लेखसंग्रह

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-१

Category:

 

टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. 

साहित्य - ललित

अॅडव्होकेटांची बासुंदी

Category:

 

वकिली सोडून देऊन अ‍ॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्‍यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर? नक्कीच पुण्यात फेमस होईल! चितळेंच्या बाकरवडी सारखी! किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी! आणि अशा तर्‍हेनं ‘अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदी’चा उदय झाला होता.

लेखसंग्रह

सोन्याचं नातं…. PNG अर्थात “पु. ना. गाडगीळ”

Category:

 

महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे.

लेखसंग्रह

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

Category:

 

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड अशी त्‍यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्‍यापूर्वी देखील त्‍यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्‍त्रक्रिया केली. अशक्‍य वाटणारी गोष्‍ट त्‍यांनी शक्‍यतेच्‍या आवाक्‍यात आणली. या शस्‍त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्‍याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले.

लेखसंग्रह

शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं महत्त्वपूर्ण

Category:

 

शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत विविध लेखाद्वारे आपण ते पहिले. माणसाच्या जीवनात त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाने आपली छाप इतरांवर पडते.

लेखसंग्रह

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग १

Category:

 

अठराव्‍या शतकात मराठी सत्तेने प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या भारताचा बराच भूभाग आपल्‍या अधिपत्‍याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्‍येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्‍लीला धडक दिली वा दिल्‍ली काबीजही केली पण ते दिल्‍लीपती झाले नाहीत. याचे कारण म्‍हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्‍याचा मराठी भाषा, संस्‍कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्‍या स्‍वाभिमानामुळे आणि आपल्‍या आत्‍मसंतुष्‍ट किंवा अल्‍पसंतुष्‍ट वृत्तीमुळेच मराठे दिल्‍लीच्‍या उंबरठ्यावरच राहिले, दिल्‍लीपती झाले नाहीत.

साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग ९

Category:

 

राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला.