(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • चरित्र अभिनेते इफ्तिखार

    इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

  • सीतारादेवी

    सितारादेवी यांनी कथक नृत्यशिवाय भरतनाट्यम , मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीचा अभ्यास केला . लोकनृत्य , परदेशी नृत्याची देखील त्यांना आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना मैदानी खेळ , पोहणे यांचीही आवड होती. त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे होते त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतही स्वतःची छाप पडली होती.

  • सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे म्हटले की त्यांची सर्वप्रथम कोसला ही कादंबरी समोर येते आणि त्यांनतर येते ते त्यांनी केलेले वाद-विवाद , त्यांची ‘ अनाकलनीय ‘ परंतु परखड मते. ‘ अनाकलनीय ‘ हा शब्द अशासाठी वापरला कारण अनेकांना त्याची मते पटत नाहीत , रुचत नाहीत म्ह्णून अनाकलनीय .

  • बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे

    सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यांचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती.

    कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान

    स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्या आधी स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत असत. पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.

    स्नेहप्रभा प्रधान यांना १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.

    नंतर त्यांची घट्ट मैत्री जुळली ती डॉ. शिरोडकर यांच्यासोबत. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. स्नेहप्रभा प्रधान मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या. शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्‌मुखपणे व शांतपणे व्यतीत केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन, पहिली मंगळागौर ,सजनी, सिव्हिल मॅरेज, सौभाग्य या चित्रपटात कामे केली.
    स्नेहप्रभा प्रधान यांचं आत्मवृत्त "स्नेहांकिता‘ वाचण्यासारखे आहे. ७ डिसेंबर १९९३ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.

    स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके
    पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
    रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
    सर्वस्वी तुझाच (नाटक)
    स्नेहांकिता (आत्मचरित्र).

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

    मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.

    सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले. पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता.

    राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता.
    त्यानंतर केसरीच्या संपादकीय खुर्चीवर काका विराजमान झाले. त्यातूनच काकांचे जळजळीत देशप्रेम व सडेतोड विचार प्रगट होऊ लागले. सोलापुरात दुष्काळ निवरणाचे काही काळ गेले. तेथे त्यांनी लोकजागृतीचे काम केले. यामुळेच पुढे `कांचनगडची मोहना ` नाट्यकृती जन्माला आली. `कीचकवध ` हे अप्रतिम नाटक त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या फाळणीवर लिहिले. ते २३-२-१९०७ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये रंगमंचावर सादर झाले. ते ऑक्टोबर १९०८ मध्ये `मराठा ` चे संपादक झाले. १९१० साली कीचकवध नाटकावर बंदी आली. प्रेमध्वज, मानापमान, विद्याहरण, सत्वपरीक्षा इ. नाटके त्यांनी लिहिली. त्यांची नाटके समाज प्रबोधनाबरोबर जनजागृतीसाठीही होती. ते दोन वेळेला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. मे १९०७ व जून १९१७. १९३३ साली एका साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही झाले. १९२० साली त्यांनी केसरीचे संबंध तोडले. मुंबईस दैनिक `लोकमान्य ` च्या संपादकपदाची धुरा सांभाळू लागले. एप्रिल १९२३ साली स्वत:च्या संपादकत्वाखाली स्वत:चा `नवाकाळ ` दैनिकाची सुरुवात केली. १९३५ मध्ये मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सुलोचना संगीत मंडळाकडून `बायकांचे बंड ` नाटकाचा प्रयोग झाला. १९३८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे २६ ऑगस्ट १९४८ रोजी निधन झाले.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विजय बक्षी

  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले.

    सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

    नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.

    १९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे.

    पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सुरेश साळुंखे

    बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे...

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख पुढील पानावर वाचा.

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख वाचा.

    salunkhe-suresh-modified

  • जयंत श्रीधर एरंडे

    (जन्म १९४५)
    एम.एस्सी. (भौतिकी)
    निवृत्त उपमहासंचालक - प्रसार भारती,

    आकाशवाणी कार्यक्रम निर्मिती, वर्तमानपत्रे-मासिके यात लेख, पुस्तक, लेखन, परिसंवाद-मेळावे यांचे आयोजन,

    साई दर्शन, ए-२०४, रामबाग, स्वामी विवेकानंद रस्ता,
    बोरिवली(प.), मुंबई ४०००९२, फोन : २८०५९५४२

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

  • सुप्रिया पिळगांवकर

    चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.

    सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.

    १९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

    मराठीसृष्टीवरील सुप्रिया पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    ## Supriya Pilgaonkar