(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

    पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल

      August 4, 2019


  • नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द

    २४-३०/११/२०१२
    पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
    झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
    स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
    करायला तयार आहे

      November 29, 2012


  • जागतिक श्रवण दिन

    कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी विशिष्ट थीम जाहीर केली जाते.

      March 4, 2025


  • साहित्य आणि ललित लेखन: स्वरूप, प्रकार आणि फरक

    वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

      August 12, 2026


  • साबणातील घटकद्रव्य

    खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं.

      March 15, 2023


  • समाधान

    संत तुकारामांच्या अभंगओवीत मानवी जीवनाच संपुर्ण सार पूर्णार्थाने व्यक्त झालेलं आहे. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे आणि म्हणूनच कर्ताकरविता तो एकची भगवंत आहे आणि त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून तो माणूस सुखी समाधानी जीवन जगतो आहे हेच एकमेव सत्य आहे . याचाच अर्थ आपण स्वतः जीवनात सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे.

      May 23, 2023


  • पितिकाची शेती…. विकासाला गती !

    भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. प्राचीन ज्ञानाचा आजच्या संदर्भाने पूर्ण कौशल्यासह वापर करून आपली प्रगती साधने आवश्यक आहे.

      June 11, 2012


  • स्त्रियांच्या रजोदर्शन काळातील अस्पर्शता आणि त्याविषयीच्या भूमिकेमध्ये बदलाची आवश्यकता

    वैदिक कालखंडापासून भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये स्त्रियांचे स्थान महत्वपूर्ण आहे.वैदिक काळातील स्त्रिया शिक्षित असत आणि त्याजोडीने त्या कुटुंबातील त्यांच्या जबाबदा-याही पार पाडत असत. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग असे.विश्वावरा आत्रेयी हिचा वैदिक साहित्यात यज्ञकर्त्री असा उल्लेख या दृष्टीने महत्वाचा ठरतो.

      January 19, 2019


  • जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

    २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच

      October 18, 2022


  • रेल्वे प्रवासाचे नियोजन – भाग ४

    भारतीय रेल्वेचं वर्तुळाकार मार्गाचं (सर्क्युलर) तिकीट - एक अनुभव

    १९५० ते १९६० सालांदरम्यान रेल्वेचं विविध विभागांचं अतिशय स्वस्त असं 'झोनल तिकीट' मिळत असे. निरनिराळी गावं त्या तिकिटात समाविष्ट होत व त्याची मुदत अगदी महिनाभर असे. निरनिराळ्या गावांतील नातेवाईक शोधून त्यांच्याकडे मुक्काम ठोकण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. गमतीने तिकीटधारकाला 'झोन्या' म्हणत. 'झोन्या' केव्हा दत्त म्हणून समोर उभा राहील याचा भरवसा नसे. आल्यावर तो राजासारखा राहायचा. मनात आलं, की एक गाव सोडून दुसऱ्या गावात नातेवाइकांकडे पुख्खा झोडायचा. पुढे रेल्वेनंच अशी तिकिटं बंद केली.

    आजही अशा प्रकारची सोय असलेलं भारतातील कुठल्याही मार्गावरचं टेलीस्कोपिक राऊंड तिकीट उपलब्ध असतं. ८ दिवसांपासून ४८ दिवसांपर्यंत कोणत्याही वर्गाचं तिकीट मिळू शकतं. आपल्याला ज्या गावांना जायचं आहे, ती गावं व तेथे जाणारा मार्ग रेल्वेला दिल्यावर ते त्या स्थळांचा नकाशाप्रमाणे कमीत कमी अंतराचा मार्ग आखून देतात. २००८ साली आम्ही चार मित्रांनी वातानुकूलित पहिल्या वर्गाने प्रवास करण्याची योजना आखली. सर्वच गाड्यांना हा वर्ग नसतो, व त्या तिकिटानं राजधानी एक्सप्रेसनं प्रवास करता येत नाही. तेव्हा आम्ही आमचं बायबल (रेल्वे टाईम टेबल) घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. आमच्या आखून दिलेल्या मार्गावरील ज्या गाड्यांना वातानुकूलित पहिल्या वर्गाचे डबे आहेत, त्या गाड्यांची निवड केली. साधारणपणे बऱ्याच गाड्यांना ८ ते १० तिकिटं, तर काहींना २८ तिकिटांचा पूर्ण डबाही असतो; पण या वर्गामधील काही तिकिटं गाडी निघण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवलेली असतात. त्यामुळे ८ पेक्षा अधिक तिकिटं मिळणं कठीण असतं. बरोबर २ महिने आधी सकाळी ८ वाजता निरनिराळ्या दिवसांची आमच्या मार्गावरील स्टेशनांची तिकिटं पदरात पडल्यावर पुढील प्रवासाची आखणी केली. आम्हाला नुसता रेल्वेप्रवास करायचा नव्हता, तर प्रेक्षणीय स्थळं पाहायची होती. त्यामुळे आम्ही निवडलेला मार्ग असा होता.

    मुंबई-पुणे-सिकंदराबाद-विशाखापट्टणम- बाळूगाव (ओडिसात भुवनेश्वर जवळील चिल्का सरोवराला जाण्याकरता उतरायचं स्टेशन) - जग्गनाथपुरी हावडा (कलकत्ता) सियालडा (कलकत्ता) न्युजलपईगुरी (बंगाल-आसाम सरहद्द) अलाहाबाद - लखनौ - मुंबई - पुणे.

    हे सर्व अंतर होतं ६४०४ कि.मी. आणि रेल्वे तिकीट होतं प्रत्येकी ६३७० रुपये (ज्येष्ठ नागरिक सवलत धरून) प्रवासात प्रेक्षणीय स्थळं अशा प्रकारे पाहता आली.

    १. हैद्राबाद (१ दिवस)
    २. चिल्का सरोवर, भुवनेश्वर, नंदनकानन प्राणीसंग्रहालय, कोणार्क, जग्गनाथपुरी (५ दिवस)
    ३. सिक्कीम - गंगटोक, गुरडोगमार लेक (भारत-चीन सरहद्द) (४ दिवस)
    ४. अलाहाबाद - (१ दिवस)
    ५. लखनौ - (३ दिवस)

    एकूण प्रवासाचे २१ दिवस होते.

    वातानुकूलित पहिल्या वर्गाचे आलिशान डबे, चौघा जणांना एकेक भाग, त्यामुळे आम्हा चौघांचं तर बंदिस्त घरच झालं होतं. आतून डबल लॉकची सोय, उत्तम पडदे, झोपण्यास प्रशस्त फोमचे बेड, संपूर्ण डब्याला मऊ गालिच्याचे अच्छादन, दिव्यांची उत्तम सोय, कोणत्या बाजूचं स्वच्छतागृह मोकळं आहे ते दर्शविणारे बाण, अंघोळीकरता शॉवरची सोय, अशी सगळी उत्तम व्यवस्था होती. गाडीच्या डब्यांच्या काचा अतिशय स्वच्छ होत्या. त्यामुळे उत्तम फोटोग्राफी करता येत होती. डब्यात रेल्वेचा सेवक २४ तास दिमतीला असल्यानं चहापान, जेवणा-खाण्याची उत्तम सोय होती. हे सर्व सुखसोयीनी परिपूर्ण असलेले डबे म्हणजे भारतीय रेल्वेची शान आहे. या वर्तुळाकार मार्गासाठीच्या (सर्क्युलर) तिकिटामध्ये कोणत्याही गावाला ४ दिवस राहता येतं. वातानुकूलित विश्रामकक्षामध्ये १५ तासांपर्यंत थांबण्याची मुभा असते.

    जगन्नाथपुरी स्टेशनचा विश्रांतिकक्ष पाहून तर डोळे दिपूनच गेले. अत्याधुनिक हॉल, बसण्यास उत्तम खुर्च्या, भिंतींवर उत्कृष्ट पेंटींग्ज, बसल्या-बसल्या समोरच्या भव्य टी.व्ही. पडद्यावर सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा, प्लॅटफॉर्म क्रमांक ही माहिती दिसत होती. जवळच खानपानाकरता आधुनिक कॅफेटेरिया होता. तिथे पिझ्झ्यापासून पुरी-भाजीपर्यंत सर्व काही अतिशय स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होतं.

    'संपर्क क्रांती एक्सप्रेस' ही गाडी राजधानी एक्सप्रेस सारखीच, पण या गाडीमध्ये तिकिटाच्या किंमतीत जेवण नसतं, मात्र भाडंही बरंच कमी असतं.. न्यूजलपईगुरी ते अलाहाबाद हा १८ तासांचा प्रवास राजधानी एक्सप्रेससारखाच सुखकर होता.

    'गरीब रथ एक्सप्रेस' गाडीही अशाच वेगाने जाणारी आणि स्वस्त तिकीट असलेली. बऱ्याच मार्गांवर धावत असणाऱ्या या गाड्यांचा उपयोगही या योजनेत करून घेता येतो.

    'लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस' ही या प्रवासातली मानाची गाडी. हा प्रवास २४ तासांचा. या प्रवासाने संपूर्ण प्रवासाचा शिणवटा घालविला होता. दादर स्टेशनवर परतलो तेव्हा या अभूतपूर्व प्रवासाची हृदय-सांगता झाली.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 28, 2022