बदललं, सारंच बदललं.
ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.
आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.
कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही.औषधे पोटात घयायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.
चलातर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!
१)मुळव्याधी मध्ये ब-याच जणांना संडासला घट्ट होते त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.
२)जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.
३)कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात प्रत्येक चकतीवर खंडीसाखर घालून एकावरएक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी ,खोकला ह्यात कफसुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.
४)खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाज देखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.
५)मार लागणे,मुरगळणे,सुज ह्यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करून कोमट करून दुखणा-या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस
बाबा सांगतात...
आपले नुकसान करणाऱ्या शत्रुवरही प्रायः उपकारच करावा.
यातील "प्रायः" हा शब्द महत्त्वाचा ! या शब्दाला विशेष महत्त्व आहे. हा शब्द नसता तर अनर्थ झाला असता. आजच्या भाषेत गांधीगिरी करावी.
महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील झालेल्या युद्धांचा विचार करता, पहिल्या अनेक युद्धात महंमद हरला. त्याने माफी मागितली आणि पृथ्वीराजने ती माफी दिली. त्याला जिवंत सोडले. शेवटच्या युद्धात मात्र घौरी विजयी झाला आणि त्याने कोणत्याही प्रकारे दयामाया न दाखवता पृथ्वीराज चौहानला ठार केले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, हे सूत्र खरंतर घौरीने आम्हाला शिकवले.
आणि नंतर शिवरायांनी प्रत्यक्षात अंमलात आणले. प्रचंड ताकदीच्या, धूर्त, कपटी अफजलला कपटानेच ठार मारले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, भरवसा ठेवू नये, कधी गाफील राहू नये, आपले आणि आपल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी 'डिप्लोमसी' करावी लागली तरी चालेल. पण शत्रूवर कधीही उपकार करू नयेत. मिडीयाला सांगताना मात्र हेच सांगावे, की कट्यारीचा पहिला वार त्याने केला म्हणून स्वसंरक्षणार्थ मला वाघनखे वापरावी लागली. नाहीतर आम्ही अहिंसेचेच पुजारी आहोत. आम्हाला हिंसा करणे कधीही आवडत नाही. किंबहुना ती आमच्या रक्तातच नाही. म्हणूनच तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही युद्धाची सुरवात भारताने केलेली नाही. पण कधीतरी सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही देखील शिवरायांचे वंशज आहोत, हे दाखवलेच पाहिजे. शिवरायांना युद्धनीतीचे आदर्श मानणाऱ्या लढाऊ इस्राईल सारख्या छोट्याश्या देशाकडून, शत्रूशी कसे वागावे, हे आपल्या देशातील राजकीय मंडळीनी शिकण्यासारखे आहे. अशा शिवरायांकडून ""प्रायः" शब्दाचा अर्थ आम्हाला समजला.
संपत्ती आणि विपत्तीमधे एकच चित्तवृत्ती ठेवावी.
संपत्तीचा अभिमान जरूर असावा, पण माज असू नये. विपत्ति आली तरी बुद्धी स्थिर रहावी. तिचा तोल ढळू देऊ नये. म्हणजे कितीही श्रीमंत असली तरी अंतिम क्षणी आपल्यासाठी मांजरपाटाचाच तुकडा येणार आहे हे विसरू नये.
एखाद्याच्या चांगल्या गुणाविषयी इर्षा करावी.
थोडेसे विपरीत वाटणाऱ्या या वाक्यातील मुळ अर्थ लक्षात घेऊया. इर्षा हा वाईट गुण सुद्धा चांगला बनवण्यासाठी दृष्टीकोन बदलला पाहिजे. इथे इर्षा हा शब्द "स्पर्धा" या अर्थाने वापरलेला आहे. स्पर्धा चांगल्या गुणांची करावी. आपल्यात एखादा चांगला गुण कमी असेल, तर दुसऱ्याकडून तो आत्मसात करावा. शिकून घ्यावा.
शिकण्याची तयारी असेल तर शत्रूकडूनही शिकता येते. फक्त शिकण्याची आपली तयारी हवी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा म्हणजे तेलावर प्रक्रिया करून केलेला पदार्थ तो आपल्या हृदयाच्याच नव्हे तर संपुर्ण शरीराच्याच आरोग्यास किती हानीकारक आहे ह्याची कल्पनाचा केलेली बरी.
आणी हो कोणत्याही वस्तूचा अतिरेकी वापर हा आपल्या शरीराला बाधणारच मग त्याला फक्त तूपच कसे अपवाद असू शकते.
तुप हा प्राणीज द्रव्यातील सर्वोत्तम स्नेह आहे.कारण दुधापासून तूप बनविताना त्यावर अनेक संस्कार झालेले असतात.जसे दुधतापवून त्यापासून काढलेल्या सायीला विरजण लावून त्यापासून दही बनविले जाते,ह्या दह्याचे ताक करतात व ताक घुसळून त्यापासून लोणी काढतात,व लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते.अर्थात सुरूवातीला व शेवटअग्निसंस्कार,किण्व प्रक्रिया,व मंथनसंस्कार असे अनेक संस्कार ह्या तुपावर झालेले असतात.
हे साजुक तुप सामान्य तापमानात देखील मऊ रवाळच रहाते व गरम हवामानात ते पुर्ण वितळते.पण जर तुम्ही डाल्डा पाहिलात तर तो कोणत्याही तापमानात गोठलेला व घट्टच असतो.मग असा हा कायमच गोठलेल्या स्वरूपात असणारा डाल्डा तुमच्या शरीरात गेल्यावर हृदयाच्याही धमन्यांमध्ये जाऊन न गोठल्यास त्यात नवल ते काय?
तुप हे आपल्या आरोग्यास खरोखरच उपकारक आहे.ह्याचा आहारात नियमीत वापर केल्याने शरीर सुदृढ रहाते,बुध्दी तल्लख होते,रोग प्रतिकार शक्ती वाढते,व वार्धक्याकडे होणारी शरीराची वाटचाल मंदावते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.
लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
औषध म्हणून कशी वापरू शकते.
चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.
अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील
??.
आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!
१)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.
२)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.
४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.
५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.
६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.
मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
उपावासा साठी प्रसिध्द असा हा पदार्थ.काही जण हा कंद नुसता उकडून देखील आवडीने खातात किंवा मग ह्याच्या पिठाचा वापर वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
हा काळा जाडसर साल असणारा कंद अातून मात्र पांढरा शुभ्र असतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो तसाच ह्याचा घरगुती उपचारात देखील वापर केला जातो.
शिंगाडा चवीला गोड तुरट असतो व थंड असतो त्यामुळे तो शरीरातील वात व कफ दोष वाढवितो तर पित्त दोष कमी करतो.
चला मग ह्याचे घरगुती उपचार पहायचे ना:
१)अम्लपित्तामध्ये १ टेबल संपून शिंगाडा पीठ + १ कप दूध+ १ कप पाणी घालून खीर करावी व त्यात खडीसाखर घालून रोज ४ तासांनी एकदा हि खीर थंड करून खावी.
२)पित्तामुळे अतिभूक लागून काही व्यक्ती खुप खातात त्यांना शिंगाड्याच्या पिठाचा तुपावर परतून केलेला शिरा खायला द्यावा.
३)शरीरात रक्त कमी असल्यास १ मोठा चमचा शिंगाडा पीठ व १ काळा खजूर तुपावर परतून गोळा बनवावा व असा गोळा रोज सकाळी उपाशी पोटी खावा व मग त्यावर तासभर काही ही खाऊ नये.
४)डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे ह्या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपावर परतून रात्री चघळून खावे हा प्रयोग २ महीने करावा.
५)आतड्यातून अन्न लवकर पुढे सरकल्यास संडासला साफ न होणे,वारंवार दुर्गंध युक्त संडास होणे,पातळ भसर संडासला होणे ह्या तक्रारी सुरू होतात.त्यावेळी शिंगाडा पीठाची भाकरी मसूरच्या कढणासह खावी ह्याने आतड्याची गती नियंत्रणात रहायला मदत होते.
शिंगाडा पीठ अतिमात्रेत खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

ह्याचे ०.३३-२ मीटर उंचीचे क्षुप असते.पाने ३-६ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंदीचे मुलीय पत्र असते.पत्रवृन्त पाना इतकेच लांब असते.काण्डीयपत्र आयताकार असून काण्डास वाढणारे असते.फुल पिवळे ०.५-१ सेंमी व्यासाचे गुच्छ असते.फळ ०.४ सेंमी लांब व चमकदार व स्निग्ध असते.फळाला चिकटलेले बहिर्दल ०.७५सेंमी लांब व तांबुस रंगाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून पुष्करमुल चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के,स्निग्ध व तीक्ष्ण आहे.पुष्करमुळ वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याची औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)पुष्करमुला मध्ये असणारे तीक्ष्ण व विशिष्ट सुगंधी तेल जंतुघ्न कार्य करत असल्याने त्याचा वापर जखमांमध्ये करतात.
२)पुष्करमल शोथनाशक व वेदनास्थापक आहे म्हणून सुज येणाऱ्या व वेदनायुक्त अवयवांवर ह्याचा लेप करतात.
३)पुष्करमुलाचे मुख्य कार्य प्राणवहस्त्रोतसावर होते ते कफाचे विल्यन करते तसेच जंतुघ्न व कफदुर्गंधीनाशक कार्य करते.म्हणून खोकला,दमा व उचकीमध्ये उपयुक्त आहे.
४)पुष्कर मुळ तापामध्ये स्वेदजनन व आमाचे पाचन करून ताप बरा करते.
५)पुष्करमुल शरीरातील क्लेदाचे घामावाटे उत्सर्जन करते व त्यामुळे त्वचारोगामध्ये स्त्राव व खाज कमी करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti