कथा

गुरुदक्षिणा

Category:

 

प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.

कथा

पर्वताची केली छत्री

Category:

 

त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.

कथा

सुदामदेवाची गोष्ट

Category:

 

कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि सुदामदेव आपल्या घरी गेला.

कथा

आदिमानवाची चंद्रावर स्वारी

Category:

 

(ब्रह्मदेशातली लोककथा )

आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.

कथा

चंद्रावर हल्ला

Category:

 

कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.

कथा

वशिष्ठ विश्वामित्रांची गोष्ट

Category:

 

राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.

कथा

पृथ्वीवर अवतरली चंद्रिका

Category:

 

(जपानी लोककथा)

तशी ही जुनीच गोष्ट आहे. जपानमधल्या बांबुबनातली आहे. एक गरीब म्हातारा नित्यनेमाने बांबूबनात यायचा. तिथून बांबूची रोपे जमा करायचा. रोपे विकून आपली उपजीविका करायचा. एके दिवशी धारदार कोयता घेऊन म्हातारा बांबूबनात गेला होता. त्याने कोयत्याने एक बांबूची फांदी कापली. त्याबरोबर बांबूच्या पोकळीतून चंद्रकिरणासारखी प्रकाशाची रेषा बाहेर आली.

कथा

वरुणपुत्र भृगची गोष्ट

Category:

 

वृक्षतोड हेच महान पाप आहे असे सांगणारी एक कथा ‘शतपथ ब्राह्मणात’ आली आहे. भृगुऋषी हा वरुणाचा मुलगा होता. त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की, वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असे त्याला वाटू लागले.

कथा

साळींदरची प्रकाशभेट

Category:

 

(सायबेरियन लोककथा )

कोण्या एके काळी सायबेरियन लोकांना साळींदर हा प्राणी फार आवडायचा. कुठल्याही प्रश्नाचे चटकन् उत्तर शोधणारा हुशार व चाणाक्ष प्राणी म्हणून साळींदरची ओळख होती. साळींदर दयाळू स्वभावाचा होता. कुणाच्याही मदतीला चटकन् पुढे यायचा. सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायचा. त्यामुळे सर्वांना तो हवा हवासा वाटायचा. तो सायबेरियन शेतकऱ्यांचा जिवाभावाचा दोस्त होताच; पण तितकाच तो आकाशाचाही मित्र होता.

कथा

नू’चे नाणे

Category:

 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.