(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • दादर, मुंबई येथील ‘धी गिरगांव पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड’

    मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.

    देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.

    Founder of the girgaon panche depot९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.

    त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.

    आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.

    “देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.

    मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.

    <!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध. डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा. पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा [supsystic-tables id='1'] [supsystic-tables id='2'] -->
    पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
    फोन - 9869007736
    इ-मेल - ramakantarchana@gmail.com

  • काय निवडायचं… फटाके की पुस्तके ?

    फटाके मोठा आवाज
    पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात.

    फटाके हवेचं प्रदूषण करतात.
    पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात.

    फटाके अक्षरशः पैसे जाळतात.
    पुस्तके मात्र पैसे उभे करतात.

    फटाके लहानग्यांना इजा करतात
    पुस्तके बाळांना ?छान रमवतात

    फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात
    पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात

    फटाके कान किर्रर करुन सोडतात.
    पुस्तके मानसिक समाधान देतात.

    फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात.
    पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात.

    फटाके विध्वंसक मूल्य रुजवतात.
    पुस्तके रचनेचा आग्रह धरतात.

    फटाके क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.
    पुस्तके तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.

    फटाके म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.
    पुस्तके म्हणजे बालबुद्धीला आवाहन.

    फटाके ही तर खरीखुरी विकृती.
    पुस्तकेच उभी करती मानवी संस्कृती.

    भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा
    फटाक्यास फाटा देवूनि पुस्तकेच वाटा

    आता काय निवडायचं
    तुम्ही ठरवा

    विवेकाचा आवाज बुलंद करुया

  • मातृदिन

    आज ३१ ऑगस्ट २०१६ - मातृदिन

    भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.

    ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा " आई - मुलाचं " नातं म्हणजे " विश्व " आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.

    ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -

    "दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे."

    धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.

    नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|
    नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||

    मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • बाप्पा…

    तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो.

    आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता?
    नैवेद्य दाखवल्यावर -
    आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब?
    असं म्हणाला असता?

    नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला,
    तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम,
    असं म्हणाला असता?

    अंधेरी वरून आलेल्या भक्ताला, लालबाग चा बाप्पा
    हे अंधेरीचं मैटर आहे अंधेरी च्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा,
    असं म्हणाला असता?

    नाही...

    त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच बरसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय,
    एक असला तरी त्याला मंडळामध्ये वाटलाय,

    गणपतीच्या सणाला परवा एक जण म्हणाला,
    या वर्षी देवा तेवढं एक काम करून दे,
    त्या फेमस गणपती चा तेवढं दर्शन करून दे,

    भक्तांच्या या डिमांड ला तो गालातच हसतो,
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    आशिर्वादाचं त्याने पॅकेज दिलं असतं?
    माझ्याबरोबर शंकराचे आशीर्वाद, फक्त २० हजार..

    ग्रुप नवस केला असता तर डिस्काऊंट दिला असता?
    विसर्जनाच्या २ दिवस आधी, लास्ट २ डेज, लास्ट २ डेज..
    असं ओरडला असता?

    नाही... नाही... नाही...

    भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    त्याची उंची फुटात मोजणारे आपण,
    भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण,

    जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा,
    नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा..

    एक क्षण कशाला हो..??
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    विसर्जनाच्या दुसर्या दिवशी काय नजारा असतो?
    दीड कोटी डोकी ज्या पायावर टेकली, तो पाय कुठेतरी असतो
    तेवढेच आशीर्वाद देणारा, हात कुठेतरी असतो..
    एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा,
    स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो..

    तरीही तो हसतो.. तो फसतो...
    पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो..

    त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    तुमच्या आनंदातच त्याला इंटरेस्ट असतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    गणपती बाप्पा मोरया..

  • दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक

    विजय मल्ल्या यांची " किंगफिशर एरलाइन" एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र - सहकारी - वाचक - श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी " माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा " असे उत्तर देत असे .

    त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . " मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , " विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? " " त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? " "आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . " सीने जगताविशयि ची पाने " या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या " मैत्रीची " चर्चा रंगात होती .

    माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की " माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . "

    माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .

    पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .

    असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ?

    दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .

    दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?

    दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या - भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?

    दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !

    प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?

    दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .

    दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.

    चंद्रशेखर टिळक
    ४ सप्टेंबर २०१६ .

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail . . . tilakc@nsdl.co.in

  • भाषेची गंमत – ‘ बर्मगठिव्का ’

    शेल्फोन वापरणार्‍या मंडळींची भाषा.. एक गंमत

  • आज लक्ष्मीपूजन

    दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

    या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

    प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • रासायनिक शेतीचा परिणाम

    जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.

    सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.

    1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.

    महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.

    खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.

    अनुदान, कर्जामध्ये गुंतली शेती

    आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला.

    1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
    2) हेक्‍टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
    3) रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्‍क्‍यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत.
    4) 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना "हंडी सिंड्रोम' या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
    5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल "डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रसिद्ध झाला.
    6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नाव "कॅन्सर एक्‍स्प्रेस' असे लोकांनी ठेवले आहे.

    त्यामुळे आज आपणा सर्वाना गरज आहे जैविक शेती व जैविक खतांची....

  • सर्वात मोठ्ठे कन्फुजन….

    किती आहे भुजबळांची मालमत्ता?

    - नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी
    - राम बंगला, नाशिक - दीड कोटी (समीर भुजबळ)
    - गणेश बंगला, नाशिक - 1 कोटी
    - 3 एकर जमीन, नाशिक - 25 कोटी
    - भुजबळ पॅलेस - 60 कोटी
    - ठाण्यात पारसिक बंगला - पाच कोटी
    - सुखदा बंगला - 6 कोटी
    - येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी (पंकज)
    - मनमाड येथील जमीन - 10 कोटी
    - दिंडोरीतील द्राक्ष मळा - पाच कोटी (पंकज)
    - माणेक महल, चर्चगेट - पाच कोटी (पंकज)
    - माहिममधील फ्लॅट - पाच कोटी
    - नवी मुंबईतील घर आणि दुकान - पाच कोटी
    - 30 एकर जमीन - 600 कोटी
    - पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस - 100 कोटी
    - जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट - 40 कोटी
    - 60 किलो सोने - 18 कोटी
    - हिरे - 10 कोटी
    - वाहने - रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग एनर्जी - 200 कोटी
    - नाशिकचा पॉवर प्लॅंट - 25 कोटी
    - नाशिक शिलापूर येथे जमीन - 30 कोटी
    - गिरणा शुगर मिल - 30 कोटी
    - आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन - 100 कोटी
    - भुजबळ वाईन्स - 155 कोटी
    - नाशिकची कन्सल्टिंग कंपनी - 10 कोटी
    - मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी - 35 कोटी
    - देविशा इन्फ्रा, नवी मुंबई - 600 कोटी
    - "बलु सर्कल'च्या नावाने गुंतवणूक - 600 कोटी
    - भावेश बिल्डर - 50 कोटी
    - परवेश कन्स्ट्रक्‍शन - सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत - 330 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर - 35 कोटी
    - नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. - 25 कोटी
    - माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री - 25 कोटी
    - पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड - 2 कोटी
    - बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन - 25 कोटी
    - वांद्रे येथील फ्लॅट - 5 कोटी
    - भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन - 60 कोटी

    हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

    भुजबळ "निर्दोष" (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे...

    -- मकरंद

  • बार बार देखो . . . .

    कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला " बार बार देखो " हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो .

    सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात . अगदी या सिनेमा मधल्या कतरिना सारख्या . तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच .शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत - नकळत Time Machine मधे बसलात तर त्याही तशाच बसल्या आहेत असं वाटत राहाते . आणि तुम्ही कालानुरुप म्हातारे वाटत असताना त्या कतरिना रूपीचिरतरूण गुंतवणूकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त - जास्त आकर्षक होत जातात . वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही , पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहते . अगदी तुमच्या आयुष्याला पुरूनउरेल अशी . एशियन पेंटस , केस्ट्रोल , एचडीफसी , एचडीएफ सी बँक , हिंदुस्तान लिवर , आयटीसी , कोलगेट , लार्सन टूब्रो , स्टेट बँक , रेलीस , हवेलस , टीसीएस , अशा शेअर्स सारखी .

    दूसरे म्हणजे , तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असलातरी या सिनेमामधल्या सारिका सारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी , संधी , व्यक्ति , बाबी तुमच्या आयुष्यात असतात . त्या एकाचवेळेस तुमच्यावरमाया ही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात . त्याला " डोळस मायेचा अनुभव " असे म्हणतात . असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्या सारखा तुम्हांला सांगता होतो कि " हनीमूनला गेला आहेस तरबायकोबरोबर मजा कर ; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस " . एकंदरीतच काय तर Things on hand , Deeds at hand always need attention , if not full concentration हे प्रेमात , मधुचंद्रात , वैवाहिकआयुष्यात , व्यावसायिक जीवनात , आणि गुंतवणूकीतही कार्यरत असताना ( आता इथे कामात किंवा काम - मग्न असताना कस म्हणू ! ) महत्वाचे असते .

    तिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय , ही क्षेत्रे निव्वळ Calculations , Solutions , Formulations यावरच चालत नसतात . Meaningful Attention ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते .

    चौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते . आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद ही करण्यासाठी हे ग्रुहितक सदैव ध्यानात ठेवावेच लागते . असं ग्रुहितकअस्तिवात नसेलही , पण आचरणात आणावेच लागते . अर्थशास्त्रीय सिध्दांत मांडताना नाही का असली ग्रुहितके असतात . Law of Diminishing Margiinal Utility चे ग्रुहितक काय तर म्हणे सगळेच आंबे एकसारख्याच चवीचे ,रंगाचे , आकाराचे , वासाचे . . . . तुम्हांला एकापाठोपाठ एक मिळाले . . . . एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती . . . ? या न्यायाने उद्या ग्रुहितक म्हणून सांगाल कि दीपीका , कतरिना , अनुश्का , प्रियांका एकाचवेळेस प्रेयसी म्हणूनमिळाल्या तर . . . मग लक्षात येते कि हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला ग्रुहितक म्हणायचे असते .

    म्हणून तो सिध्दांत ही Law of Diminishing Marginal Utility असतो ; Law of Equi - Marginal Utility नाही .

    पाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद . त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतः ही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BALANCE हा असलाच पाहिजे . वैयक्तिकआयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे . गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल ?

    सहावे म्हणजे या सिनेमातील एका द्रुश्यात तो गुरुजी - भटजी - पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो . त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते . ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोंक असे धरतो आणि सांगतोकी यातले एक टोक हा भूतकाळ आहे . कितीही ईच्छा असली तरी आपल्याला तो जरासुध्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते . या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य - काळ . पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकीकोणालाच माहीत नसते . अशावेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्य रित्या उपयोगात आणले पाहिजे . अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही " वापरले पाहिजे " हाच शब्द - प्रयोग अगदी समर्पक आहे.

    अशावेळी विंदा करंदीकर यांची

    " इतिहासाचे अवजड ओझे

    डोक्यावर घेऊन ना नाचा

    करा पदस्थल त्याचे आणिक

    त्यावर चढूनी भविष्य वाचा "

    या काव्य - पंक्ति आठवायला लागतात . अगदी त्याचा अर्थ या सन्वादापेक्शा वेगळा असूनही . .

    सातवीं गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला " अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं " असं म्हणते . योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे - मतलबी झाल्या - शिवायराहील काय ?

    आठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवट पर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे . अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो . पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जस - जसा पुढे जात राहतो , तस - तसे बदलत जाते . " तू माझी मैत्रिण आहेस " , " तू माझी बायको आहेस " , " तू आपल्या दोन मुलांची आई आहेस " असॆ टप्पे हे उत्तर घेत राहते .

    आणि मग एका टप्प्यावर तो तीला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण " तुम मेरा बीता हुआ कल हो , तुम मेरा आनेवाला कल हो ; और तुम मेरा यह , अब , इस वक़्त का पल हो "

    हे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो . पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेंव्हा ती त्याला मिस्किलपने विचारते की हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला ?

    आपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होतं असतं ना . .

    नववा मुद्दा म्हणजे या सिनेमात " ड्राइवर " कोण आणि " पेसेंजर् " कोण असा एक संवाद दोन - तीनदा नायक - नायिकेमधे आहे . आपणही तो प्रश्न आपल्या एकंदरीतच आयुष्याला , आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे . कारण प्रवाहात पोहणे , प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणाम ही वेगवेगळा असतोच असतो .

    अशावेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकान्ची नावं अनुक्रमे " जय " आणि " दिया " आहेत हेही कीती सूचक वाटू लागते ना !

    अजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो . सुधारतो . बिघडतो . पण बदलतो . त्यात सहवासाचाही भाग असेल ! काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगनचा , दीपीका पदुकोनच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंगचा , रनबिर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफ चा अभिनय सुधारला . राजनीति मधे कतरीना बाहुली वाटते ; तीच कतरिना " बार बार देखो " हा सिनेमा तारून नेते . त्या न्यायानेगुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना , काळाच्या ओघात आपली गुंतवणूक " केली आहे झालं " ते " तारणहार " असा मुद्दा आहे . अगदी प्रश्न नसला तरी !

    आता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे " बार बार देखो " असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हणाल्या प्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा असा " बार बार देखो " हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण .

    तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हांलाच देई पर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणूकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप - क्शालन कसे करावे ते बघतो .

    " अरसिकेशू कवित्व निवेदनम , सिरसि मा लिख लिख " असॆ कोणी कधी म्हणायला नको ! !

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    एमेल . . . tilakc@nsdl.co.in

    १६ सप्टेंबर २०१६