वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ईशान्य भारतातील लहान राज्यात बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुका त्रिपुरात 18 फेब्रुवारीला, मेघालय व नागालँड या दोन राज्यांत 27 फेब्रुवारीला होतिल. मात्र याला मिडीयात,कुठल्या वाहिन्यांमध्ये खास स्थान मिळाले नाही.
February 15, 2018
लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.
लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात 'आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत' असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती 'फुलं आहेत का?' असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली 'मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?' त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. 'फुलं नाही मिळाली तर मग काय करता?' आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. 'मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.' मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.
लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.
वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.
प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? 'अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे' असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995
पुण्यनगरी/12 मे 2017
May 16, 2017
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.
October 10, 2023
भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान भारतातच विकसित करून, आपल्या संरक्षण दलांना उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संरक्षण संशोधन आणि विकास संस्था करीत आहे. या संस्थेने विकसित केलेल्या काही आयुधांची आणि तंत्रज्ञानाची झलक आपण पत्रिकेच्या मागील अंकांमध्ये पाहिली आहे. हीच संस्था जीवन विज्ञान क्षेत्रातही मौलिक संशोधन करून, आपल्या जवानांना टोकाच्या विषम आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. याच संशोधनाचा हा थोडक्यात आढावा…
October 22, 2023
परखाच एका मुलाखतीमध्ये मला प्रश्न विचारला गेला की भाषेच्या क्षेत्रात एकच गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही काय बदलाल? क्षणाचाही विलंब न लागता उत्तर आलं की ‘भाषा शिक्षणाची पद्धत.’
November 29, 2023

अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात.
September 16, 2023
मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे – लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धावती त्या विषावर त्यावर नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूत हि पसरविले दानवाने हलाहल विष.
March 31, 2018
चीज आणि केक स्वतंत्रपणे जगभरात प्रसिद्ध आहेत , पण एकत्रितरित्याही ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ह्या चीजकेकचे जगभरात खूप चाहते आहेत.
July 30, 2020
जनावरांच्या फार्म्सबरोबर केलेल्या अशा व्यवहारामधे त्यांना लहान पिल्ले पुरवणं (कुक्कुटपालन आणि वराहपालन), त्यांना पशुवैद्यकीय सहाय्य तसंच संतुलित खाद्य पुरवणं आणि शेवटी त्यांचं सारं उत्पादन एकहाती विकत घेणं, हा ठरावीक साचा असतो. अशा करारांवर आधारित उत्पादनाची सुरुवात झाली १९६० च्या दशकात, जेंव्हा मोठमोठ्या पशुखाद्य बनवणार्या कंपन्यांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामधे या प्रकारच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. मांस उत्पादनाच्या क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांनी हीच संकल्पना १९७० च्या दशकामधे गोमांस उत्पादन करणार्या (बीफ) जनावरांच्या क्षेत्रात आणि १९९० च्या दशकात वराहपालनाच्या क्षेत्रात आणली.
प्रचंड मोठ्या संख्येने एकत्रित केलेल्या जनावरांना पोसणारे फार्मस् (Concentrated Animal Feeding Operations - CAFO) म्हणजे शेतीच्या/पशुपालनाच्या औद्योगीकरणाची अंतिम पायरी ! ठरावीक प्रकारच्या पशु पक्षांच्या उत्पादनातील एखादा ठरावीक टप्पाच या ठिकाणी पार पाडला जातो. त्यामुळे प्रत्येक CAFO चे बांधकाम, सुविधा, विविध उपकरणे, जनावरांच्या ठरावीक जाती – प्रजाती, ठरावीक पद्धतीचे खाद्य, औषधे, कार्यपद्धती हे सारे साचेबंद होऊन जाते. हा साचेबंदपणा एवढ्या टोकाचा होऊन जातो की सारी कामे तंत्रज्ञानाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने सहज सोपी होऊन जातात. शेती किंवा पशुपालन ही कला न रहाता त्याचे विज्ञान आणि गणित होऊन जाते. निसर्गाचे आविष्कार, भूमातेची काळजीपूर्वक केलेली मशागत, पावसाच्या नक्षत्रांची आतुरतेने पाहिलेली वाट, ऋतुंचा खेळ, निढळाच्या घामाने शिंपलेली जमीन आणि सरतेशेवटी सार्या कष्टांना विसरायला लावणारी तरारून आलेली सोनसळी शेतं किंवा कुरणांत हुंदडणारी वासरं, ह्या सार्या भाबड्या कवी कल्पना पुसल्या जाऊन त्याजागी केवळ रुक्ष, कोरडा व्यवहार उरतो. थोडक्यात, आजचे CAFO हे पशुपालनाचे फार्म्स न रहाता, मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्यांच्या नियंत्रणाखालचे मांस उत्पादन करणारे कारखाने होत चालले आहेत.
अर्थात औद्योगीकरणाची तत्वप्रणाली इतर अनेक क्षेत्रांना लागू होत असली तरी शेती व्यवसायात तिचे तंतोतंत पालन होणे अवघड आहे. कारण शेती किंवा पशुपालन म्हणजे काही रासायनिक फॅक्टरी किंवा मोटारी बनवायचा कारखाना नव्हे. जैविक प्रक्रियांनी औद्योगिक उत्पादनाची समीकरणे पाळावीत ही अपेक्षाच बाळगणे चुकीचे आहे. त्यामुळे शेती व्यवसायाच्या औद्योगीकरणाच्या प्रक्रियेचा वेगच मंदगती आहे असे नसून, त्यातून होणारे आर्थिक फायदे कमी तर सामाजिक उलथापालथ आणि पर्यावरणाचे दुष्परिणाम जबरदस्त आहेत.
डॉ. संजीव चौबळ
December 14, 2015
चार वर्षांपूर्वी एक इमेल आली . IIM अहमदाबाद येथील प्रोफेसर पद्मश्री अनिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या Gujarat Grassroots Innovation Augmentation Network संस्थेच्या समर स्कुल ची. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पॉलिटेक्निक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स च्या चौथ्या वर्षात जाणाऱ्या चार मुलींना त्यांच्या departmental mentor नी थोडे समजावून त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले.
October 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti