वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे.
December 30, 2024
मशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो.
July 30, 2019
मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.
April 20, 2022
श्रीरामाचा अवतार
दुष्टांचा करण्या संहार
जन्म घेतला पृथ्वीवर
परमेश्वरानी ||१||
रामासी लाभले मोठेपण
तयाठायीं तन मन धन
अर्पिती सर्व भक्तजन
प्रेमभरे ||२||
थोर ग्रंथ रामायण
त्यातील जन्मकथा निवडून
करीत असे अर्पण
तुमचेसाठीं ||३||
लंकाधीपती रावण
होता शिवभक्त महान
उन्मत्त झाला वर पावून
त्रास देई सर्वाना ||४||
युद्ध केले स्वर्गासी
बंदी केले देवांसी
छळूं लागला तयांसी
दुष्टपणानें ||५||
रावणाच्या त्रासा पोटीं
देवांच्या मुक्तीसाठीं
अवतार घेई जगत् जेठी
श्रीराम जन्म घेऊनी ||६||
आयोध्येचा दशरथ राजा
आनंदी होती प्रजा
सुखी बघण्यात मजा
त्यास वाटे ||७||
एक दुःख होते त्यास
पुत्राविना जात दिवस
पुत्र प्राप्त करण्यास
प्रयत्न केले बहूत ||८||
राजा जाई वशिष्ठ गुरु कडे
घालूनी त्यास साकडे
पुत्राविना वंश न वाढे
मार्ग सुचवावा ||९||
वशिष्ठ गुरु सुचविती
यज्ञ करण्या सांगती
पुत्रकामेष्टी यज्ञ महती
आगीच असे ||१०||
गुरुंचा आशिर्वाद घेऊनी
राजा निघाला तेथून
संकल्प केला दशरथांनी
पुत्रकामेष्टी यज्ञाचा ||११||
श्रृंगऋषी महान
होते तप सामर्थवान
विनवितसे जाऊन
त्यांचे आश्रमी ||१२||
पाद्यपुजा त्यांची करुनी
भक्तिभावे विनवूनी
यज्ञासाठीं पाचारण करुनी
तयासी बोलावले ||१३||
मंडव घातला भला
यज्ञाचा भव्य सोहळा
ऋषीगण ब्राह्मण सगळा
यज्ञासी जमती ||१४||
यज्ञांत आवाहन केले
सर्व देव निमंत्रिले
हविर्भाव सर्वासी दिले
श्रृंगऋषीनें ||१५||
स्पष्ट मंत्रोपचार म्हणून
सर्व ऋषी एकसूर धरुन
अग्नीसी टाकती हवन
राजा दशरथ ||१६||
प्रसन्न झाली यज्ञदेवता
पायस कलश हातीं देता
समान भाग राण्यांस वाटता
पुत्र प्राप्त होई ||१७||
दशरथाच्या राण्या तीन
कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
आनंदी झाल्या पायस बघून
यज्ञाचा प्रसाद ||१८||
कैकयी बसली रुसून
पट्टराणी मी लहान असूनी
प्रथम भाग कौसलेस देवून
अपमान माझा होई ||१९||
प्रसाद घेवूनी बैसली
मनीं विचार करुं लागली
तत् क्षणी एक घार आली
प्रसाद जाई घेऊन ||२०||
सर्वजण होती चकीत
कांही समजण्याचे आंत
एक भाग घार नेत
आकाशी उडाली ||२१||
कैकयी झाली दुःखी
शब्द निघेना मुखी
प्रसंग ओडावला एकाएकीं
तिचेवर ||२२||
आपल्या प्रसादातील भाग
देवून कैकयीस सांग
सोडून द्यावा तुझा राग
विनवितसे दोन्ही राण्या ||२३||
चैत्रशुद्ध नवमीला
राम जन्म झाला
कौसल्या मातेला
आनंद होई त्रिभुवनी ||२४||
सुमित्रेचा लक्ष्मण
कैकयीस भरत शत्रुघ्न
चार पुत्र मिळून
पितृत्व दिले दशरथासी ||२५||
आदर्श जीवन जगला
पितृआज्ञे वनवास सोसला
मारिले दुष्ट रावणाला
यशस्वी केले रामराज्य ||२६||
रामाचा महीमा थोर
परमेश्वराचा तो अवतार
भक्तांचा करी उद्धार
त्याचे आशिर्वादे ||२७||
एक पत्नी, वचनी, बाणी
सत्य आणि प्रेमळ वाणी
अद्वितीय गुणांच्या खाणी
रामासी ठरवी पुरुषोत्तम ||२८||
रामाचे जीवन भव्य
आदर्शमय ते काव्य
दाखवोनी जगाला दिव्य
ठाव घेई सर्वा मना ||२९||
रामनामी मोठेपण
जाईल तो उद्धरुन
संकटे जात निघून
आठवण येता त्याची ||३०||
रामरक्षा स्तोत्र पठण
करी तुमचे देह रक्षण
नित्य नियमें वाचन
मनोभावें ||३१||
" शुभं भवतु "
डॉ. भगवान नागापूरकर
५-०१११८३
January 4, 2018
त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच …
July 3, 2017

हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा घेणारा सदर ठाण्याची वनजीवन संपदा.
डोंगराळ माळरानांनी सजलेल्या विस्तृत ठाण्याच्या जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या तशी फार. देशभर आढळणाऱ्या अनेक सापांच्या प्रजातींपैकी काही प्रजाती या आपल्या शहराला लागून असलेल्या जंगलात आजही मोठ्या संख्येने आपलं अस्तित्व टिकवून आहेत. खरंतर भारतात आढळणाऱ्या सापांची संख्या तशी फार असली तरीही यातील काही जाती विषारी आहेत. विषारी सापांचा आढळ हा विविध ठिकाणी पाहायला मिळतो. घनदाट जंगलात, डोंगररांगांजवळ, गवताळ भागात, पाणवठ्याजवळ, दगड कपारीत तर काही विषारी साप हे मनुष्यवस्तीजवळ ही सापडतात. एकूण विषारी सापांपैकी मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने सापडणारे असे चार विषारी साप असून हे साप अन्नाच्या शोधात मनुष्यवस्तीजवळ येतात. या चार सापांनंतर मनुष्यवस्तीजवळ आढळणारा अशा सापांच्या यादीत चापडा या विषारी सापाची गणना करता येईल.
जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक जाती उपजाती पाहायला मिळतात. या सापांना राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणानुसार यांचा अधिवास त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र, या चापडा सापाचा अधिवास हा केवळ भारतातच आणि त्यातही पूर्व आणि पश्चिम घाटाच्या पट्ट्यातच हा चापडा साप आढळतो. आपल्या भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ असून याच्या रंगात तसेच आकारात ठिकाणानुसार काहीसा फरक आढळून येईल.
या सापाची नोंद आपल्या इथे माथेरान, कोयना, भंडारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, अंबोली, कर्नाटक या सारख्या भागात डोंगरावरील जंगलात हा बांबू पिट व्हायपर अथवा चापडा सहज सापडतो.आपल्या मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यात येऊर, नागला बंदर, ओवळा इथलं जंगल, कल्याण-डोंबिवली नजीक गांधारी, निळजे या परिसरात तसेच नवी मुंबई, पनवेल, उरण इथे हा साप सापडतो.
चापडा हा साप व्हायपर या सापांच्या प्रकारात मोडतो. व्हायपर या जातीचे असे तसे रागीट आणि फारच चिडखोर असे असतात. आपल्या इथे मनुष्यवस्तीजवळ सापडणाऱ्या चार सापांपैकी दोन्ही व्हायपर या प्रकारातलेच आहे. नाग, मण्यार या सापांशिवाय फुरसं म्हणजेच साउस्केल व्हायपर आणि गुणच म्हणजेच रसल व्हायपर हे चार विषारी साप मनुष्यवस्तीजवळ अधिक येतात ते उंदीर, पाली यांच्या शोधात. या सापांचा दंश हा अनेकदा न कळत यांच्याजवळ गेल्याने वा अपघाताने सर्वाधिक झाल्याचं लक्षात येतो.
छायाचित्राची तांत्रिक माहिती
ठाण्यातल्या येऊरच्या जंगलातील पाठवणा पाडा या भागात सापडा सापाचं हे छायाचित्र मी टिपले आहे. चापडा साप अतिशय विषारी असल्याने याची फोटोग्राफी करताना फार काळजी घ्यावी लागली होती.
या छायाचित्रासाठी कॅननचा ५० डी कॅमेरा आणि टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स वापरली आहे. कॅमेर्यात अपार्चर एफ ५.६, शटरस्पीड १/६० आणि आयएसओ ४०० ठेवून हे छायाचित्र घेतले गेले आहे.
("पुढारी" मध्ये पूर्वप्रकाशित)
October 24, 2018
विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे.
January 7, 2021
विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे.
April 13, 2022
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी अधिकार्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीवर ताशेरे ओढून सामान्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे आणि महसूल या महत्त्वाच्या खात्यांमध्ये आढळणार्या भ्रष्टाचारामागचे मूळ कारण म्हणजे किचकट कायदे. सरकारी कामांमध्ये होणार्या दिरंगाईबाबत ठोस कायदे तयार झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. त्या दृष्टीने पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही.
October 13, 2010
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti