जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे.
सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.
आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. मा.कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.
कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत. शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले. सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.
शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
http://www.azmikaifi.com
या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले. मा.कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...' (हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत... १९८० च्या दशकात मा.कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'. भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कैफी आझमी यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कांबळे, बेबीताई
‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या.
बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.
-------------------------------------------------------
कांबळे, बेबीताई
दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे.
दलित आत्मचरित्रांच्या प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरेत ज्या मोजक्या महिला आत्मचरित्रांचा समावेश आहे, त्यात बेबीताई कांबळे यांच्या 'जिणं आमचं' या आत्मकथनाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांचे "जिणं आमचं' या आत्मचरित्राचे सात भाषांमधून भाषांतर झालेले आहे. राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून थेट प्रेरणा घेतलेले विविध क्षेत्रांमधले जे धडाडीचे कार्यकर्ते आजही कार्यरत होते, त्यात बेबीताईंचा समावेश होता. १९३० च्या दशकात जेजुरीच्या जत्रेत बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण करून 'पोरांना शिकविल्याशिवाय आपली या नरकातून सुटका होणार नाही' असे बजावले होते. ते ऐकून बेबीताईंच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे शाळेत घातले आणि बेबीताईंचे जीवनच बदलले. त्यांचे आजोबा इंग्रज साहेबांचे बटलर; तर वडील ठेकेदार होते. असे असूनही 'महारवाड्या'तले कष्टाचे, रोगराईचे, अज्ञानाचे जिणे सगळ्यांप्रमाणेच त्यांनाही जवळून पाहायला लागलेच.
पुढे अनेक वर्षांनी हे जीवन शब्दबद्ध करताना बेबीताईंनी 'बिनशेपटाच्या जनावराचं जिणं' असे त्याचे मामिर्क वर्णन केले होते. हे आपले आत्मकथन नाही, तर त्या पिढीचे, समाजातल्या दबून गेलेल्या वर्गाचे ते प्रातिनिधिक प्रकटन आहे, असे बेबीताई म्हणत. त्यांचे आत्मकथन हा बहुमोल सामाजिक दस्तावेज आहे. त्यामुळेच, माया पंडित यांनी त्याचा 'प्रिझन्स वुई ब्रोक' असा अनुवाद केला, तेव्हा जगभरच्या वाचकांना दलित समाजाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे कथन नंतर फ्रेंच व इतर भाषांमध्येही गेले.
'तुम्ही आणखी लिहा' असा आग्रह बेबीताईंना होई, तेव्हा आपण कार्यकर्त्या आहोत, लेखन हे आपले साधन आहे, असे त्या म्हणत. त्यामुळेच, फलटणला काढलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेची त्यांना अधिक चिंता असे. दलित संघटित होत नाहीत, याची त्यांना काळजी वाटे. 'गटातटांच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य उरलेले नाही' असे कठोरपणे सांगतानाच आता दलित महिलांनीच 'दलित पँथर'सारखी आक्रमक संघटना उभारली पाहिजे, असे बेबीताई आवर्जून सांगत. हा त्यांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास होता.
बेबीताई कांबळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देत साहित्याची सेवा केली. अल्पशिक्षित असलेल्या बेबीताई विवाहानंतर फलटणमधील मंगळवार पेठेमध्ये दुकान चालवीत होत्या. दुकानात येणारे रद्दीचे कागद व वह्यांचे कागद यातील अक्षर ओळखीने त्यांना साहित्याची आवड निर्माण केली आणि हळूहळू जमेल तसे त्या कोऱ्या कागदावर लिहीत गेल्या. त्यातूनच दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होत गेली. श्रीमती बेबीताई यांनी दलित बांधवांची दु:ख अत्यंत जवळून अनुभवली आणि त्याचबरोबर स्वत:ही त्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. त्यातूनच त्यांच्या "जिणं आमचं' या आत्मचरित्राचा जन्म झाला. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी, हिंदी, फ्रेंच, पंजाबी, बंगाली या भाषांत भाषांतरे झाली. इंग्रजी भाषेमध्ये या साहित्यकृतीचे भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला होता.
बेबीताई कांबळे यांच्या "जिणं आमचं' या पुस्तकावर पुणे विद्यापीठात पीएचडी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितासंग्रह (भीमगीते) त्यांनी लिहिला असून, केवळ साहित्य सेवा करताना चळवळीतून दलित बांधवांना प्रगतीचे, शिक्षणाचे विचार देण्याबाबत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व दलित चळवळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. फलटण भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांनी निंभोरे (ता. फलटण) येथे भटक्या जमातीतील मुलांसाठी काढलेली आश्रमशाळा गेली २० वर्षे त्या चालवीत होत्या. याच परिसरामध्ये संविधान भवन बांधण्याच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले होते. फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील दलित चळवळ व साहित्यामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता.
दलित साहित्यात स्त्रीवादाचा जोमदार प्रवाह वाहू शकला नाही. मात्र, स्त्रीवाद व दलित चळवळ यांचे जे अभिन्न, अतूट नाते आहे, त्याची नेमकी जाण बेबीताईंना होती. त्यामुळे त्या ज्याला 'भीमाचं वारं' म्हणत, ते वारे प्रत्येक घरातल्या मुलीच्या मनात शिरायला हवे, ही त्यांची तळमळ असे. म्हणूनच, बाबासाहेब शहरांत रुजले, आता ते खेड्यापाड्यांमध्ये रुजायला हवेत, यासाठी त्या अखेरपर्यंत धडपडल्या. २१ एप्रिल २०१२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12904269.cms - बेबीताई कांबळे यांच्या निधनानंतर लिहिलेले महाराष्ट्र टाईम्समधील संपादकीय...
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर आणि विविध वर्तमानपत्रांतील लेख)
संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
संदीप खरे आता ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल. लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.innomobilesystems.skworld
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संदीप खरे यांच्या कविता व गाणी
https://www.youtube.com/watch?v=AhyCHlFF_9Q
https://www.youtube.com/watch?v=U-yKzJsJWVk
https://www.youtube.com/watch?v=EThnG-4lp7w
जुई जोशी ह्या फिलान्थ्रोपिक एन्गेजमेन्ट च्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस् पैकी एक आहेत. जुई जोशी यांची जगातील मोजक्या काही अतिशय सन्मानाने व संपुर्ण राजेशाही बंदोबस्तामध्ये वावरणार्या महिला उद्योजकांमध्ये गणती होते.
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समीर यांची काही गाणी
आए हो मेरी जिंदगी में
आखों ने तुम्हारी
आपके प्यार मे हम
घुंगट की आड से
चाहा है तुझको
जो हाल दिल का
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
तेरी उम्मीद तेरा इंतजार
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धूम मचा ले धूम
दिल ने दिल से क्या कहा
दिल है के मानता नही
देखो जरा देखो
‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.
महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणार्या् एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेर्याहसमोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणार्या् अनंत माने यांनी केलं. कॅमेर्या समोरून घाबरून पळणार्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्व्र’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वतर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली.
‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला. आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते - ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला.
१९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वनर्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणार्या् धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिर्या -मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढार्या सारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहर्याावर कायम हास्य असणार्याय धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत. मा.दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
Copyright © 2025 | Marathisrushti