वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात.
October 25, 2023
शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) :
पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं
अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी
दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं
सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई
पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे
‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’
बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं
निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं
लाखांचे पोशिंदे तुम्ही, खुशाल जावें पुढती
अडवूं-तुडवूं दुश्मन आम्ही, मृत्यूची ना भीती. ”
-
बाजी प्रभू ( सोबत्यांना स्फूर्ती देत ) :
ज़बरी दुश्मन, मुठभर आपण, परंतु निधडी छाती
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
निबिड अरण्यामधल्या खिंडित अरुंद छोटी वाट
आली कितिही तल्वारींची लाटेवरती लाट
सहज थोपवूं इथें शत्रुच्या महापुराची शक्ती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
वेगें दौडत विशाळगड नृप अपुला गाठूं पाहे
अपुल्या निष्ठेची-शौर्याची आज परीक्षा आहे
स्वराज्ययज्ञीं शोणित शिंपुन देऊं प्राणाहुती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
‘दीनदीन’चा निनादतो स्वर, ‘हरहर आपण गर्जू
शत्रूच्या समशेरींपुढती खड्ग आपुलें परजूं
तल्वारींच्या खणाखणीनें करूं मृत्युची आरती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
अतुलनीय शौर्य-धैर्य अपुलें, मरणाचें भय कैचें ?
वेगें विचरूं , जैसे तांडवनृत्य महादेवाचें
अशक्य ठरवूं दुश्मनास पाऊल टाकणें पुढती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
घटी-प्रहर-पळ अचल, अचंबित काळ थांबुं दे आज
तोफांचे ध्वनि येईतों स्पर्शणार ना यमराज
तोंवर अरिवर अखंड बरसूं लवलवणारी पाती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
-
शाहीर पहिला :
अखेर आले गडावरूनी तोफांचे आवाज
म्हणती बाजी, ”अंतिम मुज़रा स्वीकारा महाराज
मराठदेशा, ठेव ज़ागती अविरत स्वराज्यज्योती ” ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
-
शाहीर दुसरा :
ऐसे लढले बाजी, ऐसे शूर मावळे लढले
मर्दुमकीची शर्थ करूनी धारातीर्थीं पडले
स्वराज्य राखाया स्वीकरली खुशिनें वीरगती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
धन्य स्वराज्याचे पाइक ते, धन्य धन्य ते गाजी
धन्य धन्य ती घोडखिंड अन् धन्य वीर ते बाजी
धन्य मृत्यु ते, पावन ध्येया संजीवन जे देती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
- - -
(१३.०७.१६ : पावनखिंड-स्मृतिदिन )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 15, 2016
आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो.
आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक घटक समजला जातो. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.
आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत.
आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही परंपरा आहे, जिची सुरूवात सुश्रुताने केली. इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदीक साहित्यांचे संश्लेषण केले ज्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळाधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला.
आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. मार्गदर्शक आणि मूळ तत्वे पंचमहाभूते प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे ज्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळतत्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.
1. आकाश
2. वायू
3. अग्नी
4. आप
5. पृथ्वी
6. दोष
सर्व शारिरीक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात.
वात दोष
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छवास, मनातील विचार इत्यादि गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष
कफ आपतत्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकार शक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक, जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि ऍलर्जि इत्यादि त्रास होतात.
पित्त दोष
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्न पचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.
-- आरोग्यदूत WhatsApp समूहातून
January 2, 2017
मला अजूनही उमगले नाही,..
शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात...
1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात...हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240...
3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.
मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो....
एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 ...बरोबर ...रूपये 270
एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची....टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये ...
आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल....
तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.
कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे....याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ....
महात्मा गांधी सांगत ",खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच."
आला ना हिशोब ध्यानात ......शुद्ध ....शुद्ध खाद्यतेलाचा....
आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन ...
-- मकरंद
November 6, 2016
भारतीय पातळीवर १०८ शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ - श्री तुळजाभवानी तुळजापूर
तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन २२ किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण ४४ किमी अंतरावर आहे.
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
माहिती संकलन : निखिल आघाडे
October 4, 2016
काही वेळा विमा पॉलिसीचे हप्ते भरायचे राहून जातात किवा आर्थिक अडचणींमुळे ते भरता येत नाहीत. अशा वेळी पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झाल्यानंतरच्या कालावधीत विमाधारकास काही झाल्यास पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये. अर्थात लॅप्स झाल्यानंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करणे शक्य असते. मात्र, अशा वेळी विमा कंपनीचे काही निकष पूर्ण करावे लागतात.
September 8, 2010
स्थापनेपासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला.
September 4, 2021
ज्याला फुडग्रेड प्लॅस्टीक म्हणतात त्याच्या टेस्ट्स कुठल्या निकशावर केल्या जातात?
50 वर्षे असे प्लॅस्टिक वापरल्यास पुढच्या पिढ्यांवर कांय परिणाम होतील याची टेस्ट कशी करणार?Aging Effect Test ही जनरलाइज संख्याशास्त्रावर प्रयोग शाळेत केली जाते.
एकच आजार असलेल्या २०० रोग्यांना एकाच औषधाची एकच मात्रा चालु शकत नाही. प्रत्येकाच्या रंघ्रा रंघ्राला particular वागण्याची व रिझल्ट देण्याची सवय (खोड) असते. नाडी पाहुन, शरिर लक्षणे, मानसिकता, शाररिक क्षमता इ. अनेक बाबिंचा विचार करुन औषधाचे नियोजन वेगवेगळे होत असते.
आपल्या ग्रूपवर येणार्या प्रत्येक माहितीमधे सार्वत्रिक सत्य असते व व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्या साठी प्रत्येकाने निष्णात वैद्य/डाॅ. सल्ला घेण्याचे अवाहन करण्यात येते.
तसे प्लॅस्टिक टेस्टिंग बाबत कसे बरे करता येईल?
शरीर विज्ञान हे या त्रिखंडातील सर्वात complicated mecanisum आहे. प्रत्येकाने स्वतःवर निट लक्ष ठेऊनच शुद्ध आचरण केले पाहिजे.
एक साधा प्रयोग केला.....
पाण्याची बाटली विकत घेतली, पाणी संपवले, बाटली दोन दिवस तशीच बुच घट्ट लाऊन ठेवली.
दोन दिवसानंतर नाकापाशी बाटली नेऊन हळुच झाकन ऊघडले....
मस्त पैकी गॅसचा घाण वास आला....
त्यात पाणी असताना कांय होत असेल??
अल्ला जाने.... खुदा पहेचाने...
शांतीनाथ जैन, पुणे.
January 18, 2017
बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर ) या नृत्याला मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे.
July 26, 2023
काहीजणांचे उत्तर असेल पोट भरेपर्यंत; तर काहीजण म्हणतील मन भरेपर्यंत!! कदाचित काही स्वतंत्र बुद्धिवादींना असंही वाटेल की आता आम्ही किती खायचं हेदेखील आयुर्वेद ठरवणार का? ;)
ज्याला निरोगी राहायचं आहे अशी व्यक्ती मात्र या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करेल.
आयुर्वेदाने जठराचे काल्पनिक भाग करून स्थूल-द्रव आहाराची मात्रा सांगितली आहेच. मात्र असा अंदाज घेणे हे प्रत्येकाला सर्वस्वी शक्य नसल्याने तुलनेत सोपा मार्ग निवडुया. एखादा पदार्थ किती प्रमाणात खाल्ल्यावर आपले पोट भरते याचा प्रत्येकाला निश्चित अंदाज असतो. यालाच 'तृप्ती' ही संज्ञा आयुर्वेद वापरतो. आयुर्वेद सांगतो पचायला जड असलेले पदार्थ या तृप्तीच्या निम्म्या मात्रेतच घ्यावेत. उदाहरणार्थ; दोन वाट्या श्रीखंड खाऊन पोट भरत असल्यास एकाच वाटीवर समाधान मानावे. आवडतं म्हणून ओरपत बसलं तर पुढे सुस्ती, अपचन, पोट बिघडणे आणि सर्दीसारख्या तक्रारी सुरु झाल्याच म्हणून समजा. बहुतांशी गोड पदार्थ, मांसाहार, आंबवलेले पदार्थ हे पचायला जड असल्याने त्यांना हा नियम लागू होतो.
पचायला हलके असलेले पदार्थ मात्र पोट भरल्यासारखे वाटेल इतकेच खावेत; त्याहून अधिक मात्रेत खाऊ नयेत. लाह्या, घावने, कढण, पेज यांसारखे पदार्थ पचायला हलके आहेत. या पदार्थांच्या बाबतीत हा नियम लागू होतो. या नियमांनुसार जेवण केल्यास नियमितपणे व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीदेखील अपचन आणि तत्सम समस्यांपासून दूर राहू शकतील असा यामागील विचार आहे. थोडक्यात काय? तर 'चार घास कमी' जेवणे हे आरोग्यदायी आहे. या साधा नियम पाळला म्हणजे 'टमी भी खूष और मम्मी भी खूष'.
वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti