तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्यभट)

जन्मस्थळ: यावली-जिल्हा अमरावती तिसरी पर्यंत शिक्षण. ईश्वरभक्तीकडे ओढा, भजनांची आवड, आकडोजी महाराज नाथपंथीय-त्यांना गुरूस्थानी. त्यानी त्यांचे नाव तुकडोजी ठेवले. भजन व कीर्तनाव्दारे राष्ट्रीय वृत्ती जागविणे. गोरगरिबांची सेवा हिच ईश्वरसेवा. ग्रामसुधारणेवर भर, ग्रामगीता ग्रंथ, अनुभव सागर, भजनावली ग्रंथ, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेश रचना, १९३५ ला मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना, जनसेवेचे केंद्र बनविणे. बावनकाशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह.

जनसेवा नि राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वरसेवा असा दिव्य संदेश देणारे कर्ते समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचे जन्मगाव माणिक पण त्यांचे गुरू अडकुजी महाराज त्यांना प्रेमभरानं ‘तुकडा‘ म्हणून हाक मारीत. शाळेत अन गुरूंबरोबर गोड आवाजात भजने गाणारा. ‘तुकडा, पुढे खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ख्यातनाम झाला. अल्पवयातच त्यांना दारिद्र्य, भटकंती नि सामाजिक छळाच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागले. गुरूमाऊलीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊन परमात्म्याशी सायुज्जीकरण झाले. ध्रुव प्रल्हादचा आदर्श समोर ठेवीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याविषयी त्यांनी म्हटलंय ‘धरावया एकान्ती मुद्राध्यान झाली परिस्थिती कारण.

आपले साहित्य, भजन, कीर्तन अन प्रवचनातून सर्वांगीण लोकप्रबोधन करणारे तुकडोजी महाराज जनसामान्यांचे चालते बोलते लोकविद्यापीठच होते. गावोगावी फिरून त्यांनी समाज जागृती केली. विवाह पध्दती, महिलोन्नती, रूढी निर्दालन, अंत्यविधी, शिक्षण पध्दती, प्रपंचपरमार्थ वर्णव्यवस्था, संघटना सामर्थ्य, आदर्श ग्रामराज्य आदी विषयांवर सुधारणावादी, क्रांतीकारक विचार मांडले. भोळ्याभाबडा जनतेला बोधामृत पाजलं, मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण केलं. सामाजिक सुधारणेची, देशभक्तीची, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामोध्दार नि विधायक कार्याची प्रेरणा दिली. समाजदोषांवर कठोर कोरडे ओढले.

दारूबंदी नि व्यसनमुक्ततेचा हिरिरीने प्रचार केला. हरिजनांसाठी मंदिर खुली केली. जनमानसात खोलवर रूजलेल्या धर्म अन भक्ती भावनेला न दुखवता समाज सुधारणा नि राष्ट्रधर्माचे मर्म लोकांच्या गळी उतरवले. खंजिरीवर ‘गायिलेली त्यांची जोषपूर्ण भजने आणि गीत महाराष्ट्राच्या गावागावंतून, कोपर्‍याकोपर्‍यांतून गाजली, मनामनात रूजली, निःहृदयात ठसली.

लोकजीवनात ती विलक्षण लोकप्रिय झाली. ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बनेंगे सेना‘ यासारखी त्यांची वीरश्रीयुक्त गाणी आजही अंगावर रोमांच उभे करतात. सबके लिये खुला है* मंदिर ये हमारा* मतभेद को भुला है मंदिर यह हमारा..हे स्वर श्रोत्यांना भावविभोर करतात.

मूळ साहित्यिक पिंड असलेल्या तुकडोजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘आंनदामृत‘ या ग्रंथांची रचना केली. पुढे आणखीही ग्रंथ लिहिले. पण त्या सर्वात उत्कृष्ट आहे ‘ग्रामगीत‘. जणू लोकवेदच. खेडापाडातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत अवतरलेली ‘ग्रामगीता‘ म्हणजे सतत तेवणारा नंदादीपच. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, रामदासांचा दासबोध अन तुकडोजींची ग्रामगीता यामध्ये एक प्रकारचे विलक्षण साम्य आढळते.

‘जनसामान्यांच्या उध्दाराची तळमळ या तिन्ही ग्रंथामागील प्रेरणा आहे. ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या तुकडोजींनी ग्रामअगीतेतून ग्रामोध्दाराचा महामंत्र दिला. त्यांचा हा आदर्श साकार झालाय मोझरी जि. अहमदनगर येथील ‘गुरूकुंज‘
आश्रमाच्या रूपानं. ग्रामविकासावर भर देताना ते म्हणतात ‘गावांगावासी जागव* भेदभावा समूळ मिटवा* उजळा ग्रामोन्नतीचा दिवा**‘ या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे सुरू केलेले ‘ग्राम स्वच्छता अभियान खरोखरीच सार्थ वाटते. ते म्हणतात, ‘कलेनेच माणसाची ओळख* एरव्ही कोण पुसतो ‘ ग्रामगीतेतील त्यांचे विश्वकुटुंब नि मानव धर्माचे विचार धर्मांधाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ग्रामगीतेतील ‘महिलोन्नती या भागात त्यांनी स्त्रीजीवनाच्या बारीक सारीक समस्यांचा उहापोह केलेला आहे. त्यातून त्यांचे ‘स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाविषयीचे द्रष्टेपण सिध्द होते.

आपल्या जीवित काळात त्यांनी वेळोवेळी, राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चिमूर सत्याग्रहात तसेच ‘चलेजाव‘च्या स्वातंत्र्य लढात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुरूदेव मुद्रणालय, अन सेवामंडळ स्थापन करून त्यांनी गुरूदेव मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या महान कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘राष्ट्रसंत‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ३ जुलै. ११४९ रोजी त्यांनी पंढरपूर येथे आयोजित केले. विश्वधर्मपरिषद अन विश्वशांती संमेलनात ‘हर देशमे तू, हर वेशमे तू* तेरे नाम अनेक तू एकही है* हे त्यांचे प्रख्यात भजन गाऊन त्यांनी सर्वांना आकर्षित केले. भारत-चीन, भारत-पाक युध्दाच्या वेळीस सीमेवर जाऊन आपल्या देशभक्तीपर गीतांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. २२ ऑक्टोबर, १९६८ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्यभट)

जन्मस्थळ: यावली-जिल्हा अमरावती तिसरी पर्यंत शिक्षण. ईश्वरभक्तीकडे ओढा, भजनांची आवड, आकडोजी महाराज नाथपंथीय-त्यांना गुरूस्थानी. त्यानी त्यांचे नाव तुकडोजी ठेवले. भजन व कीर्तनाव्दारे राष्ट्रीय वृत्ती जागविणे. गोरगरिबांची सेवा हिच ईश्वरसेवा. ग्रामसुधारणेवर भर, ग्रामगीता ग्रंथ, अनुभव सागर, भजनावली ग्रंथ, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेश रचना, १९३५ ला मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना, जनसेवेचे केंद्र बनविणे. बावनकाशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह.

जनसेवा नि राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वरसेवा असा दिव्य संदेश देणारे कर्ते समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचे जन्मगाव माणिक पण त्यांचे गुरू अडकुजी महाराज त्यांना प्रेमभरानं ‘तुकडा‘ म्हणून हाक मारीत. शाळेत अन गुरूंबरोबर गोड आवाजात भजने गाणारा. ‘तुकडा, पुढे खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ख्यातनाम झाला. अल्पवयातच त्यांना दारिद्र्य, भटकंती नि सामाजिक छळाच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागले. गुरूमाऊलीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊन परमात्म्याशी सायुज्जीकरण झाले. ध्रुव प्रल्हादचा आदर्श समोर ठेवीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याविषयी त्यांनी म्हटलंय ‘धरावया एकान्ती मुद्राध्यान झाली परिस्थिती कारण.

आपले साहित्य, भजन, कीर्तन अन प्रवचनातून सर्वांगीण लोकप्रबोधन करणारे तुकडोजी महाराज जनसामान्यांचे चालते बोलते लोकविद्यापीठच होते. गावोगावी फिरून त्यांनी समाज जागृती केली. विवाह पध्दती, महिलोन्नती, रूढी निर्दालन, अंत्यविधी, शिक्षण पध्दती, प्रपंचपरमार्थ वर्णव्यवस्था, संघटना सामर्थ्य, आदर्श ग्रामराज्य आदी विषयांवर सुधारणावादी, क्रांतीकारक विचार मांडले. भोळ्याभाबडा जनतेला बोधामृत पाजलं, मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण केलं. सामाजिक सुधारणेची, देशभक्तीची, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामोध्दार नि विधायक कार्याची प्रेरणा दिली. समाजदोषांवर कठोर कोरडे ओढले.

दारूबंदी नि व्यसनमुक्ततेचा हिरिरीने प्रचार केला. हरिजनांसाठी मंदिर खुली केली. जनमानसात खोलवर रूजलेल्या धर्म अन भक्ती भावनेला न दुखवता समाज सुधारणा नि राष्ट्रधर्माचे मर्म लोकांच्या गळी उतरवले. खंजिरीवर ‘गायिलेली त्यांची जोषपूर्ण भजने आणि गीत महाराष्ट्राच्या गावागावंतून, कोपर्‍याकोपर्‍यांतून गाजली, मनामनात रूजली, निःहृदयात ठसली.

लोकजीवनात ती विलक्षण लोकप्रिय झाली. ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बनेंगे सेना‘ यासारखी त्यांची वीरश्रीयुक्त गाणी आजही अंगावर रोमांच उभे करतात. सबके लिये खुला है* मंदिर ये हमारा* मतभेद को भुला है मंदिर यह हमारा..हे स्वर श्रोत्यांना भावविभोर करतात.

मूळ साहित्यिक पिंड असलेल्या तुकडोजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘आंनदामृत‘ या ग्रंथांची रचना केली. पुढे आणखीही ग्रंथ लिहिले. पण त्या सर्वात उत्कृष्ट आहे ‘ग्रामगीत‘. जणू लोकवेदच. खेडापाडातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत अवतरलेली ‘ग्रामगीता‘ म्हणजे सतत तेवणारा नंदादीपच. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, रामदासांचा दासबोध अन तुकडोजींची ग्रामगीता यामध्ये एक प्रकारचे विलक्षण साम्य आढळते.

‘जनसामान्यांच्या उध्दाराची तळमळ या तिन्ही ग्रंथामागील प्रेरणा आहे. ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या तुकडोजींनी ग्रामअगीतेतून ग्रामोध्दाराचा महामंत्र दिला. त्यांचा हा आदर्श साकार झालाय मोझरी जि. अहमदनगर येथील ‘गुरूकुंज‘
आश्रमाच्या रूपानं. ग्रामविकासावर भर देताना ते म्हणतात ‘गावांगावासी जागव* भेदभावा समूळ मिटवा* उजळा ग्रामोन्नतीचा दिवा**‘ या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे सुरू केलेले ‘ग्राम स्वच्छता अभियान खरोखरीच सार्थ वाटते. ते म्हणतात, ‘कलेनेच माणसाची ओळख* एरव्ही कोण पुसतो ‘ ग्रामगीतेतील त्यांचे विश्वकुटुंब नि मानव धर्माचे विचार धर्मांधाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ग्रामगीतेतील ‘महिलोन्नती या भागात त्यांनी स्त्रीजीवनाच्या बारीक सारीक समस्यांचा उहापोह केलेला आहे. त्यातून त्यांचे ‘स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाविषयीचे द्रष्टेपण सिध्द होते.

आपल्या जीवित काळात त्यांनी वेळोवेळी, राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चिमूर सत्याग्रहात तसेच ‘चलेजाव‘च्या स्वातंत्र्य लढात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुरूदेव मुद्रणालय, अन सेवामंडळ स्थापन करून त्यांनी गुरूदेव मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या महान कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘राष्ट्रसंत‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ३ जुलै. ११४९ रोजी त्यांनी पंढरपूर येथे आयोजित केले. विश्वधर्मपरिषद अन विश्वशांती संमेलनात ‘हर देशमे तू, हर वेशमे तू* तेरे नाम अनेक तू एकही है* हे त्यांचे प्रख्यात भजन गाऊन त्यांनी सर्वांना आकर्षित केले. भारत-चीन, भारत-पाक युध्दाच्या वेळीस सीमेवर जाऊन आपल्या देशभक्तीपर गीतांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. २२ ऑक्टोबर, १९६८ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Author