जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे.
मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले.
पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.
अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.
अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
https://www.youtube.com/watch?v=j0cZearkZss
https://www.youtube.com/watch?v=fXvijeN-m-w
https://www.youtube.com/watch?v=Qi26eVirOhw
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.
वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.
त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.
वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
१९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.
दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.
१९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.
वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-दिव्य मराठी
नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
बिहारच्या बख्तियारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नितीश कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण याच जिल्ह्यातील श्री गणेश हायस्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी पाटणाच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.
नितीश कुमार ज्येष्ट स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या विद्यार्थी आंदोलनात तयार झाले.
शेतकरी कुटुंबातील मुलगा उच्चशिक्षण घेतल्यानंतर कशी कर्तृत्वभरारी घेऊ शकतो, याचा आदर्श कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव जगन्नाथ तथा एन. जे. पवार यांच्या कामगिरीतून महाराष्ट्राला मिळत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसचा युवाशास्त्रज्ञ पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिलची प्रतिष्ठित संशोधनवृत्ती सलग दोनदा पटकाविणारा अभ्यासू विद्यार्थी, पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आता कुलगुरू!
सांगली जिल्हय़ातील ऐनवाडी या छोटय़ाशा गावात हे संशोधन बीज पेरले गेले. पवार यांच्या कुटुंबीयांपैकी महाविद्यालयाचा ‘कॅम्पस’ अनुभवणारे ते पहिलेच! कोल्हापूर विद्यापीठात विशेष श्रेणीने पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भूशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरणीय भू-रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले. प्रयोगशाळेतील संशोधनाची ‘काळय़ा आई’शी नाळ जोडण्यासाठी ते झटत राहिले. म्हणूनच ब्रिटन व जपानमधील ओसाका विद्यापीठात संशोधनाची संधी मिळूनही त्यांना ओढ होती ती मायभूमीचीच! पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून काम करताना भारतीय संशोधन संस्था, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आदींच्या माध्यमातून कोटय़वधींची अनुदाने मिळवीत डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांनाही संशोधनासाठी प्रोत्साहित केले.
भूशास्त्रातील या प्रगत प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक आरोग्य, बदलते पर्यावरण, जलसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अशा अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये पथदर्शी कार्य केले. ‘जनतेची विज्ञान काँग्रेस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पुण्यातील अधिवेशनात भूशास्त्रीय संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या श्रमशक्ती प्रतिष्ठानचे वैज्ञानिक सल्लागार या नात्याने जलनियोजन, ग्रामविकासाकरिता काम करीत सामाजिक बांधिलकीचाही ते प्रत्यय देत आहेत. ‘कोल्हापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये,’ असा जाहिरातींमधील स्पष्ट उल्लेख सहन करीत या विद्यापीठाला एकेकाळी अवहेलना सोसावी लागत होती. त्याच मातीचा सुपुत्र आता कुलगुरुपदी विराजमान झाला आहे. ‘शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचे महाद्वार मी खुले करून देणार आहे. तसेच कृषी-सहकार या स्थानिक बलस्थानांच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची समाजाशी नाळ जोडणार आहे. हे प्रकल्प सिद्धीस गेल्यास विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढेल,’ असा विश्वास डॉ. पवार व्यक्त करतात.
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत.
खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स हे भारतीय चित्रपट संगीतातील एका गुणी कलाकाराचं नाव. इनॉक डॅनियल्स यांचा जन्म १६ एप्रिल १९३३ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या नव्वदाव्या वर्षा नंतर देखील ते त्याच तडफेने अकॉर्डियन वाजवतात.
शंकर-जयकिशन, राम कदम, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अनेक संगीतकारांसोबत इनॉक यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या संगीत संयोजनानाने आणि वादनाने सर्व संगीतकारांना मोहून टाकलं. अप्रतिम गाणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर त्यांची कमालीची पकड आहे .
पंचहौद मिशनच्या चर्चसमोर असलेल्या ख्रिस्ती जमातीसाठी बांधलेल्या चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बेंजो, मोठा भाऊ व्हायोलिन तर दुसरा भाऊ क्लॅरियोनेट वाजवत होते. या सुरिल्या परिवारामध्ये इनॉक यांचा ‘बालपणीचा काळ सुरांचा’ गेला. इनॉक यांच्या वादनाची सुरुवात ड्रमसेटवर झाली. नियतीच्या मर्जीनुसार इनॉक यांच्या नशिबी अॅ्कॉर्डियन होते, पण उपलब्ध असलेल्या वाद्यांत ते नव्हते. त्यांचे वडील ख्रिश्चन बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक होते. चर्च संबंधित असलेल्या युरोपियन फादर यांना वाटले की, हॉस्टेलमधील मुलांना एखादे तरी वाद्य यावे, संगीताची ओळख व्हावी, सुरांची माहिती व्हावी. या उद्देशाने त्यांनी विविध प्रकारची वाद्ये युरोपातून मागवली आणि ती इनॉकला सुवर्णसंधी वाटली; कारण फक्त पाहण्यासाठीही दुर्मिळ असणारी ट्रंपेट- ट्रॉम्बोनसारखी वाद्ये त्याला उपलब्ध झाली. सदर फादर मुलांना आवडेल ते वाद्य शिकवत असत. छोटा इनॉक त्याकडे आसुसून पाहात असे.
युरोपातून एक रेव्हरंड फादर स्लेड पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये आले होते. त्यांची मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यांची आणि इनॉकची चांगली गट्टी जमली. इनॉक यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्याने त्याच्याकडे मराठीचे ज्ञान होते- आजही ते अस्खलित मराठीतच बोलते- पण इंग्रजी मात्र त्या वेळी चांगले नव्हते. मोडक्यातेडक्या इंग्रजी-मराठीत त्यांचा संवाद चाले. त्यांचा आग्रह होता ‘तुम्ही इंग्रजी बोलू नका. मी मराठीत बोलताना ज्या चुका होतील त्या दाखवा व दुरुस्त करा.’ यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली. त्यांना वाटले की, या मुलाला थोडेफार वाजवायला शिकवले पाहिजे. ते उत्कृष्ट पियानोवादक होते. चर्चमध्ये रविवार प्रार्थनेसाठी ऑर्गन असतेच. ऑर्गन व पियानोच्या स्वरपट्टय़ा एकच असतात. रेव्हरंड स्लेडच्या मार्गदर्शनाखाली इनॉकची शिकवणी सुरू झाली. एका वर्षांतच ते ऑर्गन मोठय़ा सफाईने वाजवू लागले. घरीच ऑर्गन असल्याने शिकलेल्या पाठाची उजळणी वेळ मिळेल तेव्हा ते करीत असे. चर्चमधील क्वायर्स, हीम्स आदी प्रार्थना वाजवू लागले.
संगीतातील गायन, हार्मनी, मेलडी हे प्रकार चर्चमध्ये वारंवार वाजवले जातात. प्रख्यात पाश्चात्त्य संगीतकार बिथोवेन, बाख, मोझार्ट यांच्या रचनांचा त्यामध्ये समावेश होते. त्यांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये नोकरी करीत होते. कानपूर येथे बदली झाली तेव्हा एक अँग्लो-इंडियन परिवार भारत सोडून ऑस्ट्रेलियाला चालले होते. त्यांच्याकडून त्यांचा पियानो स्वस्तात मिळाल्याने आपल्या धाकटय़ा भावासाठी ते रेल्वेने पुण्यास पाठवला. घरचेच वाद्य मिळाल्याने इनॉक चोवीस तास रियाज करून कुशल वादक बनला.
इनॉकने पियानो अॅवकॉर्डियनवर वाजवलेले पहिले गाणे ‘आह’ चित्रपटातील ‘सुनते थे नाम हम..’ होते. खूप धमाल आली. इनॉकला पियानो अॅ कॉर्डियन खूपच आवडले. (ओरिजनल ‘पतिता’, ‘आह’, ‘दाग’ या चित्रपटांतील अॅइकॉर्डियनचे सूर मात्र व्ही. बलसारा याने हार्मोनियमवर काढले होते ही माहिती अनेक संगीतप्रेमींना मनोरंजक वाटेल) दिल्लीमध्ये झालेल्या कॉलेज यूथ फेस्टिवलमध्ये इनॉकच्या वादनाने खूपच प्रसिद्धी मिळवली व वाडिया कॉलेजला पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख व्हॅन शिप्ले या प्रख्यात हवाईयन गिटारवादकाशी झाली व एक चांगला सुरेल ग्रुप तयार झाला. त्यांचे संयुक्त वादन श्रवणीय होत असे. शिप्ले मेलडी वाजवत असे तर इनॉक हार्मनीने गाणे सुशोभित करीत असे. साथीला स्पॅनिश गिटार व दोन रिदमिस्टही होते. कॉलेजमधून संगीताकडे वाटचाल चालू झाली व अर्थार्जनही सुरू झाले. त्यांच्या कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी व ‘कम सप्टेंबर’, ‘लाराज थीम फॉर अ फ्यू मोअर डॉलर’ यांसारखी इंग्रजी गाणीही असत.
आता इनॉकचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण अपरिहार्य होते. पुण्याच्या नवयुग स्टुडियोमध्ये चित्रपट चित्रीकरणाबरोबरच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण होत असे. सुधीर फडके, वसंत पवार, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर इनॉकचा परिचय झाला. पु. ल. देशपांडे हे आपल्या ‘गुळाचा गणपती’चे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करीत होते. त्यांना अॅ्कॉडयन खूप आवडत होते, कारण पेटीवादनात ते प्रवीण होते. त्यांनी अॅीकॉर्डियन ऐवजी पियानो वाजविण्याची सूचना केली. खरे तर पियानोमध्येच इनॉक प्रवीण होता. त्यांचे पहिले चित्रपटवादन पियानोनेच झाले. राम कदम वसंत पवारचे साहाय्यक होते, पुणे आकाशवाणीवर क्लॅरियोनेट वादक म्हणून कामाला होते. त्यांना इनॉकचे वादन आवडत असे. त्यांनी स्वतंत्र काम मिळाल्यावर इनॉकला संगीत संयोजक नेमण्याचा शब्द दिला. राम कदम यांच्या सर्व चित्रपटांना इनॉकनेच संयोजन केले. वादन हेच अंतिम ध्येय ठेवणाऱ्या इनॉकचे मुंबईला प्रयाण आता अपरिहार्य होते.
१९६०-६१ ला इनॉक यांनी मराठी चित्रपटात वादन व संगीत संयोजनाला प्रारंभ केला. मुंबईत आल्यावर त्याला पहिला हिंदी संगीतात ब्रेक बिपिन-बाबुल यांच्या संगीत संयोजनाने मिळाला आणि ते लोकप्रिय झाला. त्याने संगीतकारांचे लक्ष वेधले. संगीताची प्रचंड आवड असलेल्या श्रोत्यांना अरेंजमेंट तथा संगीत संयोजनाबद्दल कुतूहल नसल्याने संगीत संयोजक यांची योग्य दखल घेतली गेली नाही. संगीतकारांच्या असामान्य प्रतिभेला सुचलेल्या चालींचे सोने संयोजकांनी केले, अगदी तेडीस तेड काम करून गाण्याला भरजरी रूप दिले व त्यांचे सौंदर्य नटवले, खुलवले.
संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केलेल्या कैफी आजमी यांच्या ‘शगुफ्ता’ अल्बमला इनॉक संयोजक होते. एका गाण्याचे संयोजन इनॉक यांनी इतके अप्रतिम केले की, कलाकार, वादक व ध्वनिमुद्रक सर्वाना ते आवडले. त्यांनी मनापासून दाद दिली.. ध्वनिमुद्रणाच्या वेळी खय्याम नव्हते. त्यांना जेव्हा ती रचना ऐकविली तेव्हा त्यांनी लागलीच इनॉकला रात्रीच फोन केला. ते म्हणाले, ‘डॉन! गाना बहुत अच्छा हुवा है, लेकिन उसमें पोएट्री छूट गयी है। हमें उसकी अरेंजमेंट बदलनी चाहिए, और कल फिर से रेकॉर्ड करेंगे। वैसी ते तुम्हारी अरेंजमेंट गाने से भी बढिम्या हो गई है।..’ त्यानुसार इनॉकने अॅकरेजमेंट बदलून गाणे ध्वनिमुद्रित केले. राम कदम स्वत: वादक असल्याने त्यांच्याबरोबर काम करणे इनॉक यांना सोपे जाई. त्यांची चतुरस्र प्रतिभा रामभाऊ जाणत असल्याने त्याच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळे. रामभाऊंचा झपाटाही विलक्षण होता. एकेका दिवशी पाच-सहा रचना ते ध्वनिमुद्रित करत. मुंबईच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रण होत असल्याने पंडित विधाते या तालवादकाला व इतरही कोरस कलावंतांना पुण्यावरून मुंबईला आणीत. मैलाचा दगड असलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.. त्यामागची कहाणी सांगण्यासारखी आहे. गीतकार, संगीतकार व इनॉक यांच्या अलौकिक मेहनतीची कल्पना येते. शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, रामभाऊंची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्या कडे इनॉक यांनी खूप काम केले. शंकर-जयकिशनकडे अॅीकॉर्डियनसाठी गुडी सिरवाई, धीरजकुमार, सुमित मिश्रा यांसारखे वादक असल्याने इनॉक यांनी त्यांच्याकडे मोजकेच काम केले. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे इनॉक यांच्या अॅजकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली याचा योगायोगही विलक्षण आहे. १९५५ ते ५७ मध्ये इनॉकने व्हॅन शिप्लेबरोबर आफ्रिकेचे अनेक दौरे केले.. तेथील संगीतप्रेमींना त्या दोघांचे वादन खूपच पसंत होते.. त्या वेळी तलत मेहमूद व सी. एच. आत्मा यांचेही कार्यक्रम होत. जानेवारी १९५७ ला भारतात परतताना इनॉक व शिप्ले भेटले. त्यांची लोकप्रियता आत्मानेही अनुभवली होती. भारतात आल्यावर सी. एच. आत्माने एचएमव्हीचे जनरल मॅनेजर चढ्ढांना इनॉकच्या वादनाच्या तबकडय़ा काढण्याची सूचना केली.. एचएमव्हीने त्यानंतर इनॉकच्या खूप गाण्यांच्या तबकडय़ा काढल्या. त्यांचा अभूतपूर्व खप रसिकांमध्ये झाला. इनॉक संयोजक म्हणून अपरिचित असलेल्या गानरसिकांना अॅणकॉर्डियन वादक इनॉकला मात्र आजही खूप जण ओळखतात. त्याच्या रेकॉर्ड्सही संग्रही आहेत. त्यांची रेकॉर्ड झालेली पहिली धून ‘सोलवा साल’मधील ‘है अपना दिल ते आवारा’ आहे. कानसेनांच्या दुनियेत रेडिओ सिलोनचे नाव अग्रगण्य आहे. त्यावर गोपाल शर्मा, विजयकिशोर दुबे नंतर आले. त्यांनी लोकप्रिय झालेल्या कितीतरी कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यामध्येच ‘साज और आवाज’ हा कार्यक्रम आहे.. होता वैशिष्टय़ संगीतकार गायक/वादकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी गायलेली/ वाजवलेली/ संगीत दिलेली गाणी पूर्ण वेळ ऐकवली जातात. १६ एप्रिलला सिलोनने पूर्णवेळ इनॉक यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षांच्या वाढदिवशी रेडिओ सिलोनने इनॉकचे वाद्यसंगीत ऐकवले व त्याचा फोन नंबर दिला. तलत महमूद, व्हॅन शिप्ले व इनॉकचे संयुक्त दौरे आफ्रिकेला झाले. अॅंकॉर्डियनमध्ये ‘गोरे गोरे, ओ बाके छोरे’ वाजवणाऱ्या रेगोला व शंकर-जयकिशनकडे वाजवणाऱ्या गुड्डी सिरवाईला ते गुरुस्थानी मानते.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विलासदत्त राऊत
इनॉक डॅनियल्स यांची वेबसाईट
http://www.enochdaniels.com/about/
इनॉक डॅनियल्स यांचे वादन
https://www.youtube.com/watch?v=b57Ke-2Is0E
https://www.youtube.com/watch?v=mnZM8ANG2Kc
९४० साली वेणूताई बीबीसीमध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं. १९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत.
मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे.
एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि त्यात तो शोभून दिसतो. मराठी सिनेइंडस्ट्रीत अशी काही मोजकी लोक आहेत. या यादीत नम्रता गायकवाड हिचं नाव घेता येईल. मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. तिच्यातले हेच गुण एक अभिनेत्री म्हणून तिला जितके महत्वाचे ठरतात. तितकेच ते तिला मॉडेल म्हणून प्रेजेंट करताना उपयोगी पडतात.
गुणी अभिनेत्री म्हणून यश संपादित केलेल्या तर मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्रात वेगळं नाव कमावलेल्या नम्रताचं फोटोशूट करण्याची संधी मला एका नामांकित वृत्तपत्रामुळे मिळाली. यावेळी एथनिक लूकसाठी डिझायनर साडय़ांमध्ये तिचं फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र, नम्रताचा चेहरा खरं तर एका छायाचित्रकाराला हवा असलेला असा फोटोजेनिक असाच चेहरा असल्याने तिला मॉडेल म्हणून दिल्या गेलेल्या कोणताही पेहरावात ती उठूनच दिसेल याची खात्री मला होती. पारंपरिक वेशभूषा केलेली नम्रता मी छायाचित्रित केली होती. याच्या विरुद्ध वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचं एक छायाचित्र टिपण्याचं मी ठरवलं अन् या छायाचित्रणादरम्यानही ती अधिक खुलल्याचं मला जाणवलं.
मॉडेलचा एक वेगळा रुबाब स्टुडिओत असतो. तो नेमका कसा जपायचा याचे एथिक्स तिला माहीत होते, तर तिच्या गालावर नेमकी खळी कुठे पडते, चेहऱयावर नेमके कुठे कटस् आहेत या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर वेगळ्या प्रकाशरचनेत तिचे छायाचित्र टिपण्याचा मी प्रयत्न केला. या शूटनंतर अनेक प्रकल्पांमुळे नम्रता आणि माझ्यात संवाद झाले. काही प्रकल्पांवर आम्ही कामही केलं. यातून तिचा आजवरचा जीवन प्रवास उलगडला. व्यावसायिक रंगभूमीवरून एकदम छोटा पडदा आणि थेट रुपेरी पडद्यावर झळकलेली नम्रता आज तरुण अभिनेत्रींच्या यादीत महत्त्वाचं स्थान मिळवून आहे.
नम्रताला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खरं तर पूरक असं कोणतंच वातावरण नव्हतं. शाळा-महाविद्यालयातही तिने कधी अभिनयात रस घेतला नाही. तसंच घरी अभिनय क्षेत्राचाही कोणताच धागा नव्हता. वडील राज्य शासनाच्या विद्युत विभागात नोकरी करत होते, तर आई ही गृहिणी होती. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंबाला एका शहरातून दुसऱया शहरात सतत स्थलांतर करावं लागत होतं अन् या स्थलांतराच्या काळात केवळ शालेय शिक्षण हेच नम्रताचं उद्दिष्ट नकळत ठरलं गेलं होतं.
जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाणारा 8 मार्च हा नम्रताचा जन्मदिवस. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नाशिकमध्ये जन्मलेली नम्रता चौथीपर्यंतच्या शालेय शिक्षणानंतर ठाणे जिह्यातल्या कल्याण इथे कायमची स्थायिक झाली अन् शहरबदलीचा तिचा प्रवास कल्याण शहरात आल्यानंतर संपुष्टात आला. कल्याणच्या नालंदा विद्यालयातून पाचवीनंतरचं शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं अन् त्यानंतर तिने बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी कमावली. शालेय शिक्षणासोबतच कल्याणच्याच गुरू लक्ष्मी यांच्याकडून भरतनाटय़मचे धडे तिने गिरवले अन् नृत्याचं बाळकडू लहानपणीच मिळवलेली नम्रता आज रुपेरी पडद्यावर ताल धरताना आपल्याला दिसत आहे.
नृत्यकलेत नम्रताने शालेय काळापासूनच रस घेतला होता. मात्र, अभिनय क्षेत्रापासून ती पार दूर होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर कल्याणच्या आचार्य आत्रे नाटय़गृहात वडिलांच्या कार्यालयातून भरवल्या गेलेल्या एका एकांकिका स्पर्धेला केवळ प्रेक्षक म्हणून आलेल्या नम्रतासाठी तो दिवस टार्ंनग पाईंट ठरला. अभिनयाची चंदेरी दुनिया इथे तिला फारच भावली. अनेक प्रश्नांची कालवाकालव तिच्या डोक्यात यावेळी सुरु झाली. एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक असलेले अशोक समेळ हे नम्रताच्या वडिलांचे जवळचे मित्रच होते. नम्रताला अभिनयाविषयी पडलेल्या प्रश्नांची उकल अशोक समेळांनी केली खरी. मात्र तिला या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अशोक समेळांच्या मार्गदर्शनानंतर अभिनय प्रशिक्षण शिबिरातून नम्रताने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रशिक्षण शिबिराच्या अंती तिला या क्षेत्रात आपलं पाऊल रोवण्यास व्यासपीठ मिळालं ते ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकाचं. ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात रुक्मिणीची भूमिका साकारून नम्रता रंगमंचावर आली अन् इथे तिने रसिक मनावर चांगलीच भुरळ घातली. यापाठोपाठ ‘मंगळसूत्र’ या मालिकेतून नम्रता छोटय़ा पडद्यावर झळकली. अलका कुबल या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीची भूमिका तिने या मालिकेत साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावरून नम्रता घराघरांत पोहोचली. आपला वेगळा चाहता वर्ग तयार होतो न होतो तोच नम्रताला रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली ती ‘स्वराज्य – मराठी पाऊल पडते पुढे’ या सिनेमातून.
व्यावसायिक नाटकानंतर छोटा पडद्यावर अन् लगेच रुपेरी पडद्यावर गुणी अभिनेत्री म्हणून नम्रताने अल्पावधीतच नाव कमावलं. तिच्या याच अभिनयाच्या जोरावर तिला पुढे ‘विजय असो’ या सिनेमात तसंच आता ‘विठ्ठल विठ्ठल’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी चालून आली. विशेष म्हणजे येत्या 18 ऑक्टोबरला तिचा ‘वंशवेल’ हा सिनेमादेखील येऊ घातला आहे. कै. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या शेवटच्या सिनेमात नम्रताची मध्यवर्ती भूमिका असून स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता आणि कुटुंब जपणूक यावर आधारित असलेल्या या सिनेमाकडे नम्रताचंही आता लक्ष लागलं आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले.
मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे.
शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील 'ती येते', 'कैद' या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ' घाशीराम कोतवाल ' मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ' महापूर ' हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच 'मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.
मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ' कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ' बेबी' , 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , ' नरू आणि जान्हवी ' ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या 'बन्या -बापू' मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला.
'श्वेतांबरा' या मालिकेने मोहन गोखले यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'मिस्टर योगी' मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी 'हिरो हिरालाल',' मोहन जोशी हाजीर हो' या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या.
समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ' मिर्च मसाला' , सई परांजपेंचा “ स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' , मीरा नायरच्या ' मिसिसीपी मसाला' या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.
शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी व सखी गोखले ही कन्या. शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी 'आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मराठी मालिका आणि 'लापतागंज' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
कमल हसनाच्या ' हे राम ' च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.मोहन गोखले यांची कारकीर्द
नाटके
कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार, गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट.
दूरदर्शन मालिका
श्वेतांबरा, देखो मगर प्यारसे, यात्रा,भारत एक खोज, लेखू, दोपहर का ठहराव, जंजीरें, अल्पविराम, मिस्टर योगी, भंवर, सी आय डी, करमचंद, जमीर, जुनून, आशीर्वाद, उजाले की अौर, शक्तीमान, बायबल, आहट, देखो मगर प्यारसे, दुनिया रंग रंगीली.
एकांकिका
मात, कैद, लिफ्ट, ती येते, बदाम राणी चौकट गुलाम, स्वराज्याचा कानमंत्र, झुलता पूल, खलित्यांची लढाई, डियर पिनाक, कदाचित, एका म्हाताऱ्याचा खून.
मराठी चित्रपट
बन्याबापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, संसार पाखरांचा, माफीचा साक्षीदार, अरे संसार संसार, आज झाले मुक्त मी, जगावेगळी प्रेमकहाणी, धाकटी जाऊ, अंगार, राजाने वाजवला बाजा, ध्यासपर्व, कैरी.
हिंदी चित्रपट
स्पर्श ,हिरो हिरालाल,मिर्च मसाला,अंधेरनगरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,हंगामा बॉंम्बे स्टाईल ,मोहन जोशी हाजिर हो,कल का आदमी,मिसिसिपी मसाला(English)आदि मिमांसा(अोरिया)भवनी भवाई(गुजराथी)हंसी हंसलाल (गुजराथी)हे राम (अपूर्ण)
दिग्दर्शन
महापूर,बीज,भाऊ मुरारराव,फरारी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti