व्यक्ती-परिचय

चित्रकार दीनानाथ दलाल

Category:

 

दलाल १९३८च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली.

व्यक्ती-परिचय

जगातील पहिले अँटीव्हायरस बनवणारे जॉन मॅकॅफी

Category:

 

संजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.

व्यक्ती-परिचय

जनसंघाचे प्रथम महामंत्री दीनदयाळ उपाध्याय

Category:

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

व्यक्ती-परिचय

चित्रकार रायबा

Category:

 

रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.

व्यक्ती-परिचय

चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे

Category:

 

चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली.

व्यक्ती-परिचय

चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर

Category:

 

चित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली.

व्यक्ती-परिचय

जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर

Category:

 

मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात.

व्यक्ती-परिचय

चरित्र अभिनेते नाना पळशीकर

Category:

 

नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.