(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे

    डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.

  • अभिनेता पुष्कराज चिरपुटकर

    दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्याची ही मालिका खूपच गाजली होती. तसेच त्याची आशू ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • रंजना देशमुख

    १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’

  • पांडुरंग सातू नाईक

    जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

  • तुकडोजी महाराज

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्यभट)

    जन्मस्थळ: यावली-जिल्हा अमरावती तिसरी पर्यंत शिक्षण. ईश्वरभक्तीकडे ओढा, भजनांची आवड, आकडोजी महाराज नाथपंथीय-त्यांना गुरूस्थानी. त्यानी त्यांचे नाव तुकडोजी ठेवले. भजन व कीर्तनाव्दारे राष्ट्रीय वृत्ती जागविणे. गोरगरिबांची सेवा हिच ईश्वरसेवा. ग्रामसुधारणेवर भर, ग्रामगीता ग्रंथ, अनुभव सागर, भजनावली ग्रंथ, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेश रचना, १९३५ ला मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना, जनसेवेचे केंद्र बनविणे. बावनकाशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह.

    जनसेवा नि राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वरसेवा असा दिव्य संदेश देणारे कर्ते समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचे जन्मगाव माणिक पण त्यांचे गुरू अडकुजी महाराज त्यांना प्रेमभरानं ‘तुकडा‘ म्हणून हाक मारीत. शाळेत अन गुरूंबरोबर गोड आवाजात भजने गाणारा. ‘तुकडा, पुढे खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ख्यातनाम झाला. अल्पवयातच त्यांना दारिद्र्य, भटकंती नि सामाजिक छळाच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागले. गुरूमाऊलीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊन परमात्म्याशी सायुज्जीकरण झाले. ध्रुव प्रल्हादचा आदर्श समोर ठेवीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याविषयी त्यांनी म्हटलंय ‘धरावया एकान्ती मुद्राध्यान झाली परिस्थिती कारण.

    आपले साहित्य, भजन, कीर्तन अन प्रवचनातून सर्वांगीण लोकप्रबोधन करणारे तुकडोजी महाराज जनसामान्यांचे चालते बोलते लोकविद्यापीठच होते. गावोगावी फिरून त्यांनी समाज जागृती केली. विवाह पध्दती, महिलोन्नती, रूढी निर्दालन, अंत्यविधी, शिक्षण पध्दती, प्रपंचपरमार्थ वर्णव्यवस्था, संघटना सामर्थ्य, आदर्श ग्रामराज्य आदी विषयांवर सुधारणावादी, क्रांतीकारक विचार मांडले. भोळ्याभाबडा जनतेला बोधामृत पाजलं, मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण केलं. सामाजिक सुधारणेची, देशभक्तीची, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामोध्दार नि विधायक कार्याची प्रेरणा दिली. समाजदोषांवर कठोर कोरडे ओढले.

    दारूबंदी नि व्यसनमुक्ततेचा हिरिरीने प्रचार केला. हरिजनांसाठी मंदिर खुली केली. जनमानसात खोलवर रूजलेल्या धर्म अन भक्ती भावनेला न दुखवता समाज सुधारणा नि राष्ट्रधर्माचे मर्म लोकांच्या गळी उतरवले. खंजिरीवर ‘गायिलेली त्यांची जोषपूर्ण भजने आणि गीत महाराष्ट्राच्या गावागावंतून, कोपर्‍याकोपर्‍यांतून गाजली, मनामनात रूजली, निःहृदयात ठसली.

    लोकजीवनात ती विलक्षण लोकप्रिय झाली. ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बनेंगे सेना‘ यासारखी त्यांची वीरश्रीयुक्त गाणी आजही अंगावर रोमांच उभे करतात. सबके लिये खुला है* मंदिर ये हमारा* मतभेद को भुला है मंदिर यह हमारा..हे स्वर श्रोत्यांना भावविभोर करतात.

    मूळ साहित्यिक पिंड असलेल्या तुकडोजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘आंनदामृत‘ या ग्रंथांची रचना केली. पुढे आणखीही ग्रंथ लिहिले. पण त्या सर्वात उत्कृष्ट आहे ‘ग्रामगीत‘. जणू लोकवेदच. खेडापाडातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत अवतरलेली ‘ग्रामगीता‘ म्हणजे सतत तेवणारा नंदादीपच. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, रामदासांचा दासबोध अन तुकडोजींची ग्रामगीता यामध्ये एक प्रकारचे विलक्षण साम्य आढळते.

    ‘जनसामान्यांच्या उध्दाराची तळमळ या तिन्ही ग्रंथामागील प्रेरणा आहे. ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या तुकडोजींनी ग्रामअगीतेतून ग्रामोध्दाराचा महामंत्र दिला. त्यांचा हा आदर्श साकार झालाय मोझरी जि. अहमदनगर येथील ‘गुरूकुंज‘
    आश्रमाच्या रूपानं. ग्रामविकासावर भर देताना ते म्हणतात ‘गावांगावासी जागव* भेदभावा समूळ मिटवा* उजळा ग्रामोन्नतीचा दिवा**‘ या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे सुरू केलेले ‘ग्राम स्वच्छता अभियान खरोखरीच सार्थ वाटते. ते म्हणतात, ‘कलेनेच माणसाची ओळख* एरव्ही कोण पुसतो ‘ ग्रामगीतेतील त्यांचे विश्वकुटुंब नि मानव धर्माचे विचार धर्मांधाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ग्रामगीतेतील ‘महिलोन्नती या भागात त्यांनी स्त्रीजीवनाच्या बारीक सारीक समस्यांचा उहापोह केलेला आहे. त्यातून त्यांचे ‘स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाविषयीचे द्रष्टेपण सिध्द होते.

    आपल्या जीवित काळात त्यांनी वेळोवेळी, राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चिमूर सत्याग्रहात तसेच ‘चलेजाव‘च्या स्वातंत्र्य लढात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुरूदेव मुद्रणालय, अन सेवामंडळ स्थापन करून त्यांनी गुरूदेव मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या महान कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘राष्ट्रसंत‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ३ जुलै. ११४९ रोजी त्यांनी पंढरपूर येथे आयोजित केले. विश्वधर्मपरिषद अन विश्वशांती संमेलनात ‘हर देशमे तू, हर वेशमे तू* तेरे नाम अनेक तू एकही है* हे त्यांचे प्रख्यात भजन गाऊन त्यांनी सर्वांना आकर्षित केले. भारत-चीन, भारत-पाक युध्दाच्या वेळीस सीमेवर जाऊन आपल्या देशभक्तीपर गीतांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. २२ ऑक्टोबर, १९६८ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

    आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले.

  • वैजयंती गुजर-घोलप

    बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,

    ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.

    वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.

    उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.

    तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.

    नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.

    आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.

  • रणधीर कपूर

    रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम', 'जा ने जा धुंडता फिर रहा' व 'भवरे की गुंजन ए मेरा दिल' ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील अभिनेत्री

    भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे

  • बासरीवादक अमर ओक

    अमर ओक यांच्याकडे एकूण ३० बासऱ्या आहेत, या बासऱ्या ६ इंचांपासून ३८ इंचांपर्यंतच्या आहेत. अमर ओक यांनी अवधूत गुप्ते, अजय अतुल, सलील कुलकर्णी, स्वप्नील बांदोरकर, वैशाली सामंत अश्या अनेक संगीतकारांच्या बरोबर काम केले आहे.