(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग साठ

    जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

    रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अकरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    भाग दोन

    जीवनावश्यक काय आहे ?
    अ.व.नि.
    अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली.....
    ....... तुला स्वर्गात जायचे आहे की नरकात असा प्रश्न विचारल्यावर जिथे फोरजीची रेंज येते आणि मोबाईल आणि चार्जर नेता येतो तिथे कुठेही चालेल, अशी उत्तरे देणारी मोबाईल अनिवार्य झालेली आजची पिढी.....

    पाचवी गरज औषधांची निर्माण झाली.
    असे वाटू लागले आहे, की औषधांशिवाय मी जगूच शकणार नाही. एकवेळ जेवण आणि आंघोळ राहिली तरी चालेल पण औषधे विसरून चालणार नाही, असे वाटण्या इतपत कायमस्वरूपी औषधाबद्दलचे प्रेम निर्माण झाले आहे.

    "उगाच रिस्क कशाला घेताय"
    " हेल्थ महत्त्वाची की पैसा"
    अशा गोंडस टायटल असलेली टिपीकल वाक्य डाॅक्टरनीच सुनावल्यावर, औषध ही जीवनावश्यक गरज बनली. परदेशवारीची ऑफर फार्मा कंपन्या, डाॅक्टरना देतात. एखाद्या कंपनीची औषधे जर वर्षभर वापरली तर सिंगापूर मलेशिया ट्रीप जर होत असेल तर या मोहात कोण पडणार नाही ? अर्थात सर्व डाॅक्टर ही ऑफर स्विकारतात असं नाही. पण हा सरळ सरळ बिझनेस आहे. दुर्दैव आहे की यात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य पणाला लावले जातेय.

    फूड अॅण्ड हेल्थ सप्लीमेंटच्या नावाने महागड्या टूथपेस्ट पासून ते अगदी औषधे विकणाऱ्या कंपन्या, आपले टाय बांधलेले सोकाॅल्ड सोकावलेले एजंट दारोदारी फिरवत आहेत. दुर्दैवाने यात काही डाॅक्टरदेखील एजंट म्हणून सामील आहेत. आरोग्य जनजागृती च्या नावाने, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. "आजकाल म्हणे अन्नाचा दर्जा खूप घसरल्यामुळे आमची ही पावडर तुम्हाला दिवसभराची सर्व एनर्जी देईल." इथपर्यंत असत्याचा प्रचार केला जातोय. फ्रि मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्पच्या जनसेवेतून काही मशीनद्वारे मोफत कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणीचे नाटक पार पाडले जाते. हवे तसे रिपोर्ट आणले की आमच्या कंपनीचे अमुक औषध आता आपल्याला विकत घ्यायला हवे, असेही या "फ्री" चेक कॅम्पमधे सांगितले जाते.
    उल्लु बननेवाले है, इसलिए "बनानेवाले" पैदा होते है।

    औषधे ही रोग घालवण्यापुरती, तात्पुरतीच घ्यायची असतात, नंतर रोग विसरून जायचा असतो, लक्षात ठेवायचा नसतो, हे लक्षातच येत नाही आणि औषधं कायमची पाठी लागतात.

    "माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला त्रास होताहेत" हे मान्य न करता, हे जीवनचक्र असेच चालणार, आणि आम्ही आयुष्यभर औषधे घेत बसणार आहोत." अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तींनी, हा लेख फारसा मनाला लावून घेऊ नये. विसरून जावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.04.2017

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १७

    समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
    देहे दुःख ते सुख मानीत जावे....
    सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
    प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
    सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
    सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?

    प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!

    आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.

    घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

    किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
    चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
    पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
    ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
    ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
    मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
    एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
    हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
    शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !

    पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
    नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?

    मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
    रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
    अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
    पण निदान...
    आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
    आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
    आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
    आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
    आणि
    आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
    देहे दुःख ते सुख मानीत जावे......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.02.2017

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – गोवार/गौर बाकूची

    होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते.

    अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या गेल्या तर हि भाजी कडू होते असे म्हणतात.

    हिची भाजी कडवट असली तरी लागते छान आणि ब-याच लोकांना हि भाजी फारच आवडते.जशी हि स्वयंपाकात वापरतात तसेच हिचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.

    गोवारीची भाजी हि चवीला कडू तिखट लागते व हि उष्ण असते त्यामुळे ती शरीरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त मात्र वाढवते.

    चला हिचे औषधी प्रयोग पाहूयात:

    १) चाई पडून टक्कल पडले असल्यास गवारीच्या ह्यांचा लेप त्या जागी लावावा व पोटात खायला गोवार भाजी द्यावी.

    २)हि भाजी कडूपौष्टीक मानली जाते त्यामुळे ताप येऊन गेल्या नंतर येणा-या अशक्तपणा मध्ये हि खायला द्यावी.

    ३)खरूज झाली असता गोवारीच्या बिया व कडूकारले गोमूत्रात वाटून लावावे.

    ४)त्वचेवर पांढरे कोड आल्यास तसेच सोरियासीस मध्ये गोवारीच्या बियांचे तेल त्वचेवर लावावे व पोटात खायला भाजी द्यावी.

    ५)मुळव्याध,कृमी व वारंवार संडास मधून आव पडणे ह्यात गोवारीची भाजी खाणे उत्तम होय.

    गोवारीची भाजी खायचा अतिरेक केल्यास अॅसिडीटी,पातळ जुलाब होणे व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के,
    कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • हार्ट अटॅक रिस्क डिटेक्टर

    आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग ४

    ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ?

    आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका.

    आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी घालून बसणे सोडावे, असे थोडेच आहे ?

    जशी संस्कृति तसे आचरण. पाश्चात्य संस्कृतीमधे मांडी घालून बसणे हा संस्कार त्यांच्या लहानपणापासूनच नाही, मग अगदी कितीही उच्चविद्याविभूषित झाले तरी, खाली बसायचे असते, हे त्यांना माहीतच नसते.

    पाश्चात्यांचे एकवेळ समजू शकतो, पण ज्यांच्या आयुष्याची निम्मी वर्ष जमिनीवर, पाय दुमडून जेवण्यात आणि उकीडवे बसून मलविसर्जन करण्यात गेली, अश्या आमच्या भारतीय वैद्यक तज्ञांनी, असे सल्ले आपल्या फाईल्सवर छापील स्वरूपात आणल्यावर, बदललेल्या शिक्षणपद्धतीने, भारतीय संस्कृतीचे किती नुकसान झाले, हे लक्षात येते.
    भारत हा माझा देश आहे.
    सारे भारतीय माझे बांधव आहेत ...
    माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
    या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन....
    या प्रतिज्ञेचा एवढ्या लवकर विसर पडावा, याचेही आश्चर्य वाटते. या आमच्या भारतीय परंपरा हळुहळू आमच्या जीवनपद्धतीतून नाहीश्या होत चालल्या आहेत. एवढे पाश्चात्य विचारांचे आपण होत चाललो आहोत, हे आमच्या लक्षातही येत नाहीये.

    सहज या परंपरांचा हिशोब करीत बसलो असताना असे लक्षात आले की, सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान एकशे सत्तावीस ठिकाणी आपण अभारतीय पद्धतीने वागतोय, ज्यांचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे.

    पण आमची विचारसरणीच अशी काही बदलली गेली आहे, की अश्या एकशे सत्तावीस गोष्टी, मूलतः भारतीय नाहीत, हे आमच्या अस्सल भारतीय मनालादेखील पटत नाही.
    त्यातीलच एक म्हणजे जमिनीवर बसणे.

    जमिनीशी, या मातीशी थोडा तरी संपर्क हवाच ना ? !

    वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर "अर्थिंग" हवेच ! अनेक विचारांची, माणसे आपल्याला दररोज भेटत असतात. आपल्याला नको असलेले विचार ते आपल्याला बोलून दाखवतात. काही विचार आपल्याला, आपल्या अंतर्मनातून काढून टाकायचे असतात, पण ठरवले तरी काढता येत नाहीत, अशावेळी हे "अर्थिंग" उपयोगी होते, असा माझा अनुभव आहे.

    आकाशात कितीही भरारी घेतली तरी आपले पाय मात्र जमिनीवरच हवेत, असे म्हटले जाते, ते काही अगदीच शब्दशः घ्यायचे नसते, असे नसते. पाय शक्यतो जमिनीवरच हवेत, म्हणजे "शाॅक" लागण्याची भीती नसते.
    असो.

    जमिनीशी असलेली ही भारतीय नाळ, जेवताना जर जुळली तर फार बरे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    20.09.2016

  • किचन क्लिनीक – मिरची

    किचन क्लिनीक – मिरची

    मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
    गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.

    लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
    औषध म्हणून कशी वापरू शकते.

    चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.

    अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील??.

    आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!

    १)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.

    २)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

    ३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.

    ४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.

    ५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.

    ६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.

    मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सोनोग्राफी (कलर डॉप्लर)

    आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.