आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
एक.
दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर....
दोन अडीज मोसंबी.
यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !
पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
एक ग्लास अगदी सहज.
आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर...
दोन ग्लास पण नक्कीच पिऊ....
मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ....
मला तर तो "रस" नकोच होता
मला तर तो "रस" नकोच होता,
पण
तू दिलेला रस
रस घेऊन
घेतला नाही तर....
.
..
...
तुझा विरस होणार होता
आणि नंतर तुझा,
माझ्यातला "रस" कमी होणार होता....
म्हणून प्यावा लागला.
मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
तब्बल सात ते आठ.
माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?
पचेल का तो ?
नाही ना.
मग ??
आधीच आहे अप्सरा
बटेने झाकला चेहरा
केसात माळला गजरा
चेहराही मंद हसरा
त्यात जरासा नखरा
हाऽय हाऽय्ऽ
काय हा नजारा
फेसाळलेला रस काढलेला
ग्लास समोर भरलेला
त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
एवढासा ग्लास तो किती नटवला
बाकी चवींनी एवढा का सजवला ?
पचायला जड होणारा पचवायला.
स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !
फळे हवीत चावून खायला
एवढंस मर्म सांगायला
एवढं हवं होतं का घोळवायला.
असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?
तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
चव निर्माण करणाऱ्यावर,
चव घेण्यासाठी "मी" आहे,
असे सांगणाऱ्या "मी" वर !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.12.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग एक !
बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.
आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.
काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
(दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)
जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.
भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
आयुर्वेद सांगतो,
पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
झालं....
टीकाकार आता विचारतील,
"म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?
तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.
निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.
जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.
निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.
फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे.
आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.05.2017
वांगी खावीत तर कृष्णाकाठचीच. आणि अस्सल नारळाच्या रसातील सोलकढी प्यावी तर कोकणातीलच. हीच वैशिष्ट्ये. हे वेगळेपण. हीच परंपरा. हाच प्रदेशविचार.
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.
पानाची जवळपास अर्धी बाजू या तिखट पदार्थांनी व्यापलेली असते.
सुरवात गोड पदार्थांने करावी, नंतर आंबट तिखट.
चवी चवीनं जेवावं. पूर्ण आस्वाद घेत जेवावं. एका पदार्थाचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जावून, दोन्ही पदार्थांचा स्वाद बिघडू नये, यासाठी पानात द्रोण किंवा वाट्या असतात. केळीच्या पानापासून हे द्रोण बनवले जायचे. त्याचा तळ हा डुगडुगणारा असे, किंवा आमटी, भाजी वाढेपर्यंत हाताने धरून ठेवावा लागे, नाहीतर वाऱ्याने उडून जाई. नंतर आत सोलकढी ओतली की द्रोण खालून फुटुन सोलकढी वाहूनही जाई. किंवा दोन्ही हातांनी त्या द्रोणाच्या दोन्ही कानाना धरून हळुवार उचलून ओठाला लावून पिऊन टाकल्यावर, दिग्विजय केल्यासारखे बाजुच्या माणसाकडे बघीतले जायचे, आठवतंय ते सारं ! चवीनं जेवणं ही सुद्धा एक कला होती.
उजव्या बाजूची उसळ खाताना उसळीचे तिखट हाताला लागे, तोच हात डाव्या बाजूच्या कोशिंबीरीत गेला तर कोशिंबीरीची अस्सल चव बिघडू नये, यासाठी मधे बोटे धुवावीत. तिखट भाजी खाल्ली आणि चटणी चाटायची असेल तर बोटं धुण्यासाठी एक पाण्याचा वाडगा मधे ठेवलेला असे. आणि या पाण्यातही केशराच्या कांड्या घातलेल्या असत म्हणे ! "
जेवण झाल्यानंतर देखील हात धुवायला चंदनाचे पाणी वापरले जाई. जेवताना जे तिखट हाताबोटांना लागले आहे, त्याचा उष्ण गुण बोटांना त्रास देऊ नये, किंवा जेवलेल्या मसाल्याचा वास बोटांना राहू नये म्हणूनही असेल कदाचित! पण देवाच्या षोडशोपचार पूजेमध्ये देखील नैवेद्य झाल्यानंतर, हस्त प्रक्षालन, मुख प्रक्षालन झाल्यावर करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामी असे म्हणून देवाच्या हाताबोटाना चंदन लावण्याचा उपचार आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, या न्यायानुसार आमच्या पूर्वजांनी या परंपरा पाळण्याचा प्रघात काही काळपर्यत सुरू ठेवलेला होता.
हे अतिच होतय हो !" असं वाटणं चुक नाही. कारण ही गोष्ट आहे, आमच्या पणजोबांच्या काळातील ! पण सांगितलीच नाही तर आमच्या पुढच्या पिढीला कसं कळणार, कधी कळणार, चवीनं कसं जेवायचं ते !
समृद्ध संस्कारांचा वारसा "व्वाह व्वा" चे रूपांतर "वाॅव" मधे करणाऱ्या पिढीला समजला तर पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
16.11.2016
थोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते.
धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti