(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर

    समीरण वाळवेकर यांनी ‘आजच्या ठळक बातम्या’ (टेलिव्हिजन पत्रकारितेवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ), चॅनल ४ लाईव्ह’ (मराठी लोकप्रिय काल्पनिक कादंबरी), चरित्रात्मक ग्रंथ : ‘फिनोलेक्स पर्व’ (प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या वरील) ही तीन पुस्तके लिहिली आहेत.

  • देविका राणी

    देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या 'लाइट ऑफ एशिया' या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन 'करमा' नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर 'स्टार लंडन'च्या समीक्षकाने लिहिले होते की, "देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही". नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशु रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये "बॉंबे टॉकिज' या संस्थेची स्थापना केली. बॉंबे टॉकिजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चित्रपटात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉंबे टॉकिजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षक वर्ग चित्रपटांकडे वळवला. देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशु रॉय यांच्याशी विवाह केला. "बॉंबे टॉकिज' ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशु रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. अशोक कुमार यांची भूमिका असलेला "किस्मत' हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुकर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. मा.देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अछूत कन्या' नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रभारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. देविका राणी यांचे ८ मार्च १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

    ‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

  • रजनी अविनाश भिसे

    विभाग प्रमुख, कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई

  • गायिका कृष्णा कल्ले

    कृष्णा कल्ले यांना १९५८ साली झालेल्या सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायनस्पर्धेत पहिले पारितोषिक आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया ‘ हा मानाचा ‘ किताब मिळाला. कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून त्या लग्नानंतर १९८५ साली मुंबईला आल्या.

  • ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते

    आज ३१ ऑक्टोबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांची पुण्यतिथी.

    मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मा.सुमती गुप्ते.

    त्यांचा जन्म १९१९ मध्ये वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी मा. विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले. ‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत.

    सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर

    रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर चा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला.

    भारताची 'जिमनॅस्ट क्वीन' अशी तिची ओळख असलेल्या दीपा कर्माकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी हे बाधक असतं. असे पाय असणार्यांनना उडी मारल्यानंतर जमिनीवर लँड करताना बॅलेस करण्यात त्रास झेलावा लागतो. परंतू दीपाने अथक परिश्रम आणि अभ्यासाने आपली ही कमी दूर केली. २००७ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये शानदार प्रदर्शनानंतर दीपाचा उत्साह वाढला आणि ती अधिक अभ्यास करू लागली. दीपाने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.

    २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपा कर्माकरच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले.

    २०१५ च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले.

    रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरने भारताला जिमनॅस्टचे वेड लावलं. तिच्यामुळे जिमनॅस्टीक या खेळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. मागल्या वर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने प्रोडूनोवा जिम्नॅस्टमध्ये अंतिम पाचामध्ये जागा बनवली आणि आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघाने तिला विश्व स्तरीय जिम्नॅस्टच्या पंक्तीत बसवले. दीपा कर्माकरनं आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७७ हून अधिक पदकांची कमाई केली आहेत आणि त्यात ६७ सुवर्णपदकं आहेत. FIG आर्टिस्टीक जिमनॅस्टीक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीची दखल 'बार्बी डॉल' या प्रसिद्ध कंपनीनंही घेतली आणि त्यांनी चक्क दीपा कर्माकरच्या रूपाची बार्बी डॉल तयार केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

    अशोक सराफ यांचे गोपीनाथ सावकार हे मामा. अशोक सराफ यांनी गोपीनाथ सावकार यांच्यावर लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख.
    कलेशिवाय ज्यांनी आयुष्यात कशालाच महत्त्व दिले नाही, असे गोपीनाथ सावकार माझे मामा होते आणि मामापेक्षा म्हणाल तर त्यांचं आणि माझं कलेच्या क्षेत्रातलं नातं द्रोणाचार्य-एकलव्यासारखं होतं.

    सबंध आयुष्यात त्यांनी नाटक व सिनेसृष्टीतील माणसं, तिथली अवस्था प्रत्यक्ष पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळेच ‘तू या धंद्यात यायचं नाहीस’, असं त्यांनी मला स्पष्ट बजावलं होतं. मात्र, त्यांच्या नाटकांच्या तालमींना मी न चुकता जायचो. त्यांचं काम पाहायचो. त्यांची डायलॉग बोलण्याची पद्धत, त्यांच्या भूमिका सगळ्याचं निरीक्षण करायचो.

    अर्थानुकूल डायलॉग कसे बोलायचे? वाक्यातला ऱ्हिदम कसा असावा? हे सगळं त्यांचा अभिनय पाहत शिकत गेलो. नट शब्दापेक्षा डोळ्यांनी कसं वाक्य कमीट करू शकतो, हे ते उत्तमरीत्या दाखवायचे. त्यांच्यासारखा डोळ्यांचा उत्कृष्ट वापर करणारा माणूस आजतागायत तरी मी या इंडस्ट्रीत पाहिला नाही. म्हणूनच अभिनयाच्या बाबतीत ते काळाच्याही पुढे होते. ते जो काही अभिनय करत, त्यातल्या काही अंशी मी अभिनय करू शकलो तरी मी स्वत:ला धन्य समजेन. ‘भावबंधन’ मधला धुंडिराज ते सादर करायचे. त्यातल्या आशीर्वादाच्या प्रत्येक प्रवेशाला मी ढसढसा रडलो आहे. माहीत असायचे की, हे नाटक आहे, पण त्यांचा अभिनय पाहून भावना आवरता यायच्या नाहीत. जितक्या सहजतेने ते विनोदी (भादव्या) भूमिका करायचे, तितक्याच सहजतेने सामाजिक नाटकंही करायचे.

    दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं तर त्यांची एक सवय होती. इकडे स्टेजवर नाटक चालू झाले की, हे विंगेत डोळ्यांवर हात ठेवून बसायचे आणि तोंडाने नाटकातले संवाद बोलणं चालूच असायचं. त्यांच्या बंद डोळ्यापुढे नाटक चालू असायचं. स्टेजवरचा नट जरा कुठे चुकला, की त्यांना बरोबर समजायचं, मग ते अस्वस्थ व्हायचे. नाटक जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालायचं नाही. इतका गुणवान माणूस, पण त्यांच्या गुणांची योग्य ती कदर झाली नाही. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्या वाऱ्यालाही कोणी फिरकायचे नाही.

    मला आठवतं, तो काळ मराठी संगीत नाटकांचा पडता काळ होता. एकूण नाटय़सृष्टीच मोडकळीला आली होती. त्यावेळी चारच नाटय़संस्था होत्या. पेंढारकरांची ललितकलादर्श, रांगणेकरांची नाटय़निकेतन, संयुक्त महाराष्ट्र कलावंत आणि माझ्या मामांची कलामंदिर. त्यातल्या ललितकलादर्श आणि नाटय़निकेतन यांचा उल्लेख आताही होतो. याचं कारण त्यांनी यशस्वी नाटकं दिली. माझे मामा यशस्वी नाटक देऊ शकले नाहीत. नाटकाच्या इतिहासातही त्यांचं नाव येत नाही. कारण जग इतकं गतिमान आहे, की तुम्ही काय केलं, यापेक्षा तुमचा गवगवा किती झाला, यावर तुमचं यश इथं मोजलं जातं. जसं यशासारखं दुसरं यश नाही, त्याप्रमाणे अपयशासारखं दुसरं अपयश नाही! हा माणूस तर आयुष्यभर अपयशीच ठरला. ही ट्रॅजिडी आहे. त्यांनी कोणाची स्तुती केली नाही. कोणाची हाजी हाजी केली नाही. जो चांगला असेल, गुणी असेल, त्याला त्याच्या योग्यतेच्या भूमिका दिल्या. जे काही तुम्ही आहात ते करा, करून दाखवा आणि यशस्वी व्हा. याशिवाय तरणोपाय नाही, हा धडा मी त्यांच्याकडून अनुभवाने घेतला.

    बाळ कोल्हटकरांचं ‘दुरितांचं तिमिर जावो’, हे नाटक त्यांच्याकडे प्रथम आलं होतं. तेव्हा मामा दुसरं नाटक बसवत होते. त्यांनी कोल्हटकरांना सांगितलं की, ‘तुझं नाटक करतो,पण माझ्या हातात दुसरं नाटक आहे. ते स्टेजवर आलं की तुझं नाटक करतो. मला तुझं नाटक आवडलंय.’ पण नंतर काय झालं कुणास ठाऊक! ते नाटक दुसरीकडे गेलं. नाही तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं चित्र बदललं असतं.

    ह. रा. महाजनींचं ‘शकुंतला’सारखं नाटक त्यांनी बसवलं. अगदी दृष्ट लागण्यासारखं नाटक होतं, पण चांगलं नाटक असूनही पहिले तीन प्रयोग नायगाव ओपन एअर थिएटरला लावलं आणि भर ऑक्टोबर महिन्यात धो-धो पाऊस कोसळला आणि नाटक पुन्हा उठलंच नाही. याला नशीब म्हणायचं, दुसरं काय!

    मामांचा पाय कापल्यावर कलामंदिरची मॅनेजमेंट, नाटकाची व्यवस्था वडीलच सांभाळत. पण पाय कापला तरी मामा गप्प बसले नव्हते. लाकडाचा पाय लावून चालताना वेदना व्हायच्या तरी ते तीन मजले चढून धापा टाकत यायचे.. तालमींना जायचे. हे सगळे पाहून मी विचार करायचो, ‘काय त्यांच्या मनाचं सामथ्र्य असावं. जे त्यांना सतत नाटक करायला लावत होतं!’

    अशा परिस्थितीतही त्यांना संस्थेसाठी नवीन नाटक करावंसं वाटत होतं. त्यामुळे ते सारखे अस्वस्थ असायचे. त्यांनी शिरवाडकरांकडे नाटक मागितलं. त्यांनी त्यांचं नवीन नाटक ‘सं. ययाती-देवयानी’ मामांना दिलं. नाटय़सृष्टीतील प्रथेप्रमाणे यातही मोडता घालण्याचे चिक्कार प्रयत्न झाले. परंतु शिरवाडकर हे शब्दांचे पक्के! सच्चा माणूस आणि स्पष्टवक्ते! त्यामुळे त्यांनी इतरांना सांगितले, ‘मी तुम्हाला नाटक देऊ शकत नाही. सावकार नाही म्हणाले तर ते तुम्हाला देईन.’ शेवटी ते नाटक मामांनाच मिळालं. सगळ्या बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी हे नाटक बसवलं. शरीर साथ देत नव्हतं. सांपत्तिक स्थिती साथ देत नव्हती. काही ना काही अडचणी येत होत्या. पण नाटक करण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी हे नाटक त्यांनी बसवलं. ‘ययाती आणि देवयानी’चं दिमाखदार प्रॉडक्शन यशस्वीपणे उभं केलं! परंतु दुर्दैवाचा फेरा हा की नाटक चांगलं होतं, प्रयोग भरपूर झाले, परंतु नाटक चाललं असं म्हणता येणार नाही.

    ययाती आणि देवयानी नाटकाचा १९६७ मधील बेळगावचा प्रयोग मी आयुष्यात विसरणार नाही. हे नाटक मला अख्खं तोंडपाठ होतं. ‘तू या धंद्यात अजिबात जायचं नाही,’ असं सांगणाऱ्या मामांनीच छोटू सावंत आजारी पडल्यामुळे या प्रयोगासाठी मला बोलावलं. त्यावेळी झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकणार नाही. अगोदरचा वास्कोचा प्रयोग मामांनी लाकडाचा पाय लावून केला. पण लाकडाच्या पायामुळे त्यांच्या अभिनयात कुठेही कमतरतात आली नव्हती. परंतु जास्त त्रास झाल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. त्या बेळगावच्या प्रयोगात, विदूषकाच्या कॅरेक्टरला मला तुफान रिस्पॉन्स मिळाला. ती माझ्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची भूमिका मी माझ्या गावात केली. शिरवाडकरांचा विदूषक उच्च प्रतीचा होता. मराठीत आतापर्यंत असा विदूषक झालेला नाही.

    नाटक झाल्यावर मामांकडे मी पाहिलं. काहीतरी शाबासकी मिळेल, वाहवा मिळेल. पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. ज्या अर्थी ते वाईट करतोस’ असं म्हणाले नाहीत, त्या अर्थी मी बरं काम केलं असावं, असा मी माझा समज करून घेतला, म्हटलं, छोटू सावंत परत आला की तो हे काम करेल. पण एक दिवस मामा मला म्हणाले, यापुढे हा रोल तूच कर.’ माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रशस्तिपत्र मला त्या दिवशी मिळालं. हा मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गौरव समजतो. मला घेऊन त्यांचे पैसे वाचणार होते असं नव्हतं. माझी नाईट मला व्यवस्थित मिळणार होती. नात्यापेक्षा कलावंतांना महत्त्व देणारा, व्यवहाराला एकदम चोख माणूस!

    झालं! माझा रोल ठरल्यावर त्यांनी मला एक दिवस तालमीला बोलावलं. विदूषकाचं पहिलं वाक्य असतं. होय देवी, मी विदूषक.’ मी म्हटलं, ‘होय देवी, मी विदूषक,’ हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, ‘थांब, थांब’ काय बोललास, ‘विदुषकमधला दू दीर्घ आहे, तू ऱ्हस्व बोललास दू दीर्घ बोल.’ म्हटलं, माझी पहिल्या वाक्याला ही अवस्था, तर पुढे काही खरं नाही. मी हळूच स्क्रिप्ट बंद केलं. म्हटलं, मामा मला कळलं, तुम्हाला काय म्हणायचं ते! मी करतो, बरोबर करतो.’ आणि हळूच सटकलो. उच्चारांच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर. मी नकळत शिकत गेलो! अशी अॅकक्टिंग कर, तशी अॅंक्टिंग कर,’ असं शिकून कुणी नट बनत नसतो. खरं म्हणजे आपण आपल्या गुणवत्तेनुसार ग्रहण करायचं असतं. घडायचं असतं. अभिनयाचे सर्व प्राथमिक धडे मी घेत होतो. ते पुढे डेव्हलप कसे करायचे, हे बघून शिकत होतो. वाक्याला लय किती असावी? पॉज किती असावा? वाक्यात मुव्हमेंट किती असावी? यासाठी ते जीवतोड मेहनत करायचे. कलाकारांकडून स्वत:च्या मनासारखं काम होईपर्यंत काम करून घ्यायचं. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना बक्षिसं मिळाली. अजूनही मिळतात. पण मनुष्यस्वभाव असा आहे की, जर तुमचं नाव नाही, तर तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसांची नावं अभिमानाने केव्हा घेतली जातात? तो यशस्वी असेल तरच! गोपीनाथ सावकार ही व्यक्ती चांगल्या कलाकृती करूनसुद्धा आयुष्यभर अपयशीच राहिली. मग त्यांचा उल्लेख त्यांच्याकडून शिकलेल्यांनी का करावा? गोपीनाथ सावकार हे नाव सांगून त्यांना जर दीडकीचा फायदा होणार नसेल, तर त्यांचं नाव का सांगावं? पण मी मात्र अभिमानानं सांगतो माझे गुरू गोपीनाथ सावकार!

    त्यांच्या परखड स्वभावामुळे त्यांच्यामागे स्तुतिपाठक नव्हते. त्यांनी कधी ग्रुपबाजी केली नाही. प्रसिद्धीसाठी वेगळे मार्ग स्वीकारले नाहीत. त्यांना या सगळ्यांची गरजही नव्हती. पण त्यांच्या अंगी करण्याची उमेद असून, पात्रता असूनही त्यांना जास्त चांगलं काही करायला मिळालं नाही.

    आयुष्यात शेवटपर्यंत लंगडय़ा पायानं ते झगडत राहिले. नाटक करत राहिले. १९७३ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९७४ मध्ये या क्षेत्रात माझा उदय झाला. पण समर्थ कलावंत असलेले माझे मामा मला मार्गदर्शन करायला, घडवायला माझ्यासोबत नव्हते, याचं मला दु:ख आहे. आज माझी नाटकं चालतात, चित्रपट चालतात. दुसरी माणसं पैसे कमावतात. पण मी माझ्या मामांना काहीच मदत करू शकलो नाही. ही माझ्या आयुष्यातील मोठी खंत आहे. माझं सगळं यश त्यांचं आहे आणि त्यांचंच राहणार आहे.

    अशोक सराफ
    (गोपीनाथ सावकार चरित्र आणि आठवणी पुस्तकातून साभार.)

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • एम.एस.सुब्बुलक्ष्मी

    जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला.

    एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं.

    १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते.

    २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅरकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले.

    सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र
    https://www.youtube.com/watch?v=1-VzQZowjBE
    व्यंकटेश स्तोत्र शब्द
    कौशल्या सुप्रजा राम ! पूर्व संध्या प्रवर्तते ,उत्तिष्ठ ! नारासर्दुला ! कर्तव्यं देवं अह्निकम . उत्तिश्ठोत्तिष्ठ ! मनोहर गोविंदा ! उत्तिष्ठ गरुडध्वजा ! उत्तिष्ठ कमलकान्त! त्रैलोक्यंमंगलम कुरु.

    मतससमस्तजगतमधुकैटभअरेह्वाक्सोविहारिणी ! मनोहर-दिव्यमूर्ते ! श्रीस्वामिनी ! श्रीतजनप्रिय -दानासिले ! श्रीवेंकटे सदायिते ! त्वसुप्रभातम त्वसुप्रभातम अरविन्द लोचने ! भवतु प्रसन्नमुख -चन्द्र मंडले ! विधि शंकरेन्द्र -वनिताभीर अर्चिते ! वर्सा सिला नाथ -दायिते ! दयनिधेअत्र्यदि - सप्तऋषयासमुपास्या संध्यामअक्सासिन्धु -कमलानी मनोहरनी, आद्यपदयुगम अर्चयितुम प्रपन्ना शेशाद्री -शेखर -विभो ! तव

  • व्हायोलिनवादक पद्मश्री डी के दातार

    पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हयोलिनवादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.