(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव

    राव यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळविण्यासाठी रुपयाचे अवमूल्यन तसेच खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे काही निर्णय घ्यावे लागले. राव यांनी दहशतग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका घेतल्या. त्यानंतर पंजाबमध्ये शांतता निर्माण झाली.

      August 10, 2025


  • स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते ना. ग. गोरे

    १९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.

      June 15, 2022


  • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी

    अभिषेक मनु सिंघवी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांपैकी एक आहेत. अभिषेक मनु सिंघवी हे एक भारतीय वकील, राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.अभिषेक सिंघवी हे पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे सदस्य असून ते काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करतात.

      February 24, 2024


  • मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे

    मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे.

    रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९४३ रोजी झाला. १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून चार ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली. नंतर सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्वंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५ चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार मिळाला होता. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तेंडुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. रामदास फुटाणे यांच्या कोपरखळया मारणाऱया वात्रटिकां इतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=pZl6pi9dKFc

    "सामना‘ चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

      April 14, 2017


  • काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका इंद्रायणी सावकार

    इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

      June 27, 2022


  • गोविंद श्रीपाद तळवलकर

    लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सडेतोड, विश्लेषक आग्रलेखांचे “आग्रलेख” हे संकलन  प्रसिद्ध आहे.

      August 2, 2017


  • दिलखुलास – प्रवीण दवणे

    प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते…

    पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून ओळख मिळवलेले आणि कुसुमाग्रजांची एक वेगळीच जवळीक लाभलेला तसंच त्यांच्या नवनवीन कविता खुद्द ज्यांनी त्यांना वाचून दाखवल्या तो भाग्यवान साहित्यिक म्हणजे प्रवीण दवणे.

    ते साहित्य क्षेत्रात येण्यासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्यांच्या शाळेत साजरा केला गेलेला शिक्षक दिन. डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूलला अकरावीला असताना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या वर्गासाठी मराठीचा तास घेतला होता. त्यांच्या शिकवणीचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि इथेच त्यांना त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांची वेगळी अशी ओळख झाली. त्यांनी मराठीचा ध्यासच घेतला आणि पुढे साहित्याचा वसाच जपण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं.

    बघता बघता त्यांच्या लिखाणाला गती आली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘मंथन’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लिखाणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिलखुलास’, ‘परीसस्पर्श’, ‘प्रकाशाची अक्षरे’, ‘रे जीवना!’, ‘सावर रे’, ‘शब्दमल्हार’, ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ अशा पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण त्यांनी केलं. आर्ताचे लेणे, आनंदाचे निमित्त, भूमीचे मार्दव, दत्ताची पालखी, एक कोरी सांज असे अनेक कवितासंग्रह त्यांचे आजवर प्रसिद्ध झाले आहेत तर आई परत येते, प्रिय पप्पा अशा अनेक नाटकांसाठीचं लिखाणदेखील त्यांनी केलं आहे. सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे कार्यक्रम आजही दर्दी रसिकांची गर्दी खेचतंय.
    मराठी साहित्यात आपला वेगळा असा ठसा उमटवलेल्या प्रवीणजींचं एक वेगळं पोर्ट्रेट मला टिपण्याची संधी मिळाली. त्यासंबंधित त्यांच्याशी बोलून मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो.

    घरात शिरताचक्षणी लगेचच लक्ष वेधून घेत ते त्यांच्या यशाचा आलेख सांगणाऱया कित्येक ट्रॉफीजची केलेली आरासवजा मांडणी. शेकडो पारितोषिकांनी नटलेली ही मांडणी प्रवीणजींच्या यशाचा आलेख स्पष्ट सांगतात. अनेक सिनेमांची छायाचित्रं असलेली, नामांकित संस्थांची नावं असलेली, अनेक नामांकित आणि मानाच्या अशा पुरस्कारांनी सजलेल्या या ट्रॉफीज नुसत्या पुनः पुन्हा बघत राहाव्या अशाच. याच ट्रॉफीजच्या पुढय़ात प्रवीणजींना उभं राहण्याची मी विनंती केली आणि यशाच्या या खुल्या शिदोरीसोबत त्यांचे काही मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले. कृष्णधवल छायाचित्रांनी त्यांचा हा इतिहास आणखीनच जिवंत वाटत होता. हे फोटो टिपत असतानाच माझ्या मनात एक प्रश्न डोकावत होता. प्रवीणजी त्यांचं लिखाण कुठे बरं करत असतील या प्रश्नाचं उत्तर थेट त्यांनीच मला दिलं. त्यांनी मला त्यांच्या लिखाणाच्या खोलीत नेलं.

    या खोलीत त्यांचं एक लिखाणाचं टेबल होतं. मागून मंद प्रकाश डोकावत होता, तर टेबल ज्या भिंतीला लागून ठेवलं होतं त्यावर एक बोर्ड होता. या बोर्डावर प्रवीणजींना ऊर्जा देणाऱया देवदेवतांची छायाचित्रं होती. टेबलाच्या एका बाजूला अनेक कागदं तर खिडकीवर एका कोपऱयात लिखाणाचं साहित्य आणि इतर बाबी विखुरलेल्या होत्या. हे सारं चित्र प्रवीणजींसोबत कॅमेऱयात कैद करण्यासाठी मी प्रवीणजींना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही लगेचच हातात लेखणी घेऊन नेमकं ते कसं लिखाण करतात त्याची एक झलकच मला दाखवली.

    गेली अनेक दशकं सतत आपल्या लिखाणातून आपला वेगळा असा आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिलेल्या साहित्यिकाचं असं पोर्ट्रेट टिपायला मिळणं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळंच असं होतं.

    प्रवीणजींचा हा फोटो माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. हा फोटो नैसर्गिक कसा वाटेल याकडे माझा कल होता आणि म्हणूनच ड्रमॅटिक लाइटिंग न करता नैसर्गिक प्रकाशात हा फोटो कसा टिपता येईल यासाठी मी झटत होतो. हा फोटो टिपताना त्यांच्या मागून खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि खोलीत असलेला प्रकाश यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मागून येणाऱया प्रकाशाचा छायाचित्रणाला त्रास होत होता.

    खिडकी बंद केली तर प्रकाशाचा स्रोत अडवला जाईल आणि फोटो नैसर्गिक येणार नाही. आणि खिडकी उघडी ठेवली तर त्यातून येणाऱया प्रकाशाचा ग्लेअर छायाचित्रात येईल अशी परिस्थिती होती. अगदी क्षणार्धात यावर तोडगा काढून या फोटोसाठी फ्लॅश म्हणजेच अनैसर्गिक लाइट वापरण्याचं मी ठरवलं. फ्लॅश लाइटची तीव्रता बाहेरून येणाऱया प्रकाशाशी मिळतीजुळती ठेवून प्रकाशयोजना केली आणि हा नैसर्गिक वाटेल असा फोटो टिपण्यात मला यश आलं. दिलखुलास साहित्यिकाचा दिलखुलास अंदाज या दिवशी मी कॅमेराबद्ध केला.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

      March 16, 2019


  • उस्ताद गुलाम मुस्तफा खान

    पिढीजात शास्त्रीय गायनाचा वारसा लाभलेले गुलाम मुस्तफा खान हे अनेक घराण्यांचे गायन आत्मसात केलेले गायक होते. त्याखेरीज ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणूनही ज्ञात होते. जाती गायन, प्रकारावर त्यांचा विशेष अभ्यास झाला होता.

      April 27, 2024


  • माझी माणसं – जिवलग

    या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील ! आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे . आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा .

      December 7, 2017


  • उमेश कामत

    मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा जन्म १२ डिसेंबर १९७८ रोजी झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.

    कायद्याच बोला,समर - एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची गजब गोष्ट ,मणि मंगळसूत्र ,थोडी खट्टी थोडी हट्टी, धागे दोरे,,परीस, टाइम प्लीज, माय डिअर यश ,लग्न पाहावे करून, पुणे वीअ बिहार ,बाळकडू, अ पेइंग घोस्ट, मुंबई टाइम, अश्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 3, 2019