(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ संगीतकार शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर

    दादा चांदेकर या नावाने प्रसिद्ध असलेले मराठी संगीत दिग्दर्शक. त्यांचा जन्म १९ मार्च १८९७ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. १९३१ नंतर दादांनी साताऱ्याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. १९३५ साली भालजी पेंढारकरदिग्दर्शित कालियामर्दन या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. १९३७ मधील प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सच्या स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे संगीतही दादांचेच होते; परंतु त्यांचे खरे नाव झाले ते हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रह्यचारी या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. 'यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या' या मीनाक्षीने गायिलेल्या गाण्याने तर त्या काळी (१९३८) चित्रपट-रसिकांना वेडच लावले होते. यानंतर दादांनी लपंडाव, अर्धांगी, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, छाया, अमृत, सासरमाहेर इ. चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांत बहुतेक मराठी व काही हिंदी चित्रपटही होते. 'नटली चैत्राची नवलाई' हे पहिली मंगळागौरमधील लता मंगेशकरने गायिलेले त्यांचे आणखी एक लोकप्रिय गीत; परंतु ज्या जयमल्हार (१९४७) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीतही दादा चांदेकरांचेच होते.

    काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीतनियोजन त्यांनीच केले. ते उत्तम हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून बरेच दिवस त्यांनी काम केले. मा.दादा चांदेकर यांचे २७ जानेवारी १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश

  • तेजस्वी – तेजस्वी पाटील

    तेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहरा… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे….
    भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात भगवानदादांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आपल्या कसदार अभिनयानं तेजस्वीनं या वेगळ्या भूमिकेचं सोन केलं.

    लग्नानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या काही मोजक्या यशस्वी कलावती आहेत. तेजस्वी पाटील ही यापैकी एक. स्वदीप पाटील या व्यावसायिक तरुणाशी तेजस्वीचं लग्न झालं आणि लग्नानंतर व्यवसयिक कलाकार म्हणून तेजस्वीने ओळख निर्माण करावी अशी स्वदीपची इच्छा होती. तेजस्वीचं कलाकार होण्याचं स्वप्न स्वदीपच्या मदतशीर स्वभावामुळेच शक्य झाल्याचं तेजस्वी सांगते. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली मी आणि तेजस्वी फोटोशूटसाठी तिच्या अंधेरीच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ती सांगत होती. यावेळी तेजस्वीचा एमबीएपर्यंतचं शिक्षण तर यापुढे एचआरमध्ये तिने केलेलं स्पेशलायझेशन या सगळ्यावर आम्ही गप्पा मारत होतो. सणानिमित्ताने तेजस्वीचं फोटोशूट आम्ही करत होतो. हे करताकरता तेजस्वी तिच्या आवडीनिवडी, तिचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आणि त्यातल्या गमतीजमाती सांगत होती. या गप्पांमुळे तेजस्वी रिलॅक्स झाली होती. तिच्यावर शूटचं टेन्शन अजिबात जाणवत नव्हतं आणि म्हणूनच शूटच्या दरम्यान बोलक्या तेजस्वीचे हसरे, प्रसन्न फोटो मला टिपता आले.

    २०१३-१४ साली तेजस्वी ’प्राजक्ता’ या तिच्या ’मी मराठी’ चॅनलवरील प्रमुख भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तर यानंतर झी टीव्हीवरील ’भाग्यविधाता’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. यानंतरचा तेजस्वीचा प्रवास मला आमच्यातल्या संभाषणामुळे वेळोवेळी समजत होता. २०१३ साली पुन्हा आम्ही एका शूटच्या निमित्ताने एकत्र काम केलं. मराठी सणवार बेतलेलं हे शूट होतं. हा मराठमोळा साज लक्षात घेऊन तेजस्वीचा लूक काय असेल यावर माझी टीम काम करत होती. सगळ्यात आधी तिचा लूक ठरला. त्यानंतर कॉस्च्युम मग मेकअप आणि हेअर आणि सगळ्यात शेवटी त्यावरचे दागिने आणि इतर बाबी ठरवण्यात आल्या. या लूकला तेजस्वीचीही पसंती मिळाली आणि शूटचा दिवस ठरला.

    नेहमीच ठरलेला मराठमोळा लूक न निवडता यावेळी तेजस्वीसाठी मॉडर्न लूक निवडण्यात आला होता. या मॉडर्न लूकमध्ये तेजस्वीचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. तेजस्वीचं स्मितहास्य, डोळ्यांतली चमक आणि प्रसन्न चेहऱयामुळे हे शूट यशस्वीपणे पार पडलं. याच शूटनंतर तेजस्वीचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये एक फोटोशूट करण्यात आलं. शॉर्ट वन पीसमध्ये तेजस्वीचं ग्लॅमर शूट करण्यात आलं. यावेळी तेजस्वीच्या चेहऱयावर थोडीशी भीती दिसत होती. एरवी मॉडर्न कपडय़ांत सहज वावरणारी तेजस्वी यावेळी थोडी शांत शांत दिसली. आम्ही काही फोटो काढले; परंतु हवे तसे फोटो मिळत नव्हते. थोडावेळ थांबून तेजस्वीशी बोलून मग पुन्हा हे फोटोशूट करण्यात आलं. तेजस्वी आता थोडी खुललेली दिसली आणि मग बिनधास्त तेजस्वीचे हटके फोटो मला यावेळी टिपता आले.

    या शूटनंतर पुन्हा मला तेजस्वीचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक फोटोशूटची संधी जितकी हवीहवीशी वाटते तितकीच त्याची जबाबदारीही जास्त असते. शूटचा दिवस ठरला आम्ही स्टुडिओ १०९ मध्ये भेटलो. तेजस्वीच्या शूटच्या आधी ‘झाला भोबाटा’ या गाजलेल्या मराठी सिनेमातील मोनालिसा बागलाच फोटोशूट मला करायचं होत. हे शूट थोडं लांबलं आणि तेजस्वीच्या शूटला आम्हाला उशीर झाला. तेजस्वी मेकअप रूममध्ये शांत बसली होती. एखाद्या कलाकाराचं शूट ठरलेल्या वेळेत सुरू व्हावं म्हणून माझी टीम शूटच्या किमान तासभर आधी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असते आणि शूट वेळेतच सुरू झालं पाहिजे असा माझा नेहमीच आग्रह असतो; परंतु त्यादिवशी तेजस्वीच्या शूटला उशीर झाला. तेजस्वीने नेहमीप्रमाणेच त्यादिवशीही शूटसाठी मदतशीर होती. साधारणपणे अर्धा तास हे शूट उशिरा सुरू झालं. स्टुडिओत तेजस्वीचं शूट सुरू झालं आणि तिच्या चेहऱयावर एक वेगळंच तेज यावेळी मला पाहायला मिळालं. संयमी स्वभावाच्या तेजस्वीचं हेच रहस्य तिच्या सिनेमातल्या कामातही बघायला मिळतं. उगीच मिळतील ते सिनेमे, वरवरची कामं तेजस्वी टाळते. संयमानं चांगल्या कामाची वाट बघते आणि मिळालेल्या संधीच ‘सोनं’ करण्यासाठी अपार मेहनत घ्यायची तयारी दाखवते हेच तेजस्वीच्या यशाचं गमक असावं.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.

    बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले.

    सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली.

    १९५७ मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेत्री हेमल इंगळे

    जन्म.२ मार्च १९९६ कोल्हापूर येथे. हेमल इंगळेने सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

  • एन. के. पी. साळवे

    स्वातंत्र्य सैनिक, विद्वान राजकारणी, कणखर प्रशासक आणि समाजजीवनाचे सांस्कृतिक भान असलेले बहुभाषी एन.के.पी. साळवे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीतील एक खंदा पुरस्कर्ता नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव या चळवळीला यापुढेही होत राहील. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेले एन.के.पी. साळवे तारुण्यातच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.

    एक निष्णात चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून जशी त्यांची ओळख होती तशीच उत्कृष्ट वक्ता म्हणूनही. धर्माने ख्रिश्चन असलेल्या साळवे यांचे हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. त्यामुळेच कोणत्याही सभेतील त्यांचे भाषण हा वक्तृत्वाचा उत्तम वस्तुपाठच असे. उर्दू शेरोशायरीच्या पखरणीशिवाय त्यांचे भाषण संपत नसे.

    सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि चार्टर्ड अकांऊन्टट असल्यामुळे बऱ्याच औद्योगिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. व्यक्तिगत मतभेदापलीकडे दृष्टी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी व पुढे खाण व पोलाद खात्याचे राज्यमंत्री आणि सांसदीय कामकाज मंत्री होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एन्रॉनचा वीज प्रकल्पामुळे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारकिर्द अधिक गाजली. त्यांच्याच काळात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रवेशव्दार मुक्त झाले. संसदेत करप्रणाली, घटना, सार्वजनिक लेखा या विषयावरील त्यांची भाषणे विशेष गाजली.

    नवव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्याचा महसूल विभागणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्रातही एन.के.पी. साळवे या नावाला एक वेगळे वलय होते. १९४३ ला अखिल भारतीय पंच समितीवर त्यांची निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे १० वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भात क्रिकेटला चांगले दिवस आणले. भारतीय नियामक मंडळाचे ते ४ वर्ष, तर आशियाई क्रिकेट कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. १९८७ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या रिलायन्स विश्वकप सामन्याच्या वेळी भारत-पाक व्यवस्थापन समितीचेही ते अध्यक्ष होते. नागपुरातील सी.पी. क्लब, गोंडवाना क्लबसह मुंबई, दिल्लीतील क्रिकेट विश्वाशीही त्यांचा जवळून संबंध होता.

  • एकनाथ कुलकर्णी

    नाशिक येथील रहिवासी असलेले कुलकर्णी तेथील स्थानिक परिसरात त्यांच्या विविध वैद्यकीय कौशल्यांसाठी व रोगांच्या अचुक निदानासाठी वाखाणले गेलेले आयुर्वेदिक तज्ञ आहेत.

  • सुरेश खानापूरकर

    धुळे जिल्ह्यात जिथे अवर्षण नित्याचे झाले होते, त्या भागात आता लोक वर्षाला तिसर्‍या पिकाचा विचार करु लागल्याचे चित्र शिरपूर पॅटर्नमुळे तयार झाले. भूगर्भाच्या अचूक अभ्यासाने जमिनीची अॅंजिओप्लास्टी करण्याचे अभिनव तंत्र भूगर्भशासस्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी इथे विकसित केले. शिरपूर पॅटर्न नावाने ओळखली गेलेली या जलक्रांतीचा प्रसार आता राज्यभर होतो आहे.

    शिरपूर पॅटर्नचा जनक

  • वसंत आठवले

    पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.

    (कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!

  • अनोखा कॉमिक्स कलाकार स्टीव्ह डिटको

    डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला.

  • ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम

    एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे