(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • संगीतकार , गायक सुधीर फडके

    सुधीर फडके यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कै . वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात एच .एम. व्ही . या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली.

  • श्रीकांत माने

    माने, श्रीकांत

    सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.

    त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.

  • शाहीर पठ्ठे बापूराव

    पठ्ठे बापूरावांचे खर नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्याय जात्यावरच्या ओव्यां ऐकून ऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी` या नावाने लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा.

    ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव` म्हणून ते प्रसिद्धीला आले.

    `पठ्ठेबापूराव`, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्याीत पसरली.

    १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. मा.पी.पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा

    आज ३० नोव्हेंबर
    आज जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा वाढदिवस.
    जन्म.३० नोव्हेंबर १९३६
    लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर कुमार यांच्या बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), व मराठीत तर त्यांनी अमराठी असुन ठसा उमटवला. शुक्रतारा मंद वारा (अरुण दाते यांच्या बरोबर) आणि विसरशील खास मला ही गाणी मा.सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर ती गाणी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
    विसरशील खास मला” हे मालकंस रागातील नितांत सुंदर गीत. त्यावेळेस यशवंत देव आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीला होते. दोन कार्यक्रमांमधील जागा भरून काढण्यासाठी त्यांना एक गाणे हवे होते. “विसरशील खास मला” हे गीत त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याकडून म्हणून घेतले. हे गीत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले. त्यावेळेस कामात खूप व्यस्थ असलेल्या आशा भोसले यांना हे गीत खूप भावले. त्यानंतर काही वर्षांनी आशा भोसले यांच्या विनंतीवरून यशवंत देव यांनी हे गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. शुक्रतारा मंदवारा हे गाणे जवळ जवळ १०० चे वर सुधा मल्होत्रा शुक्रतारा मंदवारा या कार्यक्रमाच्या निमिताने अरुण दाते यांच्या बरोबर गायल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गोपी कुकडे

    श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.

  • हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार

    सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी झाला. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या मा.ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांत भूमिका केल्या. ललिता पवार यांनी आपल्या भूमिकांतून सिनेरसिकांना अत्यंत प्रखर अशा सासू किंवा आई व खलनायिकेचे दर्शन घडविलेले आहे. त्यांची सासूची व आईची भूमिका चिरस्मरणात राहात आलेली आहे. विशेष म्हणजे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकार केलेली ‘मंथरा’ ही अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांच्या चिरस्मरणात आहे. मा.ललिता पवार ह्या बॉलीवुड मधील पहिली अभिनेत्री की ज्यांनी १९३५ साली आलेल्या हिंमते मर्द या चित्रपटात बिकिनी घातली होती. हृषीकेश मुखर्जीच्या ‘अनाडी’मध्ये त्यांनी साकार केलेली ‘मिसेस डिसा’ म्हणजे त्यांच्या अभिनयाचा कळस होता. १९४३ मध्ये मराठी नाटय़संमेलन पार पडले, त्यामध्ये मा.लता मंगेशकर यांनी मास्टर दीनानाथ यांची दोन नाटय़पदे गाऊन सर्वाची वाहवा मिळवली, मा.ललिता पवारांनी लताचे जाहीर कौतुक करून त्यांना दोन सोन्याच्या कुडय़ा भेट दिल्या. व लता मंगेशकर यांच्या आयुष्यातला पहिला जाहीर सत्कार मा.ललिता पवार यांनी केला होता. २४ फेब्रुवारी १९९८ ललिता पवार यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अरुण बाळकृष्ण कर्णिक

    अरुण बाळकृष्ण कर्णिक नदी आणि समुद्रावरील बांधकामासंबंधी सल्लागार आहेत.

  • गायक भरत बलवल्ली

    खड्या आवाजातली पांढरी सहा ची अद्भुत गायकी असलेले भरत बलवल्ली यांचा जन्म २८ मार्च १९८८ रोजी झाला.
    भरत बलवल्ली हे लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज; विलंबीत, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयीत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणा-या भावना ही सर्व भरत बलवल्ली यांची बलस्थानं आहेत. भरत भरत बलवल्ली यांचे वडील तबला वादक असल्याने त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतंच, पंडीत यशवंतबुवा जोशी आणि पंडीत उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरत बलवल्ली यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. पंडीत तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले. लहानपणी बालगंधर्वासह अनेक थोरामोठय़ा गायकांची गाणी ते ऐकत होते, मात्र त्यांनी मा.दीनानाथांची गाणी ऐकली आणि आतूनच त्यांना असं जाणवलं की हे गाणे तर मी गाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्यांची पारायणं केली, भरत बलवल्ली आवाजातील दीनानाथांची गाणी श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासारख्या जेष्ठ संगीतकारांनी ऐकली, त्यांनी दीनानाथांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेलं. हा मुलगा हुबेहूब तसंच गातोय, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

    भरत बलवल्ली यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती गणपतराव मोहिते ऊर्फ मा. अविनाश यांच्याकडून. मा.मोहिते हे तर दीनानाथांचे स्नेही व सहकारी. भरत बलवल्ली यांनी आतापर्यंत देश विदेशात सुमारे १५० हून अधिक मैफीली सादर केल्या असून लंडन मधल्या लेसिस्टर आणि कॉलीनडेल, स्वितझर्लंडमधल्या झ्युरीक, बाझल या परदेशातल्या मैफीली आणि स्वरांकीत मल्हार महोत्सव, दिनानाथ मंगेशकर स्मृती समारोह, पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, पं मल्लिकार्जून मन्सूर स्मृती समारोह, पं बसवराज राजगुरू स्मृती समारोह, सानरसखा संगीत महोत्सव या भारतातल्या मैफीलींचा त्यांनी गाजवलेल्या आहेत. देणे मंगेशाचे हा पं. दीनानाथ मंगेशकरांच्या गीतांवर आधारीत कार्यक्रम आणि भक्तीरस हा अभंग, भजने, निर्गुणी भजने, दोहे इत्यादींचा समावेश असलेला हे ही कार्यक्रम भरत सादर करतात. मा. दीनानाथ मंगेशकर ज्यापद्धतीने शास्रीय संगीत गायचे ती गायकी विलक्षण अवघड अशी गायकी आहे. भरत बलवल्ली यांनी या गायकीवर केवळ संशोधनच केलं नाही तर त्या गायकीचं शिवधनुष्य यथार्थपणे देणे मंगेशाचे या कार्यक्रमात पेलूनही दाखवलंय. याबद्दल मंगेशकर कुटंबातल्या पाचही भावंडानी याबद्दल त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्याचे विशेष आभारही मानले आहेत. भरत बलवल्ली यांना वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळली आहे. या व्यतिरीक्त भरत बलवल्ली यांना आतापर्यंत पंडीत विष्णू दिगंबर शास्त्री पुरस्कार, स्वर संस्कार, वाद्यसंगीतामध्ये पहिला क्रमांक आणि कै. विश्वनाथ पेंढारकर पुरस्कार, स्वरसाधना समिती लाईट क्लासिकल व्होकल्समध्ये प्रथम पारीतोषिक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन स्पर्धेत प्रथम पारितोषिक, कवी वसंत बापट गीत गौरव पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. भरत बलवल्ली यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मंगेश तेंडुलकर यांनी भरत बलवल्ली यांच्यावर लिहीलेला लेख

    http://m.maharashtratimes.com/no/-/articleshow/6041852.cms
    भरत बलवल्ली यांची काही गाणी

    https://www.youtube.com/watch?v=nwgLHEoXa7w

    https://www.youtube.com/watch?v=o9G4GdgCASc

    https://www.youtube.com/watch?v=F55SMb1jYsc

    https://www.youtube.com/watch?v=3qm38hHBC9M

  • पं. भीमसेन जोशी – थोडक्यात जीवनप्रवास

    भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.

    पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.

    • कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले.
    • वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक.
    • घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले.
    • विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती.
    • ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण.
    • जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण.
    • वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम.
    • २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन.
    • १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी.
    • समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद.
    • उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये.
    • शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग.
    • गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

  • लाखात अशी देखणी – सुरेखा पुणेकर

    लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा…

    कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने अन् गोड गळ्याने गाऊन सादर करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर.

    ‘लावणी’ या विषयावर फोटो डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मी सुरू केलं. या कामाची गरज म्हणून तेव्हा आघाडीच्या कलाकारांना, कलावतींना भेटण्याची, त्यांची कला समजून घेऊन ही माहिती सचित्र टिपण्याची मोहीमच मी सुरू केली. यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालत असतानाच गावागावांत रात्री उशिरापर्यंत, किंबहुना रात्री उशिरा सुरू होणाऱया तमाशा आणि लावण्या कॅमेराबद्ध करण्याचं वेड मला लागलं होतं. हे सुरू असतानाच या कलेला आपला श्वास मानणाऱया सुरेखाची ओळख मला अप्रत्यक्ष होती. मात्र प्रत्यक्ष झाली ते पुण्यातल्या बालगंधर्व नाटय़गृहातल्या एका लावणी शोच्या निमित्तानं. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी सादर करणाऱया कलावतीचा एक शृंगार असतो. या शृंगारात स्त्रीने नेसलेलं रूपड़ं साडीचं वस्त्र, अंगावर भरजरी दागिने, कपाळावर असलेली टिकली, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने आणि कलावंताचं देखणं रूपडं या साऱयाचा उल्लेख करता येईल. हाच शृंगार कॅमेराबद्ध करण्याविषयी मी सुरेखाबरोबर फोनवर बोललो.

    थोडय़ाच वेळात आतून आवाज आला आणि सुरेखाची नि माझी भेट झाली. सुरेखाची मूलभूत तयारी झाली होती. आता तिचा शृंगार सुरू होता. हा शृंगार टिपण्यासाठीची माझी लगबग सुरू झाली. शो सुरू व्हायला थोडासा अवधी होता. वरवरच्या गप्पा झाल्या आणि थोडय़ाच वेळात सुरेखा खुलली. मेकअप रूममध्ये काही मोजके फोटो टिपून मी स्टेजवरचं सुरेखाचं नृत्य, तिची अदा अन् गायन टिपण्यासाठी स्टेजसमोर गेलो. यावेळी मला सुरेखाचे अनेक कॅण्डिड टिपता आले.

    काही दिवसांनंतर पुन्हा सुरेखाचे फोटो टिपण्यासाठी मी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला गेलो. शोला बराच वेळ होता. मी मेकअप रूममध्ये फोटो टिपत होतो अन् सुरेखा तिचा जीवन प्रवास हळूहळू उलगडून सांगत होती. सुरेखाचे वडील सोंगाडय़ाचं काम करत, तर कधी तमाशात गायन, नृत्य सादर करत. त्या काळी तमाशात वा लावणीच्या फडात स्त्रिया नृत्य सादर करीत नसत आणि म्हणूनच सुरेखाची आई तमाशात गायन, अभिनय सादर करत असे, तर आईचे आईवडील हेदेखील नृत्य, गायन आणि अभिनयात पारंगत असल्याचं सुरेखा सांगते. आईचं घर स्मशानभूमीजवळ होतं. वडिलांकडची परिस्थितीही जेमतेम. वडील पुणे रेल्वे स्टेशनवर दिवसा हमालीच काम करत अन् रात्री कला सादर करण्यासाठी लावणी अन् तमाशाच्या फडात जात. नंतर तिच्या आईवडिलांनी तमाशाचा फड सुरू केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून सुरेखाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेची पायरी ती कधीच चढली नाही. ‘‘माझ्या पाच पोरींपैकी एकीचा तरी तमाशाचा फड असेल अन् ती त्याची मालकीण होईल’’ हे तिच्या बाबांनी लहानपणी रंगवलेलं स्वप्न अखेर १९८६ साली पूर्ण झालं. तिच्या बहिणीसोबत ‘लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला. पुढे चार वर्षे तो चालला.

    त्यानंतर १९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘तुम्हा बघूनी डावा डोळा’ या सुरेखाच्या दिलखेच अदाकारीने रसिकमन जिकलं. त्यानंतर सुरेखाला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली अन् आर्थिक मानधनही. या शोसाठी दोन लाखांचं मानधन मिळालं. यापूर्वी एकहाती एवढा पैसा बघितलाही नसल्याचं सुरेखाने कबूल केलं. पोटाची खळगी भागवण्यासाठी सुरेखाच्या बैलगाडीतून गावोगाव हिंडण्याच्या प्रवासाला आता खऱया अर्थानं गती मिळाली अन् पुढे बैलगाडी ते विमान आणि नारायणगाव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा तिचा प्रवास केवळ लावणीमुळेच शक्य झाल्याचं सांगताना ती भावुक झाली. इतक्यात शोसाठीची घंटा वाजली अन् आपल्या भावनांना आवर घालत सुरेखा पायात घुंगरू बांधण्यात गुंतली. यावेळी मला तिचे उत्तम कॅण्डिड टिपता आले. कॅमेऱयात मी सुरेखाच्या अनेक भावमुद्रा टिपल्या होत्या, परंतु एकदा रंग चेहऱयावर लागला की, कलाकार त्याच्या भावना, वेदना विसरून त्याच्या कलेत कसा एकरूप होतो अन् क्षणार्धात चेहऱयावर एक वेगळं तेज घेऊन हसऱया चेहऱयानं आपली कला सादर करण्यासाठी कसा सरसावतो याचं जिवंत उदाहरण माझ्या मनाच्या कॅमेऱयात कायमचं बंदिस्त झालं.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com