(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • गणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट

    आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच !

  • आता १०० रुपयांचे नाणे

    रिझर्व्ह बँकेने २०००, ५००, २०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच १०० रुपयांचं नाणं चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

    १०० आणि ५ रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात आणली जातील, असे रिझर्व्ह बँकेने एका पत्रकात नमूद केले आहे. सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात असून १०० रुपयाचं नाणं सध्याच्या चलनातील सर्वात मोठं नाणं ठरणार आहे.

    अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील एकेकाळचे सुपरस्टार डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७७ पासून ते १९८७ पर्यंत एम. जी. रामचंद्रन यांनी तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. एआयएडीएमके पक्षाची स्थापना त्यांनीच केली होती. रामचंद्रन यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.

  • शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २८६ वर्षे पूर्ण

    मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २२ जानेवारी रोजी २८६ वर्षे पूर्ण झाली.

  • नववर्ष दिवस छे.. छे.. हा तर हिंदू विकृती दिवस

    हिंदू धर्मावर केलीली टीका माझ्या मित्रांना आवडणार नाही पण क्रिश्चन नववर्षाची “वाट” आपल्या हिंदू लोकांनीच लावली आहे.आत्ताचा हिंदू समाज धड ना हिंदू धड ना क्रिश्चन असा बेगडी झाला आहे.कुणी हि विकृती आपल्या समाजात घुसवली हे कळत नाही.डी.जे चा धिंगाणा ,बेफाम दारू पिणे ,रस्त्यावर गोंधळ,आणि अनिर्बंध वागणूक हि आजच्या नव हिंदू संस्कृती ची ओळख झाली आहे.

  • गोव्यातील वेलिंगचा ” लक्ष्मीनरसिंह “

    गोव्याच्या  माझ्या मित्राबरोबर त्याचे  कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा.

  • थोडीशी प्रेरणा – संघर्षयात्रा

    ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती. ही कहाणी काल्पनिक नाही. सत्यघटनेवर आधारित माझा एका ध्येयवादी विद्यार्थ्याची आहे.

  • नोबेल’चे अज्ञात मानकरी

    एखाद्याला पडलेल्या प्रश्नातून किंवा सुचलेल्या कल्पनेतूनच शोध लागतात. आजच्या काळात जसे आपल्या विविध गरजा किंवा समस्या शास्त्रज्ञांना नवनवी तंत्रे विकसित करायला भाग पडतात, तशाच गरजांमधून खरेतर लाखो वर्षांपूर्वी आदिमानवांनीही शोध लावण्यास सुरुवात केली.

  • अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

    १९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

  • न्यायपालिकेची प्रतिष्ठा जपली जावी!

    २०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.

  • मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

    अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !