आत्ताचा क्षण मनापासून जगूया…

उद्याच्या चिंतेत आजचा आनंद कशाला हरवायचा,
आजचा प्रत्येक क्षण मनभर आनंदाने जगायचा.

कालच्या आठवणींना प्रेमाने निरोप द्यायचा,
उद्याच्या काळजीचा भार वेळेवरच सोपवायचा.

जे आपल्या हातात नाही, ते नियतीच्या स्वाधीन करायचं,
मनावरचं प्रत्येक ओझं हसत हसत हलकं करायचं.

संकटं येतातच आयुष्यात ऋतू बदलल्यासारखी,
पण आशेची ज्योत मात्र कधीच मावळू द्यायची नाही.

सुखात साथ देणारे अनेक भेटतात वाटेवर,
दुःखात हात धरणाऱ्यांनाच मनात कायमचं स्थान द्यायचं.

क्षणभंगुर आहे हा सुंदर प्रवास आयुष्याचा,
म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने, समाधानाने आणि हसतमुखाने जगायचा.

कारण...

आनंद वाटला की तो अनेकपटींनी वाढतो,
दुःख वाटलं की मन हलकं होतं.
माणुसकीनी नाती जपली की,
आयुष्य खऱ्या अर्थाने फुलून येतं.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



उद्याच्या चिंतेत आजचा आनंद कशाला हरवायचा,
आजचा प्रत्येक क्षण मनभर आनंदाने जगायचा.

कालच्या आठवणींना प्रेमाने निरोप द्यायचा,
उद्याच्या काळजीचा भार वेळेवरच सोपवायचा.

जे आपल्या हातात नाही, ते नियतीच्या स्वाधीन करायचं,
मनावरचं प्रत्येक ओझं हसत हसत हलकं करायचं.

संकटं येतातच आयुष्यात ऋतू बदलल्यासारखी,
पण आशेची ज्योत मात्र कधीच मावळू द्यायची नाही.

सुखात साथ देणारे अनेक भेटतात वाटेवर,
दुःखात हात धरणाऱ्यांनाच मनात कायमचं स्थान द्यायचं.

क्षणभंगुर आहे हा सुंदर प्रवास आयुष्याचा,
म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने, समाधानाने आणि हसतमुखाने जगायचा.

कारण…

आनंद वाटला की तो अनेकपटींनी वाढतो,
दुःख वाटलं की मन हलकं होतं.
माणुसकीनी नाती जपली की,
आयुष्य खऱ्या अर्थाने फुलून येतं.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author