व्यक्ती-परिचय

न्या. महादेव गोविंद रानडे

Category:

 

निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.

  July 7, 2015


अण्णासाहेब किर्लोस्कर
व्यक्ती-परिचय

अण्णासाहेब किर्लोस्कर

Category:

 

संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला.

  July 7, 2015


व्यंकटराव भवानराव खेडगीकर
व्यक्ती-परिचय

व्यंकटराव भवानराव खेडगीकर

Category:

 

आत्मचरित्रकार आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अग्रणी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी रामानंदतीर्थ तथा व्यंकटराव भवानराव खेडगीकर. स्वामी रामानंदतीर्थांचा जन्म १९०४ साली झाला.

  July 7, 2015


पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर
शहरे आणि गावे

पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर

Category:

 

एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत.

  June 29, 2015


मुंबईची तहान भागविणारा तानसा तलाव
शहरे आणि गावे

मुंबईची तहान भागविणारा तानसा तलाव

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे.

  June 27, 2015


मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय
शहरे आणि गावे

मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय

Category:

 

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.

  June 27, 2015


पैठण – दक्षिण काशी
शहरे आणि गावे

पैठण – दक्षिण काशी

Category:

 

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती.

  June 27, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर जिल्हा

Category:

 

सोलापूर जिल्हयाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे ते येथील महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर व अक्कलकोटसारख्या सुप्रसिध्द देवस्थानांमुळे. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते.

  June 26, 2015