पानाची जवळपास अर्धी बाजू या तिखट पदार्थांनी व्यापलेली असते.
सुरवात गोड पदार्थांने करावी, नंतर आंबट तिखट.
चवी चवीनं जेवावं. पूर्ण आस्वाद घेत जेवावं. एका पदार्थाचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जावून, दोन्ही पदार्थांचा स्वाद बिघडू नये, यासाठी पानात द्रोण किंवा वाट्या असतात. केळीच्या पानापासून हे द्रोण बनवले जायचे. त्याचा तळ हा डुगडुगणारा असे, किंवा आमटी, भाजी वाढेपर्यंत हाताने धरून ठेवावा लागे, नाहीतर वाऱ्याने उडून जाई. नंतर आत सोलकढी ओतली की द्रोण खालून फुटुन सोलकढी वाहूनही जाई. किंवा दोन्ही हातांनी त्या द्रोणाच्या दोन्ही कानाना धरून हळुवार उचलून ओठाला लावून पिऊन टाकल्यावर, दिग्विजय केल्यासारखे बाजुच्या माणसाकडे बघीतले जायचे, आठवतंय ते सारं ! चवीनं जेवणं ही सुद्धा एक कला होती.
उजव्या बाजूची उसळ खाताना उसळीचे तिखट हाताला लागे, तोच हात डाव्या बाजूच्या कोशिंबीरीत गेला तर कोशिंबीरीची अस्सल चव बिघडू नये, यासाठी मधे बोटे धुवावीत. तिखट भाजी खाल्ली आणि चटणी चाटायची असेल तर बोटं धुण्यासाठी एक पाण्याचा वाडगा मधे ठेवलेला असे. आणि या पाण्यातही केशराच्या कांड्या घातलेल्या असत म्हणे ! "
जेवण झाल्यानंतर देखील हात धुवायला चंदनाचे पाणी वापरले जाई. जेवताना जे तिखट हाताबोटांना लागले आहे, त्याचा उष्ण गुण बोटांना त्रास देऊ नये, किंवा जेवलेल्या मसाल्याचा वास बोटांना राहू नये म्हणूनही असेल कदाचित! पण देवाच्या षोडशोपचार पूजेमध्ये देखील नैवेद्य झाल्यानंतर, हस्त प्रक्षालन, मुख प्रक्षालन झाल्यावर करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामी असे म्हणून देवाच्या हाताबोटाना चंदन लावण्याचा उपचार आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, या न्यायानुसार आमच्या पूर्वजांनी या परंपरा पाळण्याचा प्रघात काही काळपर्यत सुरू ठेवलेला होता.
हे अतिच होतय हो !" असं वाटणं चुक नाही. कारण ही गोष्ट आहे, आमच्या पणजोबांच्या काळातील ! पण सांगितलीच नाही तर आमच्या पुढच्या पिढीला कसं कळणार, कधी कळणार, चवीनं कसं जेवायचं ते !
समृद्ध संस्कारांचा वारसा "व्वाह व्वा" चे रूपांतर "वाॅव" मधे करणाऱ्या पिढीला समजला तर पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
16.11.2016
November 16, 2016
मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.
सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.
यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.
यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.
पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !
या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.
यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.
आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.
त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.
आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !
सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.
ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.
ईश्वर /निसर्ग महान आहे.
.......क्रमशः ऊद्या
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
25.09.2016
September 25, 2016
होन्सफील्ड या शास्त्रज्ञाने संगणकाचा व क्ष किरण शास्त्राचा उपयोग करुन हाडे व फुफ्फुसे या व्यतिरीक्त क्ष-किरणांनी प्रतिमा निर्माण करुन व नुसत्प्रतिमाच नव्हे तर अतिसूक्ष्म फरक कळू शकणारे स्वच्छ व अचूक प्रतिमाशास्त्र मानव जातीला देऊन या क्षेत्रात क्रांतीच केली.
November 15, 2010
अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.
ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.
हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.
२)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.
३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.
४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.
५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.
अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही.
April 15, 2017
नागरमोथा वनस्पती ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी बाळगुटीमध्ये वापरली जाते; आणी तिच्या थंडगुणधर्मासाठी आणि पचनास मदत, कृमीनाशक, लघवी साफ करण्यास मदत, आणी वजननियंत्रणात उपयोगी असणाऱ्या फायद्यांसाठी ओळखली जाते. ही पित्त आणि कफ कमी करते, तसेच अतिसार व कृमींवर प्रभावी आहे.
January 23, 2026
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
June 16, 2002
जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे.
December 5, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौदा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आप्तोपसेवीच....
या शब्दाचा अर्थ आप्तांची सेवा असा होतो. आता आप्त कोण ? आणि सेवा म्हणजे काय ? आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध शोधायचा.
ग्रंथकार म्हणतात, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे आप्त. आप्त म्हणजे आपलं हित जाणणारे. जे वयाने, तपाने, ज्ञानाने मोठे आहेत ते !
ही व्यक्तीच पाहिजे असे नाही, एखादा ग्रंथदेखील आपला आप्त होऊ शकतो.
अनुभवाने शहाणपण येते ते इथे. ज्यांनी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, अशा काहीना जीवनाचा अनुभव नक्कीच जास्त मिळालेला असतो. त्याचा फायदा करून घ्यावा.
अर्थात वयाचे बंधन ज्ञानाला येत नाही, म्हणूनच आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती संभाजी महाराज, आम्हाला वंदनीय आहेत. त्याच आदराने आम्ही मार्क झुकेरबर्ग किंवा जॅन कौम यांच्याकडेदेखील पाहायला शिकले पाहिजे. व्यक्तीच्या वयापेक्षा त्याने केलेल्या तपाला हे वंदन आहे.
अगदी आजोबांना वाॅटसॅप शिकवणारा त्यांचा नातू हा आजोबांसाठी आप्त होईल. सासुला पिझ्झा करायला शिकवणारी सून ही, सासुबाईसाठी आप्तच असेल,
आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्क मॅनेजरला, एमबीए झालेला एखाद्या कंपनीचा तरूण वयाचा डायरेक्टर हा आप्त होईल.
पण कधी तरी अनुभवाचा, आणि वयाचाही विचार करायचा असतो. कधीतरी तपाचा तर कधी ज्ञानाचा. हे तारतम्य प्रत्येकाजवळ असेलच, असे नाही. पण ते अंगी आणावे लागेल. हेच ग्रंथकाराना सांगायचे आहे.
पाट्या वरवंट्यावर वाटणे आणि मिक्सरमधून वाटणे या साध्या क्रिया वाटतात, पण आप्तांनी सांगितलेले ऐकले तर चवीत पडणारा फरक समजतोच ना. वरवर पाहाता दोन्ही पद्धतीने तयार झालेली चटणी किंवा वाटप, यातील सूक्ष्म फरक अनुभवानेच समजतो.
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी या आप्तांचा सल्ला शिरसावंद्य मानावा. भक्तीने विश्वास ठेवावा, ज्ञानाने त्यातील विज्ञान शोधून काढावे तर तपाला तपासून कर्म करावे. हेच खरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०३.०८.२०१७
August 3, 2017
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti