(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मराठा आरमार दिन – भाग-२

    आपल्या देशात आरमारी सामर्थ्याचे महत्व प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यांच्या निधनानंतर बलाढ्य आरमार हे त्यांचे सुत्र धरुन कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला जावा.शत्रुंनी त्यांचा उल्लेख समुद्री चाचे असाच करायचे खरं तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि हे सर्व शत्रु चाचे आहेत.इंग्रज त्यांना जमिनीवरचं आणि पाण्यातलं जे मिळेल ते गिळंकृत करणारा 'लॅण्डशार्क' म्हणायचे.. इंग्रजांनी कान्होजींना लुटारु,चांचा,खलपुरूष,बंडखोर सगळं काही म्हणुन घेतलं आणि आपल्या वकिलांना त्याच्या दारी तिष्ठत राहायला पाठवताना मात्र 'त्याच्याशी सभ्यपणे बोलावे' अशा सूचनाही दिल्या. पोर्तुगिजींनी तर कान्होजीला गलिच्छ शिव्या दिल्या तरीही त्यांची बार्बारोसाशी (तुर्की साम्राज्याचा नौसेनासंघटक व सेनापती) तुलना करुन त्याच पोर्तुगिजींनी त्यांना मैल्यवान भेटीही पाठवल्या.पश्चिम किनारपट्टिवर इंग्रज,डच,पोर्तुगिज,फ्रेंच इ. परकिय सत्ता होत्या पण ह्या युरोपिय शक्तींपैकी कुणाचही एकमेकांशी पटत नसत. इतकं असुनही आठराव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या परदेशी रक्तपिपासूंना कोकण किनार्यावरचा सर्वमान्य शत्रू निवडायला सांगितलं असतं तर त्यातल्या कुणीही मोगल किॅवा मराठ्यांच नाव घेतलं नसतं.ते एकमुखाने म्हणाले असते : "कान्होजी आंग्रे".

    कान्होजी आंग्रे युद्ध ह्या घटनेकडे खुप विचारपुर्वक पाहात असत लढाईतील यश केवळ बेफाम धाडसावर अवलंबुन नसुन अनावश्यक धोके पूर्ण विचारानी टाळणं हे डावपेचाइतकच महत्वाचं होतं हे त्यांना उमगलं होतं.

    सुरुवातीला कान्होजींनी आपल्या लढाऊ जहाजांचा वापर नौदलासारखा न करता किनार्यावरील गस्त घालणार्या जहाजांसारखा करुन ज्या जहाजांकडे मराठ्यांचे दस्तक परवाने नसतील त्यांना दंड भरायला लावणे इतकाच केला.समुद्रावरील मराठ्यांची सत्ता मुकाट्यांनी मान्य करायला लावणं हे त्या परिस्थितीतलं काहीसं महत्वाकांक्षी उद्दिष्ट कान्होजींनी बाळगलं होत.शिवछत्रपतींच्या मृत्युनंतर धामधमीच्या काळी संभाजीराजेंची हत्या व राजाराम महाराज दुर जिंजीप्रदेशी अशा वेळी आरमाराचं संपुर्ण परिवर्तन अाणि कोकणचा पद्धतशीर रितीने कबजा मिळवला तो ह्या एकाच माणसानी.जिंजीला राज्याभिषेकाच्या वेळी त्याच्या नेमणुकीची घोषणा करण्यापलीकडे छत्रपतींकडुन कान्होजींना फारसा साहाय्य नव्हतं.पण कान्होजी मात्र मराठ्यांच्या छत्रपतीखेरीज कुणालाही स्वामी मानायला तयार नव्हते.राजाराम महाराज जिंजीवरुन स्वराज्यात आल्यावर त्यांनी फार मोठा कोकणी मुलुख त्यांच्या हवाली केला.७-८ वर्षांच्या अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या सागरी मुलुखावर राजाराम महाराजांनी आपल्याला आरमाराचा सरसेनापती करावे अशी अपेक्षा करणे कान्होजींची चुकीची नव्हती पण राजाराम महाराजांनी उत्तरेला कान्होजी आंग्रे व दक्षिणेला भवानजी मोहिते यांना आपापल्या विभागाचे नायब सुभेदार नेमले.मराठा सार्वभौमत्व न जुमानता स्वखुषीने कारभार करायला आणि वेगळी वाट धरायला जर कारणच हवं असेल तर ते इथे होतं. पण शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या सार्वभौमाविरुद्ध असणार्या विचाराचा त्यांच्या मनाला स्पर्शही झाला नव्हता.आपली बढती व बर्खास्ती त्यांनी राजांवर सोपवली.४० वर्षापुर्वी जेव्हा आरमार स्थापन केलं त्यावेळी अारमाराची कर्तव्य कोणती,जबाबदार्या कोणती ह्याची शिवरायांनी स्पष्ट शब्दात मांडणी केली होती.किनारपट्टीचं संरक्षण,देशाच्या समुद्रावरुन चालणार्या व्यापाराच्या धोक्यापासुन बचाव आणि सर्व जहाजांकडून जकातीची वसुली.आता कान्होजीच्या काळात आरमाराला दाढा,पंजे आणि पिळदार स्नायू लाभले होते.आता ते कामगिरीला सज्ज झालं होतं.सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी आरमाराला कान्होजीसारखा थंड डोक्याचा आणि कर्तबगार सरखेल लाभला होता.कान्होजींनी समुद्रपर्यटनाला निघालेल्या सर्व जहाजांना परवाने द्यायला सुरुवात केली होती त्यांना "दस्तक" म्हणत.पोर्तुगिझांच्या "कार्ताझ" इतकीच ह्या दस्तकींची किंमत होती.आणि सवलती तशाच होत्या.

    कान्होजींच मुख्य ध्येय आणि उद्योग ,अधिक मोठी आणि अधिक मजबुत जहाजं बांधणे हेच होतं.हिंदुस्थानातल्या जहाजांच्या रचनेत पुरातन काळापासून चालत आलेल्या पध्दतीत काही फरकच पडला नव्हता.सगळी जहाजं एका ठरावीक नमुन्याचीच बांधली जायची.फक्त त्यातली काही मोठी होती.आणि काही लहान होती एवढाच काय तो फरक.जहाज बांधणीच्या एकूण कल्पनेतच आमुलाग्र फरक घडवून आणायची गरज होती.

    कान्होजी व पोर्तुगिजांशी असणारा मुख्य दुवा"मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" नावाचा इसम होता.ह्या माणसाला कान्होजी आंग्रेंनी जहाज बांधणीच्या आणि रचनेच्या कामात आपला सल्लागार नेमला.वस्तुत: त्यांनी बऱ्याच परदेशी तंत्रज्ञांना,बंदुकबाजांना,बंदुकीच्या नळ्या करणाऱ्यांना,बंदुकीची दारु करणाऱ्यांना,अश्वपरिक्षा असणाऱ्यांना अशा अनेकांना आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते.पण सर्वात जास्त परदेशी लोक होते ते जहाद बांधणीचे लोक."मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" या सोबत आणखी एका पोर्तुगीज नावाचा वारंवार उल्लेख आढळतो ते म्हणजे"मॅन्युएल डि कॅस्ट्रो" याचा. हा निशाणबाजीत अतिंशय तरबेज होता.

    इंग्रज,फ्रेंच,डच,पोर्तुगिझ हे मराठ्यांच्या जहाजांचा उल्लेख "आंग्र्यांची गलबतं" असा किंवा "आग्र्यांचा आरमार" असासुद्धा करायला लागले.सेनापतीच्या नावाने फौजा ओळखल्या जाण्याचे दाखले इतिहासात क्वचितच आढळतात.युद्धात लढणार्या खलाशी किंवा सैनिकांपैकी फार थोड्याजणांना आपल्या नौसेनापतीचं नाव ठाऊक असतात.मराठ्यांच्या आरमाराचा उल्लेख "आंग्र्यांचा आरमार असा करणे" हेच आंग्र्यांचा पराक्रमाची साक्ष आहे.पण ह्यांमधुन एक विचित्र गोष्ट घडली छत्रपतींच्या मनात आंग्रेविषयी संशय निर्माण करण्यासाठी इंग्रज,पोर्तुगिज,डच,फ्रेंच ह्या लोकांनी त्यांच्या अजोड पराक्रमचा विपर्यास करुन कान्होजीबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली की, कान्होजी आंग्रे स्वतंत्र राजा असल्याचे जाहीरपणे सांगतो छत्रपतींच्या अनुमतीशिवाय आपला अंमल गाजवु पाहतो.याउलट कान्होजींनी कंपनीच्या सल्लागारांना वारंवार बजावलं होतं की आपण "मराठा साम्राज्याचे सरखेल आहोत.समुद्राचे सार्वभौमत्व मराठ्यांच्या छत्रपतीकडे आहे."

    कान्होजींनी मानसून ,बाॅम्बे,गोडोल्फिन,अॅन हे कंपनीच्या अत्यंत महत्वाच्या जहाजांवर यशस्वी हल्ला चढवला.

    चर्चगेट,बझार गेट हे जे आज मुंबईच्या ठिकाणांची नावे आहेती त्या कान्होजी आंग्रेंपासुन बचाव करण्यासाठी मुंबई शहराभोवती बांधलेल्या भिंतीच्या दरवाजाचे नाव आहेत.

    कान्होजींच्य् विरुध्द लढाईस इंग्रजांनी सहा महिन्यांच्या आत ब्रिटानिया,फेम,रिव्हेंज,व्हिक्टरी,फ्राम,बून अशी अधिक बलवान असं आधुनिक पद्धतीच आरमार उभा केलं.नवीन नियुक्त झालेला गव्हर्नर "बुन" ह्याने विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी आपलं हे आरमार बाहेर काढलं व १८ जून १७१८ ला मोठी नामुष्की पदरी पाडुन हे आरमार मुंबईला परतले.हा हल्ला सर्वात मोठा समजला जातो.कोकणच्या इतिहासात झाला नाही असा तोफांचा भडिमार विजयदुर्गावर झाला.आजही विजयदुर्गाच्या भोवताली खडकावर आदळलेल्या तोफांचे खुणा आहेत.पण आंग्र्यांचे बळ इतके वाढले होते की हा हल्ला त्यांनी यशस्वीरित्या परतवला व शत्रुसैन्याचा जबर नुकसान केलं ही लढाई अहंकारी गव्हर्नर बुनला मोठी चपराक होती ह्या हल्ल्यातुन त्याने धडा न घेतल्याने पुढे त्याच्या पदरी आणखी नामुष्की आली.फेमस होण्याच्या बाबतीत तत्कालीन मुघल बादशाह, छत्रपती शाहू आणि बाजीराव यांनाही आंग्रेंनी मागे टाकले होते . मलबार ते नॉर्थ कॅरोलिना पर्यंत प्रसिद्ध पावलेले एकमेव कान्होजी आंग्रे. छत्रपतींनी कान्होजींचे इतके विराट स्वागत केले होते कि जेजुरी ते सातारा पूर्ण रस्ता भंडारा उधळल्या मुळे सोनेरी झालेला.

    जमिनीवर कुणाचीही सत्ता असो, खंदक आणि भिंतीच्या कडेकोट बंदोबस्ताआड असणार्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो पण अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कोकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यावर दुमच नव्हतं.
    "सत्ता होती ती मराठा आरमार प्रमुख सरखेल कोन्होजी आंग्रे यांचीच!"

  • सोयाबिन

    शहरात राहणार्‍यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का?

    नाही..

    बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल.

    मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर रांगा लावलेल्या दीसल्या सहज वीचारल तर प्रतेक गाडीत सोयाबीन. शेतकरी बांधावानी वीकायला आनलेले. भाव वीचारला 2200 /2500 असा.(हाच भाव पाच वर्षे आगोदर पन होता.पन त्यावेळी सोया तेलाचा भाव 40/45 रूपैय होता.पन सोयाबीनचा पाच वर्षा आगोदरचा भाव आज शेतकरी भावाला मीळतोय. पन तेलाचे भाव आज 70ते75रूपय हा विरोधाभास नाही का?

    कच्चा माल आतीश्य स्वस्त आणि त्या पासुन बननारा माल पाच पट माहाग कारन कच्चा माल गरीब,असंघटीत अश्या शेतकरी वर्गाचा ) गाड्यावाल्याना वीचारले कोठुन आलात बरेच सांगत होते की मेहकर, जानेफळ, बुलडाणा,शेगाव,नांदुरा, मलकापुर आणी इतर बर्याच गावावरून. आलेला माल माती मोल कीमतीत वीकल्या जात होता तरी शेतकरी रांगा लाऊन उभा.

    काय करनार वीदर्भ मराठवाडा गेल्या चार ते पाच वर्षा पासुन दुष्काळात होर पाळतोय. या वर्षी पाऊस बरा झाला सोयाबीन एक मात्र नगदी पीक.त्याच्या भरोश्यावर दीवाळी, उसनवारी, कर्ज, मुलांचे ,शिक्षण आणी बर्याच गोष्टी .गाडीत माल भरला खामगावला चांगला भाव मीळतो म्हणुन आनलेला. बाजारात भाव नाही वापस नेता येत नाही. आगोदर खर्च खुप झालेला. व्यापारी जो भाव देइल तो भाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी बांधावाच्या जीवावर मोठी झालेली संघटना मुंग गीळून चुप का? निवडनुकी च्या अगोदर ईव करेगे टीव करेगे म्हननारे आता कुठ आहेत .

    आपण जगतो आहोत ते शतकर्य च्या भोरोश्यावर. शेतकरी पीकवतो तेंव्हा आपल्या ताटात असत. शेतकरी जगला पाहीजे. लाखांचा पोशींदा जगला पाहिजे. सरकारला म्हना पेट्रोल शंभर रूपय करा.दारू ,सिगार,बुट इतर चैनीच्या वस्तू चे भाव दीडपट करा नोकरदार वर्गाला एका महीन्याचा पगार कमी द्या. शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला भाव द्या .......

    मित्रांनो आपण चिनचे सामन न घेन्याची चळवळ ऊभी केली त्याची दखल चीनला घ्यावी लागली...तसी ताकत आपल्याला सोशल मीडीयावर शेतकरी बांधवासाठी ऊभी करावी लागे मी छोटासा प्रयत्न सूरूकेला आहे .आप नाहाक चुटकुले पाठवतो आज शेतकरी भावाची व्यथा पाठवा....

    कारन हे सरकार ..... what's up, Facebook च सरकार आहे.याला या मार्फत माहीती लवकर समजते...

    -- तुकाराम लांडे

  • प्रसन्नतेची उधळण

    हिंदू परंपरेत, केवळ गंमत किंवा मजा (एन्जॉयमेंट) म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्यापाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

  • शॉपिंग कार्ट अर्थात ट्रॉली

    goldman-shopping-trolleyमॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.

    अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ' पिग्गली विग्गली ' या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.

    एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.

    उत्साहाने दुसर्‍या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.

    आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.

    कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.

  • ट्रॅक्टर

    आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे आणि ते योग्यही आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरट, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रक्टर हे वरदान आहे. हे कृषीयंत्र बैलजोडी सांभाळण्यापेक्षा शेती व्यवसायात सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे.

    अर्थात, ट्रक्टर विकत घेताना निरनिराळ्या कंपन्यांच्या जाहिरातीला बळी न पडता अभ्यासांती अनुभव जमेला धरावा आणि गुणवत्ता, दर्जेदारपणा आदी आवश्यक असणाऱ्या ट्रक्टरची निवड करावी. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, पडताळणी करून तो विकत घ्यावा. कारण तो घेण्यासाठी फार मोठे भांडवल गुंतवावे लागते.

    विशेषतः आवश्यक असतील तेवढी सुरुवातीला ट्रक्टरचालीत औजारे घ्यावीत म्हणजे अडचणी येत नाहीत. नंतर मात्र सवडीने जशी जमतील तशी इतर औजारे घ्यावीत. ट्रक्टर औजारासाहित स्वयंपूर्ण असणे कधीही चांगले. घेतलेला (खूप भांडवल घालून) ट्रक्टर सुलभतेने चालवा. त्याची कार्यक्षमता कमीत कमी १०-१५ वर्षे टिकून राहायला हवी. आपण ट्रक्टरची योग्य प्रकारे काळजी घ्यावी.

    ट्रक्टर काम झाल्यानंतर उन – पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवाऱ्याला ठेवावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल अगर काडीकचरा काढून स्वच्छ करावा. ट्रक्टर नेहमी एकहाती असावा. ड्रायव्हर सारखे बदलू नयेत आणि ट्रक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात.अगदी पहिली गोष्ट म्हणजे इंजिनटाकीतले तेल पुरेसे आहे कि नाही ते पाहावे. पाम्पामधले वंगण / तेल डीप स्टीकच्या सहाय्याने तपासावे. रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे. एअर क्लीनर स्वच्छ करावा. ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या सहाय्याने तपासावे. टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी. (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी. असावा.) फॅनबेल्ट तपासावा. ज्या ठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत. महत्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत. बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे कि नाही ते तपासावे. इ. गोष्टी पाहून खात्री करून मगच किल्ली फिरवून ट्रक्टर चालू करावा.

    ट्रक्टर चालू करताना पहिल्यांदा इंधनकॉक चालू करावा. गिअर शिफ्ट लिव्हर आणि पिटीओ लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. थ्रोटल लिव्हर तीनचतुर्थांश जागेवर ठेवावी. क्लच दाबून ट्रक्टरची चावी ऑनच्या बाजूने फिरवावी. अशा पद्धतीने ट्रक्टर चालू करावा. ट्रक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी. क्लच पेडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे. गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत.

    ट्रक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला कि ट्रक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे. जर इंजनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भर कमी करावा. ट्रक्टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये. ट्रक्टरमागे घेताना औजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी. ड्राबर पट्टी अगर औजारांवर उभे राहू नये. नेहेमी क्लच हळुवार सोडवा. रोडवर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहेमी ट्रक्टर गिअरमध्ये असावा. वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये.

    मॅन्युअलप्रमाणे ट्रक्टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात. काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून ट्रक्टरची देखभाल करून घ्यावी. म्हणजे पुढे भविष्यात एखादा मेजर घोटाळा होत नाही. ट्रक्टर यंत्राची आपण जशीन काळजी घेऊ तसा तो आपल्याला साथ देईल. अलीकडे ट्रक्टरनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुधारणा केल्यात. सुविधा निर्माण केल्यात. त्यामुळे ट्रक्टरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळेच देखभालीकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडते. मॅन्युअलचा अभ्यास करून या महागड्या पण उपयुक्त यंत्राची देखभाल सतत ठेवावी.

    Vasant Charmal
    Krushi - Sheti
    Schedule - 26 oct 16 - 17:00
    Search for a photo of tractor and use it

  • सुबाभूळ लागवड – फायदे प्रचंड

    पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुबाभूळ निश्चितच फायद्याची आहे.

  • ओवाळूं आरती : भाग – १/५

    भारत हा उत्सवप्रिय, सणप्रिय देश आहे. भारतात सण भरपूऽर , आणि, सण म्हटलें की, पूजा-अर्चा-आरत्या आल्याच ! त्यातील ‘आरती’ या विषयावर कांहीं ऊहापोह करावा म्हणून हा लेख.

    भाग -

    भारतातीलच काय , पण सर्व जगातील बरेच लोक ‘अस्तिक’ आहेत. ‘अस्ति’ म्हणजे, ‘(तो/ती/ तें) अस्तित्वात आहे’ . अति-पुरातन काळीं, ‘अस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘वेदांना मानणारा’ असा होत असे. कारण वेद हे अपौरुषेय , म्हणजेच ईश्वरीय, मानले जात. परंतु, आतां, म्हणजे गेल्या बर्‍याच शतकांपासून, ‘अस्तिक’ म्हणजे, ‘ईस्वराचें अस्तित्व मानणारा’ असा अर्थ घेतला जातो.

    आदिम काळापासून, जगभर मानवप्राणी ईश्वराचें अस्तित्व मानत आलेला आहे, आणि हा विचार हजारों वर्षें अप्रतिहत सुरूंच आहे, अजूनही आहे. कांहीं काळापासून, ‘नास्तिकपण’, म्हणजे ‘ईश्वराचें अस्तित्व न मानणें’, म्हणजेच ‘निरीश्वरवाद’ , हा विचार समाजातील कांहीं व्यक्ती मानूं लागल्या आहेत. अर्थात्, जसजसा समाजात विज्ञानाचा प्रसार-प्रचार होत गेला, होत आहे, तसतसे, ‘निरीश्वरवाद’ मानणारे ‘बुद्धिवादी’, ‘इहवादी’ लोक कांहीं अंशीं तरी वाढत आहेत. मात्र, ‘इहवाद’ हा भारतास नवीन नव्हे, तर हा अनेक शतकें-सहस्त्रकें जुना आहे. ज्याला ‘चार्वाकवाद’ अथवा लोकायत’ म्हणतात, तें दर्शनशास्त्र इहवादीच आहे. अर्थात्, ‘ईश्वराचें अस्तित्व मानणें’ हा श्रद्धेचा भाग आहे. आणि, बोजड , कंपल्सरी व ‘अंगावर येणार्‍या’ कर्मकांडात न अडकून पडलें, तर, ईश्वरावर (देवावर) भरोसा ठेवून जीवनक्रमण करणार्‍यांना कांहीं अंशीं तरी जीवन सुकर होतें, व त्यांचा मानसिक ताण कमी होतो, हें मानणें क्रमप्राप्त आहे. आपण आरत्यांबद्दल बोलत आहोत, त्यामुळे, ‘अस्तिक्याबद्दलच’ चर्चा करणें अपेक्षित आहे.

    पुढे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊं या, आणि ती आरत्यांच्या संदर्भात महत्वाची आहे. ती गोष्ट अशी की, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम हे धर्म एकेश्वरवादी आहेत, म्हणजेच ते फक्त ‘एकच-ईश्वर’ मानतात. तसें हिंदू धर्माचें नाहीं. हिंदू धर्म हा, अगदी वैदिक काळापासून अनेकेश्वरवादी आहे. ‘तेहतीस कोटी’ देव अशी संकल्पना आहेच. तसेंच, ‘अवतार’ ही संकल्पनाही हिंदू धर्मात आहे. अवताराची संकल्पना सुरुवातीला, आणि त्यानंतर बराच काळ, जरी विष्णूच्या संदर्भात निर्माण झाली, तरी नंतरच्या काळात, इतरांच्या बाबतीतही ही संकल्पना मानली जाऊं लागली. गणपतीही वेगवेगळ्या युगांमध्ये पुन्हा-पुन्हां अवतरत असतो, अशी संकल्पना आहेच. हल्लीच्या काळाचा संदर्भ घेतला तर,’शिरडीचे साईबाबा हे सूफी संत, ‘दत्ताचा अवतार’ मानले जातात, तर ‘सत्य साईबाबा’ हे मूळ शिरडीच्या साईबाबांचा अवतार मानले जातात.

    याचा अर्थ असा नाहीं की हिंदू धर्मात एकेश्वरवाद नाहींच. तोही आहे. उदाहरणार्थ , आदि- शंकराचार्यांचा ‘अद्वैतवाद’ म्हणजेच आत्मा-परमात्मा यांचें ऐक्य. अर्थातच, तिथें एकेश्वरवाद हा अध्याहृत आहेच.

    महत्वाची गोष्ट अशी की, हिंदू धर्म हा, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद यांच्यातही समन्वय साधतो. वैदिक कालातही इंद्र, मित्र, वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) इत्यादी दैवतें मानली जात होती. आजही, हिंदू हे, गणपती, शंकर, राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश, बालाजी , स्कंद / कार्तिकेय / षण्मुगम् (षण्मुखम् ), खंडोबा, म्हसोबा, वगैरे अनेकानेक नांवांच्या देवांना ; तसेच रेणुका, महालक्ष्मी, दुर्गा, काली, पार्वती, सरस्वती, इत्यादी अनेकानेक नांवांच्या देवींना भजतात. ( ही केवळ उदाहरणें आहेत. त्यामुळे, इतर देव-देवींच्या नांवाचा उल्लेख न केल्याबद्दल क्षमस्व) . आणि, असे अनेक देव-देवी मानूनही, ‘परमेश्वर’, ‘परमात्मा’ ही ‘सर्वश्रेष्ठ’ शक्ती मानलेली आहेच. परत, व्यंकटेश म्हणजे विष्णू, पांडुरंग म्हणजे कृष्ण, राम व कृष्ण हे विष्णूचे अवतार, असें ऐक्य मानलेले आहेच.(ज्येष्ठ संशोधक कै. रा, चिं ढेरे म्हणतात की, विठ्ठल व बालाजी ही ‘लोकदैवतें’ आहेत. म्हणजेंच, विठ्ठल व बालाजी हें एक भिन्न प्रकारचें ऐक्य झालें). त्यामुळे, हिदूंमध्ये अनेक देवतांचें पूजन-अर्चन होतें. याचा अर्थ असा की , ‘unity in diversity’ हें तत्व हिंदूंच्या बाबतीत अनेक अर्थांनी खरें आहे.

    पूजन व अर्चन हे बहुतांशी बरोबरच (together, साथसाथ) जातात. पूजाअर्चा (हिंदीत : पूजा- अर्चन) अशा जोड-शब्दप्रयोग आपण नेहमीच वापरतो. पूजन/पूजा व अर्चन/अर्चा हे संस्कृत शब्द आहेत. व्ही.एस्. आपटे यांचा संस्कृत-इंग्लिश शब्दकोश त्यांचे असे अर्थ देतो : पूजन : To worship, To revere. अर्चन : To salute, To welcome with respect, To honour, To praise, To worship. याचा अर्थ असा की पूजन व अर्चन हे दोन्ही शब्द जवळजवळ समानार्थी आहेत. पण , जर दोन्ही एकच असते, तर त्याच्या जोड-वापरानें पुनरुक्ती झाली असती ( जसें की, ‘पिवळा पीतांबर’). म्हणजेच, दोहोंत थोडाफार तरी फरक आहे, खास करून प्रॅक्टिकली. पूजन हा मुख्यत: कार्मिक (इथें त्याचा अर्थ आहे, ‘कृतीशी संबंधित’) विधी आहे , तर अर्चन / अर्चना हें मुख्यत: ‘वाचिक’ कार्य आहे. ( अर्थात्, अर्चनेच्या संगें थोडीफार कृती येतेच. त्याबद्दल आपण पुढे पाहूं ).

    उपासना व पूजन म्हटलें, तर, तें अनेक देवदेवतांचें तर असतेंच, पण तसेच तें अनेक साधू-संतांचेही असतें. शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची प्रत्यक्ष पूजा होवो न होवो, महाराष्ट्रीय लोक त्यांची ‘मानसपूजा’ तर करतातच. ( शिवरायांच्या स्वत:च्या काळातील किंवा नंतरच्या काळातील, त्यांच्यावरील पोवाडे आहेत, मराठी-हिंदी काव्यें आहेत, बखरीतील उल्लेख आहेत, पण आरत्या दिसत नाहींत. शिवरायांच्या आधुनिककालीन आरतीचा संदर्भ आपण पुढे जोडूं. पण तात्पर्य काय, तर, महापुरुषांवरही आरत्या असूं शकतात ).

    पूजाविधी पाहिले तर, नेहमीच्या, म्हणजे दररोजच्या (घरातील अथवा मंदिरातील) पूजाविधींबरोबरच, सणासुदीचे पूजाविधी आहेत ; अभिषेक-लग्न-मुंज-गर्भाधान- वास्तुशांती-उदकशांती- नामकरणविधी (बारसें)-व्रतवैकल्यपूर्ती/उद्यापन वगैरे विविध प्रसंगीं करावयाचे पूजाविधी आहेत ; परत, सत्यनारायण, सत्यविनायक असे विशिष्ट पूजाविधी आहेतच.

    अर्चना वा वाचिक ‘वंदन’ अनेक प्रकारचें असतें. प्रार्थना, भजन, कीर्तन, स्तोत्र-श्लोक-ऋचा-मंत्र यांचें पठण, अध्यात्मिक-धार्मिक-भक्तीपंथीय निरूपण, दैवी घटनांचें व देवादिकांशी आणि संतांशी संबंधित कथांचें गद्यपद्यात्मक कथन-गायन , (कधीकधी, संगतीनें नृत्यही) , दैवतांची ( किंवा संतांची / गुरूची ) स्तुती व पदवंदना, नाम-जप, (तपासहित वा त्याव्यतिरिक्त), अशा अनेक प्रकारें हें वंदन होतें. आरत्या हा त्यातलाच एक प्रकार.

    ‘आरती’ या पद्यप्रकाराकडे ‘एक साहित्यप्रकार’ म्हणून आस्वादायचा प्रयत्न करूं नये, कारण साहित्याच्या निकषांवर तोलायचें तें काव्य नव्हेच. अर्थात्, तो जरी एक काव्यप्रकार असला, तरी त्याचा संबंध, श्रद्धा, भक्ती, धार्मिक बाबी, इत्यादी गोष्टींशी असतो. तेव्हां, त्या दृष्टीकोनातूनच ‘आरती’च्या पद्यांकडे पाहणें योग्य ठरेल.

    आरती हा शब्द संस्कृतच्या ‘आरात्रिका / आरात्रिकम्’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आपटे यांचा शब्दकोश असा देतो : (1) ‘Waving a light in front of an idol’ ; (2) The light.

    म्हणजेच, ‘आरती’ हा शब्द मूलत: ज्योतीशी संबंधित आहे, आरती म्हणजे ‘त्याप्रसंगीं म्हटलेलें पद्य’ हा अर्थ नंतर जोडला गेलेला आहे.

    त्यामुळे, आज असें आहे की,

    • आपण ‘उच्च-रवानें वाचिक उच्चारण’ करतो म्हणजे, मोठ्यानें चालीवर म्हणतो, तीही आरतीच ;

    ( हा अर्थ नंतर प्राप्त झालेला दिसतो) ;

    (अशा प्रकारें मोठ्यानें ‘म्हणण्याला’ --- जें गाण्याच्या क्रियेहून भिन्न आहे ----- उर्दूत, ‘तरन्नुम नें सुनाना’ म्हणतात, अर्थात् तो शब्द उर्दूत साधारणपणें गझलच्या संदर्भात वापरला जातो, तिथें आरतीचा संबंध नाहींच. चालही वेगळी. मात्र क्रिया तीच .)

    • त्याचप्रमाणें, त्या प्रसंगी पेटवलेल्या निरांजनात ज्योत, प्रकाश, हातात घेऊन आपण आराध्याला ओवाळतो, ती ओवाळण्याची क्रियाही (हिंदीत : ‘आरती उतारना’), आरतीच.

    ( हा मूळ अर्थ आहे ) ;

    • आणि, तो निरांजनाच्या ज्योतीचा प्रकाश म्हणजेही आरतीच,

    ( हाही मूळ अर्थ आहे ) .

    आरती मराठीत इतकी भिनली आहे की, मराठीत ‘आरती ओवाळणें’ हा एक वाक्प्रचार झालेला आहे. व्यंगार्थानें, चेष्टेनें, किंवा हिणवूनही, ‘आतां तुझी आरती ओवाळूं कां’, किंवा ‘आरती ओवाळायचीच बाकी राहिली आहे’ अशा प्रकारचे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (४)/११

    • सुशिम कांबळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
    • ‘कॉलोनियल-इरा’मधील इंग्रजांची बाजू घेण्याचें मला कांहींच कारण नाहीं. मात्र, इंग्रजांनी मुद्दाम मोजक्या लोकांना(च) इंग्रजी शिकवली, असें म्हणणें बरोबर नाहीं. जे लोक socio-economically एका विशिष्ट, upwardly mobile वर्गात होते (जात कुठलीही असो) , ते अशा भाषा शिकतातच, मग ती संस्कृत असो, मध्य-युगात फारसी असो, वा आधुनिक काळात इंग्रजी, (किंवा गोव्यात पोर्तुगीझ, व पाँडिचेरीला फ्रेंच ) . त्या लोकांना स्वत:च्या प्रगतीसाठी ते आवश्यक वाटतें, म्हणून ते ती भाषा शिकतात, हेंच खरें आहे.

    ( आणि, आज तर भारतावर इंग्रजांचें राज्य नाहीं. तर मग, आज जे upwardly mobile लोक सॉफ्टरेअरच्या कामासाठी व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इंग्लिश शिकतात, त्याचें काय ? ).

    • तसेच संस्कृतचेंही आहे. वैदिकेतरांना गुलाम बनवण्यासाठी संस्कृत मुद्दाम मोजक्याच लोकांना शिकवली गेली, असें म्हणणें म्हणजे सत्याचा विपर्यास आहे.
    • पुरातन व मध्य युगात अनेक राजांना संस्कृत येत नव्हती (एका सातवाहन राजाची गोष्ट तर प्रसिद्धच आहे). पण ते गुलाम नव्हते, तर राजे होते. असे अनेक क्षत्रिय, वैश्य व अन्य राजे, जसें की शक, कुषाण, हूण , यांना संस्कृत येत नव्हती, पण ते निश्चितच गुलाम नव्हते.
    • जैन व बौद्ध जन हे वैदिक नव्हते ; ते तत्कालीन प्राकृत भाषांमध्ये व्यवहार करीत, त्यांच्यातील जनसाधारणांना संस्कृत येत नव्हते; पण त्यातील कोणीही गुलाम नव्हता. जैनांमध्ये तर मोठमोठे ‘श्रेष्ठी’ (धनवंत व्यापारी) होते, वीर-सेनापती होते ; गुलाम कोण होता ?
    • शूद्रांबद्दलही तेंच म्हणतां येईल. नरहर कुरुंदकर सांगतात (संदर्भ : वर उल्लेखलेला लेख), की , शूद्र म्हणजे गुलाम हे समीकरणही चुकीचें आहे. (पुरातन काळात ) ‘प्रत्येकाच्या जवळील विकत घेतलेले गुलाम’ हा वेगळा वर्ण आहे. गणिकांना शूद्र मानलें गेलेलें आहे, पण त्यांच्याकडे मोठा नोकरवर्ग असे, गुलामही असत. तसेंच, आधी जे शूद्र होते, ते नंतर क्षत्रिय होण्याची, आणि, शूद्र असूनही राजे असण्याची उदाहरणें आहेत. (जिज्ञासूंनी , नरहर कुरुंदकर या साम्यवादी असलेल्या , पण निष्पक्ष विचारांच्या विचारवंताचें लिखाण मुळातूनच वाचावें. कित्येक अपसमज दूर होतील).
    • खरें तर, हिंदूंमधेही, (खास करून , नंतरच्या काळात) किती जनसाधारणांना संस्कृत येत होती ?
    • त्यामुळे, संस्कृत येणें न येणें व गुलामगिरी यांचा अर्थाअर्थी कांहींही संबंध नव्हता.
    • इतरेजनांची भाषा संस्कृतपेक्षा हजारो वर्षें जुनी आहे , ही statement सुद्धा वास्तवाला धरून नाहीं. भाषाविषयक चर्चा आपण आधी केलेलीच आहे, तिच्या पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं. संस्कृत ही येथील भाषांची ‘जननी’ आहे किंवा कसें, याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे.
    • अश्वघोषाचा उल्लेख करून, कांबळे म्हणतात की ‘संस्कृत पंडितांनी वैदिक धर्म सोडून जैन वा बौद्ध धर्मात प्रवेश केला होता ’. कांहीं जणांनी कदाचित तसें केलेंही असेल. मात्र, हिंदु धर्मातही वेदप्रामाण्य न मानणारी ‘दर्शनें’ आहेत, जसें सांख्य, योग, वैशेषिक, लोकायत. त्यामुळे, हिंदु धर्माचा भाग राहूनही वेदप्रामाण्याच्या दायर्‍याबाहेर सहज रहाता येत असे. त्यामुळे, संस्कृत पंडितांन आपला धर्म सोडायची कांहींही जरूर नव्हती.

    मात्र, जैनांनी व बौद्धांनी संस्कृतमध्ये रचना करण्याचें कारण तें नव्हे. जैन किंवा बौद्ध विद्वानांनी प्राकृतात लिहिलें, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलें, व संस्कृतातही लिहिलें. त्या कारणांचा ऊहापोह आपण आधी केलेलाच आहे.

    • संस्कृत समाजाची भाषा होऊं शकली नाहीं, मग तिनें ऐक्य प्रस्थापित कसें झालें ? ( इति कांबळे ) -

    प्रागैतिहासिक काळीं आर्ष-संस्कृत ही एका पूर्ण-समाजाचीच भाषा होती. परंतु, शेकडो वर्षें लोटल्यावर तिचें रूप, संपर्क-भाषा, ज्ञान-भाषा, दुवा-भाषा (Link Language) अशा स्वरूपाचें झालें. त्यामुळे विविध विषयांमधील ज्ञान---- मग तें, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, खगोलशास्त्र असो, वैद्यक असो, गणित असो, साहित्य-कला असो, किंवा इतर कांहींही असो, ------ संस्कृतमुळेच भारताच्या विविध भागांमध्ये पोचलें ; भारतातच नव्हे तर पूर्व-आशियातील अनेक देशापर्यंतही पोचलें.

    • ज्ञानेश्वर हे यादवकालीन आहेत. त्यावेळी, (त्यांच्या किमान १५०-२०० वर्षें आधी, म्हणजे मुकंदराजांच्याही आधी), प्राकृतातील, ----- महाराष्ट्री, अपभ्रंश अशा क्रमानें, ----- ‘मराठी’ हें, (प्राकृत) भाषिक रूप उदयाला आलें होतें. म्हणून ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांच्या मराठीत लिहिलें. भाषिक बदलांच्या प्रक्रियेची चर्चा आपण आधी केलेलीच आहे. संस्कृत ही त्या काळात केवळ Link-Language म्हणून, ज्ञानभाषा म्हणूनच, राहिलेली होती.
    • आपण युरोपचें उदाहरण घेऊं. लॅटिन ही आधीच्या काळीं रोमन-समाजाची भाषा होती. बर्‍याच नंतरच्या काळात, तिचें स्वरूप केवळ , ज्ञानभाषा व दुवा-भाषा म्हणूनच राहिले. मध्य युगात विविध प्रादेशिक भाषा पुढारल्या होत्या , जसें फ्रेंच, इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, वगैरे. पण, मध्ययुगात ज्ञानग्रंथ लॅटिनमध्येंच लिहिले जात. त्यामुळे, अन्य भाषाभाषियांनाही त्यांना सहजपणें समजूं शकत. तरीही प्रादेशिक भाषांमध्ये रचना होतच होत्या. उदा. इंग्रजीत मिल्टन, शेक्सपियर, वगैरे.
    • मध्य-युगात संस्कृतचेंही तेंच झालें. परंतु, वृथाभिमानी ब्राह्मण-जन, प्रादेशिक भाषेला ‘ज्ञानभाषा’ म्हणून मानेनात. ( ध्यानात घ्या, इथें आपला रोख ‘ज्ञानभाषे’बद्दल आहे. मराठीत रचना करायला आक्षेप घेणारे ब्राह्मणही घरीदारीं मराठीच बोलत, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे ). म्हणूनच, एकनाथांना असें खडसावून विचारावें लागलें की , ‘ मराठी काय चोरापासून झाली?’
    • पुरातनकालातील व मध्ययुगातील कांहीं परंपरांचेही तेंच आहे. त्या समर्थनीय नाहींतच. पण, त्याचा दोष जातो, तो समाजातील घटकाला किंवा घटकांना, एखाद्या भाषेला नव्हे, हें आपण पूर्वीच चर्चिलें आहे.

    ( पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • तुमचा डेस्क – तुमची स्टाईल

    घर सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे शो-पीस, एंटिक पीसचा वापर करतो. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कार्यालयामधील वातावरण आनंदी वाटावे असे वाटत नाही का? कारण कार्यालयामधील कामकाजाचा कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचे ऑफिस कल्चर संबंधित केलेल्या अध्ययनानुसार नुसतेच समोर आले आहे. त्यामुळेच कार्यालयामधील वातावरणात बदल व्हावा, असे वाटत असेल तर आपल्या डेस्कला आवडीनुसार लूक द्या.

    १. डेस्कवर विखुरलेल्या वस्तू नीट लावून ठेवा. कोणते पेपर्स आवश्यक आहेत व कोणते नाहीत हे नियमित पडताळा जेणेकरून अनावश्यक वस्तूंचा उगाच भरणा होणार नाही.

    २. महत्त्वपूर्ण कागदपत्र फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा, फाईलला नंबर द्या. त्याच्या डिटेल्सची नंबरनुसार लिस्ट बनवा जेणेकरून गरज असेल तेव्हा कागदपत्रे व फाईल वेळेवर मिळतील.

    ३. कामाबद्दल नियोजन करा. नंतर गोंधळ होण्याऐवजी एक डेस्क प्लॅनर तयार ठेवा. यामध्ये कामांची सूची व वेळ लिहून ठेवा. महत्त्वपूर्ण शेड्युल्स हायलाईट करा, ज्यामुळे विसरायला होणार नाही.

    ४. डेस्कच्या जवळपास कुटुंबाचा किंवा आपल्याला आवडेल असा फोटो ठेवा.

    ५. कार्यालयाची परवानगी असेल तर डेस्कजवळ एका छोट्या कुंडीत झाड लावा जेणेकरून काम करताना प्रसन्न वाटेल.

    -- पूजा प्रधान

  • उंदीर

    शेतकरी घाम गाळून धान्य पिकवतो. पण हे धान्य शेतात पुरते तयार होण्याआधीच त्यातले ३५ टक्के अन्नधान्य चक्क उंदरांच्या पोटात गेलेले असते. पुन्हा धान्य साठवून ठेवले की त्यावर उंदराचा डोळा असतो, तो वेगळाच. जागतिक आरोग्य संघटनेच्या चार दशकाआधी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरचे दरवर्षी ३० लाख टन अन्न उंदरांचे भक्ष्य बनते. इतके हे उंदीर येतात तरी कुठून? उंदरांच्या विविध जातीपैकी ४१ जाती ह्या साठवून ठेवलेल्या अन्नधान्यावर वाढत असतात. एका उंदराचे आयुष्य जरी जेमतेम एक वर्षाचे असले तरी जन्मल्यापासून काही आठवड्यातच ते पुनरुत्पादन करण्याची क्षमता प्राप्त करतात. खूप मोठ्या प्रमाणात ते आपली प्रजोत्पत्ती करीत असतात. अगदी एका आठवड्यात उंदराची प्रजा १०% ने वाढत असल्याची आढळले आहे. हे खादाड उंदीर धान्याचा फडशा पाडतातच, पण आपल्या मलमूत्र व अंगावरील केसांनी अन्नधान्याची नासाडी करतात. एका वर्षाला एक उंदीर २५,००० लेंड्या, साडेतीन लिटर मूत्र व १० लाख केस, कोठारात साठविलेल्या अन्नात टाकून ते दूषित करीत असतात. शिवाय ते घराच्या वास्तूला आणि कोठारालासुद्धा हानी पोहचवीत असतात. तेव्हा माणसाचा शत्रू असलेल्या ह्या उंदरांना आवर घालण्यासाठी विविध प्रयत्न जारी आहेत. पण त्या उपायांवरदेखील ते चाणाक्षपणे मात करीत दिसून येत आहे. धान्याची कोठारे मोकळ्या हवेशीर जागेत असली तर उंदरांना लपण्यास जागा मिळत नाही. तसेच खांबावर उभारलेल्या कोठारापर्यंत उंदीर पोहोचू नयेत म्हणून त्यांच्या बुडाशी संरक्षक ठेवले जातात. कित्येकदा धान्याच्या कोठारांच्या आसपास मांजर, कुत्रा, मुंगूस ह्यासारखे उंदरांना भक्ष्य बनविणारे वा पळविणारे प्राणी पाळले जातात. किंबहुना उंदीर मारण्यासाठी बक्षिसेदेखील जाहीर केली जातात. परंतु वर्षानुवर्षे वापरात आणल्या जाणार्‍या ह्या उपायांचा फारसा फायदा होत नाही, हे आढळून आलेले आहे. उंदरांना अटकाव करण्यासाठी दोन प्रकारची रसायने विष म्हणून वापरता येऊ शकतात. झिंक सल्फाईड हे असेंद्रिय रसायन उंदरासाठी जहरी विष आहे. पिठाच्या गोळ्यात ते घालून शेते वा घरांच्या आजुबाजूला ते ठेवता येतात. हे रसायन एकदोन वेळा पोटात गेले तर उंदीर मरू शकतो. परंतु हे रसायन अन्य सस्तन प्राण्यांना, किंबहुना माणसांनादेखील बाधा ठरू शकते व ते पोटात गेले तर त्यावर रामबाण उपायदेखील उपलब्ध नाही, त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे. दुसरे विशेष म्हणजे एकदा ते अल्प प्रमाणात पोटात गेले की उंदरांना त्याचा परिणाम जाणवू लागतो. मग तो कावेबाज प्राणी पुन्हा त्या आमिषाला अजिबात तोंड लावीत नाही, असे प्रयोगात आढळले आहे. त्यामुळे त्यांना मारण्याइतका झिंक सल्फाईडचा डोस त्यांच्या पोटात गेला की त्यांची रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन उंदीर मरू शकतो. हे औषध चुकून माणसाच्या शरीरात गेले तर व्हिटामिन के चा डोस देऊन बरे करता येते. परंतु हे वारफेरीन औषध उंदरांना पुन्हापुन्हा द्यावे लागते व ते महाग आहे. साहजिकच तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रांत त्याचा वापर होत नाही. थॅलियमयुक्त रसायने उंदीर मारण्यासाठी वापरली गेली, पण त्यांची विषारी बाधकता माणसालादेखील धोक्याची ठरली. पाश्‍चिमात्य देशांनी ह्या विषाचा उंदरासाठी सातत्याने वापर केला होता. पण आता त्यांना समजले आहे की हळूहळू उंदरांनी ह्या विषाला प्रतिबंध करणारी शक्ति निसर्गतः प्राप्त केली आहे. ह्या विषाच्या वर्गातील डायफेनाकूम व फ्लोकूमासेन ही दुसरी रसायने बाजारात आली आहेत. अगदी अल्पशा अंशाने उंदरांना मारण्याची ताकद ह्या नव्याह औषधांत आहे, ही एक आशावादी बाब आहे. तरीसुद्धा जगभर शास्त्रोक्त कार्यक्रम राबवून उंदराच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, ही माणसाच्या हिताच्या दृष्टीने एक निकडीची गरज आहे, हे कुणालाही पटते.