ्यांनी तत्काळ पूर्णपणे वर्ज्य करणे अत्यंत आवश्याक आहे. शरीरात कॅन्सरच्या गाठी वाढू लागल्या की त्या पेशींना जीवनावश्यणक तत्त्वे, जीवनसत्त्वे इत्यादी मोठ्या प्रमाणात लागतात. परिणामी, शरीरातील पेशींना त्या कमी पडू लागतात. शिवाय या विकृत पेशी काही द्रव्ये स्रवतात. या द्रव्यांमुळे अन्नपेशींना अपाय होतो. परिणामी, पेरिफरल न्यूरोपथी होते. कधी कधी खुद्द कॅन्सरचा आकार फार मोठा नसतो. त्यामुळे जेथे कॅन्सर होतो त्या जागेवर फारसा त्रास होतही नाही. असा छुपा कॅन्सर जठर, मोठे आतडे, थॉयरॉईड ग्रंथी व श्वारसनलिका येथे असण्याचा संभव बराच असतो. मूळ कॅन्सर काढून टाकला की या पेरिफरल न्यूरोपथीचे त्रास शमू लागतात. मूत्रपिंडांचे कार्य नीट होत नसल्यास शरीरात बरेच बदल होतात. महत्त्वाच्या क्षारांची पातळी योग्य राहत नाही.
मूत्रपिंडाचे कार्य पुन्हा व्यवस्थित झाल्याखेरीज ही तक्रार जाऊ शकत नाही. काही जड धातूंचे रेणू शरीरात गेल्यास त्यांच्या अपायामुळे पेरिफरल न्यूरोपथी होतो. सुवर्ण, चांदी, पारा, आर्सेनिक किंवा शिसे अशा धातूंचे रेणू अपायकारक असतात. आपण सेवतो त्या औषधांत रासायनिक पृथक्कणरणाच्या परीक्षणातून असली द्रव्ये नाहीत याची खात्री करून मगच कोणतेही औषध घ्यावे. काही जीवनसत्त्वे मज्जापेशींच्या कामाला अधिक महत्त्वाची असतात. जीवनसत्त्व ब संकुलातील ब 1, ब 6 व ब 12 ही विशेष महत्त्वाची असतात. त्यांचा आहारातील अभाव हे पेरिफरल न्यूरोपथीचे कारण असते. पॉलिश्डा भातच खाणे, मैदा खाणे, दूध न घेता इतर आहार पूर्ण शाकाहारी असणे, अशा कारणांतून हे अभाव निर्माण होतात. आपल्या रक्तवाहिन्यांवर स्वतःच्या शरीरात स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा दुष्परिणाम होतो. या आजाराला पेडिआर्टरायटिस नोडिसा म्हणतात. या आजारात मज्जातंतूंना जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोष निर्माण झाल्याने पेरिफरल न्यूरोपथी होतो. थॉयरॉईड ग्रंथीच्या आजारातदेखील पेरिफरल न्यूरोपथी होते. पेरिफरल न्यूरोपथी हे अनेक विकारांचे लक्षण असते. कारण शोधून मगच खरा इलाज होऊ शकतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई
January 6, 2017
समाज हा एका विशिष्ट वंशाच्या, भाषेच्या किंवा व्यवसायाच्या लोकांचा समूह असतो. समाजाचा जसजसा व्याप वाढत जातो तसतसे त्यातील गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवू लागतात आणि त्या गुण वैशिष्ट्यांना घेऊन आपला वेगळा समूह निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु होते. यातून मग एक नवा समाज नावारुपास येतो. पुढे हे नावच त्या नवनिर्मित समाजाची मर्यादा आखून देते.
January 23, 2026
खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो... घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच!
आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले...
घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन... आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन... जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???
आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही.
मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता?
खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले... बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग; राग त्रासापेक्षा जास्त होता...
रागातच पुढे चाललो...
पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले... रस्त्यावर पाणी सांडलेले होते. उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता....
तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो.
पण दुर्दैव... तासभर एकही एस.टी.नव्हती...
मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू... पाकिट उघडले त्यात एक चिठ्ठी मिळाली.
त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले...
अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे.
दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली--
ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते...
त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते...
असे लिहले होते.
अरे चांगले बूट??
परंतु त्यांचे बूट तर फाटलेत...
आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या...
पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट...
मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही...
मी...
मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून.
एक तीसरी चिठ्ठी मिळाली.
जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा...
आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या...
पप्पांची गाड़ी...
आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो...
आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता...
मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती...
मी समजलो पप्पा कुठे आहेत!
पप्पा तिथेच होते...
मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला...
नको पप्पा नको..
मला नाही पाहिजे मोटर सायकल...
बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या...
आणि हो पप्पा,
आता मला मोठा माणुस व्हायचच आहे...
तो पण तुमच्यासारखाच....
पप्पा फक्त तुमच्या सारखाच...
पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली...
सगळं शांत वातावरण...
मित्रांनो; आई-वडिलांना ओळखा.
आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही... खऱ्या अर्थाने जगा... हेच तर खरं जिवन आहे... आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या...
माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा...
Forwarded Post
-- Aniket
November 29, 2016
श्रीदत्त अवतार परंपरेची सविस्तर माहिती…
December 20, 2016
यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे
रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति |
तदा देवदेवेश गौरीश शंभो
नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖
भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे.
भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका आचार्य मांडत आहेत.
त्या अंतिम समयाचे वर्णन करताना ते म्हणतात,
यदा- ज्यावेळी
पुत्रमित्रादयो- पुत्र मित्र इत्यादी माझे नातेवाईक,
मत्सकाशे- माझ्याजवळ येऊन,
रुदंति- रडत असतील,
अस्य हा कीदृशीयं दशेति - अरे अरे काय ही याची दशा? असे म्हणत माझ्या मरणासन्न अवस्थेत चे वर्णन करीत असतील,
अर्थात माझ्या त्या जराजर्जर अवस्थेला पाहून, त्या बाह्य अवस्थेलाच माझी वास्तव अवस्था समजत ज्यावेळी ते शोक करीत असतील,
तदा - त्यावेळी
देवदेवेश- हे देवाधिदेव !
गौरीश शंभो- भगवान गौरीनाथा शंकरा,
नमस्ते शिवाय- नमः शिवाय , हा महामंत्र
इत्यजस्रं ब्रवाणि - मी अखंड जपत असावा.
आचार्यश्री म्हणत आहेत की अंतिम समयी देहाची परिस्थिती ही गलितगात्रच असणार आहे. पण तशी "परिस्थिती" असताना देखील माझी "मनस्थिती" वाईट असू नये.
जमलेले नातेवाईक बाहेर माझ्याबद्दल काहीही म्हणोत , मी आत मध्ये नमःशिवाय हेच म्हणत असावे. अंतरंगी आपल्या स्मरणाने शांती असावी. चिंतनात आपले नामस्मरण असावे.
बाहेरून पाहणाऱ्या नातेवाईकांना माझी अवस्था कशी ही दिसत असली तरी अंतरंगामध्ये मी चा नातेवाईकांशी नाही तर आपल्या चरणांशी गुंतलेला असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti