(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

    प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: एकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती. एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं.

    प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं. प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई. १९५१ साली प्रेमनाथ यांचे सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली.

    अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यानंतर अचानकपणे खलनायकाच्या भूमिका स्वीकारल्या त्यातही यशस्वी झाले. त्यांनी राजकपूरच्या बॉबी या चित्रपटापासून चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटातून त्यांनी डिंपल कपाडियाच्या वडीलांची भूमिका केली. या चित्रपटातील अभिनयाने त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर मिळवून दिले. त्यांना अमीर गरीब, शोर, रोटी कपडा मकान, बॉबी या चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली. सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. मा.प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गणपतराव जोशी

    चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

  • जेष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर

    डीडी हे त्यांचे टोपण नाव.....
    दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्याा डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी पुण्याजवळ कोंडुर येथे झाला. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २०रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले.

    मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले. १९४३ साली माझं बाळ ह्या चित्रपटात. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवलकोंडा का / प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

    राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.

    डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. दत्ता डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे, हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. दत्ता डावजेकर यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • समाजसेविका अनुताई वाघ

    अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली .

  • मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र

    आज ९ नोव्हेंबर..आज मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा वाढदिवस.
    किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.
    काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.

    वृद्धांपासून युवकांपर्यंत अनेकांच्या ओठावर ‘बघ माझी आठवण येते का? ’सारख्या ओळी रुजू लागल्या. ‘ऊन थोडं जास्त आहे’ सारखं काव्य कविता न वाचणार्यांकच्याही कंठात जाऊन बसले. हे यश जितकं अल्बमची निर्मिती करणार्याा ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या मार्केटिंग विभागाचं आहे. ‘गारवा’ हा अल्बम गाजल्यावर किशोर कदम यांना हिंदीत लिखाणासाठी विचारले गेले, पण लाखो रुपयाचं आमिष नाकारत त्याने हिंदीत लिहिणे त्या क्षणी नाकारले. किशोर कदम यांचे शिक्षण आर.व्ही.टी.एच.एस. शाळेत झाले. त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे सलून होते. किशोर यांच्या घरच्यांनी त्यांना तू हवे ते कर, असे सांगितले. त्याच्या हातात कात्री-कंगवा येऊ दिला नाही. किशोर कदम यांचे अभिनयाचे शिक्षण सत्यदेव दुबे यांच्याकडे झाले. ते दुबेजींचा लाडका शिष्य होता.

    पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’(मराठी), ‘कल का आदमी’(हिंदी) या चित्रपटांत त्याने काम केले. प्रा. र. धों. कर्वे या संततिनियमनासंदर्भात कार्य करणार्या’ जगावेगळ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी ‘ध्यासपर्व’ या सिनेमात केली. श्याम बेनेगल यांच्या ‘सलीम’चाही तो हिरो होता. अरुण खोपकर यांनी बनवलेल्या नारायण सुर्वेंवरील लघुपटात त्यांनी सुर्व्यांची व्यक्तिरेखा साकारली. इतर कलावंत आणि किशोर यात फरक असा, की तो खूप वाचनात रमणारा कवी आहे. तत्त्वज्ञान, झेन बुद्धिझम, ओशो रजनिशांची पुस्तके, नेरुदा, सीझर वाह्येव्होसारखे स्पॅनिश कवी, हेन्री डेव्हिड थोरो असे वाट्टेल त्या विषयावरचे तो वाचत असतो. ‘टाइम्स म्युझिक’तर्फे ख्यातनाम कवी गुलजार व मराठी कवी सौमित्र यांनी स्वत:च सादरीकरण केलेल्या २४ कवितांची ‘तरीही’ ही सीडी ऐकणे, हा एक वेगळाच अनुभव आहे.

    प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. किशोर कदम यांच्या बाबतची एक आठवण. आशा भोसले यांनी ‘आपली माणसं’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले. ते गाऊन झाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी कुतूहलाने गीतकाराचे नाव विचारले. तो आशातार्इंच्या डोळ्यांत पाणी आणणारा गीतकार होते म्हणजेच, किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र. समुद्र हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या कवितांमधून अनेकदा समुद्राविषयी उल्लेख असतात.

    उदाहरणार्थ
    जगण्यास तेव्हा खरा अर्थ होता,
    निरर्थास ही अर्थ भेटायचे
    मनासारखा अर्थ लागायचा,
    अन् मनासारखे शब्दही यायचे
    नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने,
    किती वेळ बोलायचे
    निघोनी घरी शेवटी जात असता,
    वळुनी कितीदा तरी पाहायचे

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • पं. त्र्यंबकराव जानोरीकर

    भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

    पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७०च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

    जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. पंडित जानोरीकरांनी अनेक शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत. पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांचे २३ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चंद्रशेखर संत

    माराठी क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर संत हे तब्बल २५ वर्षे ते “म.टा”त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’ मध्येही त्यांनी काम केले.

  • लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे

    कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.

  • सूर संस्काराचा – डॉ. वरदा गोडबोले

    डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे.
    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी आणि श्रीमती गंगुबाई हनगल या तयार झाल्या, तर त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे दिवंगत पं. ए. के. अभ्यंकर घडले. पं. ए. के. अभ्यंकर हे देशपरदेशात आपल्या गायकीमुळे सुप्रसिद्ध असे नाव. गेल्या आठवडय़ात पं. अभ्यंकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला.

    ‘आपल्या शिष्याने आळविलेले सूर’ हीच खरी गुरुदक्षिणा असं मानणाऱया पं. अभ्यंकरांनी अनेक शिष्य घडवले. या शिष्यांपैकी हिंदुस्थानी शास्त्र्ीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात गुंतलेली आणि गुरू पं. अभ्यंकरांचा सुमारे ३५ वर्षांचा सहवास लाभलेली डॉ. वरदा गोडबोले ही एक संस्कारसंपन्न गायिका.

    १६ मे २०१३3 रोजी मी पं. ए. के. अभ्यंकर ऊर्फ पं. अच्युत केशव अभ्यंकर यांच्या घरी गेलो होतो. पं. अभ्यंकर तेव्हा ७६ वर्षांचे होते. त्यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला कित्येक दशकांचा प्रवास तसच दिवेआगर ते ठाणे व्हाया गिरगाव या प्रवासात त्यांची नोकरी, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, घरातले सदस्य आणि त्यांचे शिष्य अशा सगळ्या विषयांवर आम्ही सुमारे दोन – अडीच तास गप्पा मारत होतो. या दिग्गज गायकासोबत बोलता बोलता मध्येच त्यांना थांबवत त्यांची काही पोर्ट्रेट मी टिपली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांची शिष्या डॉ. वरदा गोडबोले उत्तम करत असल्याची पावती खुद्द त्यांनीच मला दिली. याच विश्वासानं मी त्याच दिवशी डॉ. वरदा गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची वेळ घेऊन दुसऱयाच दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो.

    वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात गुंतून पुढे गांधर्व महाविद्यालयातून पहिल्या श्रेणीत संगीत अलंकार ही पदवी, तर त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान पटकावणाऱया डॉ. वरदा गोडबोले या अभ्यासू गायिका. डॉ. वरदा यांना गायनाची आवड बालपणापासून होतीच. मात्र त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. संगीतासोबतच अभ्यासाची प्रगतीही त्यांनी समांतर गाठली. कला शाखेतल्या संस्कृत विषयाच्या पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वाधिक गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावणाऱया डॉ. वरदा यांनी हाच यशाचा आलेख कायम राखत मुंबई विद्यापीठाच्या एमए संगीताच्या परीक्षेतही सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.

    सुमारे दोन तास यशाचा हाच आलेख समजून घेत मी डॉ. वरदा गोडबोले यांचे पोर्ट्रेट टिपत होतो. यादरम्यान त्यांच्या गुरूंविषयी त्या बोलत होत्या. श्रीमती लीलाताई शेलारांकडून प्राथमिक शिक्षण तर त्यानंतर पं. अभ्यंकर यांच्याकडे किराणा घराण्याचं शिक्षण तब्बल बारा वर्षे घेतलं. पं. अभ्यंकरांकडच्या या बारा वर्षांत डॉ. वरदा यांच्या गायकीने आकार घेतल्याचं त्या मानतात. त्यानंतर आग्रा घराण्यातील पं. यशवंत महाले, ग्वाल्हेर घराण्यातील पं. मधुकरबुवा जोशी तसेच अजय पोहणकर आणि डॉ. सुशीलाताई पोहनकर यांच्याकडे पूर्ण केलं, तर माणिक वर्मा यांच्याकडे नाटय़ संगीताचा अभ्यास त्यांनी केला.

    एरवी मॉडेल फोटोग्राफी करताना अनेक बाबी लक्षात घेऊन फोटो टिपण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र गायक, गायिका यांच्या फोटोच्या वेळी त्यांचे हावभाव हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या चेहऱयाचा तजेलपणा, डोळ्यांतली चमक, कलेबाबत असलेली ओढ, त्या कलेशी असलेली निष्ठा आणि त्यातला प्रामाणिकपणा या सगळ्यांची एकूण जुळणी करत टिपलेलं पोर्ट्रेट हे उत्तमच येत. इथे एरवी लागणाऱया मेकअप, हेअर, कॉस्च्यूम या बाबी तशा गौण ठरतात. डॉ. वरदा यांचे मी त्यांच्या घरी त्यांच्या तंबोऱयासोबत टिपलेले पोर्ट्रेट हे याचंच उत्तम उदाहरण.

    यानंतरही डॉ. वरदा गोडबोले यांचे फोटोशूट करण्याची संधी मला अनेकदा आली. संगीत मैफलीत प्रत्यक्ष फोटोदेखील टिपण्याची संधी मला लाभली. मैफलीत उपलब्ध लाईटचा वापर करत कँडिड फोटो मी टिपले, तर विविध माध्यमांसाठी स्टुडिओतही फोटोशूट करायला मला मिळालं. स्टुडिओत लाइटींच्या सहाय्यानं फोटो टिपताना काही तास मला घालवायला लागले होते. केवळ फोटोशूटकरिता पोझेस न देता डॉ. वरदा यांनी त्या स्टुडिओतही आपला रियाझ सुरू केला आणि मला त्या रियाझावेळी फोटो टिपायला सांगितले होते.

    डॉ. वरदा यांचा संगीत प्रवास मला मधूनमधून समजत होता. शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे जमा केल्यानंतर डॉ. वरदा यांनी देशभरात विविध ठिकाणी आपलं गायन सादर केलं, तर ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमातल्या ‘नाथ हा माझा…’ या लोकप्रिय गाण्याचा आवाजही डॉ. वरदा यांचा आहे. संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने डॉ. वरदा यांनी स्वरदायिनी ट्रस्टची स्थापना केली.

    या संस्थेच्या अध्यक्षपदी पं. अभ्यंकर हे होते, तर डॉ. वरदा यांच्याकडे शिकायला येणाऱया शिष्यांसाठी तसेच गायन, कथ्थक आणि तबला यांचे शास्त्रोक्त धडे देण्यासाठी स्वरदा संगीतालयाची स्थापना केली. आज शेकडो विद्यार्थी या संगीतालयात शिकत आहेत हे विशेष. संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत विविध घराण्यांची गायकी त्याच ताकदीनं सादर करत आपल्याकडे असलेल्या संगीताचा गुणोत्तराने प्रचार आणि प्रसार करणाऱया डॉ. वरदा गोडबोले यांनी नव्या पिढीसमोर आपला स्वतःचा आदर्श घालून दिला आहे.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • लोकनायक….. राज ठाकरे !

    सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत.