जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला.
त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.
Govind Sadashiv Apte
फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.
रोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म 'हरक्यूलिस'मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गडकरी रंगायतन हे ठाण्यातील एका नव्या पर्वाची नांदीच ठरलं. कारण रंगायतन झाल्यानंतर ठाण्यातील अभिनयाला एक मंच मिळाला आणि रंगायतनच्या कट्ट्यावर नाट्यसृष्टीला योगदान देणारे कलावंत मोठे होऊ लागले. त्यातलाच एक कलाकार म्हणजे “सुनिल गोडसे”!
ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले.
‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.'इश्क का रंग है सफेद' या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'कॉमेडी सर्कस', 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येच जास्त दिसू लागली होती. छोट्या पडद्यावर मालिकेपासून करिअरला सुरूवात केलेल्या रश्मीनं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तिचे खरे नाव शिवानी देसाई. रश्मीने मुंबईच्या नारसी मॉजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून टूर अँड ट्रॅव्हलमध्ये डिप्लोमा केला आहे. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं.
रश्मी देसाई बिग बॉस 15 मध्ये देखील दिसली होती. तिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री केली होती. इतकंच नव्हे तर ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत रहिली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. श्मीनं अभिनेता आणि तिचा सहकलाकार नंदिशशी गाजावाजा न करता लग्न केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. रश्मी देसाई गुजराती तर नंदिश पंजाबी आहे. 'उतरन' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले.
जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.
मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल.
त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात.
हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे
आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले होते. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२८ रोजी झाला. वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे यांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आधी मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते. बाळासाहेब पित्रे यांनी ४० वर्षांपूर्वी ऑर्थोपेडिक ऑपरेशनसाठी लागणाऱ्या स्टील इन्सर्टची निर्मिती सुरू केली. त्या वेळी कोकणात रस्ते, वीज यांचा पुरवठा नसताना आपला कारखाना सुरू केला आणि तो यशस्वी करून दाखवला. त्यांचे चिरंजीव अजय पित्रे यांनी हाच वारसा पुढे चालू ठेवत देवरूख इथे Export Oriented Unit(EOU) सुरू करून कोकणवासीयांचा चांगला रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
बाळासाहेब पित्रे यांनी १९७३ पासून सुश्रुत कंपनीच्या कारभाराची सूत्रे सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही आपला सहयोग दिला. बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या पावशतकात निर्माण झाले होते. सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची देवरुखकरांची भूक या उद्योगाच्या पाठबळावर सुरू झालेल्या बाळासाहेब पित्रे यांच्या पित्रे ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी भागविली आहे. बाळासाहेब पित्रे यांनी सिद्धी ट्रस्ट, सेंटर फॉर रुरल आंतर्प्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CREDAR),देवरुख ललित कला अॅकॅडमी, आकार ऑर्गनायझेशन, अशा विविध माध्यमात कार्यरत सामाजिक संस्थांची स्थापना करून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनाही सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन केले होते.
देवरुख मधील अग्रगण्य अशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते मानद अध्यक्ष होते. स्व. लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालयाची निर्मिती बाळासाहेब पित्रे यांच्या पुढाकाराने झाली. जुन्याजाणत्या कलावंतांच्या अजरामर कलाकृतींचे सर्वात मोठे संकलन असणारे हे मुंबईबाहेरील एकमेव कलासंग्रहालय आहे. बाळासाहेब पित्रे यांनी स्थापन केलेल्या "सिध्दी ट्रस्ट"द्वारा सन १९८०पासून विकासाचे अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. सिध्दी ट्रस्टतर्फे "शालेय परिसर विकास प्रकल्प" या प्रकल्पाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर १९८८-८९मध्ये करण्यात आली. त्यांच्या ‘क्रेडार’ या संस्थेच्या स्थापनेतून डी-कॅड (देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयात चित्रकला, हस्तकला, पेपर क्राफ्ट, पेपर मॅश, स्क्रीन प्रिंटिंगसह कलाविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात.
हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची विक्रीही तेथे होते. देवरूखमधील नाट्यगृहाची कमतरता लक्षात घेऊन बाळासाहेब पित्रे प्रायोगिक कलामंच त्यांनी स्थापन केला. तेथे संगीत, सांस्कृतिक महोत्सव, व्यावसायिक नाट्यप्रयोग होतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि सृजनशील वृत्तीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याकार्तुत्वाने ठसा उमटवला होता. बाळासाहेब पित्रे यांच्या पत्नी सौ. विमलताई पित्रे यांचे ६ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले होते. मी त्यांना दोन वर्षा पुर्वी भेटलो होतो तेव्हा मला त्यांची उद्याेजक व कलावंत अशी दोन्ही रुपे बघण्यास मिळाली होती. या वयात सुध्दा त्यांचा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. बाळासाहेब पित्रे यांचे १२ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti