(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आंनदयात्री कवी बा भ बोरकर

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. .बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

  • शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर

    शंकर यांचे पूर्ण नाव शंकरसिंग रघुवंशी. शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम वाजवायचा. या दोघांची ओळख झाली. संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंरतही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. बरसात, आह, आवारा, श्री ४२०, जिस देश मे गंगा बहती है, बुट पॉलिश, संगम, मेरा नाम जोकर असे एकाहून एक चित्रपट देत शंकर-जयकिशन आणि राजकपुर या जोडीने इतिहास घडविला. शंकर जयकिशन यांचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतात. मुकेश यांचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हुं’, ‘किसी की मुस्कूराहटों पे हो निशा’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई, काहे को दुनिया बनाई’, ‘होठों पे सच्चाई होती है’ हीच गाणी येतात. जयकिशन यांच्या मृत्यूनंतर शंकर आणि राजकपुर यांचे सांगितिक संबंध तुटले. तरीही पुढची सोळा वर्षे शंकर एकट्याने संगीत देत होते. २६ एप्रिल १९८७ रोजी शंकर यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संत नानामहाराज – श्रीगोंदेकर

    श्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.

  • पहिल्या महिला भारुड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी

    पद्मजाताई स्वतः पेटी, तबला, ढोलकी चांगली वाजवतात. नाथांच्या भारुडांबरोबरच बदलत्या सामाजिक समस्यांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या पद्यरचना त्यांनी केल्या. संगीत,संवाद, नृत्यदिग्दर्शन असा सबकुछ ‘पद्मजा’ टच मिळाल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणि लोकप्रियता वाढत गेली. गल्लीतल्या देवळापासून सुरू केलेला भारुडाचा कार्यक्रम दिल्लीपर्यंत म्हणजे केवळ देशातच नाही, तर देशाच्याही बाहेर गाजला. इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका या देशांमध्येही भारुडाच्या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली.

  • प्रगल्भ प्रतिभेचे नौशाद

    एका नामांकित लेखक-समीक्षकाने, "बलवत्तर भाग्याचे नौशाद" अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी 'Top' ला जाण्यात त्यांच्या 'गुणवत्तेपेक्षा' त्यांच्या 'भाग्याचा' वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ 'भाग्य' म्हणणे म्हणजे विनोदच आहे.

    अर्थात नौशादांवर टीका करणारे अनेक आहेत . भप्पी लहिरीने सुद्धा त्यांना झोडपले होते. एका पत्रकाराने भप्पीला विचारले की 'तुम्ही चालींची चोरी करता' या आरोपाबाबत काय सांगाल? तशी भप्पी म्हणाला की ' चोरी कोण करत नाही ? नौशाद नाही का शास्त्रीय संगीतातले राग चोरत?' आता चालींची 'उचलेगिरी' करणे आणि एखादा राग कलात्मकतेचा शिडकावा करून विविध स्वरूपात मांडणे यातील फरक त्याला समजत नसेल काय? पण वेळ मारून नेली ना? मग झालं तर!

    नौशादजी एका वेळी एकच चित्रपट करत याचीही कुचेष्टा होत असे. पण मला तरी हे कलाकाराच्या मनस्वीपणाचं व नम्रतेचं निदर्शक वाटतं. एक विषय हातात घेतला की त्यावर अधिकाधिक परिश्रम घेऊन, स्वतःच्या कुवतीनुसार त्याला पूर्ण न्याय देऊन त्यातून बाहेर पडायचे व मगच दुसऱ्या विषयात प्रवेश करायचा यात चुकीचे काय? The secret of good writing is re-writing असे म्हणतात. 'प्रतिभेच्या पहिल्याच उमाळ्यात सुचले तेच अंतिम' असे मानण्यापेक्षा , ते अधिकाधिक उत्तम व निर्दोष कसे करता येईल यावर जोर देणे ही एक प्रकारची विनम्रताच आहे.

    त्यांचे आत्मचरित्र प्रौढी मिरवणारे आहे अशीही टीका झाली. परंतु त्यात इतर कोणाला कमी लेखले आहे असे मला तरी आढळले नाही. मला तरी ते स्व-कर्तृत्वाचे सार्थ (पण अनाठायी नव्हे) अभिमानाने केलेले विस्तृत कथन वाटले.

    "भाग्याचीच" गोष्ट म्हणायची तर 'सैगल' व 'नूरजहाँ' या दोन्ही शिखरस्थ कलाकारांना संगीत देण्याचे भाग्य नौशादजीना लाभले. ते अन्य कोणालाच प्राप्त झाले नाही. आणि महत्वाचे म्हणजे 'शहाजहाँ' व 'अनमोल घडी' यातली गाणी अनुक्रमे सैगल व नूरजहाँ यांच्या करीअर मधली माईलस्टोन गाणी ठरली. शिवाय सैगल व नूरजहाँ या दोघांनी नौशादजींकडे फक्त एकेकच चित्रपट केला होता हे ही लक्षात घेण्याजोगे !

    मेहबूब, करदार, सनी, विजय भट्ट, के आसीफ यासारखे मोठे निर्माते नौशादजीनाच घेत ही केवळ 'योगायोगाची' गोष्ट नव्हती तर ती त्यांच्या गुणवत्तेची पावतीच होती.

    'कलात्मक' संगीत देणा-या संगीतकारात त्यांचे स्थान खूप वरचे आहे. त्यांच्या संगीतातील 'कोरस'चा वापर या एकाच विषयावर एक मोठा लेख लिहीता येईल. एकाच ओळीसाठी दोन चाली - मुख्य गायकासाठी एक व कोरससाठी एक- हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य! त्यातही एक चाल आरोही असेल तर दुसरी अवरोही अश्या रचना ! कधीकधी दोन्ही चाली एकाच दिशेने जाणा-या!

    कधी गाण्याची चाल 'नाजूक' असेल तर त्याला 'भारदस्त' कोरसची 'भक्कम' चौकट तर कधी उलट - म्हणजे 'रांगड्या' चालीला 'नाजूक' कोरसची कलात्मक नक्षी ! उडन खटोला मधील 'मोरे सैय्याजी उतरेंगे पार' म्हणजे तर कोरसमधील सृजनशीलतेची परिसीमाच! यात prelude व interlude म्हणून फक्त कोरसच वापरला आहे. 'हैय्या हो हैय्या रे हैय्या' हे शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत ते प्रत्येकाने मोजून बघायला हवेत. शिवाय कोरस दोन वेगवेगळ्या स्केल मध्ये वापरला आहे. त्यामुळे 'अंतराचा' आभास निर्माण होतो.

    "ज्यांचा गळा गायनासाठी फारसा 'तयार' नाही अशा कलाकारांकडून अजरामर गाणी गाऊन घ्यायची" हे त्यांच्या प्रतिभेचं आणखी एक द्योतक! उमादेवी ( अफसाना लिख रही हूँ), श्याम (तू मेरा चांद), करण दिवाण ( जब तुमही चले परदेस आणि सावनके बादलो), मंजू (अंगडाई तेरी है बहाना) या सगळ्यांना 'गायकाचा' मान नौशादजीनीच मिळवून दिला.

    माझे एक नौशादप्रेमी मित्र म्हणतात की रविंद्र संगीत , बंगाली संगीत याप्रमाणेच "नौशाद संगीत" ही एक स्वतंत्र व समृद्ध संगीत शाखा आहे. मला तरी यात काही अतिशयोक्ती वाटत नाही. मात्र या प्रगल्भ प्रतिभेच्या संगीतकाराच्या संगीताचा बारकाईने अभ्यास करता येईल असे सांगितीक ज्ञान माझ्याकडे नाही याची खंत मात्र सतत वाटते .

    -- धनंजय कुरणे
    08.05.2017

  • प्रा. नरहर कुरुंदकर

    कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी अनेकवेळा कॉलेजला दांडी मारून आपला वेळ हैदराबादमधील स्टेट लायब्ररीमध्ये घालवू लागले . त्यांनी तेथे इतिहास , संस्कृती , धर्म , तत्वज्ञान , साहित्य, राजकारण , आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्रचंड वाचन केले.

  • शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ श्रीकांत जिचकार

    हा माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.

  • लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार

    शाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली.

  • पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

    गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

  • लेखक मुल्कराज आनंद

    त्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली.