जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मुळच्या पुण्यातील असलेल्या डॉ.रेवा नातू यांचे वडील पं. विनायक फाटक हे प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. दत्तोपंत आगाशे, पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण केले. त्यांनी काही काळ मा.वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून संगीतात एम.ए व पी.एच.डी केली व प्रथम क्रमांक मिळविला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय, पुणे मार्फ़त त्यांनी संगीताचार्य ही पदवी मिळविली. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत टी. डी. जानोरकर पुरस्कार आणि ललकारी यांसारख्या नऊ पुरस्कारावर मोहोर उमटविली. रेडियोवर संगीत कलाकार म्हणून त्या कार्यरत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मध्येही डॉ. रेवा नातू कायम गायन करत असतात. कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. हसले मनी चांदणे‘ या कार्यक्रमातून प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे, किशोरी आमोणकर या दिग्गज गायिकांच्या गायलेली दुर्मिळ गीते डॉ. रेवा नातू सादर करतात. तिन्ही गायिकांच्या आवाजातील नजाकत, रागदारीवरील हुकूमत, त्यांच्या गीतांतील सौंदर्याचे तंतोतंत दर्शन डॉ. रेवा नातू घडवितात. ऑल इंडिया रेडियो मध्ये शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी संपादन केलेली आहे तसेच नेहरू सेंटर, मुम्बई आयोजित भारत डिस्कव्हरी स्पर्धेमध्ये त्या विजेत्या झालेल्या आहेत. विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, पं.विनायकबुवा पटवर्धन पुरस्कार, २०१५ चा इंद्रधनु सुधीर फड़के युवोन्मेष पुरस्कार, ललकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ. रेवा नातू यांच्या कान्हा, तराना,गणेश सहस्त्रनाम अशा सी.डी पण प्रकाशित झाल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. रेवा नातू यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=Ip4caZ3Kj7U
https://www.youtube.com/watch?v=f7hf5QnYDog
https://www.youtube.com/watch?v=DY1LO_a8l0I
https://www.youtube.com/watch?v=lMUvf-OzKKA
https://www.youtube.com/watch?v=mjvqDGf1Dp4
वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करणारे प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर.
ज्या काळामध्ये आपल्या देशात व्यवस्थापन या विषयाचा शास्त्र म्हणून उदय झाला नव्हता, त्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिली.
'मॅनेजमेंट गुरू' ही संज्ञा आता प्रचलित झाली आहे. शेजवलकर हे या संज्ञेचे एक चालते-बोलते उदाहरण. याच्या पुढे जात ते 'मॅनेजमेंट एज्युकेशन गुरू' बनले. म्हणूनच पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात त्यांचा उल्लेख 'शेजवलकर शिक्षण संस्था' म्हणून केला जातो. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद ते अखंडपणे भूषवित आहेत. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालक होते. ही यादी आणखी वाढविता येईल; पण केवळ एवढ्या उल्लेखांमध्येही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसून येते.
त्यांचे मराठी भाषाप्रेमही सर्वज्ञात आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी ते नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करतात. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो. उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. परंतु तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या सार्या व्यापातून वेळ काढून त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. गेली ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. 'प्रार्थने'संबंधी ते लिहितात, 'सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वराजवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.' व्यवस्थापनापासून अध्यात्मापर्यंतचा त्यांचा सहजसुंदर वावर खरोखरच स्तिमित करणारा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या निवडीमुळे राजकारणविरहीत भाषासेवेचे बीज रोवले जाईल, अशी आशा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.
अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. जेष्ठ कलाकार अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले.
वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम ॲण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या नव्या सिरीजची निर्मिती केली.
डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.
स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.
रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या एफ.टी.आय मध्ये '' साऊंड रेकॉर्डडिस्ट ''चा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर दूरदर्शनवर म्हणून नोकरी केली.तेव्हा दूरदर्शनवर आरोही,शब्दांच्या पलीकडले,अमृताची फळे असे दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत.येथेच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले.सुधीर फडके आणि गजानन वाटवे यांना ते ''शब्दोच्चरतिल आदर्श'' मानतात.
रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ''घाशीराम कोतवाल''या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.''ओंजळीत स्वर तुझेच''हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.
सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.''पिक करपल'' हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मानसी पटवर्धन
वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.
त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.
त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.
कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.
त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या.
त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.
पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बातमी कोणतीही असो ती सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी ईर्षां मनात बाळगणे हा आजचा प्रकार नाही. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र मर्यादित होते व फक्त सरकारी माध्यमे, मोजकी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था होत्या तेव्हापासून ही ईर्षां कायम आहे. मात्र आपण देत असलेली बातमी नुसती सर्वप्रथम देऊन उपयोग नाही ती बिनचूक असली पाहिजे, असा खाडे यांचा आग्रह असे. याच आग्रहामुळेच त्यांचा पत्रकारितेत दबदबा होता. त्यांचे पूर्ण नाव कदाचित कोणाला आठवणार नाही पण ‘दि. बा.’ म्हटले की पत्रकार व राजकीय नेत्यांच्या मनात लगेच खाडे हे नाव आलेच पाहिजे, अशी त्यांची ख्याती होती.
दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. यांचे मंगळवारी वयाच्या ८२ व्या वर्षी मधुमेहाने निधन झाले. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतला आणखी एक दुवा आता निखळला आहे. मितभाषी, मनमिळावू आणि नेहमीच सर्वाना माहिती देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांपैकी ते एक होते. २००५ च्या अतिवृष्टीत घर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे जमवून ठेवलेला माहितीचा खजिना नष्ट झाल्यावर खाडे हताश झाले होते. खाडय़ांच्या त्या साहित्याचे मोल फक्त अभ्यासकांनाच कळू शकते. त्यावेळी सरकारने फक्त पाच हजार रुपये मदत देऊ केली.
वर्षांनुवर्षे मेहनतीने जमा केलेली माहिती पाच हजार रुपयांत परत मिळणार नव्हती. १९५२-५३मध्ये पत्रकारितेत आलेल्या खाडे यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रसिद्धी सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत होत ते वृत्त विभागात आले आणि नंतर ते वृत्तसंपादक या पदापर्यंत पोहोचले. कोयनेचा भूकंप झाला तेव्हा खाडे त्यांच्या अंधेरी येथील घरी होते. मुंबईत त्या भूकंपाचे धक्के बसताच सगळी पळापळ झाली. मध्यरात्रीची वेळ व वीज बंद झालेली.
खाडे यांनी आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, पण स्वत: मात्र पुन्हा घरात शिरून मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी सर्वप्रथम कुलाबा वेधशाळा तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाबाबत माहिती घेतली. नंतर लाइटनिंग कॉल लावून (त्या काळात मुंबईबाहेर फोन करण्यासाठी ट्रंककॉल किंवा लाइटनिंग कॉल लावावा लागत असे) दिल्ली रेडिओवर भूकंपाची बातमी दिली. पुढल्याच बातमीपत्रात रेडिओवरून महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची माहिती देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाडे यांच्या नावासहित समजली. त्या काळी रेडिओवरून बातमी देणाऱ्या बातमीदाराचे नाव सांगण्यात येत नसे. तरीही त्यांच्या नावासहित ही बातमी देण्यात आली होती, याचे कारण त्यांनी घेतलेली मेहनत!
त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या चमूसहित कोयना येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांच्या मुलाखती घेत तो अनुभव श्रोत्यांसाठी जिवंत केला होता. त्यांची बदली शिलाँग येथे काही काळासाठी झाली होती. मुंबई दूरदर्शन सुरू झाले तेव्हा त्यांची बदली दूरदर्शनच्या वृत्त विभागात झाली. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तसंपादक होते. पण तेथे त्यांचे मन काही रमेना. ते पुन्हा आवर्जून ऑल इंडिया रेडिओत आले. जनता पक्ष सत्तेवर असताना जयप्रकाश नारायण मुंबईत जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेमध्ये जाहीर केले.
सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जयप्रकाश नारायण यांची प्रकृती फक्त चिंताजनक झाली होती. पण त्यांच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे याची खातरजमा न करताच संसदेमध्ये त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संसदेचे कामकाज थांबविण्यात आले. बातमीची पक्की खातरजमा करून घेण्याची सवय खाडेंना स्वस्थ बसू देईना. त्यांनी इस्पितळात धाव घेतली तेव्हा खरी परिस्थिती उघड झाली. खाडे यांनी तातडीने दिल्लीला खरे वृत्त कळविले. यामुळे सरकारचे हसे झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक वृत्तसंस्था व वृत्तपत्राचा पत्रकार जसलोकमध्ये तळ ठोकून बसू लागला व इस्पितळातूनही रोज अधिकृतपणे माहिती देण्यात येऊ लागली. आता अशी माहिती देणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र या पायंडा खाडे यांच्यामुळे पडला हे विसरता येत नाही. बिनचूकपणा हाच खरा बातमीचा आधार, असा आग्रह धरणारे खाडे यांच्यासारखे पत्रकार आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात सापडणे कठीण!
मंत्रालयात तेव्हा पीटीआय व युएनआय या दोन वृत्तसंस्थांचे पी.के. व व्ही.के. नाईक आणि रेडिओचे खाडे या त्रिमूर्तीचा दबदबा होता व त्यांच्यामुळे पत्रकार परिषदाही रंगत असत. तिघेही अत्यंत गप्पिष्ट असत आणि मैफल रंगविण्यात तिघांचाही हातखंडा असे. त्यातही खाडे नेहमीच आघाडीवर असत. कमी पण योग्य शब्दांत समोरच्याचे वर्णन करण्याची खाडे यांची हातोटीही वाखाणण्यासारखीच होती.खाडे यांच्या जाण्याने आता ती रंगत निघून गेली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti