(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ

    महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला.

    संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती.

    नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली.

    या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली.

    १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात.

    नूरजहाँ फाळणी नंतर मुंबईहून लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले.

    नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडावा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले.

    पाकिस्तानात पार्श्वगायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली.

    त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता.

    नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • राजू भाई

    २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला.

  • अभिनेता सुश्रुत मंकणी

    अभिनेता सुश्रुत मंकणी यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी रोजी झाला.

    प्रसिद्ध अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा असलेल्या सुश्रुत मंकणीने देवयानी या मालिकेत काम केले आहे. सुश्रुत मंकणीने तुझ्यात जीव रंगला आणि गर्ल्स हॉस्टेल मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मुग्धा परांजपेशी नुकतेच लग्न केले आहे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे

    कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.

  • वैजयंती गुजर-घोलप

    बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,

    ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.

    वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.

    उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.

    तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.

    नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.

    आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.

  • मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

    गोव्यातील बोरी हे मा.सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

    २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता.

    तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • आविष्कार दारव्हेकर

    आविष्कार दारव्हेकर

    आविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.

  • काशिनाथ बोडस

    ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.

  • माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले

    माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.

  • ग्रीन टीच्या संशोधिका मिशियो शुजीमुरा

    शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली.