(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गझलसम्राज्ञी

    बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित झाली नाही. या संगीत मैफलीत तिने स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी अवघे सात वर्षे असलेल्या त्या मुलीने तब्बल सहा तास एकटीने गाऊन ती संगीत मैफल साजरी केली व पूरग्रस्तांसाठी निधी जमविला. या जिद्दी मुलीचे नाव होते बेगम अख्यर. मोठेपणी गझलसप्राज्ञी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. बेगम अखर मुळच्या कोलकात्याच्या. लहानपणापासून त्यांना सुगम संगीताची खूप आवड होती. त्यांना शास्त्रीय संगीताची फारशी आवड नव्हती. तरीही पतियाळाचे उस्ताद आत्ता अहमदखान यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे रितसर धडे घेतले. मात्र पुढे त्यांनी गझल, भजन, सुमरी, दादरा आदी प्रकारांमध्येच जास्त रुची दाखवून त्यात प्रभुत्व मिळविले. मिर्झा गालिब व जिगर भोरादाबादी हे त्यांचे आवडते कवी. त्यांच्या अनेक गझलांना बेगम अस्त्ररनी स्वत: संगीत दिले तसेच स्वतः गाऊन अनेक गझला लोकप्रिय केल्या. गझलगायकीमुळेत्या केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तानातही त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. आदरातिथ्य करण्याच्या त्यांच्या लखनवी पद्धतीमुळे त्या आजही असंख्य रसिकांच्या स्मृतीमध्ये आहेत.

  • आधुनिक काळातील संत आणि कवी सद् गुरु स्वामी स्वरूपानंद

    स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. “मृत्यू पावलो आम्ही” या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते.

  • पं. यशवंतबुवा जोशी

    यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांनी जगन्नथबुवा पुरोहित यांच्याकडून घेतली.

    यशवंत जोशी यांचा जन्म १९२७ साली झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासून संगीत व गायनाची प्रचंड आवड असल्याने संगीतविषयाशी निगडीत गोष्टींकडे त्यांचे मन सहज वेधले जात. त्याकाळी अनेक दिग्गज गायकांच्या कर्यक्रमांना हजेरी लावल्याने गायक बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नियमीत सराव व आपल्या सुरांना वळण लावण्याची जोड मिळाली. अशा तर्‍हेने त्यांच्यामधील गायक घडत गेला. त्या काळी केवळ गायक होण्याला, आजच्यासारखी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे अजिबात नव्हती, तर गायक अधिक नट असणार्‍या कलाकारांनाच प्रसिध्दीचे वलय चाखण्याची संधी मिळत असे. पण यशवंतबुवांची साधना व गायननिष्ठा या सर्व भौतिक सुखांच्या पलीकडची असल्याने, त्यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने व सुरांवरील हुकुमतीने श्रोत्यांना तृप्त करण्याचा निर्णय घेतला, व त्यांच्या गायनप्रवासाची झोकात सुरूवात झाली. यशवंतबुवा मिराशी हे त्यांचे पहिले गुरू होते.

    आयुष्यभर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिध्दीचे वलय फार उशीराने प्राप्त झाले. यशवंतबुवांची गायनशैली हीदेखील त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच वेगळी, उठावदार, व बहारदार आहे. इतर नवोदित गायक ज्याप्रमाणे आपल्या गायनशैलीत इतर घराण्यांच्या शैलींचा प्रभाव मिसळून नेहमी एका नव्या व तजेलदार गायनशैलीचा वेध घेण्यास उत्सुक असतात, त्याप्रमाणे यशवंतबुवा हे प्रत्येक शैलीचे वेगळेपण व स्वतंत्र असं अस्तित्व अबाधित ठेवणाचा सचोटीने प्रयत्न करतात. गायला सुरूवात करताच स्वरांवर घट्ट पकड बसविण्याची त्यांची क्षमता असो, किंवा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करण्याचे त्यांचे कसब असो, या सर्व गोष्टी त्यांच्या सर्जनशील गायकीचा प्रत्यय देत असतात.

    आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणार्‍या या हाडाच्या कलावंताला हृदयेश आर्ट्स या संस्थेकडून देण्यात येणारा पहिला “हृदयेश संगीत सेवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे.

  • ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील लक्ष्मीकांत

    बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.

  • मराठी सिनेसृष्टीतील कलाकार सचिन खेडेकर

    १९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला.

    मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.

    आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.

    रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.

    त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते.सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बाबाराव दामोदर सावरकर

    बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

  • बॉलिवूडमधील ‘काका’ राजेश खन्ना

    चालण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले.

  • ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक बी. आर. इशारा

    हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.

    "चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां्च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चेतना, हम दो हमारे दो, एक नजर, मिलाप, लोग क्या कहेंगे, सौतेला पती, औरत का इन्तेकाम, घर की लाज असे विविध वादग्रस्त विषयांवरील सिनेमे त्यांनी केले. अभिनेत्री परवीन बॉबीला रूपेरी पडद्यावर झळकवण्याचे श्रेय इशारा यांनाच जाते.

    त्याशिवाय रेहाना सुल्तान, राकेश पांडे, विजय अरोरा या कलावंतांनाही त्यांनीच पहिला ब्रेक दिला.चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत.मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • विनायक जनार्दन कीर्तने

    थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.

  • गायत्री अरविंद जोशी

    सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे.