(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • शेतकरी राजा

    असा उद्योगधंदा जगाच्या पाठीवर शोधुन तरी सापडेल का ?

    ९५२ किलो म्हणजे जवळपास टनभर कांद्याची विक्री. कांद्याला दर मिळाला प्रतिकिलो १ रुपया ६० पैशे.

    ९५२ किलोचे झाले १५२३ रुपये २० पैशे.

    त्या १५२३ रुपये २० पैशातुन आडत ९१ रुपये ३५ पैशे,

    हमाली ५९ रुपये,

    भराई १८ रुपये ५५ पैशे,

    तोलाई ३३ रुपये ३० पैशे आणि

    मोटार भाडे १३३० रुपये

    असे एकुण १५२२ रुपये २० पैशे वजा करुन

    हातात मिळाला 1 रुपया.

    हमाल, काट्यावाला, आडतदार, वाहतुकदार यांना रोजगार तर ग्राहकांना माफक दरात शेतीमाल उपलब्ध करुन हातात मिळालेली दमडी घेऊन तो विनातक्रार चालता झाला. एवढी दानत एखाद्या कर्तव्यदक्ष राजाकडेच असु शकते.

    म्हणुनच त्याच्यासाठी शेतकरी राजा हे विशेषण वापरले जात असावे.

  • बाजीराव पेशवे

    मित्रांनो १८ ऑगस्ट ही तारखेप्रमाणे *श्रीमंत बाजीराव पेशवे सरकारांची* जयंती आहे. हे निमीत्त साधुन त्यांच्या बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न आहे. सदर स्वरूपात त्यांच्या पराक्रमाबाबत थोडक्यात माहीती देण्याचा विचार आहे.

    शिवराय व शंभुराजे नंतर इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या या पराक्रमी योध्याला लोकांनी फक्त मस्तानी पुरताच ओळखला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर हे बाजीरावांनीच केले. दिल्ली पर्यंत मजल मारणारा स्वराज्याचा पहीला पंतप्रधान म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शेवट पर्यंत छत्रपतींचा सेवक म्हणुनच जगलेला हा योद्धा काळाच्या पडद्याआड गेला.

    २० वर्षाच्या वादळी कारकिर्दीत एकही युद्ध न हरलेला हिंदवी स्वराज्याचा एकमेव पेशवा म्हणुन आजही ओळख आहे.

    सदस्यांनी आपली पसंती कळवावी.

  • जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही.

  • आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ

    भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे.

    आंब्यांचा उगम -
    आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असे मानण्यात येते.

    अवीट गोडीच्या या फळाला कोकणाचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

    आंब्याचा मोहर -
    आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हणतात. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील ''drupe" या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.

    आंब्याचा माच -
    कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यास आंब्यांचा माच लावणे असे म्हणतात. एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळवलेले गवत पसरुन त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्‍या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे अच्छादन करतात. साधारणत: १०-१५ दिवसांत, झाकल्या गेल्यामूळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

    आंब्याचे झाड -
    आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर एवढा उंच असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटिमीटर लांब, तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असतो. कोवळे असताना पानांचा रंग काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद होतो. पाने जशी मोठी होतात, तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.

    आंब्यांचा आकार -
    आंब्यांच्या जातीप्रमाणे त्याच्या फळाच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब, तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. फळाचे वजन २.५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

  • शिवकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध

    शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा जवळपास २५ देशांशी व्यापारी संबंध आलेला दिसतो. ते पंचवीस व्यापारी व त्यांचे देश पुढील प्रमाणे

    १) फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव- पोर्तुगीज- पोर्तुगाल
    २) इंगरेज- इंग्रज -इंग्लंड
    ३) वलंदेज- डच- हॉलंड
    ४) फरांसिस- फ्रेंच- फ्रांस
    ५) दिनमार्क- डिंगमार- दीडमार- डेन्मार्क
    ६) निविशयान- नॉर्वेजिअन- नॉर्वे
    ७) ग्रेग- यवन-ग्रीक
    ८) लतियान- लॉटीअन- तलियना- इटालियन
    ९) यहुदीन- ज्यू
    १०) कसतल्यान-शंटलंडियन
    ११) विअज- वेनेशिअन
    १२) सुवेस- सुईस- स्विस
    १३) प्रेमरयान- पोमॉरॉनिअन
    १४) जनामारी - जर्मन
    १५) अरमान- अर्मानिअमी
    १६) रुमियान- रुन- तुराणी- तुर्की- रुमानिअन
    १७) हबसी- शिद्दी- अबिसिनिअन
    १८) इस्तंबील- इस्तंबुल
    १९) चीन- चिनदेशिय
    २०) इराणी- इराणदेशीय
    २१) मोरस- मॉरिशदेशीय
    २२) आफरीदी- आफ्रिका खंडातील
    २३) उमर- उरुस- रुशन- रशियन
    २४) रबातियन- जॉर्डन
    २५) अस्पिहानी- स्पॉनिउडस- स्पेनदेशीय

    याचप्रमाणे भारतातील पाच प्रदेशातील व्यापार्‍यांचा महाराजांशी व्यापार झालेला दिसतो.

    १) ब्रह्येय- ब्रह्मदेश
    २) सिंध- सिंधी
    ३) सुस्त- सूरत- गुजराथी
    ४) नाग- आसामी
    ५) नायर- केरळ

    संदर्भ- शिवकालीन महाराष्ट्र
    (डॉ. अ.रा. कुलकर्णी)

  • अमेरिकेत येणारी मराठी मंडळी

    नुकताच घडलेला हा किस्सा आहे. अमेरिकेतून परत येताना मला सेओलच्या विमानतळावर एक मराठी गृहस्थ भेटले. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली. चांगले ‘कोकणस्थ ब्राह्मण’ होते. सहा महीने अमेरिकेतील मुलीकडे राहून परत निघाले होते. ते कोणत्यातरी खासगी बँकेत नोकरीला होते व ती बँक आर्थिक संकटात सापडल्यामूळे त्या बँकेचे एका सार्वजनीक बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यांच्या पत्नीचा टि. व्ही. वर जे ‘रिऍलिटी शोज’ चालतात त्याच्याशी काहीतरी संबंध होता. त्यांनी ही माहीती मी विचारलेले नसताना सुद्धा सांगून टाकली. कदाचीत मला इम्प्रेस करण्याचा त्यांचा विचार असावा. एका मराठी टी.व्ही. च्यानलवर लहान मुलांच्या गाण्याचा एक रिऍलिटी शो दाखवला होता तो बराच लोकप्रीय झाला होता. या शोशी त्यांच्या पत्नीचा कांहीतरी संबंध होता. त्या शोमध्ये ज्या मुलीला प्रथम पारितोषीक मिळाले ते कसे वशील्याने व पैसे चारून मिळाले, परिक्षक पण कसे भ्रष्ट निघाले. (खरे म्हणजे हा रिऍलिटी शो मी बघीतला होता व जिला प्रथम पारितोषीक मिळाले ती मुलगी माझ्या मते यासाठी योग्य होती) त्यांच्या बँकेतल्या अधिकार्यांमनी भ्रष्टाचार करून कर्जे कशी दिली व बँकेला कसे बुडवले या गोष्टी ते सेओलच्या विमानतळावर मला अगदी साग्रसंगीतपणे सांगत होते. सांगताना त्यांचा चेहेरा असा काही आनंदाने फुलला होता व ‘आपण काहीतरी फार मोठे गुपीत सांगत आहोत’ असा जो भाव त्यांच्या चेहेर्या वर उमटला होता तो खरोखरच पहाण्यासारखा होता. सेओलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर( सेओल दक्षीण कोरियाची राजधानी. त्याला ‘इंचियॉन (Inchion) पण म्हणतात) सांगायच्या या गोष्टी होत्या का? पण त्यांनी मला पाऊण तास तरी पिळलेच. मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की सहा महीने अमेरिकेत राहून त्यांना अमेरिकेतले काहीच कसे आठवत नाही? बरे ही त्यांची अमेरिकेतली तिसरी ट्रीप होती. याचा अर्थ असा की ते शरीराने अमेरिकेला आले असले तरी मनाने मात्र भारतातील भ्रष्टाचाराच्या चिखलात व दलदलीतच अडकलेले होते. ते जेव्हा भारतात परत जातील तेव्हा त्यांना अमेरिकेतल्या आठवणी येतील. मला अमेरिकेत भेटलेल्या बहुतेक मराठी लोकांचा हाच अनुभव आहे. ते शरीराने व मनाने अमेरिकेत कधीच येत नाहीत. अमेरिकेत येताना मन भारतात ठेवतात व भारतात परत आल्यावर मन मात्र अमेरिकेत ठेऊन येतात. ते शरीर आणि मन एकत्र घेऊन कधीच फिरत नाहीत.

    फार पूर्वी माझे एक जवळचे नातेवाईक दत्तोपंत पहिल्यांदा अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे जाऊन आले तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे फारच वेगळे चित्र माझ्यासमोर उभे केले होते. ‘अहो! अमेरिका म्हणजे प्रचंड महाग!’

    दत्तोपंत सांगत होते , ‘अहो नुसत्या चहा किंवा कॉफीच्या कपाला 70 रुपये लागतात.(त्यावेळी आपल्याकडे 1 रुपयात चहा व 5 रुपयात उत्तम कॉफी मिळत होती), बाहेर जेवायला गेलात तर कमीत कमी 300 ते 400 रुपये लागतात (त्यावेळी पुण्यात 20 रुपयांमध्ये पोटभर राईस प्लेट मिळत होती). कंटींगला 400 रुपये लागतात (त्यावेळी 10 रुपयांत कटींग व्हायची). काय चाटायचय त्या अमेरिकेला? नुसता चकचकाट व भगभगाट. बोलायला एक माणूस मिळत नाही. अमेरिका म्हणजे तुरुंग आहे तुरुंग! तुम्ही शहाणे असाल तर अमेरिकेत पाऊल टाकू नका!’ पण हेच दत्तोपंत पुढे अनेक वेळा अमेरिकेला जाऊन आले ही गोष्ट वेगळी.

    अमेरिकेत येणारी मंडळी 1 डॉलर म्हणजे 60 रुपये असा हिशोब डोक्यात ठेऊनच येतात व अमेरिकेत आल्यावर डॉलरमधल्या किंमतींचे भारतीय रुपयात रुपांतर करत बसतात. त्याला मी ‘कन्व्हर्जन फोबीया’ म्हणतो. आता 1 डॉलर म्हणजे 1 रुपया असा हिशोब धरला तर काय फरक पडतो ते बघूया

    अमेरिकेत 1 डॉलरला (म्हणजे 1 रुपयाला) जेवढा ब्रेड मिळतो त्यांच्या निम्यापेक्षा कमीच व निकृष्ट प्रतीचा ब्रेड आपल्याकडे कमीत कमी 20 रुपयात मिळतो.
    अमेरिकेत साधारणपणे 2.5 ते 3 डॉलर (म्हणजे 2.5 ते 3 रुपये) 1 गॅलन, म्हणजे 4.5 लिटर पेट्रोल (ज्याला अमेरिकेत ‘गॅस’ म्हणतात) मिळते. आपल्याकडे पेट्रोलचा भाव 65 रुपये लिटर आहे.
    अमेरिकेत साधारणपणे 3 ते 4 डॉलरला (म्हणजे 3 ते 4 रुपयात) 1 गॅलन (म्हणजे 4.5 लिटर) दूध मिळते. आपल्याकडे अर्धा लिटर गाईच्या दूधाला 20 रुपये पडतात.
    अमेरिकेत साधारणपणे 10 डॉलरमध्ये (म्हणजे 10 रुपयात) उत्तम भारतीय जेवण मिळते. याच जेवणाला आपल्याकडे कमीत कमी 200 ते 300 रुपये लागतात.
    अमेरिकेत कटिंगला सर्वसाधारणपणे 8 ते 10 डॉलर्स (म्हणजे 8 ते 10 रुपये) लागतात. आपल्याकडे कटींगचा दर 70 रुपये आहे.
    त्यामूळे 1 डॉलर म्हणजे 1 रुपया हा हिशोब डोक्यात ठेऊन वावरले तर अमेरिका फार महाग वाटत नाही.

    एक काळ असा होता की त्या वेळी अमेरिकेत जाणे हे अप्रुप वाटायचे. पण आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. अनेक मराठी मंडळी हल्ली अमेरेकेत येऊ लागली आहेत व ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेत येणारे तीन प्रकारचे लोक असतात असे मला आढळून आले आहे. पहिला प्रकार म्हणजे विद्यार्थी किंवा स्टुडन्ट्स. दुसरा प्रकार म्हणजे लग्न होऊन अमेरिकेत आलेल्या मुली व तिसरा प्रकार म्हणजे या मुलांचे किंवा मुलींचे आईबाप किंवा सासु सासरे. यामध्ये जी तरूण मुले अमेरिकेत येतात ते तेथील वातावरणाशी जुळवून घेतात. खरी पंचाईत होते ती तेथे येणार्यात सिनिअर सिटिझन्सची किंवा ज्येष्ठ नागरीकांची!

    भारतात हिन्दु, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, मारवाडी, गुजराथी, मराठी, कानडी, तेलगू, मल्याळम, तामीळ, बंगाली, जाट, शिख, उत्तर भारतीय लोक रहातात पण एकही भारतीय रहात नाही असे ज्युझीलंडहून आलेल्या एका टुरिस्टने नमुद करून ठेवलेले आहे. येत्या 15 ऑगस्ट 2016 रोजी भारताला स्वातंत्र मिळून 70 वर्षै होतील. पण अजुनही खर्याा अर्थाने भारतीय लोक अजुन पैदा झालेले नाहीत. अमेरिकेत पण याचे प्रत्यंतर दिसते. अमेरिकेत जरी अनेक भारतीय एकत्र जमत असले व ‘मिनी इंडीया’ चे रुप दिसत असले तरी यात भाषेप्रमाणे ग्रूप पडतातच य यामध्ये मराठी लोक आघाडीवर असतात. तसेच भारताला नावे ठेवणे हा या लोकांचा आवडता उद्योग असतो. भारतामध्ये ज्याप्रमाणे मराठी माणूस ‘आधी मराठी व मग भारतीय’ असतो तसाच तो अमेरिकेतही असतो. अमेरिकेमध्ये सुद्धा टेक्सासमधला माणूस स्वतःला ‘टेक्सॅसियन’ म्हणतो, न्युयॉर्कमधला माणूस ‘न्युयॉर्कर’ म्हणतो, कॅलिफोर्निया मधला माणूस ‘कॉलिफोर्नियन’ म्हणतो. पण ते आधी ‘अमेरिकन’ असतात व मग ‘टेक्सासन, न्युयॉर्कर, कॅलिफोर्नियन’ असतात. तसेच अमेरिकेत स्वतःच्या देशाला नांवे ठेवणे म्हणजे स्वतःच्या आईला नावे ठेवण्यासारखे समजतात. आपल्याकडील लोक भारताला नांवे ठेऊन भारताला वाईट देश ठरवायला मागे पुढे पहात नाहीत. पण अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक अमस्या असुनही कोणी अमेरिकन अमेरिकेला वाईट देश ठरवत नाही. अमेरेकेत जाणार्यास मराठी लोकांनी एक लक्षात ठेवावे की आपण जेव्हा अमेरिकेत किंवा परदेशात जातो तेव्हा आपण भारताचे ‘अँबॅसॅडर’ असतो. भारताची प्रतिमा बिघडवणे किंवा सुधारणे आपल्या वागणूकीवर अवलंबून असते. भारताची प्रतीमा सुधारण्याचे काम फक्त भारत सरकारचे किंवा नरेन्द्र मोदी यांचे नाही. पण बर्यासच मंडळींना हे भान रहात नाही.

    मी अजून एक प्रकार बघीतला तो म्हणजे नावे ठेवण्याचा. येथे येणारी बहुतेक सिनियर सिटिझन मराठी मंडळी भारताला नावे ठेवण्यात तरबेज असतात. त्यात त्यांना काही कमीपणा वाटत नाही. कारण भारताना नावे ठेवण्यासाठी प्रवृत्त करणारी अनेक दृष्ये त्यांना डोळ्यांनी दिसत असतात. भारतात रस्त्याच्या कडेला उभे राहून लघवी करणारे, रस्त्यात थुंकणारे, कचरा टाकणारे, वाहतुकीचे नियम मोडून भरघाव व बोदरकारपणे वाहने चालवणारे जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार, बलात्कार, फसवाफसवी, खून अशा बातम्यांचे पेव फुटलेले असते. पण अमेरिकेत तसे काहीच आढळून येत नाही. तेथे रस्त्याच्या कडेला उभे राहुन लघवी करणारा माणूस दिसत नाही. रस्त्यात थुंकणारा व कचरा टाकणारा माणूस सापडत नाही. सगळेजण वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत गाड्या चालवत असतात. भ्रष्टाचार, बलात्कार, फसावाफसवी, खून अशा सारख्या बातम्यांचे फारसे पेव फुटलेले दिसत नाही. थोडक्यात अमेरिकेला नावे ठेवावी असे काही दिसत नाही किंवा आढळत नाही. मग या लोकांची पंचाईत होते. त्यामूळे हे लोक अमेरिकन संस्कृतीवर घसरतात. अमेरिकन संसकृती कशी वाईट आहे, कुटुंब संस्था कशी मोडकळीला आली आहे, डायव्होर्सेस कसे होत असतात, एका बाईची तीन तीन लग्ने कशी होतात तर पुरुषांना चार चार गर्ल फ्रेन्ड्स कशा असतात, लैंगीक स्वैराचार कसा बोकाळलेला आहे हे सांगत बसतात व अमेरिका म्हणजे वाह्यात बायकांचा व लिंगपीसाट पुरुषांचा देश आहे असे विकृत चित्र निर्माण करण्यामध्ये धन्यता मानत बसत1त. खरे म्हणजे लग्न, मुले हा प्रत्येक व्यक्तीचा अत्यंत खासगी व वैय्यक्तीक प्रश्न असतो. यामध्ये इतरांनी बुचकायचे काहीच कारण नसते. तसेच अपण आपल्या संस्कृतीबद्दल अभीमान बाळगणे ही गोष्ट जरी चांगली असली तरी इतर देशांमधीला, विशेषतः अमेरिकेमधील संस्कृती वाईट ठरवण्याचा अधीकार आपल्याला कोणी दिला?

    अता भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे हेणार आहेत. याचा भारत आता सिनियर सिटिझन कॅटेगरीत आला आहे. सिनियर सिटिझन्स हे जास्त मॅच्युअर असतात असे समजले जाते. ही मॅच्युरिटी आता अमेरिकेत येणार्यास मराठी सिनियर सिटिझन्सनी दाखवणे आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी आता तरी त्यांनी ओळखायला हवी.

    या 15 ऑगस्टच्या निमित्ताने ‘मी आधी भारतीय आहे व मग मराठी आहे’ ही भावना जरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ठासवली गेली तरी सार्थक झाले असे म्हणता येईल.

    तुम्हाला काय वाटते?

    -- उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

  • मातृदिन

    आज ३१ ऑगस्ट २०१६ - मातृदिन

    भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.

    ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा " आई - मुलाचं " नातं म्हणजे " विश्व " आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.

    ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -

    "दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे."

    धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.

    नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|
    नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||

    मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • बाप्पा…

    तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो.

    आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता?
    नैवेद्य दाखवल्यावर -
    आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब?
    असं म्हणाला असता?

    नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला,
    तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम,
    असं म्हणाला असता?

    अंधेरी वरून आलेल्या भक्ताला, लालबाग चा बाप्पा
    हे अंधेरीचं मैटर आहे अंधेरी च्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा,
    असं म्हणाला असता?

    नाही...

    त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच बरसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय,
    एक असला तरी त्याला मंडळामध्ये वाटलाय,

    गणपतीच्या सणाला परवा एक जण म्हणाला,
    या वर्षी देवा तेवढं एक काम करून दे,
    त्या फेमस गणपती चा तेवढं दर्शन करून दे,

    भक्तांच्या या डिमांड ला तो गालातच हसतो,
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    आशिर्वादाचं त्याने पॅकेज दिलं असतं?
    माझ्याबरोबर शंकराचे आशीर्वाद, फक्त २० हजार..

    ग्रुप नवस केला असता तर डिस्काऊंट दिला असता?
    विसर्जनाच्या २ दिवस आधी, लास्ट २ डेज, लास्ट २ डेज..
    असं ओरडला असता?

    नाही... नाही... नाही...

    भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    त्याची उंची फुटात मोजणारे आपण,
    भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण,

    जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा,
    नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा..

    एक क्षण कशाला हो..??
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    विसर्जनाच्या दुसर्या दिवशी काय नजारा असतो?
    दीड कोटी डोकी ज्या पायावर टेकली, तो पाय कुठेतरी असतो
    तेवढेच आशीर्वाद देणारा, हात कुठेतरी असतो..
    एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा,
    स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो..

    तरीही तो हसतो.. तो फसतो...
    पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो..

    त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    तुमच्या आनंदातच त्याला इंटरेस्ट असतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    गणपती बाप्पा मोरया..

  • दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक

    विजय मल्ल्या यांची " किंगफिशर एरलाइन" एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र - सहकारी - वाचक - श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी " माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा " असे उत्तर देत असे .

    त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . " मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , " विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? " " त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? " "आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . " सीने जगताविशयि ची पाने " या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या " मैत्रीची " चर्चा रंगात होती .

    माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की " माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . "

    माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .

    पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .

    असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ?

    दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .

    दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?

    दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या - भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?

    दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !

    प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?

    दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .

    दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.

    चंद्रशेखर टिळक
    ४ सप्टेंबर २०१६ .

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail . . . tilakc@nsdl.co.in

  • भाषेची गंमत – ‘ बर्मगठिव्का ’

    शेल्फोन वापरणार्‍या मंडळींची भाषा.. एक गंमत