वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्र गीतांच्या मालिकेतील हे आणखी एक गीत.
चित्रपट हे एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून परिवर्तनही घडवता येऊ शकतं. या माध्यमाचं काम केवळ मनोरंजनात्मक न राहता विविध विषय हाताळून विस्तारत जात आहे. बायोपिक चित्रपट हे देखील त्यातीलच एक. बायोपिक चित्रपट प्रेक्षकांना ऊर्जा देण्यासाठी बनवले जातात.
बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
झाडांवर कधीही पक्षी?? बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )
झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .
ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )
ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य आयुर्वेदीक उपयोग आहेत .
त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती.
मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल.
ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला.... खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे हे जलदुर्ग नेहमीच खुणावत असतात. पण जाण्या-येण्याच्या गैरसोयी आणि या बेटावर वावरण्यास असलेले निर्बंध यामुळे हे दुर्ग पाहणे कठीण होऊन गेले आहे. खांदेरी बेट हे सरकारच्या तटरक्षकाच्या ताब्यात असल्याने पर्यटकांना लाभ घेता येत नाही. परंतु एक पर्याय म्हणजे येथे कोळी लोकांचे दैवत वेताळबाबाचे मंदिर असल्याने त्यांची ये-जा नेहमी सुरु असते.त्यांच्यासोबत मात्र येथे आपला संचार करू शकतो.उंदेरीवर मात्र कोणी जात नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या या बेटांवरील ब्रिटीशकालीन दिपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नांव देण्यात आले आहे.
शिवाजीमहाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासून म्हणजे इ.स. १६७१ पासून त्यांचे खांदेरी- उंदेरी या समुद्रातील बेटावर लक्ष होते. इंग्रज, पोर्तूगीजांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी या बेटावर आपले मजबूत आरमार असावे असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. इ.स.१६७९ साली मायनाक भंडारी यांना काम करण्यास बजावले. काम सुरु होताच इंग्रज खवळले. यावर तेथे आपले अधिकारी पाठवून बेट आपल्या मालकीचे असल्याचा कांगावा केला. पण मायनाक भंडारीने त्यांना न जुमानता काम जोराने सुरु ठेवले. पण मायनाक भंडारीने झाल्या प्रकाराबद्दल महाराजांना निरोप धाडला होता. हे ऐकून महाराजांनी आपल्या आरमाराचा सेनापती दौलतखान यास तातडीने रवाना केले.इ.स. ३ सप्टेंबर १६७९ इंग्रजांनी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्युजेस हा अधिकारी नेमला व इ.स. ६ सप्टेंबर १६७९ रोजी ह्युजेस आपल्या तुकडीनिशी बेटावर चालून आला. पाऊस पडत होता. दर्या उसळला होता.बेटावर लाटा येऊन थडकत होत्या त्याचवेळी मुंबई दिशेने अनेक बोटीतून सैन्य खांदेरीच्या दिशेने निघाले होते. मायनाक भंडारीनी बेटावरील तोफांचा ताबा घेतला होता तर त्या खवळलेल्या सागरात दौलतखान गस्त घालीत होता. चाणाक्ष सेनापती दौलतखान याने त्या इंग्रज तुकडी वर असे आक्रमण केले की, ते ज्या बोटीतून आले होते, त्यासहित त्यांना जलसमाधी दिली. तीन अवाढव्य गुराबा आणि साठ एक नांव होत्या.किमान ५००० इंग्रज सैन्य होते. परंतु सुखासुखी कोणी परतला नाही. इंग्रज नरमले. दुसरीकडून जंजीऱ्याचा सिद्दी कासम जागा झाला. दौलतखानने त्याची गत इंग्रजाप्रमाणे केली. हे सुरु असतना मायनाक भंडारीने अल्पावधीतच खांदेरीची मजबूत तटबंदी उभी केली. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी तुफान दर्याच्या लाटांना तोंड देत खांदेरीची तटबंदी अद्याप ठामपणे उभी आहे. त्या पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी वर्षानुवर्षे अशीच उभी राहणार आहे. खांदेरीच्या पोटात दडलेली ही विजयीगाथा थोड्या थोडक्या लोकांना ठाऊक असेल. जेव्हा पूर्णपणे खांदेरी उभा राहिला तेव्हा महाराज नव्हते. जर महाराज अजून दहा वर्षे असते तर एक इंग्रज दिसला नसता किंवाऔरंगजेब दख्खन मध्ये दाखल झाला नसता. तसेच स्वराज्याची वाताहतही झाली नसती.
इ.स.१५८८ ची एक गोष्ट सांगाविशी वाटते. स्पेनचा स्पँनिश आरमाडा म्हणून जगातील अव्वल दर्जाचे आरमार. काटक, धिप्पाड, कष्टाळू स्पँनिश सैन्य अटलांटा महासागरातील उत्तर समुद्रात त्यांचे राज्य होते. ते स्वत:ला बलवान आम्हीच असे म्हणत आणि त्यांच्या वाटेला कोणी जाण्याची हिमंत करीत नव्हते. ब्रिटनच्या मनात त्यांच्याविषयी सल होती. दळणवळण यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे इंग्रज चवताळले होते. योग्य संधीची वाट पाहत त्यांनी स्पँनिश आरमाराला आम्ही खऱ्या अर्थाने बलवान आहोत, असे सांगितले. त्यामुळे स्पँनिश सैन्य इंग्रजावर धावून गेले. कुमक कमी असलेल्या आणि आरमारात प्रवीण नसलेल्या इंग्रजांनी स्पँनिश नौकांना सैन्यासहित जलसमाधी दिली आणि विजय संपादन केला. तेव्हा तसे कारणही घडले एक मोठ्या वादळाचा तडाखा युध्द सुरु असताना झाले. अन इंग्रजांच्या पथ्यावर पडले. त्यानंतर इंग्रज सर्वत्र संचार करू लागले. राज्याचा विस्तार होत गेला. पण त्यांनी त्या बुडविलेल्या नौका समुद्रातून बाहेर काढल्या. खर्च अमाप आला. परंतु आपल्या विजयाचे स्मरण भविष्यात आपल्या पिढीला व्हावे म्हणून त्या नौकाच्या लाकडापासून त्यांनी टेबल बाकडे बनविले आणि *ग्रीनव्हीच नेव्हल अँकँडमी* या सैनिकी शाळेत ठेवले. येथे शिक्षणास आलेल्या सैनिकांना आपण बसत असलेल्या आसनाविषयी माहिती दिली जात असते. एक विजयी भावना त्याच्या मनात जागृत होत असते. ते टेबल बाकडे या आधुनिक युगात अडगळीतील सामान न करता आजही त्या सैनिकी शाळेत आपल्या मुठभर पूर्वजांनी पराकोटीचा संघर्ष करीत पराक्रमाचा पूर्वेतिहास लिहिला आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.
आपल्या सैनिकांनी देखील असाच पराक्रम केला होता हे आपल्या भावी पिढीला प्रेरणादायक ठरावे म्हणून आपल्या समजूतदार आणि शहाणपणा अंगी मुरलेल्या लोकशाहीतील नेत्यांनी आपली चुणूक दाखवायला हवी होती. याविषयी सत्ताधीशांनी खांदेरीच्या पोटात काय काय दडलंय, याचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. वरचेवर देशप्रेमाची गाथा सांगणारे बेंबीच्या देठापासून कोकलतील, पण भूतकाळातल्या या स्मृती खणून काढण्याचे प्रयत्न कोणी करणार नाही. आपल्याला बलवान राष्ट्र घडवायचे असेल तर सैनिकी शाळामध्ये असे विषय तरी घ्यायला काही हरकत नसावी.
अशोक भेके
पुणे शहराच्या इतिहासावर एक नजर टाकणारा लेख शेअर करतोय...
सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'
सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.
सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.
सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.
सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.
सन 1663 : मंगळवार पेठ वसली.
सन 1703 : बुधवार पेठ वसली.
सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू.
सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.
सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली
सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले.
सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.
सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.
सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या.
सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.
सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या.
सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.
सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू.खडकी कटक स्थापना.पेशव्यांचा भीमा कोरेगाव येथे पराभव
सन 1856 : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला
सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869 : सर डेव्हिड ससून रूग्णालय कार्यान्वित
सन 1875 : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला
सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण
सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.
सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885 : फर्ग्यसन महाविद्यालयाची स्थापना
सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाल
सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले
सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.
सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.
सन1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.
सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे बांधकाम
सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू
सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू
सन 1961 : पानशेत धरण फुटले.
सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते.... परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल.
चिमुकली इसापनिती हे गडकर्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही कथा--
कथा-१
कथा पहिली
एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.
कथा दुसरी
रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला.
कथा ३
एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.
कथा चौथी
एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, ''देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.''देवाने सांगितले की, ''बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?'' देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.
संदर्भ :- रामगणेश गडकरी यांचे संकेत स्थळ
संकलन - समीर सप्रे
युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.
गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स
अनेकदा आपल्याला हवा सर्च रिझल्ट गुगलवर मिळत नाही. मग ते फोटो असो वा गाणी, एखादी विशिष्ट माहिती. सर्च करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. पण आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो.
गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यासाठी:
1. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज 8 चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ' Windows8 + History ' असे सर्च केल्यास गुगलवर हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
2. आपल्या प्रश्नामध्ये ' - ' चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर 'sachin' असे शोधायचे असेल. पण येणार्या यादीमध्ये 'sachin tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर 'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
3. आपल्या प्रश्नामध्ये ' ~ ' चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो.
4. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो.
उदा. ' www.facebook.com mobile ' असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.
5. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. 'Define: Hard Disk ' असे शोधल्यास गुगल ' Hard Disk ' या शब्दाचा अर्थ सांगणार्या वेबसाईटची यादी देईल.
6. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमुळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का ते शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.gmail.com/ ' असे शोधल्यास गुगल 'www.gmail.com ' प्रमाणेच माहिती असणार्या वेबसाईटची यादी देईल.
7. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. उदा. गुगलवर "contact us" असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
8. आपल्या प्रश्नामध्ये ' * ' चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर 'friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.
9. आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. 'fri??d' असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.
10. आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस आपल्याला दोन शब्दांना मिळून एकत्रित सर्च करायचे असते अशा वेळी 'AND अथवा O ' शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल मध्ये सर्च करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND ' शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.
- तुषार भामरे
भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा
Copyright © 2025 | Marathisrushti