युवा-विश्व

तीन हजार टाके

Category:

 

काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

कथा

कुंपणापलीकडचे आकाश

Category:

 

तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.

युवा-विश्व

मोक्षा रॉय

Category:

 

मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

कथा

एक दिवस

Category:

 

लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.

युवा-विश्व

मन कल्लोळ

Category:

 

एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.

कथा

एक होती वेडी चिऊ…

Category:

 

एक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती.

ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०४
इतर मराठी व्हिडिओज

ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०४

Category:

 

दिनांक ३ मे, भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदिवस. याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पूर्णतः भारतीय चित्रपट लोकांसाठी प्रदर्शित केला.

सुमारे ५० चित्रपट आणि जवळपास तेव्हढेच लघुपट निर्माण करून, भारतीय चित्रपट व्यवसायाला स्थापित करणाऱ्या दादासाहेब फाळके यांचं युग बोलपटाच्या आगमनाने संपलं.

ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०२
इतर मराठी व्हिडिओज

ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०२

Category:

 

वयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला?