शेतकरी कुटुंबातील मुलगा उच्चशिक्षण घेतल्यानंतर कशी कर्तृत्वभरारी घेऊ शकतो, याचा आदर्श कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव जगन्नाथ तथा एन. जे. पवार यांच्या कामगिरीतून महाराष्ट्राला मिळत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसचा युवाशास्त्रज्ञ पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिलची प्रतिष्ठित संशोधनवृत्ती सलग दोनदा पटकाविणारा अभ्यासू विद्यार्थी, पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आता कुलगुरू!
सांगली जिल्हय़ातील ऐनवाडी या छोटय़ाशा गावात हे संशोधन बीज पेरले गेले. पवार यांच्या कुटुंबीयांपैकी महाविद्यालयाचा ‘कॅम्पस’ अनुभवणारे ते पहिलेच! कोल्हापूर विद्यापीठात विशेष श्रेणीने पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भूशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरणीय भू-रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले. प्रयोगशाळेतील संशोधनाची ‘काळय़ा आई’शी नाळ जोडण्यासाठी ते झटत राहिले. म्हणूनच ब्रिटन व जपानमधील ओसाका विद्यापीठात संशोधनाची संधी मिळूनही त्यांना ओढ होती ती मायभूमीचीच! पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून काम करताना भारतीय संशोधन संस्था, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आदींच्या माध्यमातून कोटय़वधींची अनुदाने मिळवीत डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांनाही संशोधनासाठी प्रोत्साहित केले.
भूशास्त्रातील या प्रगत प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक आरोग्य, बदलते पर्यावरण, जलसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अशा अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये पथदर्शी कार्य केले. ‘जनतेची विज्ञान काँग्रेस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पुण्यातील अधिवेशनात भूशास्त्रीय संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या श्रमशक्ती प्रतिष्ठानचे वैज्ञानिक सल्लागार या नात्याने जलनियोजन, ग्रामविकासाकरिता काम करीत सामाजिक बांधिलकीचाही ते प्रत्यय देत आहेत. ‘कोल्हापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये,’ असा जाहिरातींमधील स्पष्ट उल्लेख सहन करीत या विद्यापीठाला एकेकाळी अवहेलना सोसावी लागत होती. त्याच मातीचा सुपुत्र आता कुलगुरुपदी विराजमान झाला आहे. ‘शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचे महाद्वार मी खुले करून देणार आहे. तसेच कृषी-सहकार या स्थानिक बलस्थानांच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची समाजाशी नाळ जोडणार आहे. हे प्रकल्प सिद्धीस गेल्यास विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढेल,’ असा विश्वास डॉ. पवार व्यक्त करतात.
शेतकरी कुटुंबातील मुलगा उच्चशिक्षण घेतल्यानंतर कशी कर्तृत्वभरारी घेऊ शकतो, याचा आदर्श कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव जगन्नाथ तथा एन. जे. पवार यांच्या कामगिरीतून महाराष्ट्राला मिळत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसचा युवाशास्त्रज्ञ पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिलची प्रतिष्ठित संशोधनवृत्ती सलग दोनदा पटकाविणारा अभ्यासू विद्यार्थी, पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आता कुलगुरू!
सांगली जिल्हय़ातील ऐनवाडी या छोटय़ाशा गावात हे संशोधन बीज पेरले गेले. पवार यांच्या कुटुंबीयांपैकी महाविद्यालयाचा ‘कॅम्पस’ अनुभवणारे ते पहिलेच! कोल्हापूर विद्यापीठात विशेष श्रेणीने पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भूशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरणीय भू-रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले. प्रयोगशाळेतील संशोधनाची ‘काळय़ा आई’शी नाळ जोडण्यासाठी ते झटत राहिले. म्हणूनच ब्रिटन व जपानमधील ओसाका विद्यापीठात संशोधनाची संधी मिळूनही त्यांना ओढ होती ती मायभूमीचीच! पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून काम करताना भारतीय संशोधन संस्था, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आदींच्या माध्यमातून कोटय़वधींची अनुदाने मिळवीत डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांनाही संशोधनासाठी प्रोत्साहित केले.
भूशास्त्रातील या प्रगत प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक आरोग्य, बदलते पर्यावरण, जलसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अशा अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये पथदर्शी कार्य केले. ‘जनतेची विज्ञान काँग्रेस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पुण्यातील अधिवेशनात भूशास्त्रीय संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या श्रमशक्ती प्रतिष्ठानचे वैज्ञानिक सल्लागार या नात्याने जलनियोजन, ग्रामविकासाकरिता काम करीत सामाजिक बांधिलकीचाही ते प्रत्यय देत आहेत. ‘कोल्हापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये,’ असा जाहिरातींमधील स्पष्ट उल्लेख सहन करीत या विद्यापीठाला एकेकाळी अवहेलना सोसावी लागत होती. त्याच मातीचा सुपुत्र आता कुलगुरुपदी विराजमान झाला आहे. ‘शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचे महाद्वार मी खुले करून देणार आहे. तसेच कृषी-सहकार या स्थानिक बलस्थानांच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची समाजाशी नाळ जोडणार आहे. हे प्रकल्प सिद्धीस गेल्यास विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढेल,’ असा विश्वास डॉ. पवार व्यक्त करतात.