जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रत्येकजण राजपाल यादव यांच्या अभिनयाचे फॅन आहेत. जरी त्याची उंची खूप कमी असली, तरी त्याची प्रतिभा तितकीच मोठी आहे.
परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच आहे. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र मिळाले. देशाने २६ जानेवारी १९५० साली नवीन संविधानाचा स्वीकार केला आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम करण्याचा बहुमान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना लाभला. ते १९६२ पर्यंत या पदावर होते.
रोशनलाल नागरथ ऊर्फ "रोशन" यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी गुजरानवाला येथे झाला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओ स्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले.
१९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशन यांना दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांच्या १९४९ ते १९६७ अशा आपल्या कारकीर्दीत आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात म्हणजेच दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात.
इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशन यांनी ५२ गीतकारांबरोबर काम केले. रोशन हे संगीतकार राजेश रोशन व अभिनेते राकेश रोशन यांचे वडील व अभिनेते ऋतिकचे आजोबा. रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=kh8PqtYUQCc
https://www.youtube.com/watch?v=EECgvIxsHCs
https://www.youtube.com/watch?v=q1RgtdfWTV0
राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे.
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये कविता, कथा, एकपात्री प्रयोग, नाटक, विज्ञानकथा अशा विविध वाङ्मय प्रकारांची निर्मिती केली आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये लेखन केले आहे. गुजराती आणि कानडीमध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तके भाषांतरीत झाली आहेत. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक एकांकिकांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांच्या लेखनाला आजपर्यंत सुमारे १७ विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
अक्कम बक्कम, छत्रीची जादू आणि इतर कथा, दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी, अजब कथा, अशोक आणि अमीन, आई आणि बाळ, आमची शाळा, मगरू आणि इतर कथा, गंमत गँग, गंमत जंमत, गंमतशाळा भाग १, २, गुळाची ढेप आणि सरबत, चटकन पटकन वाचन लेखन, झॅकपॅक शोध आणि इतर कथा, बंटू बसला ढगात आणि इतर कथा, ससुल्या आणि इतर कथा, विज्ञान गमती-सहज सोपे प्रयोग, माझे मराठी निबंध, भाग १,२, सु सुटका आणि रंगीत डोंगर, प्रेमळ भूत संच अशी त्यांची ५० हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला.
चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. गोविंदस्वामी आफळे हे तरुण - बाल - वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते. तसेच सुधाताईही उत्तम कीर्तन प्रवचन करीत असत. त्या होमिओपॅथीक डॉक्टर ही होत्या. आणि हिंदुमहासभेच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. केली आहेत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. शाळा महाविद्यालयात असताना देखील काही कीर्तने केली. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं.आगाशे बुवा, पं.शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अश्या अनेकांचे मार्गदर्शन लाभले. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना चारुदत्त आफळे यांनी ऑर्गन साथ केली आहे.
१९८८ ते २०१८ या तीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यगीते कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. महाराष्ट्रासह इंदोर, उज्जैन (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), ग्वाल्हेर, लखनौ (उत्तरप्रदेश), दिल्ली, कोलकाता (बंगाल), हैद्राबाद (आंध्र), बेळगाव, बेंगलोर (कर्नाटक) इ. प्रांतातून कीर्तन, प्रवचने झाली. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला.
कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात. राजर्षी शाहू महाराजांवरील शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे काम करण्याचेही त्यांना भाग्य मिळाले.हेमंती बॅनर्जी कृत बालगंधर्व वरील माहितीपटात बुवांनी बालगंधर्वांची भूमिका केली. ज्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
नाट्यसेवेसाठी त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार मराठी नाट्य परिषदेकडून – पं. पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून – बालगंधर्व पुरस्कार, मंगेशकर प्रतिष्ठानाकडून – मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, व या वर्षी पुणे महानगर पालिकेकडून "बालगंधर्व पुरस्कार" असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
माधव शिरवळकर हे एक इंटरनेटवरील लेखक आहेत
कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर (उज्जैन ) येथे झाला. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. मा.प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या मा.प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मा. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी प्रदीप यांची काही गाजलेली गाणी
अब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)
आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)
आज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)
आज मौसम सलोना सलोना रे (झूला)
आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)
इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)
ऊपर गगन विशाल (मशाल)
ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी (गीत)
ओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)
कान्हा बजाये बांसरी और ग्वाले... (नास्तिक)
गगन झन झना रहा (नास्तिक)
चना जोर गरम बाबू (बंधन)
चल चल रे नौजवान (बंधन)
चल मुसाफिर चल (कभी धूप कभी छाँव)
चलो चले माँ (जागृति
देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)
पपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)
शिवसेना, भाजप, आणि लोकभारती पक्षाच्या आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर शहराच्या विकासाला गती देण्याची यशस्वी कामगिरी राजश्री शिंदे यांनी केली. त्यांनी महापौरपद स्वीकारल्यापासून शहराचा विकास झपाटयाने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. यात शहराच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करून त्यात इमारतीची उंची वाढविणे, आरक्षण स्थलांतर, अंतर्गत बदल आणि चटई क्षेत्राच्या लगतच्या जागेत बदल करणे बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहराच्या विविध ठिकाणी वाहतुक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यापैकी उल्हासनगर स्टेशनला सॅटिस, पादचारी पुल, रिक्षा स्टँड, वाहनतळ, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, गणेश विसर्जन घाट असे महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले. शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण केले.
गोरगरिबांसाठी त्यांनी समाजमंदिरे बांधून दिली. त्यांच्या कारकिर्दित ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti