(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग तीन

    ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 19-पुष्प सातवे

    पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.
    माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.
    यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.

    ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.

    पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.
    पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.

    जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.

    तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.

    हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.

    एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता 'अंगाला तेल लावूच नका', असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.

    देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.06.2017

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग १

    ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार

    पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात.

    ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात केली. ज्याला आपण आज भारतीय बैठक म्हणतो.

    गावाकडे अजूनही पुरूष मंडळी पंगतीमधे जेवताना, उकीडवे बसूनच जेवतात. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसणे, म्हणजे ऊकीडवे बसणे.
    उकीडवे बसल्याने दोन्ही मांड्या पोटावर दाबल्या जातात. जेवतानाच पोट दाबून जेवले गेल्याने अनावश्यक जेवण जात नाही. त्यामुळे तब्येत सडसडीत रहाते. पोट सुटत नाही. पोटात वात साठून रहात नाही. तयार झालेला गॅस लगेच बाहेर पडून जातो. पोट हलके होते.
    हा पोटातील गॅसचा दाब इतर अवयवांवर न पडल्यामुळे तेही खुश.

    समजा, दाटीवाटीने एका कोचवर (बाकावर) चार माणसे बसली आहेत. त्याच बाकावर आणखी दोघांना बसायला सांगितले तर ? कोंबून ठोसून बसलेच, तर पहिले चार जण, जे आरामात बसले होते, त्यांना आपल्या हालचालींवर निर्बंध आणावे लागतील. त्यांच्या हालचाली मर्यादित होतील.

    अगदी तसेच पोटातील अवयवांचे होते. यकृत, प्लीहा, अग्न्याशय, किडनी, आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर रहाणारे ह्रदय, फुफ्फुसे, यांच्यावर आतड्यातील गॅसचा अतिरिक्त दाब सतत पडत रहातो.

    हा गॅस तयार होता होता जर बाहेर पडला तर त्रास होणार नाही. पण जर ही हवा आतच साठून राहीली तर, या सर्व अवयवावर अतिरीक्त दाब पडतो. आणि त्यांचे आयुष्य कमी होते.

    हा दाब किती असतो, कल्पना आहे ?
    अहो, याच दाबून ठेवलेल्या वाताच्या जोरावर, त्या जेम्स वॅटने म्हणे वाफेचे इंजीन चालवले होते.

    आता हा वाताचा दाब आत जर वाढला तर, या पैकी एका अवयवांवर दाब येणार हे निश्चित. मग त्या अवयवाने कधीतरी अचानक संप करून, त्याच्यावर पडणारा अतिरीक्त ताण कमी करण्याची मागणी केली तर, चुक आहे का ?

    अवयवांनी ही अशी मागणी करणे, म्हणजेच विशिष्ट रोगाची लक्षणे होत.
    म्हणजेच हा ताण अतिरिक्तरीत्या वाढू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवयवांना संपावर जाण्यापासून रोखणे.

    हे सर्व एका आसनामुळे शक्य आहे, ते म्हणजे उकिडवे बसून जेवणे.

    आताच्या काळात जरा "मॅनरसलेस" वाटेल, पण त्याला पर्याय नाही.

    जसे आसन तसे मलविसर्जन.

    टेबलखुर्ची घेऊन जेवायला काटकोनात बसले की, मलविसर्जन पण काटकोनातच केले जाते ना ! कमोडवर बसून हो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    17.09.2016

  • आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग १९

    मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे.

    चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो.

    उपवासाच्या विविध व्यंजनामधे जिऱ्याच्या जोडीला आल्याचा मान असतो. पचायला मदत करणारे, अजीर्ण दूर करणारे, पोटाची फुगारी, आमाचा अवरोध दूर करणारे म्हणून आले प्रसिद्ध आहे.

    आजीबाईच्या बटव्यातील एक हमखास उपयोगी पडणारे औषध म्हणजे, आल्या लिंबाचे सेंदेलोण पादेलोण हिंग घालून तयार केलेले पाचक.

    नुसते नाव घेतले तरी तोंडात लाळेचे लोट तयार होतायत, तर प्रत्यक्षात जीभेवर आले की लाळेचे फव्वारेच तयार होतील.तयार झालेल्या या लाळेमुळे पित्त आणि आल्यामुळे कफाचे अजीर्ण, आणि वात लगेच कमी होतो.

    म्हणजेच तीन्ही दोष कमी व्हायला आले धावून आले ! ???

    आले पोटात आत जावून काम करतेच, पण कुठेही लचकले, मुरगळले, तरी पहिला घरगुती उपचार आठवतो, तो म्हणजे आल्याचा लेप ! पायाची टाच दुखत असू दे किंवा गुडघ्याला सूज असू दे, आले वाटून लावले कि हमखास वेदना कमी होतात. स्वभावतःच गरम असल्यामुळे, लेप लावण्यापूर्वी पुनः गरम करावे लागत नाही.

    लेप लावल्यावर आल्याचा तिखटपणा त्वचेवर क्षोभ उत्पन्न करतो, दाह होतो, उष्ण गुणांनी पदार्थ प्रसरण पावतो, याच नियमांनी त्वचेअंतर्गत असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे त्या अवयवाला तात्पुरत्या स्वरूपात जास्तीची मदत मिळते आणि वेदना कमी केल्या जातात.

    अशीच प्रक्रिया प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाच्या लेपाने होते. फक्त वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. कारण काही मसाले त्वचेवर फोड देखील उत्पन्न करतात. पण जायफळ, दालचिनी, कांदा हे मसाले त्वचेवर लेप लावून वेदना कमी करण्यासाठी सेफ झोन मध्ये आहेत.

    प्रत्येक मसाला चवीला, तिखट लागला तरी तो प्रत्येक वेळी पित्त वाढवेलच असे नाही. जशी लवंग ! चवीला तिखट असली तरी पित्त कमी करण्यासाठी तिला वैद्यांच्या दुनियेत मानाचे स्थान आहे.

    चवीप्रमाणेच एखादा पदार्थ स्पर्शाला थंड असला तरी पित्ताला कमी करतो असेही नाही. जसे फ्रीजमधील मिरची .

    आल्यापासूनच पुढे सुंठ बनवली जाते. चांगले जून झालेले आले, चुना लावून वाळवले जाते. आणि सुंठ बनते. आले जरी पित्ताला वाढवणारे असले तरी, सुंठ मात्र पित्ताला कमी करते.

    अनुभव आणि वाढलेले वय स्वभावातला तिखटपणा कमी करतोच ना ! फक्त माणसात तेवढा दिसत नाही, जेवढा आल्यात आहे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.11.2016

  • आहाररहस्य १२

    आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले.

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ६

    पानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे.

  • बेल/बिल्व

    ।।उमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि।।

    शंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही.

    बेलाचे झाड हे ८-१० मीटर उंच असते व ह्याच्या बुंध्याचा घेर १-१.२५ मीटर एवढा असतो.हा वृक्ष काटेरी असतो व ह्याची पाने त्रिदल युक्त अर्थातच तीन छोटी पाने मिळून हे पान बनते.फुले हिरवट पांढरी सुगंधी व ४-५ पाकळ्यांची असतात.
    फळ मोठे गोल किंवा अंडाकार धुरकट पिवळे असून पिकल्यावर त्यावर नारंगी झाक दिसते.

    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:

    कच्चे फळ हे चवीला तिखट,कडू,तुरट असते व उष्ण गुणाचे हल्के व स्निग्ध असते.
    तर पिकलेले फळ हे चवीलातिखट,कडू,तुरट,
    गोड असते व उष्ण पचायला जड व रूक्ष असते.

    हे शरीरातील वात व कफ दोष कमी करायला मदत करते.

    आता ह्या बेलाच्या वृक्षाचा उपयोग कुठे केला जातो ते थोडक्यात पाहूयात:

    कच्चे फळ हे भुक वाढविणारे,पचनक्रिया सुधारणारे,मल बांधुन ठेवणारे कृमिनाशक आहे म्हणूनच ह्याचा उपयोग जुलाब,आव पडणे,भुक मंदावणे ह्यात केला जातो.

    पिकलेले फळ हे सौम्य रेचन करते म्हणून पोट साफ होत नसल्यास ह्याचा उपयोग होतो.

    बेलफळाची साल हि काढा करून वारंवार उल्टी होत असल्यास उपयुक्त आहे.

    बेलाच्या वृक्षाचे मुळ हे हृदयाला हितकर असल्याने हृदयविकारात उपयोगी आहे.

    बेलाची पाने ही अंगावरील सूज कमी करतात,तसेच ती वेदनाशामक म्हणून उपयोगी आहेत.डायबेटीस मध्ये लघ्वीतून साखर जाणे व वारंवार लघ्वी होणे ह्यात देखील बेलाची पाने उपयुक्त आहेत.

    तर आपण पाहीलेच असेल की बेलाचा वृक्ष किती औषधी गुणांनी युक्त आहे तो आणी म्हणूनच ह्याला गणपती प्रिय पत्रीमध्ये मानाचे स्थान आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनिक – मोहरी

    आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.

    मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.

    चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.

    १) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.

    २) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.

    ३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.

    ४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.

    ५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.

    मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर

    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • दुर्वा/श्वेत दुर्वा

    ।। गजाननाय नम: श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि ।।

    गजाननप्रिय दुर्वा खरोखरच तन मन शांत करायचे महत्त्वाचे कार्य करते.

    ह्याचे जमीनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप असते.अनेक पर्व असणारे व ह्या पर्व संधी जवळ उगवणारी मुळे ही पुन्हा जमीनीत शिरतात व पुन्हा वाढतात व पसरतात.ह्याची पाने १-१० सेंमी लांब असून,फुले हिरवी अथवा वांगी रंगाची एका मंजीरीत २-८ असून मंजीरी १-८ सेंमी लांब असतात.बिया अगदी बारीक पिंगट रंगाच्या असतात.

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.

    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
    ह्याची चव तुरट,गोड,थंड गुणाचे असून हल्के असते.ही कफपित्तनाशक अाहे.

    चला आता ह्याचे शरीराला काय फायदे आहेत ते जाणून घेऊया:

    दुर्वाचा लेप हा आघात,जखम,व्रण ह्यात लेप केल्यास डाग कमी होतात व वर्ण सुधारतो.

    डोळ्यांची आग होत असल्यास दुर्वा फायदेशीर आहे.

    शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला उपयुक्त आहे.

    स्त्रियांच्या अंगावर लाल अथवा पांढरे जात असल्यास दुर्वारस फायदेशीर ठरतो.

    दुर्वा गर्भाशयाची शक्ती वाढविते.

    वारंवार तहान लागणे,उल्टी होणे ह्यात देखील दुर्वा उपयुक्त आहे.

    मनाला शांत करणे हा अलौकिक गुण ह्या वनस्पती मध्ये आढळतो म्हणूनच तर गणपतीला ह्या वाहिल्यास आपले ही मनशांत होते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग तीन

    भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.