जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जळगावातील कलाशिक्षक आणि चित्रकार राजू बाविस्कर.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यावरचं लासूर हे त्यांचं गाव. घरची गरिबी सतत चिंतेत पाडणारी. पण हातात पडलेले कलेचे दान त्यांना लहानपणीच उमगले आणि शाळेत असतानाच त्यांनी आधी गंजलेल्या काळ्या पत्र्यावर, तर नंतर गावातील लग्नघरांच्या भिंतींवर चित्रं काढायला सुरुवात केली. लग्नघरातील या कामाचे त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. हेच पैसे त्यांच्या शिक्षणाच्या आणि घरच्याही उपयोगी पडू लागले. इथूनच सुरू झाला त्यांचा खरा कलाप्रवास. यातून त्यांना त्यांच्या कलेचे 'मोल'ही कळले. मग हळूहळू ते गावात-पंचक्रोशीत कलेची कामे घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले.
औरंगाबादमधून बॅचलर ऑफ फाइन आर्टचे शिक्षण घेतल्यावर बाविस्कर जळगावात ड्रॉइंगमास्तर म्हणून रुजू झाले. एके दिवशी शाळेतले शिक्षक व कवी नीळकंठ महाजन यांनी त्यांची रेखाटनं पाहिली आणि ती 'हंस' मासिकाकडे पाठवायला सांगितली. बाविस्करांनी ती पाठवली. त्यानंतर प्रकाशन व्यवसायात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला. पॉप्युलर, पद्मगंधा, शब्दालयसारख्या नामांकित प्रकाशकांकडून त्यांच्या रेखाटनांना, मुखपृष्ठांना मागणी येऊ लागली. त्यांची रेखाटनं आणि मुखपृष्ठं पाहून त्यांना भालचंद्र नेमाडेंपासून ना. धों. महानोरांपर्यंत आणि रंगनाथ पठारेंपासून राजन गवस यांच्यापर्यंत अनेकांची दाद मिळाली. हा प्रवास सुरू असतानाच बाविस्करांना अचानक जाणवलं की रेखाटनांत रेषांची खूप गर्दी होतेय. मग त्यांनी जाणीवपूर्वक रेषा कमी केल्या. चित्रांतील आकार कमी करत गेले आणि त्यांना आपल्याच चित्रांत निराकारातून आकार साकारत असल्याचे लक्षात आले. आता त्यांच्या रेखाटनांचा-चित्रांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू आहे.
राजू बाविस्कर यांना सांगलीचा प्रतिष्ठेचा 'चित्रकार पंत जांभळीकर स्मृती पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराने एकप्रकारे बाविस्कर यांच्या प्रयोगशीलतेवरच शिक्कामोर्तब केले. कारण देवदेवतांच्या चित्रां-पासून सुरू झालेला बाविस्कर यांचा कलाप्रवास आता अमूर्ताकडे सुरू झाला आहे. आकार, रेषा यांच्यात न अडकता त्यांचा कुंचला आता निराकारात आकार शोधू लागला आहे. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरलेल्या त्यांच्या अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शनाला मिळालेला जाणकारांचा प्रतिसाद, ते योग्य वाटेवर असल्याचेच दर्शविणारा आहे. मात्र बाविस्कर यांचा इथवरचा प्रवास हा एकप्रकारे कोणत्याही यशस्वी व्यक्तीसारखाच संघर्षाचा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत.
त्या काळी इंग्रजी चित्रपट सोडला, तर मराठी चित्रपटात पोहण्याचे दृश्य नसायचं. तसं दृश्य व तेही पोहण्याच्या पोशाखामध्ये चित्रित होण्याचा मराठी चित्रपटसृष्टीतला तो ऐतिहासिक प्रसंग.
नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाट्य कंपनीचे सूत्रधार ते नाट्यनिर्माता या साऱ्या आघाड्यांवर गोट्या सावंत यांनी काम केलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्थाच्या साठी काम केले आहे.
संजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.
रत्ना पाठक-शाह या मूळच्या रंगकर्मी आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. त्यांचा जन्म १९ मार्च १९५७ रोजी झाला. हॉलिवूड स्टार्सप्रमाणे त्याही मेथड अभिनय करतात. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. मिर्च मसाला हा त्यांचा गाजलेला चित्रपट.सुप्रिया पाठक शहा यांची साराभाई ही सिरीयल खूपच प्रसिध्द झाली होती.
त्यांची ओळख सुप्रिया पाठक यांची मोठी बहीण, व मा.दिना पाठक यांची कन्या अशी पण आहे.
मा.नसीरुद्दीन शाह हे पती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर नसीरुद्दीन शाह यांनी रत्ना पाठक यांच्याशी दुसरा विवाह केला. पंकज कपूर यांची पत्नी सुप्रिया पाठक यांची सख्खी बहीण आहे. त्या शाहिद कपूरच्या मावशी लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहीले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती, त्यातच त्यांचे मोठेपण होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.
एच. के. जावळे हे जेव्हापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी रूजू झाले त्यावेळेपासून जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय यंत्रणां व अधिकार्यांच्या कार्यपद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडून आला.
अफाट कार्यक्षमता व परिषदेच्या कार्याची व्याप्ती वाढविणारे, तसेच सामाजिक व राजकीय विकासकार्यांमध्ये हिरीरीने सहभागी होणारे राजकीय नेतृत्व अशी ओळख एच. के. जावळे यांनी निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या डोंगराळ भागांमध्ये राहणार्या आदिवासींसाठीच्या योजनांचे जास्तीतजास्त फायदे त्यांना मिळवून देण्याचा सतुत्य प्रयत्न केला आहे. इंग्रजीचे महत्व जाणून त्यांनी सर्वप्रथम ठाणे आदिवासी पाडयांमध्ये, २६ ठिकाणी “इंग्रजी नर्सरी” सुरू केल्या तर, शहरी भागातील लोकांना आपल्या या विकासयात्रेमध्ये खेचून घेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. लोकसहभागातूनच या बालवाड्यांसाठी उत्तम प्रतीच्या व आधुनिक पायाभूत सुविधा बांधण्यात आल्या. “इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन” व “नाईक फाउंडेशन” तर्फे काही शाळांना सात्विक व पोषक मध्यान्न आहार पुरविला जातो. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला तडीस नेणारे शिल्पकार म्हणून जावळे यांच्याकडे पाहिलं जातं. इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन तसेच भिवंडी, पालघर व वाडा या तालुक्यांमध्ये मध्यवर्ती भोजनालय सुरू करण्याची मुळ संकल्पना सुध्दा एच. के. जावळेंच होती. ठाणे जिल्ह्यामध्ये व्हर्चुअल क्लासरूम ची संकल्पना अधिक प्रभावशालीपणे व विस्तारीत स्वरूपावर खेड्यात देखील कशी राबवता येईल, यादृष्टीने या विषयावरती सखोल आभ्यास सुरू आहे व त्यामुळे या संकल्पनेने आपली मुळे रोवण्यास सुरूवात केलं असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, व राजकीय विकासाचा दर वाढविण्यासाठी आदिवासी व ग्रामीण जनतेला अद्ययावत आरोग्य सल्ला व सुविधांचा लाभ देणे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन, जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यवृध्दी, व्यवसयाभिमुख विषय व तज्ञांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य पार पाडले आहे.
जयाप्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाली.वयाच्या १४ व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रुपये मानधन मिळाले होते. १९७९ सालीआलेल्या 'श्री श्री मुवा' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'सरगम' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला. बॉलिवूड सिनेमांमुळे मा.जयाप्रदा यांना खरी ओळख प्राप्त झाली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली. मा.जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयाप्रदा यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ARKnsS541g8
Copyright © 2025 | Marathisrushti