(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता चैतन्य ताम्हाणे

    एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.

  • रमेश देव

    भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

  • (डॉ.) वा. द दिवेकर

    इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.

    पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

    १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.

    इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.

    गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.

    दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.

    वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.

  • केशवराव भोळे

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.

  • परेश मोकाशी

    परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते.

  • आबासाहेब जर्‍हाड

    आबासाहेब जर्‍हाड हे आय ए एस अधिकारी असून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत. ते अत्यंत विज्ञानवादी विचारांचे आहेत.

  • नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व

    प्र.के अत्रे म्हणत असत "बालगंधर्व.....फक्त पांचच अक्षरे......पण महाराष्टाचे पंचप्राण ह्या अक्षरात गुंतले आहेत. त्यांचा जन्म २६ जून, १८८८ रोजी झाला. लोण्यात जशी खडीसाखर विरघळते त्याप्रमाणे "बालगंधर्व" ही अक्षरे मराठी मनात विरघळतात.

    बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

    बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!

    नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...
    जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
    तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।
    रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
    कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
    सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।

    अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!

    बालवयातच लोकमान्य टिळकांकडून मिळालेली "बालगंधर्व‘ ही उपाधी, १९०५ मध्ये झालेला "किर्लोस्कर नाटक मंडळी‘तील प्रवेश, त्यानंतर छत्रपती शाहूमहाराजांनी दिलेला उजव्या अधू कानाच्या ऑपरेशनचा सल्ला, १९१२ मध्ये झालेली "गंधर्व नाटक मंडळी‘ची स्थापना, १९१९ मध्ये कंपनीची एकट्याकडं मालकी, केशवराव भोसले यांच्याबरोबर झालेला १९२१ मधील "संयुक्त मानापमान‘चा प्रयोग, त्या काळात झालेलं एक ते दीड लाखाचं कर्ज, १९२८ पर्यंत त्यांनी केलेली साडेतीन लाखांची परतफेड...अन्‌ १९३० नंतर त्यांना लागलेली उतरण...असे हे बालगंधर्व यांच्या जीवनातील काही टप्पे...

    बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मधुकर धोंड

  • नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

    श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.

  • सुप्रसिद्ध संगीतकार व कवी दत्ता डावजेकर

    दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या् डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २०रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.

    त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवल कोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. १९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला.

    दत्ता डावजेकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.

    दत्ता डावजेकर यांची काही गाणी

    आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी
    कुणि बाई, गुणगुणले, गीत माझिया ह्रुदयी ठसले
    गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
    थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
    तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला
    अंगणी गुलमोहर फुलला
    गोमू माहेरला जाते हो नाखवा
    या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट
    बाई माझी करंगळी मोडली

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट