जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माईणकर, सुधीर
‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे. त्याचे लेखक म्हणजे पं. सुधीर माईणकर. पंच्याहत्तरीनिमित्त उद्याच्या शनिवारी त्यांचा होणारा सत्कार, हा त्यांना ‘प्रसिद्धी’ देणारा अपवादात्मकच सोहळा ठरेल. एरवी, प्रसिद्धी आणि ‘कीर्ती’ या किती निरनिराळय़ा गोष्टी आहेत, हे पाहायचे असेल तर सुधीर माईणकर यांच्या कारकीर्दीकडे पाहावे! तबलावादक म्हणून नाव कमावण्याची संधी असूनही सांगीतिक विद्वत्ता वाढवण्याची अवघड वाट माईणकर यांनी स्वीकारली.
‘अनेकांना ऐकता आले, त्यांनी संगीतात शोधलेली सौंदर्यस्थळे तबल्यात शोधून पाहाता आली,’ याचेच समाधान पं. माईणकर यांना अधिक आहे.. असे समाधान मिळवणारा गुरू विद्यार्थ्यांना थोडक्या काळातही किती भरभरून देऊ शकतो, याचा प्रत्यय मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) माईणकर यांच्या तबला कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुण वादकांना तसेच देशभरच्या विद्यापीठांत संगीताचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना आला आहे. ‘तबल्याचे व्याकरण, भाषा आणि सौंदर्यशास्त्र यांचा सखोल अभ्यासक’ ही माईणकर यांची प्रसिद्धी नव्हे, तर सिद्धीतून आलेली कीर्ती आहे. ‘..कला और शास्त्र’च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाला झाकीर हुसेन मुद्दामहून आले, ते त्यांना ही कीर्ती जवळून माहीत होती, म्हणूनच. वडील विष्णुपंत यांचा तबल्याचा नाद शालेय वयातच अंगी मुरलेल्या सुधीर यांनी बडम्े गुलाम अली, डी. व्ही. पलुस्कर, ॐकारनाथ ठाकुर, केशरबाई केरकर आणि आमीर हुसेनखाँ यांसारख्या दिग्गजांना ऐकले. तरुणपणी तबल्याची ‘गत’ हा त्यांचा खास अभ्यासविषय झाला, तो तबल्यातील दिल्ली घराण्याचे खलीफा इनाम अली खान यांची शागिर्दी केल्यानंतर. अजराडा, बनारस आदी घराण्यांचा बाजही त्यांनी अभ्यासला, पण ‘दाया’वर केवळ तर्जनी व शेजारचे बोट ठेवून तालाचे चापल्य आणि शुद्धता राखणारा दिल्ली घराण्याचा ‘चटिका बाज’ ही माईणकरांची खास शैली. गुरू म्हणून त्यांचे इनेगिने शागिद आहेत. परंतु अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनाही पं. माईणकर गुरुस्थानीच आहेत व राहतील.
अस्थमा झालेल्या रुग्णाना जगण्याची किंवा पूर्वीसारखं जीवन जगण्यासाठी उमेद आणि आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात जागवणारी विख्यात अस्थमा व अॅलर्जी तज्ञ डॉ. प्रमोद निफाडकर.
१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले.
पं. फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला. पं. फिरोज दस्तूर हे पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू होते.
पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते.एका अतिशय प्रतिभावान, प्रेमळ कलाकाराची ओळख पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे वळले, उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता.
'गोपाला मेरी करूना' ही अब्दुल करिमखा साहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतिम गायचे! साक्षात अब्दुल करीमखा साहेबच डोळ्यासमोर उभे करायचे! पं. भीमसेन जोशी आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!" मा.पं. भीमसेन जोशी नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!
पं. फिरोज दस्तूर यांचे ९ मे २००८ रोजी निधन झाले. पं.फिरोज दस्तूर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- तात्या अभ्यंकर
पं फिरोज दस्तूर -। राग मल्हार और ठुमरी
https://www.youtube.com/watch?v=ZoH5gPNElUg
'गोपाला मेरी करूना'
https://www.youtube.com/watch?v=ZZmyWYqA2wo
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते.
संगीत समीक्षक या नात्याने त्यांनी विविध इंग्रजी तसेच मराठी वृत्तपत्रांतून समीक्षालेखनही केले. आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. व्यवसायाने ते इंजिनिअर असले तरी संगीतक्षेत्रात त्यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.
शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले.
ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Copyright © 2025 | Marathisrushti