जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे नारायण धारपांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांना सावे दादा म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म १५ मार्च १८६८ रोजी झाला. दादासाहेब फाळके यांच्या पूर्वी हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांनी मुंबईत लघुपटांची निर्मिती करून भारतात चित्रपट सृष्टीला सुरवात केली होती. अजूनही सिनेमा सृष्टीत हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर हे खरे फोटोग्राफर. ल्यूमियर यांच्या भारतातील छायाचित्राच्या प्रदर्शनाने ते प्रभावित झाले, व त्यांनी लंडन हून कॅमेरा मागवला व लघुपटांची निर्मितीला सुरवात केली. १८९९ साली मुंबईच्या हैंगिग गार्डनवर पहेलवान पुंडलिक दादा व कृष्णा नावी यांच्या मध्ये कुस्तीचे आयोजन केले गेले होते, त्याचे रेकॉर्डिंग हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर केले होते. १९०१ मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालयच्या परीक्षेत र.पु.पराजंपे यांनी गणितात सर्वाधिक अंक मिळवले होते, व त्यांना बॅरीस्टर ही पद्वी मिळाली होती,ते भारतात परतले तेव्हा मुंबई बंदरावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याचे रेकॉर्डिंग पण हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर केले होते. नंतर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर फिल्मांलकन केले होते. हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांचे निधन २० फेब्रुवारी १९५८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले.
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते.
१९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले.
संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस् या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.
संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले. डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’' पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. 'श्यामची आई'चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
या चित्रपटाची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8
२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.
ज्या काळात केवळ फिरकी गोलंदाजी हेच भारतीय क्रिकेटच्या यशाचे मुख्य शस्त्र मानले जात होते, त्या काळात आपल्या मध्यम द्रुतगती गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा थरकाप उडविणारे गोलंदाज म्हणून वसंत रांजणे यांची ख्याती होती. त्या काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड आदी संघांकडून कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अनेक द्रुतगती गोलंदाज क्रिकेट क्षेत्र गाजवीत होते.
भारतीय क्रिकेट संघटकांनी मात्र रांजणे यांचे कौशल्य अपेक्षेइतके ओळखलेच नाही. त्या काळी जर आपल्या संघटकांनी फिरकीबरोबरच द्रुतगती गोलंदाजीस महत्त्व दिले असते तर विंडीजच्या तोफखान्यासारखीच कामगिरी रांजणे यांच्याद्वारे भारताला करता आली असती. कोणत्याही खेळाडूला पदार्पणाचा सामना उत्साहजनक असला तरी काहीसे दडपणही त्याच्यावर असते, मात्र रांजणे हे मुलखावेगळेच गोलंदाज होते. त्यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजीमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅट्ट्रिकसह नऊ बळी घेतले. रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. या कामगिरीमुळे त्यांना कसोटीचीही दारे खुली झाली. १९५८ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी सात कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये फलंदाजीत त्यांना कौशल्य दाखविण्याची फारशी संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजीत त्यांनी १७ बळी घेत कौतुकास्पद कामगिरी केली. १९६१-६२ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत त्यांनी कॉनरॉड हंट, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल या दिग्गज फलंदाजांना बाद करीत विंडीजला चकित केले होते. या डावात ७२ धावांमध्ये चार बळी ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांनी प्रथम दर्जाच्या ६४ सामन्यांमध्ये १७५ बळी मिळविले. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया त्यांनी सहा वेळा केली, तर एकाच सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे ही त्यांची हुकमत होती. इंग्लिश वातावरणात चमक दाखविण्याची शैली त्यांच्याकडे होती. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व त्यांनी गाजविले होते. त्यांची भेदक शैली पाहून फलंदाजीच्या वेळी त्यांना जखमी करीत त्यांना गोलंदाजीस येऊच द्यायचे नाही हे तंत्र विंडीजने यशस्वी केले होते. तरीही रांजणे यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत शानदार कामगिरी केली. फलंदाजीत त्यांनी ७०१ धावा केल्या. त्यामध्ये नाबाद ५६ ही त्यांची सर्वाधिक कामगिरी होती. अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत क्रिकेट कारकीर्द करणाऱ्या रांजणे यांना तत्कालीन अन्य क्रिकेटपटूंइतकी लोकप्रियता लाभली नसेल, पण प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या या खेळाडूने सतत आपल्या संघाच्याच हिताचा विचार करीत कारकीर्द केली. त्यामुळेच ‘अजातशत्रू क्रिकेटपटू’ म्हणूनच त्यांची ख्याती होती. रांजणे यांचा क्रिकेटचा वारसा त्यांचा मुलगा सुभाष यांनी पुढे ठेवताना महाराष्ट्राकडून प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. आता सुभाष यांचा मुलगा शुभम हा १९ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून चमक दाखवीत आहे. आपल्या आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करीत आहे.
नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti