(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निर्माता, दिग्दर्शन आणि अभिनेते विजय पाटकर

    विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे विजय पाटकर. त्यांचा जन्म २९ मे १९६१ रोजी झाला. जाहिरात, मालिका, नाटक, सिनेमा अशा चारही माध्यमात हौसेखातर अभिनेता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अभिनयाच्या वाटेवरून दिग्दर्शन, निर्मितीची मजल गाठणारा ठरला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’, ‘लावू का लाथ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय पाटकर यांची केले आहे. विजय पाटकर यांनी मराठी व हिंदी मिळून १४२ चित्रपटांतून आणि ३५ नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत.

    विजय पाटकर यांनी ऑस्करच्या निवडसमितीत सदस्य म्हणून काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ख्यातनाम अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल देव-कुलकर्णी

    मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

    ‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल झळकली होती. पण, ‘सोन परी’ या मालिकेने त्यांना खरी ओळख देत घराघरात पोहोवले. ‘राजा शिवछत्रपती’, ‘मीरा’, ‘स्पर्श’, ‘गुंतता ह्रदय हे’, ‘अवंतिका’ या मालिकांद्वारेही त्यांनी अनेकांच्याच मनावर राज्य केले. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. मृणाल यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

    'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आणि 'रमा माधव' या मराठी सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय सुभाष घईंच्या विस्लिंग वूड या संस्थेतून त्याने फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांच्यासोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर

    काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.

  • ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे

    सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले. शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली.

    ‘जैत रे जैत’, ‘चौकट राजा’, ‘विहीर’, ‘हापूस’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. ‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. विजय तेंडुलकरांनी मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले म्हणून सुलभाताई लिहित्या झाल्या. त्यांचा रंगभूमीशी संबंध आला तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या. आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरूवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.

    रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. ७३ हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. हिंदीत ‘भूमिका’, ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’, ‘गमन’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’, ‘विजेता’, ‘भीगी पलके’, ‘इजाजत’, ‘विरासत’ 'आदमी खिलौना है', 'गुलाम-ए-मुस्तफा' हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘कोंडुरा’ या हिंदी तसेच तेलुगू चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट गाजला होता. 'चौकट राजा', 'जैत रे जैत', सारख्या मराठी चित्रपटांमधून त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांनी अनेक हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘केहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी अशीच एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या मा.सुलभा देशपांडे यांचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली. अनेक कलावंत त्यांनी घडविले होते.

    १९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमीच्या सेवेचा गौरव करण्यात आला. ‘इंग्लिश विंग्लिश’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. सुलभा देशपांडे यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • अटल बिहारी वाजपेयी

    अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. मा.अटलबिहारी वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.

    आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या ,मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेय सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील २०४४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानानातर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट / भा.ज.प

    अटल बिहारी यांची कविता आओ फिर से दिया जलाएँ
    आओ फिर से दिया जलाएँ
    भरी दुपहरी में अंधियारा
    सूरज परछाई से हारा
    अंतरतम का नेह निचोड़ें-
    बुझी हुई बाती सुलगाएँ।

    आओ फिर से दिया जलाएँ
    हम पड़ाव को समझे मंज़िल
    लक्ष्य हुआ आंखों से ओझल
    वतर्मान के मोहजाल में-
    आने वाला कल न भुलाएँ।
    आओ फिर से दिया जलाएँ।

    आहुति बाकी यज्ञ अधूरा
    अपनों के विघ्नों ने घेरा
    अंतिम जय का वज़्र बनाने-
    नव दधीचि हड्डियां गलाएँ।
    आओ फिर से दिया जलाएँ

  • केतकी देसाई

    देसाई, केतकी

    ‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या - विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.

    पथकामध्ये चौघेजण असल्याने मतभेदांना वाव भरपूर होता. पण निर्णय म्हणजे मतभेदांचे व्यवस्थापन, हे एकदा ओळखले की प्रश्न सुटतात, असा केतकीचा विश्वास आहे. केतकीचे नेतृत्वगुण यापूर्वीही सिद्ध झाले आहेत. अमेरिकेतून जगभर पोहोतच असलेल्या ‘टेड’ या विचारविनिमय चळवळीचे कार्नेजी मेलन विद्यापीठातील केंद्र केतकीच्या अध्यक्षतेखाली चालते. ‘नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या पीट्सबर्ग शाखेची ती सह-अध्यक्ष होती. वैद्यक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांची सांगड घालण्याचे आव्हान असलेले तीन प्रकल्प तिने यापूर्वी पूर्ण केले आहेत. यानंतर, जगभरातील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न कोणते हे आधी समजून घेऊन मग ‘ओएलपीसी’सारख्या योजनांच्या यशापयशाचा मार्ग कसा आहे व कसा असायला हवा हे ठरवण्याच्या स्पर्धेत आपण उतरायचे आहे, हे केतकीने ओळखले आणि तिथे तिचे विश्वनागरिकत्व झळाळले!

  • साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन

    साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा.१९५७ साली त्यांनी 'मिस मेरी' या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते.

    त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी 'देवता', 'राज तिलक', 'नजराना' या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ‎९४२२३०१७३३
    ‎संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध उद्योजिका किरण मजूमदार

    किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझइनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत.

  • सुहास जोशी

    सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

  • जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी

    १९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले.