(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड

    डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. त्यांचा जन्म ११ आक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली निशिगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्ना्सात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्यान आल्या होत्या.

    १९९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. काळाच्या बंधनास न जुमानणारं लावण्य, सौंदर्य खचितच ज्या व्यक्तिंवर मेहरनजर करतं, त्यांपैकी एक म्हणजे निशीगंधाजी. १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. गालावरल्या त्या दोन खळ्यांनी कित्येक श्वासांचे लगाम खेचले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.

    २००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. नंतर निशीगंधा वाड यांना कोलंबिया विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली आहे. निशीगंधा वाड. एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले. 'शेजारी-शेजारी', 'वाजवा रे वाजवा', 'एकापेक्षा एक', 'प्रतिकार', 'सासर माहेर', 'अशी ही ज्ञानेश्वरी' यांसारखे मराठी तसेच 'सलिम लंगडे पे मत रो', 'कर्म योद्धा', 'दादागिरी', 'आप मुझे अच्छे लगने लगे' यांसारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. 'कुलवधू' (मराठी) व 'झी हॉरर शो' (हिंदी) यांसारख्या मालिकाही त्यांनी केल्या.

    अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी लिहीलेल्या पाच पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. मराठी व ब्रिटीश रंगभूमी व चित्रसृष्टीतील दृष्टीकोनातून स्त्रियांची समाजातील बदलती भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या विद्वत्तेचीही ग्वाही देते. रिलीजीयस हार्मनी फाऊंडेशन निर्मित धार्मिक सलोखा या विषयावरील व्याख्यानपटाच्या त्या व्याख्यात्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

  • अभिनेते शशी कपूर

    हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.

  • जगणं विसरू नकोस….

    प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता.... त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......

    "जगणं विसरू नकोस...."

    "सखे,"

    जगाकडे रोज नव्याने..
    बघणं विसरू नकोस....
    सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस....

    तुला निराश करणारे
    अनेक क्षण येतील...
    पाय घालून पाडणारे
    अनेक जण येतील...

    त्यांना घाबरून तुझं तू
    चालणं विसरू नकोस..
    नि सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस.... १

    तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
    रुचेलच असं नाही...
    कौतुकासाठी तुझं नाव
    सुचेलच असं नाही...

    कौतुक मिळवण्यासाठी, काम
    करणं विसरू नकोस...
    नि सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस.... २

    तुला सुद्धा मन आहे
    याचा विचार कर...
    बदलवणा-या मानसिकतेचा
    जोरात प्रचार कर...

    काळजापासून माया तुझी
    झरणं विसरू नकोस...
    नि सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस.... ३

    रडावंसं वाटेल तेव्हा
    रडून मोकळी हो...
    लढावंसं वाटेल तेव्हा,
    लढून मोकळी हो....

    रडण्यामध्ये तुझं तू
    लढणं विसरू नकोस..
    नि सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस.... ४

    तुला कुणाला पुरावे
    द्यायची गरज नाही...
    कुणासाठी तुला परतून
    यायची गरज नाही....

    ध्येयासाठी पुढेपुढे
    चालणं विसरू नकोस..
    नि सखे तू मुक्तपणे तुझं..
    जगणं विसरू नकोस.... ५

  • अभिनेता दिलीप जोशी

    तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं. १९९७ मध्ये क्या बात है या टी.व्ही. मालिकेतून दिलीप जोशी यांनी करिअरला सुरुवात केली.

  • सदाशिव पांडुरंग देशपांडे

    निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले

  • शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबई येथे झाला.

    श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. ते एमएस ऑर्थोपेडीक ( MS Orthopaedic) आहेत. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर २०१४ मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य मिळवून विजय मिळवला.

    गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात चांगला जम बसवला आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • अमोल बावडेकर

    अमोल बावडेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. अमोल बावडेकर हे अभिनेता आणि गायक म्हणून ह्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहेत.

  • शंतनू भडकमकर

    ब्रोकरेज फर्म्स' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजकालच्या बिझनेस युगात सर्वांनाच त्यांची गरज असते. 'ब्रोकरेज बिझनेस' हा सचोटीने, कायद्याच्या चौकटीत राहून चोखपणे करता येतो हे जाणणार्‍या लोकांची संख्या मात्र कमीच असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारातील एक आघाडीचा मालवाहतूक व्यावसायिक कंपनीसमूह म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मुंबईच्या आणि मराठी मालक असलेल्या 'एटीसी ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांची 'इंन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन' ('आयएफसीबीए') या संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व मराठी माणसांना अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही.

    मुंबई विद्यापीठाची 'बी.एस्सी.' पदवी मिळविल्यानंतर भडकमकरांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'ची (बोस्टन) 'ओनर्स प्रेसिडेन्ट्स मॅनेजमेन्ट', 'रूल नाइन' (कस्टम्स एक्झॅमिशन क्वॉलिफाइड), 'फेडरेशन ऑफ इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन' या परीक्षा उतीर्ण केल्या. वडील श्रीराम मोरश्वर भडकमकर यांनी १९५७ साली मुंबईत स्थापन केलेल्या 'इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग' व्यवसायाची सूत्रे शंतनू यांनी १९८१ साली हाती घेतली.

    आजमितीला १० कंपन्यांचा विस्तार असलेला 'एटीसी ग्रुप' देशातील एक प्रमुख 'फुल सर्व्हिस इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर' म्हणून ओळखला जातो. 'डोअर टू डोअर इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स'मध्ये 'एटीसी'चे स्पेशलायझेशन आहे. शंतनू भडकमकर यांनी 'इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन'चे मॅनेजिंग डायरेक्टर, 'काऊन्सिल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेन्ट प्रोफेशनल्स'च्या भारतीय शाखेचे अध्यक्षपद, 'फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया'चे अध्यक्षपद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्षपद, 'असोसिएशन ऑफ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स इन इंडिया'चे उपाध्यक्षपद आणि 'चायना इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स प्रोफेशनल नेटवर्क'चे उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदार्‍या चोखपणे पार पाडल्या आहेत व पाडत आहेत.

    'एटीसी ग्रुप'च्या व्यवसायाचा व्याप देशभरातील १५ शहरांतील २० कार्यालयांद्वारे सांभाळला जात असून, युनायटेड स्टेट्समध्ये एक 'ओव्हरसीज ऑफिस' कार्यरत आहे. 'मराठी माणूस व्यवसाय, उद्योगात मागे असतो, त्याला बिझनेस कळत नाही' असे म्हणणे आता इतिहासजमा झाले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • मराठी चित्रपटसृष्टीचे मामा अशोक सराफ

    मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जुन १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. आपली पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले.

    ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही हिंदी उल्लेखनीय चित्रपट केलेले आहे. अशोक सराफ यांची खरी ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नारी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मिळच आहे. क्रूरकर्मा खलनायक ते उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मवर आधारित चित्रपटातील भस्म्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. अशोक सराफ-दादा कोंडके, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ-सचिन, अशोक सराफ-महेश कोठारे या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना “अशोकमामा’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला. अशोकमामाचे बारसे कसे झाले, याविषयीचा किस्सा सांगताना, अशोक सराफ म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ.. पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे. आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. अशोकमामाचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला. आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्किाल टिप्पणी ते लगेच करुन टाकतात. मला थेट “अशोक’ अशी हाक मारणारे तसे कमीच. “अशोकजी’ असे कुणी म्हटले, तर ते माझी मलाच झेपत नाही. तर अशोक सर वगैरे माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या “अशोकमामा’, या हाकेतला गोडवाच आपल्याला अधिक भावतो. मा.अशोक सराफ यांना अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    अशोक सराफ याची कारकीर्द
    मराठी चित्रपट.
    आई नं. वन , आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला , गंमत जंमत , भुताचा भाऊ , माझा पती करोडपती, एक उनाड दिवस ,अफलातून , गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा , सगळीकडे बोंबाबोंब , आयत्या घरात घरोबा , कुंकू ,बळीराजाचं राज्य येऊ दे , घनचक्कर , तू सुखकर्ता ,नवरा माझा नवसाचा , वजीर, अनपेक्षित, एकापेक्षा एक, चंगू मंगू , शुभमंगल सावधान, नवरा माझा ब्रम्हचारी ,आमच्या सारखे आम्हीच ,बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला ,गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम,अरे संसार संसार , कळत नकळत, आपली माणसं, धूमधडाका ,एक डाव धोबीपछाड,आयडियाची कल्पना.

    हिंदी चित्रपट.
    कुछ तुम कहो कुछ हम कहें , बेटी नं. वन , कोयला , गुप्त, संगदिल सनम, जोरू का गुलाम, खूबसूरत, येस बॉस, करण अर्जुन ,सिंघम .
    नाटके.
    हमीदाबाईची कोठी,अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय दूरदर्शन मालिका
    टन टना टन (ई.टीव्ही मराठी) , हम पांच (झी वाहिनी), डोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी), छोटी बडी बाते.

  • प्रा. बापुराव जगताप

    प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.