(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवपूजेतील साधन – पळी पंचपात्र

    पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

    पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्‍या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात.

    पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र वापरत असत त्यालाच पंचपात्र ही संज्ञा आहे. पंच याचा अर्थ मोठे असून मोठ्या तोंडाचे तांब्याचे वा पितळ्याचे भांडे म्हणजे पंचपात्र होय. हे उभट गोलाकार असून त्याचे कडेला छोटे काठ असतात.

      March 18, 2016


  • गर्भवतीच्या चाचण्या

    गर्भारपणाचे नऊ महिने संपल्यानंतर प्रसूती होऊन सुदृढ माता आपल्या सुखरूप बाळाला घेऊन घरी जाते हे पाहणे स्त्रीरोगतज्ज्ञांचे ध्येय असते. यासाठी युनिसेफसारख्या जागतिक संघटनांनी ‘चाइल्ड सर्व्हायवल’ आणि ‘सेफ मदरहूड’ असा कार्यक्रम राबविला. तत्त्वप्रणाली राबविली गेली.
    आपल्यासारख्या विकसनशील देशात त्याची अमलबजावणी योग्य तऱ्हेने झाली तर एक लाख प्रसूतीमध्ये होणाऱ्या ४३० पेक्षा जास्त माता-मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

      June 23, 2023


  • आयुष्यावर बोलू काही……

    सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का??

      June 23, 2019


  • गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!

    गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात.

    पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतातच ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक Reality show किंवा Performing show होत चालला आहे.आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणक्यात पाळला जातो.

    आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना ( मग त्यात "शेंदूरलाल चढायो अच्छा गजमुखको " ही हिंदी आरतीही आली) त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर "गणपती बाप्पा मोरया " हा मराठीतला जयजयकार तर अगदी अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही ( तेथे स्थाईक मराठी किंवा भारतीय मंडळी नव्हेत ) मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात .

    पण आपल्याला मात्र त्या आरत्या आता जुन्या, कालबाह्य , out of fashion वाटायला लागल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी ... देवा हो देवा गणपती देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेशदेवा, देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा ,ओम जय जगदीश हरे .... अशी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या आहेत.

    येई गे विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह या आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे "देवे " म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत , --देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकीत लांब आकार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत जुगलबंदीचा आनंद घेतला जातो.

    भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी , गणपतीची पूजा - आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ?

    -- मकरंद करंदीकर
    अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०००६९

      August 27, 2017


  • आणखी एक इशारा!

    नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

    — प्रकाश पोहरे

      October 20, 2002


  • जागतिक श्रवण दिन

    कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी विशिष्ट थीम जाहीर केली जाते.

      March 4, 2025


  • युवा दिवस

    भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले.

    या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती.

    ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.

    स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉसलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतंय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉठलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्य ही येते.

    तर खरच आपणच आपण भविष्य घडवायला हवे, कोणावरही अवलंबून राहणे हे योग्य नाही.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 7, 2017


  • किचन क्लिनीक – जवस

    किचन क्लिनीक – जवस

    जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते.

    ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती देखील जवस वाढायला मदत करतात.

    जवसाची चटणी करतात किंवा त्याचे तेल ही काढले जाते.आता आपण ह्या दोन व्यंजनांचा शरीरावर होणारा परिणाम पाहूया:

    १) जवस चटणी:

    तिखट,गोड,कडू,स्निग्ध,भुकवाढविते,उष्ण,
    वात,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,हृदयविकार नाशक आहे.

    २) जवस तेल:
    गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध,कफ पित्तकर,वातनाशक,बल्य,संडासला साफ करविणारे,त्वचारोग नाशक,चरबी कमी करणारे,आहे.

    जवस व मोहरीचे तेल हे जरी स्निग्ध असले तरी अन्य तेलांपेक्षा हि दोन्ही तेलं थोडी रूक्षच असतात.

    जवसाचे अतिसेवन केल्यास अशक्तपणा येऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      January 8, 2017


  • आरोग्यवर्धक ज्वारी

    आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.

    ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

    ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

    ज्वारीचे फायदे -

    1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
    2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
    3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
    4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
    5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
    6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
    7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
    8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
    9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
    10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

    ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

    ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.

      October 21, 2016


  • शिव’शाई’ झाली शतायुषी

    आज बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्हा पुणेकरांचे, ते एक ‘ऐतिहासिक वैभव’च आहे! आमच्या तीन पिढ्यांनी त्यांच्या तोंडून छत्रपतींचे चरित्र ऐकले, पाहिले.

      July 29, 2021