(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • कमल हासन

    यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच 'विचारी' अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट महोत्सव संचालनालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अनेक अभिनेत्यांच्या कारकीर्दीचा असा सुवर्ण महोत्सव होतो, मग कमल हासनच्याच चित्रपटांचा असा वेगळा महोत्सव का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे उत्तर सात महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ज्या कलावंतांच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली, अशा काही प्रमुख हयात कलावंतांचा या महोत्सवात सन्मान करण्यात आला होता. त्या यादीत कमल हासनचे नाव नव्हते. कमलचे नाव नव्हते, त्याचे कारण बहुधा त्याचे वय पाहता, त्याच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे झाली आहेत, असे मुळात कुणाला वाटलेच नसावे. कमल आता ५५ वर्षांचा आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षी 'कलातूर कन्नम्मा' या चित्रपटाने झाली. सर्वोत्कृष्ट बाल कमल अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता. पुरस्कार आणि व्यावसायिक यश यांची सांगड घातली गेल्याचे भारतात क्वचितच दिसते. परंतु, त्याच्या कारकीर्दीत त्याला स्वतःला आवडणारे, पटणारे चित्रपट आणि लोकांना भावणारे चित्रपट अशा दोन्ही प्रवाहांमध्ये यशस्वीरीत्या वाटचाल केली. सर्वसामान्य प्रेक्षक त्यातला एक स्टाईलबाज, रोमँटिक नायक म्हणून ओळखतो, तर संवेदनशील प्रेक्षकांना त्याची ओळख आहे, एक विचारी अभिनेता म्हणून. स्वतःवर वाजवीपेक्षा जरा जास्तच प्रेम करणारा आणि प्रयोगांच्या आहारी जाणारा अभिनेता म्हणूनही त्याची एक ओळख आहे. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही तो कायम वेगवेगळे प्रयोग करत राहिला आणि आपल्याला असे

    प्रयोग करता यावेत म्हणून पैशासाठी तो सामान्य व्यावसायिक चित्रपट करीत राहिला. त्यामुळेच कमलच्या एकूण व्यावसायिक कारकीर्दीचे दोन भाग पडले. ‘अपूर्व 'मध्ये प्रौढ स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण किंवा मणिरत्नमच्या 'नायकन'मधली 'गॉडफादर' पद्धतीची व्यक्तिरेखा यामुळे कमल हासन अभिनयाच्या एका वेगळ्या उंचीवर पोचतो, त्याच वेळी 'अप्पूराजा'मधून तो सर्वसामान्य प्रेक्षकांचा ठाव घेतो. हिंदीत कमल इतके यश आणि लोकप्रियता क्वचितच एखाद्या दाक्षिणात्य नायकाला मिळाली असेल. 'एक दुजे के लिये' चालला तेव्हा तो आता हिंदीत मोठी खेळी खेळणार असे वाटले होते. परंतु, 'सागर', 'सदमा', 'एक नई पहेली' असे तुरळक अपवाद वगळता त्याने चित्रपटांची निवड कधी गांभीर्याने केली नाही. हिंदीच्या प्रेक्षकांनीही त्याला गंभीरपणे घेतले नाही.

    'राजतिलक'सारखे टुकार चित्रपट करून त्याने हिंदीतले स्थान स्वतःच घालवले. परंतु कारकीर्दीचा असा विचार त्याने तामीळ चित्रपटसृष्टीतही केला. नाही, त्यामुळेच तो संवेदनशील प्रेक्षक आणि पिटातील प्रेक्षक, दोघांनाही आपला वाटत आल आहे. त्याचा एक तोटा असा झाला की, योग्यत असूनही त्याला 'सुपरस्टार पद' मिळू शकले नाही. स्वतःला आवडेल, पटेल आणि रुचेल ते करण्याचं जी 'मस्ती' त्याने अनुभवली, त्याच्यापुढे 'सुपरस्टार पदाला काही अर्थ राहात नाही. व्यक्तिरेखांचे, मेकअपचे, शैलीचे प्रयोग करण्याची आपली हौस त्याने पुरेपूर भागवून घेतली. 'अप्पूराजां'मध्ये त्याने गुडघ्यात पाय दुमडून ठेंगू व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली. 'इंडियन'मध्ये तरुण आणि म्हातारा अशी दुहेरी भूमिका केली. चाची ४२० मध्ये तो चक्क नऊवारी नेसून 'लक्ष्मीबाई' बनला, तर 'दशावतार'मध्ये अकारण दहा बटबटीत व्यक्तिरेखा साकारल्या. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'हे राम'मध्येही त्याचा फोकस कायम स्वतःवरच होता. त्याच्या अशा 'गिमिक्स'पेक्षा त्याने 'सदमा'मध्ये साकारलेली भावूक, हळवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिक आवडते, संवादरहित 'पुष्पक'मधला त्याचा प्रियकर जास्त लोभस ठरतो. त्याचे वेगळेपण तरीही मान्य करावेच लागते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सामान्य प्रतिनिधींसोबत, साध्या कपड्यांमध्ये उपस्थित राहणारे 'स्टार' फार कमी असतील. अशा खऱ्या 'स्टार'पैकी कमल एक आहे!

  • प्राजक्त देशमुख

    ते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.

  • मराठी कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ नाथमाधव

    नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

  • मराठी लेखिका आणि कवयित्री लक्ष्मीबाई टिळक

    मराठी लेखिका आणि कवयित्री. कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी व ‘स्मृतिचित्रकार’ लक्ष्मीबाई टिळक यांचा जन्म १ जून १८६६ रोजी झाला.

    लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' या अभिजात, अजरामर आणि श्रेष्ठ आत्मचरित्रातील एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिऱ्या रंगाने रंगलेले साऱ्यास महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव मनकर्णिका नारायण गोखले असे होते. वयाच्या ६ व्या वर्षी १८७९ मध्ये त्यांचे लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी झाले, आणि मनकर्णिका गोखले झाली लक्ष्मी टिळक. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. प्रथम ह्या घटनेने लक्ष्मीबाईंना धक्का बसला, तरी त्यानंतर ५ वर्षांनी त्यांनीही पतीप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला.

    लक्ष्मीबाईंचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्यापुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार, असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली आहे. पुढे काव्यरचनेसाठी टिळकांचे उत्तेजनही त्यांना मिळत गेले. रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले ख्रिस्तायन हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले सु. १०।।• अध्याय रेव्हरंड टिळकांचे असून सु. ६४।। अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते. एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत.

    त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून भरली घागर (१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार तीत आढळून येतो. बालगीते, देशभक्तिपर गीते अशीही काही रचना त्यांनी केलेली असून तीही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले, तो त्यांचा ग्रंथ म्हणजे स्मृतिचित्रे. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाले.

    लक्ष्मीबाईंचे पुत्र देवदत्त ह्यांनी लिहावयास घेतलेल्या रेव्हरंड टिळकांच्या चरित्रासाठी केवळ सामग्री पुरविण्याच्या हेतूने लक्ष्मीबाईंनी आपल्या आठवणी लिहून काढावयास प्रारंभ केला. पुढे श्रीपाद कृष्णांना त्यांचे जमात आणि देवदत्तांचे स्नेही भा. ल. पाटणकर ह्यांच्याकडून लक्ष्मीबाईंच्या ह्या लेखनाची वार्ता समजली. पाटणकारांकडून ह्या आठवणी वाचून घेतल्यानंतर त्या प्रकाशात आल्याच पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली. श्रीपाद कृष्णांचे पुत्र प्रभाकर कोल्हटकर ह्यांच्या संजीवनी ह्या पाक्षिकातून स्मृतिचित्रे प्रथम प्रसिद्ध झाली.

    लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची निर्मिती आत्मप्रेमातून झालेली नाही. जाणीवपूर्वक एखादी साहित्यकृती निर्माण करण्याची इच्छाही ह्या लेखनामागे नव्हती. तथापि लक्ष्मीबाईंच्या जीवनातील नानाविध अनुभवांचे कडूगोड सौंदर्य त्यातून सहजगत्या व्यक्त झाले. स्मृतिचित्रांची अकृत्रिम भाषाशैली, त्यांतून प्रत्ययास येणारी वृत्तीची निरागसता, मानवतेवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा, स्वतःलाच हसणारी आणि स्वतःबरोबरच सभोवतालच्यांना सदैव प्रसन्न ठेवणारी लोकविलक्षण, मिस्किल विनोदबुद्धी ह्या सर्वच गोष्टींची मोहकता कधीही न कोमेजणारी अशी आहे. व्यक्ती, प्रसंग एवढेच नव्हे तर एक संपूर्ण कालखंड जिवंतपणे वाचकांसमोर उभा करण्याचे सामर्थ्य स्मृतिचित्रांच्या पानापानांत आहे.

    शालेय शिक्षणाचा संस्कार न झालेल्या लक्ष्मीबाई यांनी एका अत्यंत सुसंस्कृत मनाने आपल्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आठवणी लिहावयास घेतल्या खऱ्या्; परंतु प्रत्यक्षात त्या आठवणींचे स्वरूप असे झाले आहे, की त्यांची व्याप्ती ह्या सीमित जीवनापुरती मर्यादित न राहता त्यांतून अगदी स्वाभाविकपणे प्रकट होत गेले आहे, ते विविधरंगी, विविधढंगी मानवतेचे चित्र. आत्मचरित्रात्मक लेखन आपली मूळ प्रकृती न सोडता श्रेष्ठ कालकृतीच्या पातळीवर कसे पोहोचू शकते, ह्याचे मराठीतील एकमेव उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे.

    १९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नाशिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे पुत्र देवदत्त टिळक ह्यांनी मराठीत दर्जेदार बालसाहित्यनिर्मिती केली आहे.

    लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर ख्रिस्तायनाचा अखेरचा – ७६ वा–अध्याय त्यांनी लिहिला तसेच स्मृतिचित्रांच्या चौथ्या भागातील १२ ते २० ही नऊ प्रकरणे लिहून लक्ष्मीबाईंच्या निधनापर्यंतचा वृत्तांत दिला, टिळक दांपत्याच्या पुस्तकांचे साक्षेपी संपादनही केले. ज्ञानोदयाचेही ते अनेक वर्षे संपादक होते.

    लक्ष्मीबाई टिळक यांचे २४ फेब्रुवारी १९३६ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • मयुरेश शिर्के

    मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

  • शंकर बाळकृष्ण दिक्षीत

    ठाण्यामधील व्यासंगी विद्वानांपैकी घेतले जाणारे नाव म्हणजे शंकर बाळकृष्ण दिक्षीत हे ज्योतिषशास्त्राच्या विविध पैलुंवरील त्यांचा आभ्यास परिपूर्ण पध्दतीचा होता. भारतीय प्राचीन ज्योतिषशास्त्राला मिळालेली अचूकतेची व परिपक्वतेची किर्ती, ही ग्रीसमधील किंवा इतर परकीय ज्योतिषशास्त्रांच्या मुलतत्वांचे अनुकरण केल्याने मिळालेली नसून, हे ज्ञान भारतात रुळलेले आहे व ते स्वकियांच्या इतक्या वर्षांच्या वैज्ञानिक विचारमंथनामुळे व चतुरस्त्र आभ्यासपध्दतींमुळे, पावन व दगडावरच्या रेषेसारखे अनाशवंत झाले आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. भारतातील निरनिराळ्या ज्योतिषशास्त्रीय संकल्पना व निकष हे इथल्या संस्कृतीचे पाईक आहेत, व टॉलेमी पासून इथले ज्योतिर्विज्ञान अस्तित्वात आलेले नाही हे पुराव्यांसहित पटवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    शंकर दिक्षितांनी विद्यार्थीबुध्दिवर्धिनी, सृष्टी चमत्कार, सोपपत्तिक अंकगणित, धर्ममीमांसा व ज्योर्तिविलास, ही विज्ञानावर अधिष्ठीत पुस्तके लिहीली. भारतीय ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राच्या इतिहास व विकासावर लिहिलेला ग्रंथ तत्कालीन विद्वानांमध्ये मान्यता पावला होता. दिक्षीत यांचे मराठी ज्योतिषशास्त्राच्या परंपरेला अधिक भरीव व प्रगतशील बनविणारे योगदान म्हणजे त्यांनी, जानार्दन मोडक व भास्कर पाळंदे या तिघा विद्वानांनी मिळून मराठीतील पंचांगांवर पहिले सायंपंचांग प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ.रॉबर्ट सेबेल यांना प्राचीन भारताची कालगणना करणे सोपे गेले. डॉ. फ्लांट यांचा प्रसिध्द शोधग्रंथ गुप्त इन्स्क्रिप्शन्स यात दिक्षितांबद्दल आदर व्यक्त गेला आहे. डॉ. सेबेल यांनीही इंडियन कॅलेंडर या त्यांच्या पुस्तकात दिक्षितांच्या कार्याचा सार्थ गौरव केलेला आहे.

  • ज्येष्ठ ऑर्गनवादक व मराठी नाट्य-अभिनेते हरिभाऊ देशपांडे

    मुकेश खन्ना यांना त्यांच्या शक्तीमान च्या रोलसाठी तसेच बी.आर.चोप्राच्या ‘महाभारता’तील भीष्म पितामहच्या रोलसाठी आजही ओळखले जाते. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करायची.

  • निर्मल मेहेंदळे

    प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय मंत्र रुजवत आहेत.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख पुढील पानावर वाचा.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख वाचा.

    mehendale-nirmal-modified

  • नामवंत हिंदी लेखक व पत्रकार धर्मवीर भारती

    धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला.१९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
    https://youtu.be/adP9erjnDQo
    https://youtu.be/JS00ybwPZtw

  • दत्ता धर्माधिकारी

    शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं.