(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले. ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.

    सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हरिभाऊ शेजवळ

    प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्‍या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..

  • पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

    १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात.

  • `कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे संस्थापक जयंत साळगावकर

    साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.

  • अविनाश पिंगळे

    अविनाश पिंगळे यांचा जन्म 2 मार्च, 1987 मध्ये झाला.

  • ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे

    उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.

  • बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन

    १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.

  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

    `बहु असोत सुंदर संपन्न` हया सुप्रसिध्द महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे 1920 पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (1935) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (1913) हया ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.

  • सीताराम कुंटे

    कुंटे, सीताराम

    सुबोधकुमारांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली. सुबोधकुमार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीबरोबरच कामगार संघटना व इतरांशीही सुबोधकुमार कायम फटकून वागले. कुंटे हेही कडक शिस्तीचे असले तरी सौम्य प्रकृतीचे मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

    राजकीय मंडळी आणि कामगार नेत्यांशी खेळीमेळीचे संबंध ठेवून गोड बोलून ते पालिकेत सौहार्दाचे वातावरण ठेवू शकतील. कुंटे हे १९८५ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी. राज्य शासनाच्या सेवेत ते तब्बल २६ वर्षे असून त्यांनी सांभाळलेल्या विविध पदांपैकी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गृहनिर्माण सचिव पदावरील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी गृहनिर्माणाच्या विविध योजना त्यांनी राबविल्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’ मधील सुधारणांसह गृहनिर्माणविषयक कायदे व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांसाठी त्यांनी भरीव काम केले. बिल्डरांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या गृहरचना संस्थांना जमिनीचीही मालकी मिळावी, यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ ची तरतूद करण्यामध्ये कुंटे यांचे योगदान आहे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुंटे यांनी लाला लजपतराय विधी महाविद्यालयातून २००६ ते २००९ या काळात कायद्याची पदवी मिळविली. ‘सिरक्यूस विद्यापीठा’अंतर्गत असलेल्या मॅक्सवेल स्कूलमधून त्यांनी ‘सिटिझनशिप अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्स’ विषयात प्रमाणपत्र मिळविले, ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठामधील स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्राबरोबरच प्रशासन, शासकीय धोरणे, विधी आदी बाबींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. महापालिकेत आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्याचा बराच उपयोग होईल. मुंबई महापालिकेत त्यांनी याआधी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. अर्थसंकल्पात पाणीपट्टीसह अन्य सेवांसाठी करवाढीचा बोजा टाकलेल्या मुंबईकर जनतेला ते कोणता दिलासा देतात, हे लवकरच दिसून येईल.

  • द्वारकानाथ कोटणीस

    डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते. वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.

    डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.

    १९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दुसर्याय महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले. कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला. चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला. डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे.
    देवदूत' ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत डॉ. कोटणीस यांनी अनंत हालअपेष्टा सोसून तेथील रुग्णांसाठी जे अथक परिश्रम केले, ती कहाणी तशी सर्वश्रुत आहे. या कादंबरीत बरेच तपशील वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे डॉ. कोटणीस यांच्या बालपणापासूनचे स्वभावाचे पैलूही कळतात. लेखकाने परिश्रमपूर्वक आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. कॅंटन, चांगशा, हॅंको, वूहान असा या वैद्यकीय पथकाचा खडतर प्रवास. अपुर्याण साधनांनिशी, युद्धाच्या छायेत रुग्णांवर उपचार, ठिकठिकाणी स्वागत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी हे सारे डोळ्यांपुढे साकार होत जाते. कोमिटांग सरकार आणि कम्युनिस्ट यांच्यातील दुराव्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचेही चित्रणही येथे येते. औषधाच्या अॅम्प्यूलमध्ये डिस्टिल वॉटर भरण्याचा काळाबाजारही होत होता. भारतीय डॉक्टर आठव्या पलटणीत काम करत होते. ती कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होती. पुढे माओ, चौ एन लाय यांच्याशी डॉक्टरांच्या गाठीभेटी झाल्या. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. सामान्य चिनी जनता मोठया जिद्दीने, जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढयात उतरलेली पाहून डॉक्टरांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी आपल्या या निरीक्षणांचा, अनुभवाचा कसा फायदा करून देता येईल, असे विचार येत. ते तेथील नेत्यांशी चर्चा करीत. दुर्दैवाने डॉक्टरांचा चीनमध्येच मृत्यू झाला.

    ४ नोव्हेंबर १९३९ ला डॉ. कोटणीस, डॉ. अतल, डॉ. बसू हे येनानकडून सिआन मार्गे च्यू तेह यांच्या आठव्या पलटणीच्या सरसेनापतींच्या प्रमुख ठाण्याकडे निघाले. ते २१ डिसेंबर १९३९ ला मुक्कामाला पोचले. वाटेत बर्फाच्छादित डोंगर, अवघड वळणे या प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. किती प्रतिकूल परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय डॉक्टर रुग्णसेवा करीत होते, ते वाचून मन थक्क होते. नवखा देश, नवखी माणसे, हवामान प्रतिकूल, मृत्यूची सदैव छाया, सुरवातीला भाषेची अडचण या सगळ्या परिस्थितीत गनिमी काव्याने जखमी सैनिकांवर उपचार करणे, शस्त्रक्रया करणे हे केवढे मोठे आव्हान होते! डॉ. कोटणीस दुसरे बेथ्यून झाले. त्यांना काळी ई हा प्रेमाचा किताब मिळाला. को चिंग लान ही ध्येयवादी, प्रेमळ, समविचारी पत्नी मिळाली. पण तिला छोटया इंग व्हा या आपल्या मुलाला सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. डॉ. कोटणीस यांचा ध्येयवेडा, शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभाव, समर्पण वृत्ती विविध प्रसंगांतून मनावर ठसते. हे यश लेखकाचे आहे. पुस्तकात छान छायाचित्रेही आहेत. त्यातून हा इतिहास मनात जागा होण्यास मदत होते. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. मा.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट