जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात.परंतु शिक्षकांच्या शिकवण्याच्या प्रयत्नांना अनेक वेळा मर्यादा असतात.कधी कधी अशा शिक्षकांमुळे मुलांच्या त्या विषयाचे नुकसान होते.माझ्या बाबतीत पण असेच झाले होते.माझ्या संस्कृत शिकवणा-या शिक्षिका यथा तथाच होत्या .एस एस सी ला संस्कृत हा भरपूर गुण मिळवून देणारा विषय.त्यामुळे काळजीत पडलो. मुख्य परीक्षेच्या आधी काही दिवस भीत भीत वडिलांना सांगितले .जानेवारी महिना होता.वडिलांनी मला एक पत्र दिले आणि कर्जत जवळच्या दहिवली गावात ठाण्याहून पाठवले.मला आठवतंय ,सकाळी ११ च्या गाडीने मी कर्जत ला दर रविवारी जायचो.कर्जत हून दहिवली पर्यंत चालत.दहिवली ला मुळे गुरुजींचे घर होते. घर कसले सुंदर वाडाच होता.सर्व प्रथम गुरुजी जेवायला बसवायचे.अतिशय सुग्रास जेवण त्यांच्या पत्नी करीत असत. मग जेवण झाल्यावर मुळे गुरुजी त्यांच्या सोप्यावर फे-या मारत मला संस्कृत वाक्य, संधींची फोड करून कसे वाचावे हे शिकवत .पांढरे शुभ्र धोतर,खांद्यावर शुभ्र पंचा आणि अतिशय प्रसन्न मुद्रेचे वयोवृद्ध मुळे गुरुजींचे ते शिकवणे अजूनही माझ्या डोळ्या समोरून हलत नाही. अतिशय कमी वेळात त्यांनी मला संस्कृत हा विषय माझ्या आवडीचा करून दिला. जवळ बसवून प्रेमानी जेवायला घालणे, त्यानंतर संस्कृतची शिकवणी हे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. शिक्षक कसा असावा याचे मुळे गुरुजी मूर्तिमंत उदाहरण होते. मुळे गुरुजींनी माझ्या कडून एक पैसा न घेता मला शिकवले आणि त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली.
हे सर्व सांगण्याचे कारण असे कि -
खासदार परेश रावल यांनी सभागृहात चे कोचिंग क्लास कडे लक्ष वेधले .रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत. त्या यादीत आता पालकांचे शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे. त्यांच्या विचित्र शोषणातून गरीब व मध्यमवर्गीय पालकांना भगवान काय रजनीकांतही वाचवू शकणार नाही. ( रावल यांनी अभिनेता रजनीकांतचा असा मजेशीर उल्लेख करताच सभागृहात हास्याची कारंजी उडाली )
परेश रावल पुढे म्हणाले-भारतात बालवाडीच्या प्रवेशापासूनच पालकांच्या शोषणाला प्रारंभ होतो. प्रवेशासाठी लाखो रूपयांच्या देणग्या उकळल्या जातात. ज्यांच्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता खालावली त्यापैकी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा आग्रह करतात. क्लासेसमधे जाणाऱ्या मुलांना अधिक चांगल्या गुणांनी पास केले जाते. भारतात कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी, शैक्षणिक अर्हता अथवा गुणवत्ता लागत नाही.
चिंतामणी कारखानीस --
मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.
वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले.मा.वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला “वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी “एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही “शब्द‘-“स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी “सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा...
आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं “गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी “गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत. वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधु पोतदार
वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
चाफा बोलेना
चंद्र तोच अन् तेच तारे
चंपक-गोरा कर कोमल
चांद मोहरे चांदणे
जन पळभर म्हणतिल
जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
जय देवी मंगळागौरी
जिथे सागरा धरणी मिळते
जीर्ण पाचोळा पडे तो
तुझे डोळे पाण्याने भरले
तूच कर्ता आणि करविता
तें दूध तुझ्या त्या
दिनरात तुला मी किती
एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस' कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये 'फायलॉजिकल सोसायटी'च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून 'ऑक्सफर्ड' या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला.
१८८४ मध्ये 'A New English Dictionary on Historical Principles' या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम अनौपचारिकरीत्या 'The Oxford English Dictionary' हे नाव वापरण्यात आले. १९३३ पासून मात्र या नावानेच हा शब्दकोश प्रकाशित होत आहे.
या शब्दकोशाच्या आजपावोतो असंख्य आवृत्या निघाल्या आहेत. प्रारंभी केवळ इंग्रजी शब्दांचे इंग्रजीतच अर्थ देणारा हा शब्दकोश जग बदलत गेले तसे निरनिराळ्या भाषांतूनही अर्थ समजावून देऊ लागला, त्यात विविध भाषांमधील शब्दही अंतर्भूत होऊ लागले आणि आता तर रोजचा एक शब्द निवडण्यापासून वर्षभरातील एका शब्दाचीही निवड होऊ लावली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा 'शब्द' ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. 'फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन' या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. हा प्रकल्प किती काळ चालेल, किती निधी त्यात गुंतवावा लागेल, वगैरे कसलीच कल्पना कोणालाही आली नाही. पण जेम्स मरे, हेन्री ब्रॅडले, डब्ल्यू. ए. क्रेग, सी.टी. ऑनियन्स, यांसारख्या निष्णात शब्दकोश रचनाकारांनी पुढील सुमारे चाळीस वर्षे जीव ओतून अथक परिश्रम केले आणि इंग्रजी शब्दकोश इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रसिध्द झाली. यासाठी शब्द संकलन कसे केले, अर्थ कसे लावले गेले, मुद्रण कसे झाले, याबद्दलची माहिती रोचक आहे. जिज्ञासूंनी सायमन विन्चास्टर यांच्या 'The Meaning of Everything : The Story of Oxford English Dictionary हा ग्रंथ अवश्य पाहावा.
१९२८ साली प्रकाशित 'बारा' खंडांच्या शब्दकोशामध्ये १९३३ साली पुरवणी खंडाची जोड मिळाली. शब्दकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, त्यामध्ये विसाव्या शतकातील शब्दांची भर घालण्याकरिता चार खंडातील पुरवणी १९७२ ते १९८६ पर्यंत प्रकाशित केली गेली. याच दरम्यान १९८४ साली न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकल्प सुरू झाला. याच सुमारास कम्प्युटर तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या माध्यमाचे साधर्म्य ओळखून शब्दकोशाच्या मुद्रित आवृत्तीबरोबरच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये साठवणीला भरपूर वाव असल्याने नवे शब्द सहज समाविष्ट करण्यात येऊ लागले. हा शब्दकोश सी. डी. रूपात मिळू लागला. अनेक नवे शब्द भाषेत येत असताना त्यांचा शब्दकोशात अंतर्भाव करण्याबाबत काही निकष कटाक्षाने पाळले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जगातील भाषाविषयक सर्वात मोठा आणि व्यापक कार्यक्रम राबवते.
नवे शब्द शोधण्याकरता ऑक्सफर्ड इंग्लिश कॉर्प्स (शब्दांची गंगाजळी) आणि ऑक्सफर्ड रीडिंग प्रोग्राम ही मुख्य संसाधने आहेत. अनेक मान्यवान योगादानकर्ते आपण जे वाचले त्यातील नवे शब्द व त्यांचे अर्थ यांचा पद्धतशीर पाठपुरावा करतात. रीडिंग प्रोग्राममध्ये या प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (गाण्यांच्या ओळीपासून शास्त्रीय शोधनिबंधांपर्यंत) संग्रह केला जातो. गंगाजळीत हे दस्तऐवज आणि त्यांचे स्त्रोत यांची नोंदणी होते. असे नवे शब्द मिळाले की तो शब्द किती ठिकाणी, कोणत्या संदर्भात, कोणत्या अर्थाने, या अर्थाला काही विविध छत आहेत काय, किती काळ वापरला जात आहे, याचा आढावा तज्ज्ञांच्या संघाद्वारे घेतला जातो. अपशब्द वर्ज्य नसतात. पण ते वापरू नयेत, असा इशारा दिलेला असतो.
याखेरीज शब्दकोश कोणाकरता आहे, पृष्ठ संख्यांची मर्यादा, व्याख्या देतानाची शब्द मर्यादा, अशा तांत्रिक, वित्तीय मुद्द्यांचा देखील विचार केला जातो. एखादे वेळी एखाद्या शब्दाला जर अनेक वर्षांचा इतिहास नसतो, पण तो समर्पक असला तरी त्याचा अंतर्भाव करण्याचा विचार केला जातो. कम्प्युटरवरील गेममधले एखादे पात्र मेले आणि पुन्हा जिवंत झाले, तर त्याचे वर्णन respwan या क्रियापदाने केले जाते, आणि कायमचे मेले तर permdeath असे वर्णन केले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या शब्दांचा विचार करताना इंग्रजी भाषेतील शब्दांचा विचार होत नाही, अन्य भाषेतील शब्द विचारार्थ घेतले जातात. बंड, धरणे (असे संपाचे प्रकार) याच रूपात इंग्रजी भाषेत प्रवेशले. कधीकधी स्पेलिंगच्या फरकाने वेगळे अर्थ सुचवले जातात. Pundit म्हणजे तज्ज्ञ आणि pandit म्हणजे पदवी.
नव्या शब्दांचे अर्थ देणे, हे देखील आव्हानात्मक काम आहे. यासाठी व्यापक सामान्यज्ञान असणारी तज्ज्ञ मंडळी, संदर्भग्रंथ, माहितीचे अन्य स्त्रोत, विषय तज्ज्ञ, इतर समानार्थी शब्द यांचा आधार घेतला जातो. उद्या अण्णू गोट्या होणे हा वाक्प्रचार मराठी शब्दकोशात समाविष्ट करायचा झाला तर त्या तज्ज्ञाला अंतू बर्वा माहिती हवा. शब्दकोशशास्त्र जसे शब्दकोशांचे स्वरूप बदलेल तसे विकासात होत गेले आणि शब्दकोश जसे बदलत गेले तसे शब्दकोशशास्त्र बदलत गेले. आज शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांचे समूह राहिलेले नाहीत. कधीतरी आकडे वापरून संकल्पना सादर केली जाते, जसे २६/११ कधी आकडा आणि अक्षर एकत्र नांदतात, २द सारखे शब्द यात मोडतात. कधी A1 असा त्यांचा क्रम असतो. आता तर संकल्पना इमॉटीकॉनद्वारे दर्शवली जाते. अशा सर्वांचा क्रम काय असावा, हेही इंग्रजी शब्दकोशात रूढ होत आहे.
अविनाश पंडित.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. डॉ. सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी झाला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडी मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छ-याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता.
एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे हे सविस्तर सांगितले. तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावलेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच. ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत ब्रम्हदेशातील जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते.
त्यावेळेस भारतात पक्षीशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले. त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीनएचएस च्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोधनिबंध लिहीला. या निंबधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तसेच केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली. सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. भारतभर फिरुन त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्यांचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्व सामान्यांना वापरता येईल अश्या शैलित पुस्तके लिहिली.
त्यांनी लिहीलेल्या हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांना खर्या् अर्थाने अजरामर केले. डॉ सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीत त्यांनी अपार परिश्रम घेउन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसहीत एकाच ठिकाणी उपलब्ध केली. १९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेऊन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ. अली यांचा समावेश होतो. डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन हा 'पक्षीदिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. सलीम अली यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मान केला. तसेच ब्रिटीश पक्षीतज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक ही मिळाले. डॉ. सलीम अली यांचे २७ जुलै १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते.
मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.
अॅड. असीम सरोदे यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर मानवी हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावले. अपंग, बालमजूर, शरीरविक्रय करणार्या महिला, तृतीयपंथी, एचआयव्ही ग्रस्त अशा विविध क्षेत्रांतील उपेक्षितांसाठी त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला.
हक्काचा आवाज
बाबूराव पेंटर यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. १९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. मा.बाबूराव पेंटर यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आले होते. मा.बाबूराव पेंटर यांनी १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्री पात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला तो म्हणजे सैरंध्री. पुण्यातील आर्यन थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले होते. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- ग्लोबल मराठी
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सयफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली.
Copyright © 2025 | Marathisrushti