(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजच्या तरुणांपुढील आव्हाने

    शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे.

    जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का?

    सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे कोण चालवतील, इतर व्यवस्था कशी चालेल.

    एक पुस्तक वाचत होतो त्याच नाव आहे Rich that man poor that man" खूप छान पुस्तक आहे त्यात एक उदा. दिलं आहे की एक Gov नौकरी करणारा आणि एक व्यावसायिक यांचं मासिक उत्पन्न सांगितलं आहे, Gov नौकरी करणाऱ्याला महिन्याचा 30 हजार मिळतो तर व्यावसायिकाला दर दिवसाला 300 रु.मिळतात पण ते दुसऱ्या दिवशी दुप्पट होत असतात.आता हे कसे तर gov जॉब करणाराही 8 तास काम करतो पण त्याला जॉबवर ठेवणारा व्यक्तीही 8 तास काम करतो दोघांकडे वेळ सारखा पण व्यावसायिक मात्र असे 8 तास काम करणारे बरेच व्यक्ती ठेवतो आणि सगळ्यांपेक्षा जास्त Income कमावतो.

    फक्त आपली विचारशक्ती बदला, ज्या क्षेत्रातही काम कराल ते असं करा की तुमच्यासारखा कोणताच व्यक्ती ते करू शकत नाही, " दुनिया झुकती है बस ऊसे झुकानेवाला चाहिये" जर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी इ.हे तर खूप मोठे नाव झाले असेल याहीपेक्षा एक जळगावचा माझा मित्र अविनाश (MBA) फॉरेन मधून चांगली नौकरी सोडून इथे महाराष्ट्रात शेळ्यापालनाचा व्यवसाय करतो आणि शानने BMW गाडीत फिरतो, म्हटलंन आधीच कि सोच बदलो जिंदगी बदल जायेगी,

    स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही, वेळ गेल्यावर हात हालवण्यापेक्षा वेळेआधीच जागे व्हा, आणि पालकांनो तुम्ही सुद्धा तुमचे विचार बदला,तुमच्या मनातील भूत बाहेर काढा, मुलांना समजून घ्या.

    "तुम बदल गये तो सारी दुनिया बदल जायेगा

    -- प्रा. हितेशकुमार एस. पटले

      May 16, 2017


  • हवाई दलाची युद्धसज्जता एक महाचिंतेचा विषय: लढाऊ विमानांच्या ताफ्यात सातत्याने घट

    लाहोरमध्ये ०२/११/२०१४ ला झालेल्या स्फोटात ६१ जण ठार, तर १०० जण जखमी झाले. वाघा सीमेपासून फक्त ५०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पॅँगाँग लेक परिसरात चीनने अलीकडेच घुसखोरी ०२/११/२०१४ ला समोर आली. याच भागात खुष्कीच्या मार्गानेही पाच किलोमीटर अंतरापर्यंत आपले सैन्य घुसविले.भारताच्या तीव्र आक्षेपास न जुमानता चीनच्या आणखी एका पाणबुडीसाठी कोलंबो येथील बंदराची जागा देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे.

      November 12, 2014


  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ६

    काऊंटी फेअर्स

    सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या आणि जनावरांच्या जाती – उपजाती बघण्याची संधी मिळायची. १९ व्या शतकात, या जत्रांमधे इतर शैक्षणिक, स्पर्धात्मक, सामाजिक तसंच करमणुकीच्या गोष्टींचा समावेश होत गेला. त्या नंतर केवळ काही पिढयांमध्ये, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या शेतकी जत्रा, ही पूर्णांशाने एक अमेरिकन पध्दत / रीतिरिवाज (tradition) बनून गेली.

    सुरवातीला या जत्रा केवळ काही सधन लोक भरवायचे. १८०७ साली मॅसेच्युसेट्स राज्यातल्या वॅटसन नावाच्या एका गृहस्थाने याची सुरुवात केली. त्याने सुरुवात केली ती मेंढयांची लोकर भादरायचे प्रदर्शन भरवून. १८१० साला पर्यंत हे प्रदर्शन म्हणजे फक्त मेंढया भादरायचे प्रदर्शन न राहता, त्याला एका छोटया जत्रेचे रूप आले होते. त्यात तीन, चार हजार जनावरांच्या प्रदर्शनाबरोबरच स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, इतर ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन, वगैरे गोष्टींचा समावेश झाला होता. वॅटसनने मोठ्या हुषारीने, स्त्रियांना देखील प्रदर्शनात गोडी निर्माण व्हावी म्हणून घरगुती कलाकुसरीच्या वस्तु, खाद्य पदार्थ वगैरे गोष्टींचा समावेश केला होता. आणि या सर्वांवर कळस म्हणजे या जत्रेचाच एक भाग म्हणून वार्षिक नाचगाण्याचा कार्यक्रम देखील ठेवला होता.

    जसजशी वॅटसनच्या या जत्रेची बातमी पसरू लागली तसतशा जागोजागच्या शेतकरी सोसायटया देखील अशाच स्वरूपाच्या जत्रा आयोजित करण्यासाठी पुढे सरसावल्या. साधारण १८३० सालापर्यंत या ठिकठिकाणच्या जत्रांना तेथील स्थानिक धनिकांच्या पैशाशिवाय आर्थिक पाठबळ फारसे नव्हते. त्यामुळे बर्‍याचदा त्यांना आर्थिक चणचण जाणवायची. परंतु १८४० च्या सुमारास विविध राज्यांच्या विधानसभांनी शेतकी boards ची स्थापना केली आणि शेती संस्थांना पैसे पुरवायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून शेती जत्रा अधिक मोठया, वैविध्यपूर्ण आणि सुनियोजित होऊ लागल्या. १८४१ साली न्यूयॉर्क राज्यातील अशी पहिली जत्रा सिरॅक्युस या गावी भरली आणि तिला जवळजवळ १५००० लोकांचा प्रतिसाद लाभला.

    लवकरच या जत्रा म्हणजे सार्‍या देशभर एक मोठंच आकर्षण ठरल्या. लोक या जत्रांची मोठया आतुरतेने वाट बघू लागले. अनेक शेतकरी कुटुंबं, जवळजवळ महिनाभर आधीपासून आपल्या कामाचे आयोजन करून, जत्रेसाठी काही दिवस मोकळे राहतील अशी तजवीज करू लागली. या जत्रा म्हणजे त्यांच्या दृष्टीने रोजच्या धबडग्यातून मोकळं होण्याचं आणि करमणुकीचं एकमेव साधन होतं. अनेक ग्रामीण लोकांसाठी या जत्रा म्हणजे विजेचे दिवे, कपडे धुण्याचं मशिन वगैरे आधुनिक गोष्टी प्रथमच बघण्याची संधी असायची.

    यादवी युद्धाच्या वेळी, मीडवेस्ट मध्ये, लष्कराने या जत्रेच्या मैदानांचा उपयोग, लष्करी कवायती करण्यासाठी करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जत्रा बंद पडल्या किंवा त्यांना इतरत्र जागा शोधायला लागल्या. यादवी युद्ध संपल्यानंतर पुनश्च जत्रांची लोकप्रियता उसळून आली. बहुतेक सार्या राज्यांनी भरपूर पैशाची मदत केल्यामुळे, अनेक ठिकाणी या जत्रांना कायम स्वरूपाचे बांधकाम करता आले. १८७० नंतर, राजकीय भाषणे, विविध खेळ, करमणुकीचे प्रयोग आणि खाद्यपदार्थांची चंगळ हे या जत्रांचे एक कायम अंग होऊन गेले.

      August 29, 2015


  • डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार

    डिमेंशिया - अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण किंवा विस्मृती होणे हे त्याचेच उदाहरण आहे. डिमेंशिया मध्ये अल्झायमर नावाचा रोग जास्त प्रमाणात आढळतो. अल्झायमर मध्ये मेंदूतील बिघाडामुळे स्मृती, बोलणे, हलचाल करणे इत्यादी क्रिया हळूहळू मंदावत जातात किंवा बंद पडतात. ह्या रोगाचे प्रमाण वृद्ध व्यक्ती मधे जास्त प्रमाणात आढळते.

    स्मरण / स्मृती आणि आहाराचा काही संबंध आहे का?
    नक्कीच आहार आणि स्मृति ही एकमेकांशी निगडीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा आहार अपूर्ण / अपुरा असेल तर त्याचा त्या व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम होतो असे प्रयोग दाखवतात. ह्या विस्मृयीचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अल्झायमर होण्याची शक्यता बळावते. आहार एक असा सहज बदल करता येण्यासारखा घटक आहे की ज्याच्या बदलामुळे विस्मृती किंवा विस्मरण होणे टाळता येऊ शकते किंवा तो उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकतो. गेल्या काही वर्षात आहार पद्धती, आहार, संज्ञानीक र्हास ( cognitive decline) आणि विस्मरण ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ह्या विषयावर बरेच प्रयोग होताना आढळत आहेत,

    Ondine Van de Rest et al ह्यांनी "आहार पद्धती cognitive decline आणि विस्मरण" ह्या विषयी सर्वागीण आढावा (systematic review) केला आहे. त्यांनी मे 2014 पर्यंत cognitive decline आणि विस्मरण ह्या विषयावर केलेल्या प्रयोगांचा ह्या सर्वांगीण आढाव्यात समावेश केला आहे.

    6 पैकी 4 छेदीक विशलेषण (cross sectional) शोध प्रबंधात, 12 पैकी 6 अनुदैर्घ्य ( longitudinal) शोध प्रबंध, 1 चाचणी प्रयोग आणि 3 meta analysis ह्यांचा समावेश केला. पहाणी अंती असे आढळले की Mediterranean आहार पद्धतीचे सेवन केलेल्या व्यक्तींमधे cognitive decline, डिमेंशिया, किंवा अल्झायमर चे प्रमाण कमी आढळले. Mediterranean आहार पद्धती ही एक अधूनिक आहार पद्धती असून ती Gŕeece, Southend Italy, आणि Spain ह्या देशात पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आहार पद्धती वर आधारित आहे. प्रयोगात असे आढळले आहे कि Mediterranean आहाराच्या सेवनाने आप्णा निरोगी राहू शकतो.

    6 cross sectional शोध प्रबंधात आणि 8 पैकी 6 longitudinal शोध प्रबंधात अनुभव पूर्व (priori) वाढते अनुभवोत्तर (posteriori) प्रयोगात आरोग्यदायी आहार पद्धतीच्या (healthy diet) सेवनामुळे cognitive decline आणि /किंवा डिमेंशिया ची जोखीम कमी झालेली आढळली. अनुभव पूर्व ह्यात आरोग्यदायी आहार पद्धतीचा इंडेक्स (उल्लेख सूची, हेल्दी डाइट इंडीकेटर आणि National Nutrition Sante' guideline score कार्यक्रम व अनुभवोत्तर ह्यात factor analysis, cluster analysis, आणि reduce rank regression गोष्टीचा समावेश केला होता. ह्या प्रयोगाचा निश्कर्ष " Applied in Nutrition an international review journal" March 2015: vol 6, 154 -1 68, 201 ह्यात प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये असे ही नमूद करण्यात आले की cognitive decline टाळण्यास किंवा तो विलंबाने कसा होईल ह्या बद्दलच्या तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जास्तीतजास्त प्रयोग होणे गरजेचे आहे

    brain-foodमेंदू योग्य प्रकारे कार्यरत राहण्यास त्याला उर्जा लागते. चांगल्या प्रकारची फॅट, फळे, भाज्या, लिन प्रथिने, आणि योग्य प्रमाणात जीवनसत्व व खनिज ह्यांचे सेवन स्मृति, स्मरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एखाद्या पदार्थाचे सेवन कमी जास्त केल्यास त्याचा मेंदू च्या कार्यावर तर परिणाम होतोच पण स्मरणशक्ती वर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. काही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास स्मरण वाढते, तर काहीं पदार्थांच्या सेवनाने अल्झायमर चा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे. काही पदार्थांच्या सेवनाने शरीरात हानीकारक घटक तयार होतात ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज वाढीस लागते. ह्या संदर्भात आपण आधीच्या लेखात समजावून घेतले आहेच. ही अंतर्गत सूज मेंदूत प्लाक निर्माण करतात आणि त्याचा परिणाम म्हणून cognitive function मध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते.

    food-habitsविस्मरण निर्माण करणारे पदार्थ - प्रक्रिया केलेले चीज (processed cheese), प्रक्रिया केलेले मटण (processed meat), beer, सफेद रंगाचे पदार्थ जसे की पास्ता, साखर, सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पापकर्म इत्यादि

    स्मरण वृद्धिंगत / वाढवणारे पदार्थ - पालेभाज्या, सॅलमन नावाचा मासा, तसेच थंड पाण्यातील मासे, (cold water fish) बेरी फळ जसे की करवंद, गडद सालीची फळ, काॅफी, चाॅकलेट, एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, आणि कोल्ड व्हर्जिन खोबरेल तेल

      April 17, 2015


  • श्री आनंद लहरी – भाग १८

    आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,

      February 23, 2020


  • नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

    भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते.

      November 15, 2018


  • वाल्मिकी रामायण – रामसेतुचे पूर्ण सत्य

    रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

    आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार्‍या १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भौगोलिक संरचना आहे. यासंरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठलाही पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे सनातनी लोक म्हणतात, हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

    दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.

    आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.

    आपल्या देशात आजही दुर्गम भागातले लोक पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीही जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.

    p-20193-Ram-Setu-2वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. किनार्‍यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

    वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.


    टीप:
    वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

    ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
    बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

    ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
    कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

    बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
    चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

    हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
    पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥

    संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

    समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
    सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

    दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
    वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

    मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
    पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

    संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥

    -- विवेक पटाईत

      December 10, 2015


  • ऑक्टोबर २९ – जिवंत झालेले क्रिकेट आणि दारुण पराभव

    १८७७ : विख्यात क्रिकेटलेखक नेविल कार्डसने ज्याचा ‘मूर्त रुपातील यॉर्कशायर क्रिकेट’ म्हणून गौरव केला होता त्या विल्फ्रेड र्‍होड्सचा जन्म.

    २००० : तोवरच्या इतिहासातील सर्वात मोठा एकदिवसीय विजय आणि अर्थातच सर्वात दारुण पराभवही.

      October 29, 2010


  • आधुनिक वानप्रस्थाश्रम!

    वानप्रस्थासाठी आता वनात जाण्याची जरूरी नाही. वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेवढी निसर्गात भटकंती करावी. घरात निदान छोटी बाग तयार करून त्याची निगा राखावी. सूर्य, चंद्र, चांदण्या पहाव्यात. संगीतात मन रमवावे. कमी खावे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

      November 20, 2022


  • जागतिक संधिवात दिन

    संधिवात म्हणजे काय. तर हा एक प्रकारचा आजार आहे जो लहान पाच वर्षे वयाच्या वयापासून ते ६०-७०वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे.

      October 12, 2021