(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर

    काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं.

  • (डॉ.) सदानंद मोरे

    लोकोत्तर पुरुषांच्या पश्चात त्यांच्या वंशजांवर काळाचा दबाव नकळत निर्माण होत असतो. विशेषत: बौद्धिक क्षेत्रातील अशा महान व्यक्तींच्या पुढील पिढय़ांना ती क्षमता टिकवून ठेवता येतेच असे नाही. परंतु अशाही स्थितीत आपण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरावे, असे बहुधा डॉ. सदानंद मोरे यांनी ठरवले असावे. महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. मोरे यांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.

    महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्राचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ , ‘मंथन’, ‘त्रयोदशी’ या सारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे लोकव्यवहारातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. तत्त्वज्ञान विषयाचे गेली ३५ वर्षे अध्यापन करणारे डॉ. मोरे हे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव व संत तुकाराम अध्यासनांचे प्रमुख होते. अध्यापन हा जरी त्यांचा धर्म असला तरीही सतत चिंतन आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा स्वभाव आहे. नाशिक येथे या आठवडय़ात होत असलेल्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या विविधांगी अभ्यासाचा गौरव आहे, असे म्हटले पाहिजे. मराठी माणसांचा देशपातळीवरील पहिला जनसमुदाय म्हणून महाराष्ट्राचा जो उल्लेख होतो, त्याचे कारण महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने येथील जनतेला आत्मभान आणि राष्ट्रभान दिले हे आहे, त्यामुळेच संत नामदेव पंजाबपर्यंत जाऊ शकले आणि मराठय़ांनी पानिपतापर्यंत विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले, असे मत डॉ. मोरे आवर्जून मांडतात. मोरे यांच्या निवडीमुळे संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल, यात शंका नाही.

    --------------------------------------------------------------------------

    MSS - 0042
    मोरे, (डॉ.) सदानंद श्रीधर
    २५ जून १९५२
    १९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणार्‍या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘कृष्ण : द मॅन अॅंड हिज मिशन’ ही इंग्रजी पुस्तकं, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.

  • विश्वनाथ मा. दिघे

    पनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते.

  • इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ

    इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.

    शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.

    शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वस्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर (‌कवी अज्ञातवासी)

    दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच कवी अज्ञातवासी हे कवी, काव्यसंग्रह संपादक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, म्हणून ओळखले जात असत. केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली मात्र मधल्या काळात म्हणजे १९२२ पासून त्यांनी एका खोलीत त्यांनी वस्तू संग्रहालय सुरु केले.

  • डॉ.पंजाबराव देशमुख समाजसेवक, राजकीय नेते

    पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. २१ ऑगस्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत होउन डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ ईंडीयावर उतरले.

  • विजय तनपुरे (शिवशाहीर)

    विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. त्यांच्या पोवाड्यांच्या अनेक कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत.

    शाहीर म्हणून यश मिळवल्यावर एकदा त्यांना कीर्तन करण्याचा आग्रह झाला. पण ती आपली पात्रता नाही म्हणून त्यांनी तेव्हा नम्र नकार दिला. पण त्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी ही किर्तन करण्यासाठी कला अवगत करण्याचा ध्यास घेतला. यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यसंचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रशिक्षणासाठी अर्ज केला. डिकसळच्या प्रकाश महाराज बोधले यांच्याकडे त्यांना प्रवेश मिळाला. तिथे आपण शाहीर आहोत, नामवंत शाहीर आहोत हे न सांगता त्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहून कष्टाने कीर्तनाची कला सादर केली. लवकरच त्यांना कीर्तन कलेत पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. कीर्तनाचे कार्यक्रम मिळू लागले.
    तनपुरे हे जिद्दिने, मेहनत करुन शाहीराचे कीर्तनकार झाले.

    विजय तनपुरे यांची www.shivgarjana.com ही वेबसाईट आहे.

    संपर्कासाठी पत्ता:

    शिवशाहिर विजय तनपुरे,
    खळवाडी न. २, स्टेशन रोड,
    ता. राहुरी, जि. अहमनगर,
    फोनः ०२४२६-२३३७७९
    मोबाईलः ९३२५१४१८८२

  • हळुवार मनाचा कलंदर माणूस

    संगीतकार सी. रामचंद्र अर्थात 'अण्णा' यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !

    "पतंगा" या चित्रपटाची गाणी तयार होत असताना 'राजेंद्रकृष्ण' यांनी एक ओळ लिहीली, 'ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है' ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, "पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला ... "किसीकी खातिर जान जलाना अच्छा है - पर कभी कभी!" "दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है - पर कभी कभी" ...... अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.

    "चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत" या "आजाद"च्या निर्मात्याच्या 'आदेशा'चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस 'आवडत्या छंदा'त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी 'बसली'! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून 'आजाद' आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे "कैद!"

    बरं अश्या 'बिनधास्त- 'हॅपी-गो-लकी'- वृत्तीच्या माणसाला 'perfection' शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.

    मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता "बापूंना" पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.

    कधी कधी 'खट्याळ युक्त्या' योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. "साजन" या चित्रपटातली गाणी नायक 'अशोककुमार'ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. 'अशोककुमार'च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी 'नाही' म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, 'दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या'. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी 'आज्ञाधारकपणे' रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.

    पण हा कलंदर माणूस 'आतून' खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो'. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर 'जावं' अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची 'competition' सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते - तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!' हे ऐकून नौशाद गहिवरले !

    लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी 'समझोता' करावा. 'जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?' पण अशा वेळी त्यांचा 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, 'समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही - मी तिला घडवलयं!' कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.

    या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
    अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती 'बॅगपाईपर' होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, 'अण्णा, काय झालं ?' तेव्हा म्हणाले, 'अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !' अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !

    लता-सी रामचंद्र वितुष्टाचा 'फायदा' मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, 'लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे' यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात'!
    तेव्हा, 'तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही' असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.

    अण्णा 'साई-सावली' मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, "अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर 'बॉडी' खाली आणणं पण अवघड".

    अण्णा नेहमीच्या 'श्टाईल'मधे म्हणाले, "पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है" .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ 'चंदनवाडी'कडे रवाना झालं.

    -- धनंजय कुरणे
    कोल्हापूर

    9325290079

  • मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे.

    गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते. आज ज्युनिअर सोनालीचा वाढदिवस. तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी खडकी पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे.

    तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

    सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.

    स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुख च्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे 'सोशल मीडिया'वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री मर्लिन मन्रो

    अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला.

    खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच सुरू झाली होती.

    हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. १९५३ मध्ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्येम तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. १९५५ मध्येच आलेला 'द सेव्हन ईयर इच' या चित्रपटामध्येल तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. १९९९ मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टीचट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.

    १९५३ मध्ये एका अनोळखी मासिकाचे संपादक ह्युज हेफनर यांना मर्लिनचा एक न्यूड फोटो मिळाला. मर्लिनने १९४९ मध्ये ते फोटोशूट केले होते. त्यांनी ५०० डॉलर मोजून एक फोटो खरेदी केला आणि तो त्यांच्या नव्या प्लेबॉय (Playboy) मासिकात छापला. त्यामुळे मर्लिन प्लेबॉय या मासिकाची पहिली मॉडेल ठरली. या फोटोशूटसाठी तिला फक्त ५० डॉलर इतकाच मोबदला मिळाला होता.

    मर्लिनचा द सेव्हन इअर इच हा चित्रपट व तिचा या चित्रपटातील प्रसिद्ध सीन पाहिलेला मागील पिढीतील व्यक्ती विरळाच. हवेने उडणारा मर्लिनचा ड्रेस आणि तो सावरण्याचा तिचा प्रयत्न आणि त्यातच तिच्या चेहऱ्यावरील दिलखेचक अदा याने गेल्या काही पिढ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अनेक चित्रपटांमध्ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्यय कैद करण्याःसाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्या त सर्व सिनेतारिका फिक्या पडल्या. मर्लिनचा हा ड्रेस २०११ साली ५० लाख डॉलरमध्ये लिलावात विकला गेला होता.

    चॅनेल पाच या फ्रेंच परफ्युमची मर्लिनने मोफत प्रसिद्धी केली होती. एका मुलाखतीत तिला, तुम्ही झोपताना काय परिधान करते असे विचारले होते. त्यावेळी तिने अत्यंत खळबळजनक उत्तर दिले होते. केवळ चॅनेल नंबर पाच चे पाच थेंब असे उत्तर तिने दिले होते. म्हणजेच तिने न्यू़ड (विवस्त्र) झोपत असल्याचेही मान्य केले होते. तिची मुलाखत चांगलीच गाजली होती. वर्षभरानंतर मर्लिनने एका परफ्युमसाठी न्यूड फोटोशूटही केले होते.

    मर्लिनच्या चेहऱ्यावर असलेल्या ब्युटी मार्कबाबतही तो खरा होता की कृत्रिम अशा अनेक चर्चा आहेत. पण तसे असले तरी पोलका ड्रेसमधील मर्लिनचे रूप हे पुढील अनेक दशकांपर्यंत सौदर्याचे मूर्तिमंद उदाहरण ठरले. तिच्या ब्युटीमार्कची एवढी क्रेझ होती की अनेक दशकांपर्यंत मुली अशा प्रकारे ब्युटीमार्क चेहऱ्यावर गोंदून घेऊ लागल्या. त्याला तेव्हा मर्लिन्स मोल म्हटले जायचे.

    १९६२ साली मर्लिनने मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांच्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे गाणे गायले. त्यावेळी ती “Happy Birthday, Mr. President” असे म्हणाली होती. तेव्हापासून केनडी यांच्या नावाआधी मिस्टर प्रेसिडेंट लावले जाऊ लागले. आजही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिस्टर प्रेसिडेंट म्हटले जाते. यानंतर केनडी यांनी स्वतः मर्लिनचे आभार मानले होते.
    मर्लिनने प्लास्टीक सर्जरी केली होतो. यासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे २५६०० डॉलरमध्ये विकली गेली होती. त्यात तिने हनुवटी आणि नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख होता.

    आरसपाणी सौदर्यासाठी अत्यंत कमी कालावधीत जगप्रसिद्ध अजालेल्या मर्लिन मनरो हिचे खासगी आयुष्य तेवढेच वादग्रस्त होते. तिने तीन विवाह केले होते. तिचे दोन पती तिच्याप्रमाणेच प्रसिद्ध होते. प्रसिद्ध बेसबॉलपटू जो डीमॅगिओ आणि आर्थर मिलर. तिचा डीमॅगिओबरोबर १९५४ मध्ये घटस्फोट झाला. त्याचवर्षी तीने मिलरशी विवाह केला. पाच वर्षे त्यांचे नाते टिकले. त्यानंतर पुन्ही तिचे आणि डीमॅगिओ यांच्यात नाते जुळल्याचे म्हटले जात होते.

    तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट. मर्लिन मन्रो यांचे निधन ५ ऑगस्ट १९६२ साली झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट