जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला.
खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच सुरू झाली होती.
हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. १९५३ मध्ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्येम तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. १९५५ मध्येच आलेला 'द सेव्हन ईयर इच' या चित्रपटामध्येल तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. १९९९ मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टीचट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.
१९५३ मध्ये एका अनोळखी मासिकाचे संपादक ह्युज हेफनर यांना मर्लिनचा एक न्यूड फोटो मिळाला. मर्लिनने १९४९ मध्ये ते फोटोशूट केले होते. त्यांनी ५०० डॉलर मोजून एक फोटो खरेदी केला आणि तो त्यांच्या नव्या प्लेबॉय (Playboy) मासिकात छापला. त्यामुळे मर्लिन प्लेबॉय या मासिकाची पहिली मॉडेल ठरली. या फोटोशूटसाठी तिला फक्त ५० डॉलर इतकाच मोबदला मिळाला होता.
मर्लिनचा द सेव्हन इअर इच हा चित्रपट व तिचा या चित्रपटातील प्रसिद्ध सीन पाहिलेला मागील पिढीतील व्यक्ती विरळाच. हवेने उडणारा मर्लिनचा ड्रेस आणि तो सावरण्याचा तिचा प्रयत्न आणि त्यातच तिच्या चेहऱ्यावरील दिलखेचक अदा याने गेल्या काही पिढ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अनेक चित्रपटांमध्ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्यय कैद करण्याःसाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्या त सर्व सिनेतारिका फिक्या पडल्या. मर्लिनचा हा ड्रेस २०११ साली ५० लाख डॉलरमध्ये लिलावात विकला गेला होता.
चॅनेल पाच या फ्रेंच परफ्युमची मर्लिनने मोफत प्रसिद्धी केली होती. एका मुलाखतीत तिला, तुम्ही झोपताना काय परिधान करते असे विचारले होते. त्यावेळी तिने अत्यंत खळबळजनक उत्तर दिले होते. केवळ चॅनेल नंबर पाच चे पाच थेंब असे उत्तर तिने दिले होते. म्हणजेच तिने न्यू़ड (विवस्त्र) झोपत असल्याचेही मान्य केले होते. तिची मुलाखत चांगलीच गाजली होती. वर्षभरानंतर मर्लिनने एका परफ्युमसाठी न्यूड फोटोशूटही केले होते.
मर्लिनच्या चेहऱ्यावर असलेल्या ब्युटी मार्कबाबतही तो खरा होता की कृत्रिम अशा अनेक चर्चा आहेत. पण तसे असले तरी पोलका ड्रेसमधील मर्लिनचे रूप हे पुढील अनेक दशकांपर्यंत सौदर्याचे मूर्तिमंद उदाहरण ठरले. तिच्या ब्युटीमार्कची एवढी क्रेझ होती की अनेक दशकांपर्यंत मुली अशा प्रकारे ब्युटीमार्क चेहऱ्यावर गोंदून घेऊ लागल्या. त्याला तेव्हा मर्लिन्स मोल म्हटले जायचे.
१९६२ साली मर्लिनने मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांच्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे गाणे गायले. त्यावेळी ती “Happy Birthday, Mr. President” असे म्हणाली होती. तेव्हापासून केनडी यांच्या नावाआधी मिस्टर प्रेसिडेंट लावले जाऊ लागले. आजही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिस्टर प्रेसिडेंट म्हटले जाते. यानंतर केनडी यांनी स्वतः मर्लिनचे आभार मानले होते.
मर्लिनने प्लास्टीक सर्जरी केली होतो. यासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे २५६०० डॉलरमध्ये विकली गेली होती. त्यात तिने हनुवटी आणि नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख होता.
आरसपाणी सौदर्यासाठी अत्यंत कमी कालावधीत जगप्रसिद्ध अजालेल्या मर्लिन मनरो हिचे खासगी आयुष्य तेवढेच वादग्रस्त होते. तिने तीन विवाह केले होते. तिचे दोन पती तिच्याप्रमाणेच प्रसिद्ध होते. प्रसिद्ध बेसबॉलपटू जो डीमॅगिओ आणि आर्थर मिलर. तिचा डीमॅगिओबरोबर १९५४ मध्ये घटस्फोट झाला. त्याचवर्षी तीने मिलरशी विवाह केला. पाच वर्षे त्यांचे नाते टिकले. त्यानंतर पुन्ही तिचे आणि डीमॅगिओ यांच्यात नाते जुळल्याचे म्हटले जात होते.
तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट. मर्लिन मन्रो यांचे निधन ५ ऑगस्ट १९६२ साली झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एनडीटीवी या इंग्रजी न्यूज चॅनलवरचे ‘वूई दी पीपल’ आणि ‘द बक स्टॉप्स हिअर’ हे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. ‘वूई दी पीपल’ हा त्यांचा शो तर २०१७ मधे त्यांनी एनडीटीवी सोडेपर्यंत तब्बल १६ वर्ष चालला.
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला.कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्याय कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे. पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. मा.कमल अमरोही यांचे निधन ११ फेब्रुवारी १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं.
गोळवलकर गुरुजी यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ रोजी रामटेक येथे झाला.
माधव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली.
श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.
गोळवलकर गुरुजी यांचे निधन ५ जून १९७३ रोजी झाले. आपल्या समूहाकडून गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या दोघांचं नाटय़वेड खरं तर कमालीचं टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात.
रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले.
दुर्गम आदिवासी भागात आरोग्याचा कानमंत्र देणार्या कार्यकर्त्यांची फौज डॉ. सतीश गोगुलवार यांनी उभी केली. या कामातून विश्वासाचा पूल बांधला गेला.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख वाचा.
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली.
केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता.
या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता..
कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. २० एप्रिल १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश चान्दे
आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्या डॉ. आपटे या न्यायवैद्यक क्षेत्रातील एकमेव महिला ठरल्या तसेच कॉरोनर कोर्टातील एकमेव महिला कॉरोनर झाल्या…
Copyright © 2025 | Marathisrushti