(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रजोनिवृत्ती

    स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.

    नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.

    बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. ‘सायकिक’ झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५ नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नसíगक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो.

    पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नसíगकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.

    रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ ८५ टक्के स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शरीरातील कुठल्या ना कुठल्या भागात अचानक गरम झाल्यासारखे वा वाफा आल्यासारखे वाटते. विशेषत: चेहऱ्यावर मानेच्या भोवती, गालावर, कानशिलाजवळ हे जास्त प्रमाणात जाणवते. कधी कधी ही गरमागरम संवेदना एका ठिकाणी सुरू होऊन अचानक पूर्ण शरीरात पसरत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही संवदेना हलकीफुलकी व कालांतराने कमी कमी होत जाते. तर काहींच्या बाबतीत पूर्ण शरीरात एखादी ज्वाला भडकते आहे की काय, अशा प्रकारचा अनुभवही असू शकतो आणि तो दीर्घ काळही चालतो.

    याच काळात किंवा पाळी जायच्या काही महिने आधीपासूनच रात्री अचानक खूप घाम फुटल्यामुळे काही स्त्रिया घाबऱ्याघुबऱ्या होतात. टॉवेल पूर्ण भिजला आहे, गाऊन, कपडे पूर्ण भिजले आहेत अशा प्रकारचा घाम फुटण्याचा अनुभव भयंकर असतो. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. पूर्ण रात्रभर त्या अस्वस्थ राहतात. त्यांच्यात दिवसा चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो. रात्रीचे हे घाम फुटणे इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

    काही स्त्रियांना पाळी जाण्याच्या दरम्यान विलक्षण अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे व खूप थकवा जाणवतो आहे, अशा तक्रारी त्या करतात. या थकव्याबरोबर त्यांना खूप चिडचिडल्यासारखे वाटते व इतर गोष्टींबद्दल काही आकर्षण वाटत नाही. बऱ्याच वेळा हा थकवा प्रचंड तीव्रतेने येतो आणि अचानक येतो. स्त्रिया आपले नियमित साधे कामसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखे वाटते. हे खरे तर रजोनिवृत्तीमधले खूप महत्त्वाचे लक्षण आहे बरं. पण बऱ्याच वेळा घरच्यांच्या ते लक्षात येत नाही. या काळात बऱ्याच स्त्रियांच्या मुलाचे लग्न झालेले असते. सूनबाई घरी आलेली असते. ती आजकालच्या काळात नोकरीला जात असते. अशा वेळी घरात काम करायचे नाही म्हणून सासूबाई सुनेला छळण्यासाठी थकल्याचे हे सोंग करताहेत असे घरातल्यांना वाटते. यामुळे घरच्यांची आणखी चिडचिड होते. कमी होणाऱ्या इस्ट्रोजनसारख्या हार्मोनबरोबर स्त्रीच्या शरीरातील शक्ती ही कमी होते. अशा तऱ्हेचा दीर्घकालीन थकवा स्त्रीची दमछाक करतोच पण तिचे नातेसंबंध व विधायकतेवरही दुष्परिणाम घडवितो. बराच काळ तिच्यात क्षमता असूनही ती सुप्तावस्थेत जाते आणि काहीच करत नाही.

    भावनिक अस्थर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते.

    या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते. स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

    बऱ्याच स्त्रियांचे रजोनिवृत्तीच्या काळात वजन प्रचंड प्रमाणात वाढू लागते. हे पुन्हा हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होते. हे वजन वाढल्याने स्त्रीला स्वत:विषयीच राग येऊ लागतो. आपण बेढब दिसायला लागलो आहोत, आपले म्हातारपण जवळ आले आहे, आपले सौंदर्य कमी झाले आहे, असे वाटायला लागते. कामाची जबाबदारी घरात किंवा नोकरीवर पूर्वीच्या तुलनेने कमी होते. सुस्तपणा व थकवा आल्याने शारीरिक चापल्य कमी होते. त्यामानाने आहारावरही नियंत्रण राहत नाही. शरीराची हालचाल मंदावली जाते. या काळात हाडांचे दुखणे वाढते. गुडघे दुखू लागल्याने बाहेर जाणे कमी होते आणि वजन जास्त वाढायची प्रक्रिया चालू राहते.

    या दरम्यान पोटाला फुगारा येतो वा फुगल्यासारखे वाटते. खूप अस्वस्थ वाटते. पोटात दुखतेही. अन्नपचन होत नाही. गॅस झाल्यासारखे वाटते. अॅ सिडिटी झाल्यासारखे वाटते. हा फुगारा एक प्रकारचा रोगच आहे की काय असे स्त्रियांना वाटते. मग घरगुती औषधे सुरू होतात. बऱ्याच वेळा स्वत:च्याच मनाने किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून इनोसारखं औषध घे, आयुर्वेदिक औषधे घे असे प्रकार सुरू होतात, ज्यामुळे स्त्रियांना आणखी त्रास होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय उपचार डॉक्टरांना सांगूनच करावेत.

    काही स्त्रियांचे डोके खूप दुखते आहे किंवा डोक्याभोवती स्नायू आवळल्यासारखे वाटतात. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असेल तर रजोनिवृत्तीच्या काळात ती जास्त प्रमाणात दिसून येते. सांधेदुखी ही दुसरी महत्त्वाची तक्रार स्त्रिया या काळात सतत करतात. मानेच्या, खांद्याच्या, पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला तर त्यांना पूर्वीची जी कामे व्यवस्थित करता येत होती, ती आता करता येत नाहीत. याच्यावर वेळीच लक्ष दिल्यास हाडांची पुढे होणारी झीज लक्षात येऊ शकते व उपचाराने ती रोखताही येऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होणे अपेक्षित आहे. हाडांना ठिसूळपणा येऊन ओस्टिवोपोरोसिस व आर्थायटिससारखा विकार बळावू शकतो. या काळात हाडे नव्याने भरून यायची तरुणपणातली प्रक्रिया चांगलीच मंदावते. म्हणून पुढे येणारी हाडांची व एकंदरीत हालचाल करण्याची दुर्बलता थांबविण्यासाठी कॅल्शियम किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाबाबत डॉक्टरी सल्ला व्यवस्थित घेणे आवश्यक आहे.
    याशिवाय आणखी महत्त्वाची तक्रार म्हणजे स्तनांमध्ये थोडे थोडे दुखरेपण जाणवते. एकदम तीव्र नसले तरी ठुसठुसणारी ही वेदना अस्वस्थ वाटायला लागते. आजकाल तर स्त्रियांना आपल्याला कर्करोग झाला आहे, असा संशय पटकन येतो. त्यामुळे त्या घाबरतात व डॉक्टरांकडे जायचे टाळतात. स्तनांमधली ही अशी वेदना जी कधी खुपल्यासारखी, टोचल्यासारखी, थोडय़ाशा दबावाने येणारी असेल तर स्त्रियांनी जरूर तपासून घ्यावी. ज्यायोगे इतर काही कर्करोगासारखे आजार असतील तर तात्काळ ओळखता येतील.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. शुभांगी पारकर

      January 6, 2017


  • नाईलचा बाहू

    नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती.

      September 11, 2022


  • बोरा केव्ह्ज – एक अदभूत निसर्ग निर्मित अचंबित करणारे स्थळ

    विशाखापटटम ते अराक्कू VALLEY असा १३० किमी निसर्गरम्य घाटाचा रस्ता असून त्यावर अराक्कूच्या आधी ३५ किमी अंतरावर अनन्थगिरी डोंगररांगात २३१० फुट उंचीवर भारतातील सर्वात मोठी जमिनीखाली गुहा आहे. BORA CAVES म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारचआहे ओडीसा भाषेत त्याला बोरा गुहालु म्हणतात. ( बोरा म्हणजे मोठे भोक, गुहालु म्हणजे गुहा. गुहा ही काही दशलक्ष वर्षा पासून अस्तित्वात आहे.

      April 15, 2019


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १७

    भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे.

      December 20, 2020


  • दुःख स्वीकारावे स्वानंदे

    आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.

      September 21, 2021


  • पक्षीपरिचय २४

      October 12, 2015


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १२

    माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥

    परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक.
    आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात,

    माता च पार्वती देवी- देवी पार्वती हीच माता आहे. पार्वती म्हणजे अत्यंत स्थिर असणारी, अविचल श्रद्धा. शिवपार्वती चे स्वरूप 'श्रद्धा विश्वासरूपिणौ' असेच वर्णन केले आहे. ती दृढ श्रद्धा आहे देवी पार्वती. अशा दृढ श्रद्धेने युक्त असणारी बुद्धी म्हणजेच पार्वती.

    ह्या बुद्धीने मिळणाऱ्या तृप्ततेचा विचार खरा महत्वाचा आहे. ही तृप्तताच शाश्वत आहे. पोटाची तृप्तता काही तासात संपणार आहे. बौद्धिक तृप्तता मात्र शाश्वत आहे. ती तृप्ती येते शास्त्राच्या ज्ञानाने. ते देते ती खरी अन्नपूर्णा.

    ती बुद्धी ज्या जीवात्म्याची क्रीडासंगिणी तोच माझा पिता. त्यासाठीच उल्लेख केला, पिता देवो महेश्वरः !

    या माया- मायेश्वराच्या साहचर्याचा परिणाम आहे हे सर्व विश्व. हे दोघेच सकल जीवांचे जन्मदाते. पर्यायाने सकल जीव माझे बांधव.

    बान्धवाः शिवभक्ताश्च- हा उल्लेख याच साठी. पण त्यातही नाते कोणत्या जीवांसोबत तर शिवभक्ताश्च. बाकीच्यां सोबत वेळेचा अपव्यय नको. भगवद्भक्त तेवढेच माझे. माझ्या भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला पोषक असतील तेच बांधव. बाकी निरर्थक. त्यांना सोडता यायला हवे.

    फक्त भगवद्भक्तांनाच धरायचे.
    मग माझ्या विस्ताराला, आनंदाला पारावार नाही. कारण,

    स्वदेशो भुवनत्रयम् !

    हे संपूर्ण विश्वाच माझे म्हटल्यावर दु:ख कुठले?
    हीच भिक्षा हवी.
    या परम आनंदची मागणी आहे अन्नपूर्णाष्टकम्.
    ती मागणी पुरवते माता अन्नपूर्णा.

    जय अन्नपूर्णे !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 9, 2020


  • मोबाईल – एक खाजगीपण

    मोबाईल – एक खाजगीपण

    काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.

    हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.

    साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.

    बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.

      July 3, 2025


  • अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी

    आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

      August 2, 2017


  • भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

    मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच.

      November 8, 2023