(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बदललेल्या जागा आणि गोष्टी

    अगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात.

      August 29, 2022


  • श्री आनंद लहरी – भाग ११

    आई जगदंबेच्या चरणी असलेली आपली अनन्य शरणता आचार्य श्री येथे आर्तपणे सादर करीत आहेत. भक्ताच्या भक्तीचे ते सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. भक्ती ही पतिव्रतेसमान एकनिष्ठ असायला हवी. या अनन्यशरणतेने आचार्यश्री म्हणतात….

      February 15, 2020


  • श्रीनगर – काश्मीर रेल्वे : स्वप्न की सत्य?

    काश्मीर भारताशी रेल्वेने जोडलं जाईल हे १२५ वर्षांपूर्वीचे स्वप्न.  या रेल्वेमार्गाच्या बांधणीची पहिली कल्पना १८८९ मध्ये काश्मीर संस्थानातील डोगरा जमातीचे प्रमुख महाराजा प्रतापसिंग यांनी मांडली होती. जम्मू-श्रीनगर रेल्वे प्रकल्पाचं ऑफिस रीआसी या गावात उघडलं होतं.

      April 29, 2024


  • नमस्कार – भाग ४

    नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.

      July 18, 2017


  • चंद्रावरचं बर्फ

    चंद्रावर पाणी अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. यातलं काही पाणी हे विविध खनिजांतील पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर काही पाणी हे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं पाणी हे मुख्यतः, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांच्या तळाशी वसलेलं आहे. हे पाणी एकूण किती असावं याची निश्चित माहिती नसली तरी, बर्फाच्या स्वरूपात असलेलं हे पाणी कोट्यवधी टन असावं. चंद्रावरील विवरांच्या तळाशी जमा झालेलं हे पाणी मुख्यतः, धूमकेतू आणि अशनींच्या (लघुग्रह) माऱ्याद्वारे जमा झालं असावं. ध्रुव प्रदेशांजवळील विवरांत सूर्यकिरण अतिशय तिरके पडत असल्यामुळे, यांतील अनेक विवरांच्या तळाशी सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यामुळे हे तळ पूर्ण वेळ अंधारात असतात व इथलं तापमान हे नेहमीच शून्याखाली दीडशे अंशांपेक्षा कमी असतं.

      June 5, 2022


  • चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

    अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते.

      April 22, 2023


  • बाळक्रीडा अभंग क्र.३७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 17, 2018


  • उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?

    एखादा दहशतवादी हल्ला परतवून लावणे म्हणजे दहशतवादाविरुद्धचे युद्ध जिंकणे नाही .अधून मधून होणारे दहशतवादी हल्ले ज्याप्रमाणे दहशतवाद ह्या मूळच्या सामाजिक रोगाचे केवळ लक्षण आहे . दहशतवाद कसा वाढतो , त्याची नेमकी कारणे , त्यासाठी आर्थिक पाठबळ कसे मिळते , ह्याचा जगात वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि निष्कर्ष हेच सांगतो की हे हल्ले हा पूर्ण प्रक्रियेतला केवळ समाजात भीती निर्माण करण्याचा एक भाग आहे . मूलतत्त्ववादी उद्दिष्टे ही याहून खूप वेगळी आहेत .

      November 5, 2022


  • क्रिकेटपटू इ. ए .एस . प्रसन्ना

    प्रसन्ना यांच्या गोलंदाजीचे विशेष असे होते की ते चेंडू ‘ लूपिंग ‘ पद्धतीने स्पिन करायचे . असेही म्हटले जाते त्यांचा चेंडू इतका फिरत येई की जर तो कानाजवळून गेला तर वेगळा विशीष्ट ‘ चेंडू फिरण्याचा ‘ आवाज येत असे.

      August 7, 2021


  • कर्माचे फळ

    माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.

    चांगले केलेले काम कधी वायाला जात नाही, आज जरी यश मिळाले नाही तरी ' क्रिया तशी प्रतिक्रिया ' या निसर्गनियमानुसार भविष्यात ते न मिळालेले यश माणसाला दामदुपटीने मिळते.

    एखादा माणूस आपले सुयश हिरावून घेतो म्हणजेच आपल्याला अपयश मिळते. ज्याअर्थी अपयश मिळाले त्या अर्थी ते अपयश निसर्गनियमानुसार आधी केलेल्या चुकांचे फळ असू शकते.

    यशाचे कर्तृत्व माणूस स्वत:कडे घेतो, त्याचप्रमाणे अपयशाचे भोगतृत्वसुद्धा त्याच्याचकडे जाणे क्रमप्राप्त आहे.

    म्हणूनच माणसाने अपयशाचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुका दुरुस्त करून यशाच्या दिशेने प्रयत्न करणे, हेच त्याच्या हिताचे होय. प्रामाणिकपणे व कर्तव्यबुद्धीने काम करणे, हे सर्वार्थाने सर्वांच्याच हिताचे आहे.

    ' क्रिया तशी प्रतिक्रिया ' म्हणजे 'Low of Action and Reaction' या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या राष्ट्रातील लोक कामात कसूर करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष घडवून आणणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही.

    याउलट ज्या राष्ट्रांतील लोक कर्तव्यबुद्धीने, प्रामाणिकपणे काम करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष अटळ आहे.

    - सद्गुरू श्री वामनराव पै

      November 3, 2016