(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • आहाररहस्य ३

    आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे.
    समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव.
    हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो.

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १३

    घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.

    या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
    जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.

    हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.

    रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.

    तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !

    कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
    हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !

    दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
    आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
    हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.

    हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
    दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.

    कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !

    तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
    हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
    इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
    त्याचंच नाव आयुर्वेद !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.01.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग आठ

    शरीर सांगते ते सगळंच अगदी बरोबर असतं असं नाही. याचा अर्थ असाही नाही, की शरीर जे करतंय, ते सर्व माफ आहे !

  • किचन क्लिनिक – आले आणि सुंठ

    किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर !

    आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरंका. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघाना आले अधिक प्रमाणात खाल्ले तर एॅसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली एॅसीडीटी कमी करते.

    आले:

    १)भुक लागत नाही का मग दररोज जेवणापुर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैन्धव मीठासोबत खा आणी मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.

    २)सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ च ओल्या हळदीचा रस+१ च मध हे मिश्रण घ्यावे.

    ३)आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी,खोकला,भुक न लागणे,तोंडास रूचि नसणे ह्यावर रामबाण उपाय.

    ४)वाढलेले काॅलेस्टरोल सतावतेय का मग सकाळी उपाशी पोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमीत खा आणी ह्रूदयाचे आरोग्य चांगले ठेवा.

    सुंठ:

    १)सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.

    २)शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज,मुरगळणे,मार लागणे,ह्यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.

    ३)गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणी सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.

    ४)पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे ह्यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ६९ – चवदार आहार भाग ३१

    आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
    एक.

    दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर....
    दोन अडीज मोसंबी.
    यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
    आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !

    पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
    एक ग्लास अगदी सहज.

    आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर...
    दोन ग्लास पण नक्कीच पिऊ....

    मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ....

    मला तर तो "रस" नकोच होता
    मला तर तो "रस" नकोच होता,
    पण
    तू दिलेला रस
    रस घेऊन
    घेतला नाही तर....
    .
    ..
    ...

    तुझा विरस होणार होता
    आणि नंतर तुझा,
    माझ्यातला "रस" कमी होणार होता....
    म्हणून प्यावा लागला.

    मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
    तब्बल सात ते आठ.
    माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?

    पचेल का तो ?

    नाही ना.
    मग ??

    आधीच आहे अप्सरा
    बटेने झाकला चेहरा
    केसात माळला गजरा
    चेहराही मंद हसरा
    त्यात जरासा नखरा
    हाऽय हाऽय्ऽ
    काय हा नजारा

    फेसाळलेला रस काढलेला
    ग्लास समोर भरलेला
    त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
    पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
    गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
    एवढासा ग्लास तो किती नटवला
    बाकी चवींनी एवढा का सजवला ?
    पचायला जड होणारा पचवायला.

    स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
    असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !

    फळे हवीत चावून खायला
    एवढंस मर्म सांगायला
    एवढं हवं होतं का घोळवायला.

    असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?

    तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
    चव निर्माण करणाऱ्यावर,
    चव घेण्यासाठी "मी" आहे,
    असे सांगणाऱ्या "मी" वर !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.12.2016

  • किचन क्लिनीक – ताक प्यायचे नियम

    आता आपण ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये ते पाहूयात:

    १)फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताक पिऊ नये.

    २)अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये.

    ३)बेशुद्ध पडणे,चक्कर येणे,अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये.

    ४)कोड,त्वचा रोग,अंगावर पुरळ येणे,गळवे होणे,मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे नाही.

    ५)पित्ताचा त्रास जसे तोंड येणे,पोटात आग होणे,अंगावर पित्त उठणे,कावीळ,तोंड आंबट कडू होणे,पुष्कळ तहान लागणे,खुप घाम येणे अशा तक्रारी मध्ये ताक पिणे अयोग्य आहे.

    ६)उन्हाळा व शरद ऋतुमध्ये ताक पिंऊ नये.

    ७)घोळ हा ताक प्रकार प्यायचा असल्यास दह्याचे सर्व नियम पाळावे.

    ८)सर्दी,खोकला होण्याची सवय असणाऱ्यांनी जेवणानंतर,सकाळी दहा पुर्वी व संध्याकाळी ७ नंतर ताक पिऊ नये.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आळस मोठ्ठा देऊ नये

    "आलस्यंही मनुष्याणां महारिपु" सर्वात मोठा शत्रू आळस आहे. कारण तो दिसत नाही. जो आपल्या आतमधेच आहे तो बाहेरून कसा दिसणार ? हाच मधुमेहाचा सर्वात फास्ट फ्रेंड आहे.

    आपण कुठे कुठे आणि कधी आळशी होतो, ते एकदा तपासून पहावे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या यंत्रांनी आपल्याला एवढे आळशी बनवले आहे, हे कधी लक्षातही आले नाही. स्कूटरच्या जमान्यात गाडीला कीक मारून ती स्टार्ट करणे हा मोठाच व्यायाम होता. त्यात ती बजाजची स्कूटर सुरू असली तर वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. कारण बजाज स्कूटर सकाळी सुरू करणे हे सगळा आळस घालवायचे मस्त साधन होते. तिला अगदी जमिनीवर आडवी पडून पुनः उभी केल्याशिवाय सुरुच होत नव्हती. तसंही करून सुरू झाली नाही तर चढावावर उलटी ढकलत न्यायची, आणि उतारावरून सेकंड गियर मधे गडगडत सोडून द्यायची. आणि गाडी सुरू झाल्याचा सगळ्यात जास्ती आनंद, ती ढकलण्यात घामाघूम होईपर्यंत, मदत करणाऱ्याला व्हायचा. (म्हणजे ढकलण्याऱ्याच्या कॅलरीज जाळायला देखील बजाज किती मदत करीत होते ना ! केवढा व्यायाम व्हायचा ? आता हा व्यायाम देखील संपला.
    एक बटन दाबले की चक्क गाडी सुरू होते.
    एक बटन दाबले की घरात विहीरीचे पाणी येते.
    एक बटन दाबले की धान्याचे चक्क पीठ होते.
    एक बटन दाबले की देवाकडे दिवा पण लागतो आणि
    एक बटन दाबले तर चटणी वाटून तयार.
    एक बटन दाबले की ताकावर लोणी पसरते.
    एक बटन दाबले की कणिक तिंबून मिळते.
    एक बटन दाबले की मेसेज सेंड.
    एक बटन दाबले की पैसे ट्रान्स्फर

    आणि एवढे श्रम वाचवून उरलेला वेळ जिममधे खर्च करायचा, त्यासाठी परत पैसे मोजायचे.

    पूर्वी दहा रूपये वाचवण्यासाठी दहा मिनीटे चालायचे श्रम घेतले जायचे. एक स्टाॅप अगोदर उतरायचे. आता दहा मिनिटे वाचविण्यासाठी दहाच काय शंभर रूपये सुद्धा खर्च करायची तयारी !

    किती बदललो ना आपण ?
    कधी बदलत गेलो कळलं देखील नाही.

    आळस द्यायचाच नाही का ? द्यावा.
    चारचौघात आळस दिला की आई ओरडणारच.
    तोंडाचा आऽ करू नको असंही आई म्हणायची. तोंडात माशी जाईल असंही सांगायची.
    आळस द्यायचाच झाला तर तोंडावर हात ठेवून आळस द्यावा. जांभई द्यावी. आपल्या तोंडातील सर्व जीवजंतु आपल्याच तोंडातील दुर्गंधीसह बाहेर पसरतात. जशी जांभई तशीच ढेकर, तशीच शिंक. शिंकेचा वेग तर जबरदस्त असतो. तो हाॅर्स पाॅवरमधे देखील मोजला जातो. एवढ्या जोरात खोकलो, शिंकलो तर केवढा जंतुसंसर्ग आपण करत असतो ना !

    तसं जांभई देणं ही शरीराकडून निर्माण होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आयुर्वेदानुसार एक वेग आहे. आणि वेगाचा अवरोध कधी करू नये हा नियम. वेग निर्माण झाला की पूर्तता करायचीच. म्हणजे जांभई आली तर ती द्यायचीच. पण तोंडावर हात, रुमाल ठेवून द्यावी. अगदी पाश्चात्य पद्धतीने साॅरी असे देखील म्हणावे.
    पण मोठ्ठा आऽऽ करून सर्वांसमक्ष आपले किडक्या बत्तीशी दातांचे समग्र दर्शन बाहेरच्या विश्वाला कशाला द्यायचे ना ?
    एक तो कान्हा होता, ज्याने मुखकमल उघडल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झाले होते. ......

    आपण "तो" कान्हा नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 5

    सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
    हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.

    वो हुआ कुछ इस प्रकार...
    एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.

    असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !

    कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !

    कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
    त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.

    हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
    सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !

    त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.

    या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
    सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.02.2017

  • किचन क्लिनीक – नारळ भाग ३

    आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:

    १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.

    २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.

    ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.

    ४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.

    ५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.

    ६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.

    ७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.

    ८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

    रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !