जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.
ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल.
मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं नाव मराठीसोबतच हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विभिन्न भाषांतून दमदार अभिनय सादर करणारी खमकी अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात यशाचा आलेख कायम चढता ठेवलेल्या नेहाने सिनेमा निर्मितीतही पदार्पण करत इंडस्ट्रीला दर्जेदार कलाकृती दिली आहे.
‘मुंबई फॅशन शो’ या व्यावसायिक इव्हेंटसाठी मला काही मॉडेल्सचे फोटोशूट करायचे होते. याच वेळी नेहाचं फोटोशूट करायची संधी मला चालून आली. व्यावसायिक आणि एडिटोरियल अशी दोन्ही कामे एकाच दिवशी करायची असल्याने स्टुडिओमध्ये साधारणपणे 18 ते 20 जणांची टीम माझ्यासोबत होती. सकाळी लवकर नेहाचं शूट तिच्याशी बोलून आम्ही प्लॅन केलं तर त्यानंतर व्यावसायिक शूट. नेहाशी फोटोशूटसंबंधित बोलणं झाल्यावर तिने सगळ्यात आधी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘‘थीम काय असेल?’’ या प्रश्नातच नेहाची अभ्यासू वृत्ती दिसून आली.
यात ती कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे समजतं. 99 टक्के कलाकार एडिटोरियल फोटोशूटची थीम काय असेल वा त्यांना नेमकं काय करायचं आहे हे विचारत नाहीत. अनेकदा शूट हे ते सध्या करत असलेल्या शूटच्या लोकेशनवर अन्यथा त्यांच्या घरी करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे फोटोग्राफरला हवी असलेली थीम वा मेकओव्हर करता येतोच असं नाही. त्यातही अनेकदा शूटिंगच्या कपडय़ात आणि तिथल्याच लोकेशनला शूट केल्याने फोटोशूट हे फार कृत्रिम वा कोरडे होतात. त्यात फोटोग्राफरला हवा असलेला जीव त्याला टाकता येत नाही. त्यात अनेकदा शूटसाठी म्हणजेच व्हिडीओसाठी केलेला मेकअप हा त्रासाचा ठरतो आणि मग फोटो मिळूनही त्यातला गोडवा निघून जातो. नेहाच्या बाबतीत हे सारं काही घडणार नाही हे तिच्याशी बोलताना अगदी पहिल्याच वाक्याला मला समजल्याने मी थोडा आनंदात होतो. नेहाला थीम सांगितली. नेहाचं कॉस्च्यूम काय असेल, त्यासंबंधित मेकअप काय असेल आणि हेअरस्टाईल कशी असेल या सगळ्याची माहिती माझ्या टीमने दिली होती. नेहाला कॉस्च्यूम आणि इतर माहिती दिली होती. मात्र त्यातही तिने तपशीलवार ती समजून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेतले होते.
‘हॉट ऍण्ड ग्लॅमरस’ या शब्दांना साजेसं ठरेल असं नेहाचं फोटोशूट करायचं ठरलं. हे शूट प्रत्यक्षात आणण्यासाठी माझी टीम अहोरात्र झटत होती. त्यानुसार कॉस्च्यूम डिझायनर, स्टायलिस्ट, मेकअप आणि हेअर डिझायनर आणि असिस्टंट अशी तगडी ब्रिगेडच या शूटच्या कामास लागली होती. पांढऱया रंगाचा शर्ट आणि एक हॉट पॅण्ट यात तिचे एक्स्प्रेशन टिपणारं एक फोटोशूट आम्ही आधी केलं. हाय की (प्रखर प्रकाशातली) या प्रकारातलं हे शूट होत. यात नेहाचा पूर्ण फोटो (फुल फिगर फ्रेम) मला कॅमेराबद्ध करायचा होता, तर त्यानंतर लगेच लाईटिंगमध्ये बदल करत लो की (मंद प्रकाशातली) फोटोग्राफी करण्याचं ठरलं. याच कॉस्च्यूमला थोडं आणखी ग्लॅमर लूक देत तिचं बॅकलेस फोटोशूट आम्ही केलं. अर्थातच या सगळ्यात नेहाची कम्फर्ट लेव्हल लक्षात घेऊन हे शूट प्रत्यक्षात आणण्यात मला आणि माझ्या टीमला यश मिळालं.
शूट करताना आमच्यात – नेहा, मी, माझी स्टायलिस्ट दिव्या तांदळे – सतत संवाद होत होते. प्रत्येक लाईटिंगला, तिच्या बदललेल्या पोजेसला, प्रोफाईलला आणि या सगळ्याच गणित मांडत मी टिपलेल्या फोटोवर आमच्यातले संवाद व्हायचे. शूट सुरू केल्यानंतर मध्ये फार कमी वेळ आम्ही ब्रेक घेतला होता. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा असलेल्या मॉडेलसोबत काम करताना नेहमीच फोटोग्राफरला एक वेगळा आनंद होत असतो. त्यात सगळ्यात जास्त आनंद असतो तो मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करत जास्तीत जास्त व्हेरिएशन्सवर काम करता आलं याचा.
नेहानं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं ते बालवयातच. ठाण्याच्या रामनाथ थळवळ यांच्या उन्हाळी शिबिरात वयाच्या सातव्या वर्षी पिटुकली नेहा दाखल झाली आणि इथेच तिच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. गुरू रामनाथ यांच्याकडे शिकत असतानाच एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनसाठी नेहा बालकलाकार म्हणून निवडण्यात आली आणि तिचा अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा झाला. बालाजी प्रॉडक्शनच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून नेहा छोटय़ा पडद्यावरून झळकली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. अनेक मालिकांतून बालकलाकाराची भूमिका साकारत असलेल्या नेहाला शिक्षण आणि अभिनय या दोन्हीपैकी नेमकं एक काय निवडायचं याचा निर्णय तिने वयाच्या तेराव्या वर्षीच घ्यावा लागला आणि अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय तिने घेतला. अर्थातच हा धाडसी निर्णय घेण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा वाटा अधिक होता हे ती नमूद करते.
अनेक हिंदी मालिकांतून काम करत असलेल्या नेहाला ‘हसरते’ या मालिकेने चेहरा दिला आणि तिचं एक वेगळं अस्तित्व या क्षेत्रात निर्माण झालं. गुरू रामनाथ थळवळ यांच्यामुळेच नेहाने मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकल्याचं ती आदराने सांगते. अभिनयाचा प्रवास एका वेगळ्याच वेगाने करणाऱया नेहाचं सिनेमा निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं ते बायोस्कोप या मराठी सिनेमामुळे. या सिनेमासोबतच तिचे आणखी काही नवे प्रोजेक्टस् या वर्षी लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं ती आनंदाने सांगते.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्या १९७९ साली आलेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटात्यांनी अमोल पालेकर यांच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. पुढे या अभिनेत्री-निर्मात्याने नंतर अनेक टीव्ही मालिका तयार केल्या ज्यांनी तिला लोकप्रिय टीव्ही सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.
२०१९ मध्ये लिओनेल मेसी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला आहे. २०१९ मध्ये कमाई मध्ये अर्जेंटीनाचा फुटबॉलर लियोनेल मेस्सी प्रथमच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ८८१.७२ कोटी (१२.७ कोटी डॉलर) एवढी कमाई केली.
१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.
कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले.
मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह.
१६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.
Ambadas Shankar Agnihotri
देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या 'लाइट ऑफ एशिया' या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन 'करमा' नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर 'स्टार लंडन'च्या समीक्षकाने लिहिले होते की, "देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही". नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशु रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये "बॉंबे टॉकिज' या संस्थेची स्थापना केली. बॉंबे टॉकिजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चित्रपटात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉंबे टॉकिजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षक वर्ग चित्रपटांकडे वळवला. देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशु रॉय यांच्याशी विवाह केला. "बॉंबे टॉकिज' ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशु रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. अशोक कुमार यांची भूमिका असलेला "किस्मत' हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुकर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. मा.देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अछूत कन्या' नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रभारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. देविका राणी यांचे ८ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;
सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्या घटकांना प्राधान्य देणार्या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.
Copyright © 2025 | Marathisrushti